Author: Annant Ppangarkar
संगमनेर | प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यात सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापले असून विकासकामांच्या श्रेयावरून आता थेट ‘क्रेडिट वॉर’ सुरू झाले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यात ज्या विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे, ती सर्व कामे मुळात लोकनेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून झालेली आहेत. हा सर्व प्रकार निव्वळ ‘स्टंटबाजी’ असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे, अशी घणाघाती टीका संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय फटांगरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या या वागण्यामुळे संगमनेरच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला छेद दिला जात असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. अजय फटांगरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला…
श्रीरामपूर – राजकारणात यश मिळवणे सोपे असते, पण संघर्ष आणि अपमानातून तावून सुलाखून निघत जनमाणसात स्थान निर्माण करणे कठीण असते. श्रीरामपूरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या कर्तृत्वातून हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक विजयाची दखल घेत राहुल गांधी समर्थक संघाच्या (RGSS) वतीने त्यांचा नुकताच विशेष सत्कार करण्यात आला. करण ससाणे यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केल्यास, त्यांची ही वाटचाल अतिशय खडतर राहिली आहे. अनुराधा आदिक नगराध्यक्ष असताना करण ससाणे यांना उपनगराध्यक्षपद मिळाले होते. राजकारणात नवखे असतानाच त्यांच्या आयुष्यात मोठा आघात झाला; त्यांचे वडील आणि आधारस्तंभ माजी आमदार जयंतराव ससाणे यांचे निधन झाले. या दुखाच्या काळात सावरत असतानाच त्यांना…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे मोठी क्रांती होणार आहे. यामुळे कामाच्या पद्धती आणि नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार असले, तरी नवीन संधींची दारेही उघडणार आहेत. म्हणूनच प्रत्येक तरुणाने या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. एआयच्या युगात जे सातत्याने शिकतील, तेच टिकतील, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक आणि संशोधक डॉ. अच्युत गोडबोले यांनी केले. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था आणि ‘डबल डेकर ग्रुप’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या विषयावरील चर्चासत्रात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते. यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात, एआय तंत्रज्ञ डॉ. सुयश गुंजाळ, दुर्गाताई…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज- राजकारणात विजय मिळाला की गुलालाची उधळण आणि गल्लोगल्ली फ्लेक्स लावून शक्तिप्रदर्शन करण्याची परंपरा आहे. मात्र, संगमनेरमध्ये या परंपरेला छेद देत एक नवा आदर्श निर्माण करण्यात आला आहे. माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी दिलेल्या सूचनेचे तंतोतंत पालन करत, सेवा समितीने ऐतिहासिक विजयानंतरही एकही फ्लेक्स न लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहरातील बसस्थानक परिसर आणि मुख्य रस्त्यांनी अक्षरशः ‘मोकळा श्वास’ घेतला असून, केवळ फ्लेक्सबाजी करणाऱ्या पुढाऱ्यांना ही मोठी चपराक मानली जात आहे. शब्दाला जागले आमदार!- निवडणूक प्रचारादरम्यान आमदार सत्यजित तांबे यांनी शहराचे विद्रूपीकरण थांबवण्याचे आश्वासन दिले होते. केवळ आश्वासनच दिले नाही, तर…
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टांचे चीज होईल आणि वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे, कारण अचानक खर्च उद्भवू शकतात. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ: आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मिथुन: व्यापार आणि व्यवसायात आज तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा जवळच्या व्यक्तींसोबत विनाकारण वाद होऊ शकतात. अभ्यासात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कर्क: आज तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे आरामाला…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या ५१ कोटी ३९ लाख रुपयांच्या विकासकामांचा आज शुभारंभ होत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शनिवारी, (२७ डिसेंबर) हा सोहळा पार पडणार असून, या निमित्ताने तालुक्यात महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात सकाळी १० वाजता होणार असून तालुक्यातील निळवंडे, तळेगाव, मालदाड, गुंजाळवाडी, वडगाव लांडगा, धांदरफळ खुर्द, चंदनापुरी, हिवरगाव पावसा आणि पिंपरणे या गावांमध्ये विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडणार आहे. यामध्ये…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई केली. या कारवाईत मुळा नदीपात्रातून विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा १० लाख रुपये किमतीचा डंपर जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा पोलीस प्रशासनाने आता थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेरमध्ये ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक शुक्रवारी २६ डिसेंबर रोजी संगमनेर भागात गस्तीवर होते. दरम्यान, बोटा शिवारातील कुरकुंडी फाटा येथे एक अशोक लेलँड कंपनीचा डंपर संशयास्पद…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) संगमनेर शहर परिसरात शुक्रवारी पहाटे दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडसी कारवाया केल्या. या कारवाईत पोलिसांनी ११ लाख ४५ हजार ७०० रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल हस्तगत केला असून, कत्तलीसाठी आणलेल्या १६ गोवंशीय जनावरांची निर्दयतेच्या विळख्यातून सुटका केली आहे. मदिनानगरमध्ये पहाटेची कारवाई-स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक संगमनेर शहर परिसरामध्ये गस्त घालत असताना, त्यांना मदिनानगर येथील गल्ली नंबर २ मध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज दारूचे व्यसन हा केवळ एक स्वभावदोष नसून तो एक गंभीर मानसिक व शारीरिक आजार आहे, असे अमेरिकन मेडिकल असोसिएशननेही मान्य केले आहे. या आजारातून सावरण्यासाठी आणि मद्यपींना सन्मानाचे आयुष्य मिळवून देण्यासाठी ‘अल्कोहोलिक ॲनॉनिमस’ (ए.ए.) ही जागतिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करत आहे. याच कार्याचा भाग म्हणून संगमनेर शहरात एका विशेष ‘जनजागरण सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. संगमनेरमधील नागरिकांसाठी ही सभा उद्या शनिवारी, (दिनांक २७ डिसेंबर) दुपारी चार ते सहा या वेळेमध्ये संगमनेरच्या भंडारी मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे. कोणासाठी आहे ही सभा?- ज्या व्यक्तींना स्वतःची दारू सोडण्याची मनापासून इच्छा आहे, किंवा ज्यांच्या घरात…
संगमनेर (प्रतिनिधी): मालपाणी फाऊंडेशन संचलित ध्रुव ग्लोबल स्कूलने आपल्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाची परंपरा जपत यावर्षी मेवाडच्या गौरवशाली इतिहासावर आधारित भव्य ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन केले आहे. शनिवार, २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता मालपाणी लॉन्स येथे हा प्रेरणादायी सोहळा पार पडणार असून, यामध्ये शाळेच्या माध्यमिक विभागातील ३०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या महानाट्याच्या माध्यमातून परकीय आक्रमकांना तब्बल तीन शतके रोखून धरणारे बाप्पा रावल यांच्यापासून ते अटकेपार झेंडा फडकवणारे महापराक्रमी महाराणा प्रताप यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला जाणार आहे. प्रेक्षकांना यावेळी राणी पद्मिनीचा ऐतिहासिक जोहर, वीर गोरा आणि बादल यांचे अचाट शौर्य, पन्नादाईंचा सर्वोच्च त्याग आणि दानशूर भामाशाह यांच्या दातृत्वाची गाथा…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहराचा नावलौकिक आणि वैभव संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून शहरात प्रशासकीय राजवट असताना जनसामान्यांच्या प्रश्नांवर ब्र काढायला तयार नसलेले महायुतीचे पदाधिकारी आता निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अचानक सक्रिय झाले आहेत. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी अद्याप आपल्या पदाचा कार्यभारही हाती घेतलेला नसताना मुख्याधिकाऱ्यांना निवेदने देऊन आंदोलनाचा पवित्रा घेणे, ही निव्वळ राजकीय स्टंटबाजी असल्याची खरमरीत टीका माजी नगराध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक दिलीपराव पुंड यांनी केली आहे. दिलीपराव पुंड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात महायुतीच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र प्रहार केला आहे. ते म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली संगमनेरने विकासाची…
संगमनेर | प्रतिनिधी सहकारी क्षेत्रात नावलौकिक असलेल्या संगमनेर शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे १४ ते १५ कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. बनावट कर्जप्रकरणे आणि कोऱ्या विड्रॉवल स्लिपचा वापर करून कर्जदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून संस्थेच्या संचालक मंडळासह २२ जणांविरुद्ध संगमनेर न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या पतसंस्था विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश फुलचंद गांधी, बाळासाहेब सहादु हाडवळे, नंदू सुभाष वर्पे, सूर्यभान शेटे, नंदू कारभारी खेमनार, बाळासाहेब जगन्नाथ आहेर, जिजाबापु पोपट शिंगोटे, नामदेव गोविंद आहेर, सुधाकर बाजीराव जाधव, रंगनाथ किसन सानप, अमोल दादासाहेब गुंजाळ, संतोष संपत सातपुते, राजेंद्र…
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे आज पूर्णत्वास जातील. नोकरी किंवा व्यवसायात नवीन प्रकल्पांची आखणी करण्यासाठी हा उत्तम काळ असून वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. आर्थिक बाजू भक्कम राहील, मात्र उत्साहाच्या भरात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ – आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. गुंतवणुकीच्या क्षेत्रात असलेल्या व्यक्तींना चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभल्यामुळे कामाचा ताण कमी होईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. डोळ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर विश्रांती घ्या.…
श्रीरामपूर | महाराष्ट्र संवाद न्यूज चोरीच्या तपासासाठी गेलेल्या पोलीस पथकावर संशयित आरोपीने ट्रॅक्टर घालून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथे घडली आहे. या भीषण हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि त्यांना वाचवण्यासाठी धावलेला एक नागरिक गंभीर जखमी झाले असून, फिल्मी स्टाईलने चालत्या ट्रॅक्टरवर झडप घालून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एका टेम्पो चोरीचा (MH 14 AH 369) गुन्हा दाखल असून हा टेम्पो संशयित आरोपी लक्ष्मीकांत काळू मुंजाळ (रा. कमालपूर) याच्याकडे असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक देशमुख यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस कर्मचारी अजित पठारे व प्रसाद साळवे यांनी…
मुंबई | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण कमालीचे वाढले असून यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी ग्रामीण भागात ‘प्रकाश योजना’ कार्यान्वित करण्यासह सुरक्षिततेच्या विविध प्रभावी उपाययोजना करण्याची आग्रही मागणी केली. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर- मंत्रालयातील दालनात झालेल्या या सविस्तर चर्चेत डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सांगितले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका कृषी आणि दूध व्यवसायात प्रगत आहे. पशुपालनामुळे महिला आणि शेतकऱ्यांचा चारा काढण्यासाठी शेतात सातत्याने वावर असतो,…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज निवडणुकीच्या विजयाचा आनंद साजरा करताना उधळलेला गुलाल आणि कचरा साफ करण्याच्या किरकोळ कारणावरून मंगळवारी (दि. २३ डिसेंबर) संगमनेरच्या इंदिरा नगर भागात मोठा राडा झाला. या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले असून, नवनिर्वाचित नगरसेविका वनिता गाडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एकाच कुटुंबातील चार सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच गाडे कुटुंबीयांवरही गुन्हा दाखल झाला असल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरा नगरमधील गल्ली क्रमांक ४ मध्ये मंगळवारी (२३ डिसेंबर) सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. निवडणुकीच्या मिरवणुकीनंतर परिसरात पडलेला गुलाल स्वच्छ करण्यासाठी नगर परिषदेची अग्निशामक गाडी बोलावण्यात आली होती. पाण्याचा…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या प्रमुख आघाड्यांसोबतच आता भारतीय कम्युनिस्ट पक्षाने स्वबळावर मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या या निवडणुकीत संगमनेर तालुक्यातील सर्व ९ जिल्हा परिषद गट आणि १८ पंचायत समिती गणांमध्ये पक्षाचे उमेदवार उभे करून ताकदीने निवडणूक लढवली जाणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संगमनेर व फॉरेस्ट वाहतूकदार संघटना आणि किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने अकोले नाक्यावरील लालतारा कार्यालयामध्ये गुरुवारी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉ. बापू कानवडे होते. बैठकीची अध्यक्षीय सूचना…
अहिल्यानगर | महाराष्ट्र संवाद न्यूज- जिल्ह्यातील वाढता बिबट-मानव संघर्ष प्रभावीपणे हाताळण्यासाठी आणि वन्यजीव संरक्षणाकरिता वनविभाग आता अधिक गतिमान झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या १४ रेस्क्यू वाहनांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते बुधवारी निळवंडे येथे करण्यात आले. या नवीन वाहनांमुळे वनविभागाच्या ताफ्याचे बळ वाढले असून, बिबट्यांच्या दहशतीखाली असलेल्या गावांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात बिबट्यांचा वाढता वावर आणि मानवी वस्तीत होणारे त्यांचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाकडे जलद प्रतिसाद वाहनांची कमतरता होती. ही गरज ओळखून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एकूण १४…
अहिल्यानगर | महाराष्ट्र संवाद न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्या आणि मानवामधील वाढता संघर्ष रोखण्यासाठी वन विभागाने आता आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. केवळ पिंजरे लावून किंवा गस्त घालून बिबट्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होत असल्याने, वन विभागाने पुण्यातील ‘डी.ए.डी.ए. रिसर्च फाऊंडेशन’ संचलित ‘डावेल लाईफसायन्सेस’ यांच्या सहकार्याने ‘एआय वाईल्ड नेत्रा’ ही स्वदेशी इंटेलिजंट सर्व्हेलन्स सिस्टीम विकसित केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेली ही यंत्रणा आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ही यंत्रणा गस्त घालणे किंवा पिंजरे लावणे या पारंपरिक उपायांच्या पलीकडे जाऊन काम करते. यामध्ये प्रगत ‘कॉम्प्युटर व्हिजन’ आणि ‘डीप लर्निंग अल्गोरिदम’चा वापर करण्यात आला आहे. अनेकदा शेतातील सामान्य सेन्सर वाऱ्यामुळे हलणारी…
मेष- उद्याचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल. अडकलेली कामे मार्गी लागतील, मात्र आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. घाईघाईत कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. वृषभ- आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता असून कुटुंबासोबत तुम्ही आनंदाचे क्षण घालवाल. नवीन गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे आणि जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. अनावश्यक खर्च टाळणे तुमच्या हिताचे ठरेल. मिथुन- नोकरीत सकारात्मक बदलाचे संकेत असून मित्र-मैत्रिणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल आणि प्रवासाचे योग येतील. बोलण्यावर संयम ठेवा जेणेकरून विनाकारण वाद होणार नाहीत. कर्क- तुम्हाला उद्या मानसिक शांतता लाभेल आणि घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. कामाचा…
