Author: Annant Ppangarkar

आजचे राशीभविष्य ​मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा काळ अनुकूल असून जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील, मात्र खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ​वृषभ: आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. घरातील थोरामोठ्यांच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात, परंतु घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना संयम ठेवा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगती करणारा ठरेल. ​मिथुन: तुमच्यासाठी आजचा दिवस धावपळीचा ठरेल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी अधिक कष्ट…

Read More

शिर्डी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून, यामध्ये घातपाताची शक्यता वाटत नसली तरी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्षपाती चौकशी होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. आज रविवारी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबत सावध भूमिका मांडली. केवळ एखाद्या कार्यक्रमातील उपस्थितीवरून कोणावरही थेट आरोप करणे योग्य नसल्याचे सांगत, त्यांनी संबंधित विमान कंपनी, उड्डाणाची परवानगी आणि तांत्रिक बाबींची तपासणी करण्याची मागणी केली. खराब हवामान असताना उड्डाणाची परवानगी का दिली आणि विमान दुसऱ्या विमानतळावर का वळवले नाही, या प्रश्नांचा शोध घेऊन दोषींवर कठोर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- कमी पटसंख्येचे कारण पुढे करत राज्यातील सरकारी मराठी शाळा बंद करण्याचा घाट राज्य सरकारने घातला असून, या निर्णयाविरोधात छात्र भारती विद्यार्थी संघटनेने संगमनेरमध्ये आक्रमक पवित्रा घेतला आहे. शनिवारी संघटनेच्या वतीने संगमनेर बसस्थानक परिसर आणि प्रांत अधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत शासनाचा निषेध करण्यात आला. या आंदोलनानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना पाठवण्यात आले. विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान शालेय शिक्षण मंत्र्यांनी राज्यातील २५८ शाळा बंद करण्याबाबत माहिती दिल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. छात्र भारतीच्या मते, शासनाचा हा निर्णय अत्यंत अन्यायकारक असून तो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारा आहे. सरकारी शाळांमध्ये प्रामुख्याने गोरगरीब, दलित, आदिवासी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे सदैव सुसंस्कृत आणि वैभवशाली शहर म्हणून राज्याला परिचित आहे. याच परंपरेत आता आधुनिक सुरक्षेची जोड देण्यात आली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून आणि संगमनेर नगरपरिषदेच्या पुढाकारातून महाराष्ट्रात प्रथमच ‘रक्षक दल’ हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. महिला, मुली आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तात्काळ सुरक्षेसाठी हे दल चोवीस तास सेवेसाठी सज्ज झाले असून, आज रविवारी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे या दलाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.…

Read More

महिला दिन विशेष… जागतिक महिला दिनाचा उत्सव साजरा होत असताना समाजात परिवर्तन घडवून आणणाऱ्या कर्तृत्ववान महिलांची चर्चा होणे स्वाभाविक आहे. संगमनेरच्या राजकीय पटलावर गेल्या डिसेंबरमध्ये एका तरुण, सुशिक्षित आणि धडाडीच्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. निवडणुकीच्या राजकारणात एकीकडे केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेली महायुती शून्यावर बाद होण्याची स्थिती निर्माण झाली असताना अनपेक्षितपणे धक्कादायक निकाल समोर आला. या विजयातून जिने प्रस्थापितांना विचार करायला भाग पाडले आहे. त्या म्हणजे संगमनेर नगरपालिकेतील शिवसेनेच्या एकमेव विरोधी नगरसेविका साक्षी विनोद सूर्यवंशी. उच्च शिक्षणाची शिदोरी आणि प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून समाजकारणात उतरलेल्या साक्षी सूर्यवंशी यांनी अत्यंत कमी कालावधीत महिलांच्या हक्कासाठी लढणारे एक विश्वासार्ह व्यक्तिमत्व म्हणून…

Read More

अमेरिका खरोखरच भारताचा मित्र आहे की आणखी कोण? आजवरच्या इतिहासात भारताच्या उपयोगी न आलेल्या पहिल्या देशात ज्याचं नाव घ्यायचं ते राष्ट्र म्हणजे अमेरिका. तो जर कोणाचा मित्र होत असेल तर त्यामागे प्रचंड सौदेबाजी आलीच म्हणून समजा. या सौद्यासाठी तो मित्राचीच काय पण सग्यांचीही गय करत नाही. तो आपल्या मित्राची आब राखेल हे कदापि शक्य नाही. अमेरिकेचा हा अनुभव जगातल्या अनेक देशांच्या पदरी असताना भारताने त्याच्यासाठी उघडलेली दारं हा आता गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. विशाखापट्टणम इथे आयोजित ‘मिलन 2026’ या नौदल संचलनासाठी आपण पाचारण केलेल्या इराण नौदलाच्या आयआरआयएस देना या लढाऊ जहाजावर मागच्या दाराने हल्ला करून अमेरिकेने भारताला औकात दाखवण्याचा…

Read More

आजचे राशिभविष्य: रविवार, ८ मार्च २०२६ ​मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान लाभेल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. ​वृषभ: आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. मित्र-मैत्रिणींसोबत आनंदाचे क्षण घालवाल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. ​मिथुन: विचारांमध्ये स्पष्टता ठेवा, यामुळे निर्णय घेणे सोपे जाईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. नोकरीमध्ये वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रवासाचे योग असून तो सुखद होईल. ​कर्क: आज तुम्हाला भाग्याची…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी “जय भवानी, जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय!” या घोषणांनी संगमनेर शहर शनिवारी अक्षरशः दणाणून गेले. शिवसेना-भाजप महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने तब्बल सात तास शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ऐतिहासिक देखावे, ढोल-ताशांचा कडकडाट, अघोरी नृत्य आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आणि अफजलखान वधाचा जिवंत देखावा हे या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संगमनेर नगरपालिकेपासून मिरवणुकीला उत्साहात सुरुवात करण्यात झाली. यावेळी शिवचरित्रकार एस. झेड. देशमुख, नीलम खताळ, शिवसेनेचे शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्यासह…

Read More

संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त काल संगमनेर शहरात निघालेली ऐतिहासिक पारंपारिक मिरवणूक म्हणजे केवळ एक सोहळा नव्हता, तर ते संगमनेरकरांच्या अखंडतेचे आणि अलोट प्रेमाचे दर्शन ठरले, असे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, शहर प्रमुख अमित चव्हाण यांनी म्हटले आहे. या ऐतिहासिक मिरवणुकीच्या आरतीचे मानकरी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब हे ठरले. त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील, कोपरगाव तालुका प्रमुख भरत मोरे, शिवजयंती उत्सव युवक समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी, शिवज्योत प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सर्व सदस्य, तसेच शिवसेना महिला आघाडी आणि तमाम सर्वपक्षीय शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कतारी-चव्हाण म्हणाले, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि शिवजयंती उत्सव…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  मार्चअखेर जवळ आल्याने संगमनेर नगरपरिषदेने मालमत्ता आणि पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी आपली यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित केली आहे. थकबाकी न भरणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून, या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागांतील २२ नळ कनेक्शन खंडित करण्यात आली आहेत. मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी स्वतः या मोहिमेचे नेतृत्व करत थकबाकीदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात केल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. कर वसुलीसाठी मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधिकारी श्वेता शिंदे, कर निरीक्षक बाजीराव नवले आणि वसुली विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. मोठ्या थकबाकीदारांच्या नावांची प्रसिद्धी बॅनर आणि वर्तमानपत्रांतून केली जाणार आहे. नगरपरिषदेने यापूर्वीच थकबाकीदारांना जप्ती आणि नळ कनेक्शन कापण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. मात्र,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- कुटुंब, समाज आणि देशाच्या विकासामध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले असून, त्यांचे हे यश नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एकविरा फाउंडेशनच्या वतीने आयोजित या क्रीडा स्पर्धा केवळ खेळ नसून महिलांसाठी एक मोठे व्यासपीठ आहे. या स्पर्धांमधून मिळणारा आनंद आणि ऊर्जा महिलांना वर्षभराच्या कामासाठी नवी उभारी देईल, असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्य समितीचे सदस्य व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे आयोजित ‘महिला क्रीडा महोत्सव २०२६’ च्या शानदार उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार…

Read More

अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी- अहिल्यानगर जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध गुटखा विक्रीला पोलीस प्रशासनातीलच काही बड्या माशांचे अभय असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत नावानिशी सांगितल्यानंतर, अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार हृदय घोडके आणि अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील शंकर चौधरी या दोघांचीही तातडीने पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. आमदार खताळ यांनी हिवाळी अधिवेशनापासून या पोलीस कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट साखळीवर टीकेची झोड उठवली होती. जिल्ह्यात परराज्यातून येणाऱ्या गुटख्याचा महापूर आला असून, हा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू ठेवण्यासाठी ‘सिस्टीम’च्या नावाने दरमहा सुमारे ९० लाख रुपयांची वसुली केली जात असल्याचा खळबळजनक आरोप आमदार अमोल खताळ यांनी केला होता. केवळ आरोपच नव्हे, तर या वसुलीमध्ये प्रत्यक्ष सहभागी…

Read More

आजचे राशिभविष्य: शनिवार, ७ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कतृत्वाचा गौरव होईल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने काही ठोस निर्णय घेतल्यास भविष्यात मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी सलोख्याचे संबंध राहतील, मात्र प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. सायंकाळी एखादी शुभवार्ता मिळण्याचे योग आहेत. वृषभ आज तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. विनाकारण होणाऱ्या खर्चामुळे तुमची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते. जीवनसाथीसोबत काही कारणावरून मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना संयम ठेवावा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी वरिष्ठांशी नम्रतेने वागावे. नवीन गुंतवणूक करण्यासाठी आजचा काळ मध्यम स्वरूपाचा राहील. मिथुन मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या हायटेक बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य आणि देखणे स्मारक उभारण्यासाठी शासनाकडून निधीची मागणी केलेली आहेच; मात्र शासन निधी देण्यास विलंब करत असेल तर केवळ त्यांच्यावर अवलंबून न राहता लोकवर्गणी, नगरपरिषद, आमदार निधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून येत्या वर्षभरात हे स्मारक पूर्ण केले जाईल, असा निर्धार आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला आहे. संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने स्मारकाच्या स्वरूपाबाबत आयोजित करण्यात आलेल्या नागरिक मत नोंदणी अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या मोहिमेला संगमनेरकरांनी पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, हजारो नागरिकांनी आपले मत नोंदवले आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी यावेळी स्मारकाच्या आतापर्यंतच्या प्रवासावर…

Read More

नवी दिल्ली: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी ५ मार्च रोजी रात्री उशिरा महाराष्ट्रासह देशातील अनेक महत्त्वाच्या राज्यांच्या राज्यपालांच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या मोठ्या फेरबदलामध्ये त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री आणि तेलंगणाचे विद्यमान राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे पूर्णवेळ राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी उपराष्ट्रपती पदी नियुक्ती झालेल्या सी. पी. राधाकृष्णन यांच्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता, मात्र आता राज्याला जिष्णू देव वर्मा यांच्या रूपाने स्वतंत्र राज्यपाल मिळाले आहेत. संपूर्ण देशात झालेल्या या फेरबदलात अनुभवी नेते आणि निवृत्त अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांची आता…

Read More

आजचे राशिभविष्य: शुक्रवार, ६ मार्च २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होताना दिसेल. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील, मात्र खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वृषभ आज तुम्हाला आर्थिक बाबतीत सावध राहण्याची आवश्यकता आहे. विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता असल्याने नियोजित पद्धतीने पावले उचलावीत. मित्रमंडळींच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात, पण घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. बोलण्यावर ताबा ठेवल्यास वादाचे प्रसंग टाळता येतील. मिथुन आजचा दिवस बौद्धिक कामात यश मिळवून देणारा आहे. नवीन…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर शहर आणि परिसरातील गावांतून बेकायदेशीरपणे टाकण्यात आलेल्या ३३ KV वीज वाहिनीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या धोकादायक वीज वाहिनीच्या विरोधात ‘३३ KV बाधित शेतकरी व नागरिक कृती समिती’ आक्रमक झाली असून, उद्या शुक्रवार, ६ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या संगमनेर कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात समितीने स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. संगमनेर शहर १३२ KV ते धांदरफळ दरम्यान ही वीज वाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, ही वाहिनी टाकताना अनेक गंभीर नियमबाह्य बाबी समोर आल्याचा आरोप…

Read More

मुंबई, विशेष प्रतिनिधी – महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत असून राज्यसभेच्या सात जागांसाठी होणारी निवडणूक आता बिनविरोध झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत सात जागांसाठी सातच अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली असून, याबाबतची औपचारिक घोषणा १६ मार्च रोजी केली जाणार आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागांचे वाटप झाले होते. महायुतीच्या वाट्याला सहा जागा आल्या होत्या, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने चार जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. भाजपच्या वतीने राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना संधी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पार्थ पवार यांनी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज अधिक प्रभावी, जबाबदार आणि कायदेशीर चौकटीत राबवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कायद्याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संगमनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी केले. संगमनेर नगरपरिषद आणि प्रजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यशाळेत त्या बोलत होत्या. नगरपालिकेचे बजेट आणि नियोजनाच्या अनुषंगाने या महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रामुख्याने ‘महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५’ या कायद्याचा सखोल अभ्यास, नगरसेवकांची कर्तव्ये आणि विविध विषय समित्यांचे महत्त्व यावर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सभागृहातील कामकाजाची नेमकी पद्धत आणि लोकशाहीतील लोकप्रतिनिधींची भूमिका यावर प्रजा फाउंडेशनच्या तज्ञांच्या टीमने नगरसेवकांना मार्गदर्शन…

Read More

आजचे राशिभविष्य ​मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर प्रसन्न होतील. घरातील वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल असून भविष्यात त्याचे चांगले फळ मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर आहार घेण्याला प्राधान्य द्या. ​वृषभ आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि एखाद्या महत्त्वाच्या कार्यात तुमचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. व्यापारी वर्गाला नवीन संधी प्राप्त होतील ज्यामुळे नफ्यात वाढ होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत खेळीमेळीचे वातावरण राहील. अचानक धनलाभाचे…

Read More