Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: शहरातील मालदाड रोड परिसरात एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात चोरीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सुमारे दोन लाख रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. शहर पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मालदाड रोड परिसरात माऊली कॉलनीमध्ये सेवानिवृत्त अधिकारी रामनाथ म्हातारबा सातपुते (वय ६५) हे आपल्या पत्नीसह राहतात. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घरात ही घटना घडली. चोरट्यांनी वॉल कंपाउंड वरून उडी मारून घराच्या दरवाजाचा कडे कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉक तोडून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व ९६…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन लैंगिक अत्याचारासाठी आपल्या लॉज, हॉटेल किंवा कॅफेचा वापर करण्यास परवानगी देणाऱ्या मालकांवर आता कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (POCSO) मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या सह-आरोपींनाही तितकीच शिक्षा होते. त्यामुळे, अल्पवयीन मुला-मुलींच्या लैंगिक शोषणासाठी जागा उपलब्ध करून देणारे लॉज, हॉटेल चालक, मालक किंवा कॅफे मालक हेही आता कायद्यानुसार गुन्हेगार मानले जातील. काही दिवसांपूर्वी राहुरी पोलीस ठाण्यात एक बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासात असे समोर आले की, आरोपीने पीडित मुलीला दोन वेगवेगळ्या लॉजमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामामध्ये प्रगती होईल आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ (Taurus): आज तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, परंतु तुम्ही त्यावर मात कराल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. अनावश्यक खर्च टाळा. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. मिथुन (Gemini): आज तुम्हाला अनपेक्षितपणे धनलाभ होऊ शकतो. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नवीन लोकांशी संपर्क साधाल, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. कर्क (Cancer): आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर शहराच्या विकासाबाबत नवीन लोकप्रतिनिधींकडून अपूर्ण माहिती दिली जात असून, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप माजी पाणीपुरवठा सभापती सोमेश्वर दिवटे यांनी केला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून शहराला निळवंडे धरणातून थेट पाणीपुरवठा होत असून, जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी २३ कोटी रुपयांचा निधीही यापूर्वीच महाविकास आघाडीतील तत्कालीन नगर विकास मंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच कार्यकाळात मंजूर झाल्याचे व प्रशासकीय काळात हे काम रखडल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. महायुतीच्या आभार सभेत नवीन लोकप्रतिनिधींनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, किशोर पवार आणि नितीन अभंग यांनी सोमवारी एकत्रित पत्रकार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: आरोग्याला बाधा निर्माण होऊन देखील शहरातील गुळातील भेसळीच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप करत संगमनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शंकर रावसाहेब ढमाले गुरुवारपासून (२८ ऑगस्ट) प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण करणार आहे. ढमाले यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना सांगितले की, शहरातील सिद्धी गुळ नैसर्गिक गुळ नावाने विकल्या जाणाऱ्या मोहनलाल बन्सीलाल दर्डा यांच्या दुकानातून मी गुळ खरेदी केला होता. तो खाल्ल्यानंतर माझ्या घरात दोन व्यक्ती आजारी पडल्या आणि त्यांना रुग्णालयात ॲडमिट करावे लागले. त्यामुळे या गुळात भेसळ असल्याचा संशय आल्याने मी नगर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार दाखल…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी घेऊन येणारा ‘संगमनेर फेस्टिवल’ येत्या गुरुवारपासून (२८ ऑगस्ट) सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये विविध लोकप्रिय नाटकांसह संगीत आणि विनोदी कार्यक्रमांचा संगम साधण्यात आला आहे. राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यंदा फेस्टिवलचे १७ वे वर्ष असून राजस्थान युवक मंडळाच्या स्थापनेचे अमृत महोत्सवी वर्ष देखील आहे. फेस्टिवल मध्ये सादर होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती अशी, गुरुवार, २८ ऑगस्ट: सायंकाळी ६:३० वाजता सुप्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांचा गाजलेला एकपात्री प्रयोग ‘वर्हाड निघालंय लंडनला’ सादर होईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. शुक्रवार, २९ ऑगस्ट: सायंकाळी ७ वाजता…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन आनंदी राहील. वृषभ आज तुम्हाला काही आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते, परंतु तुम्ही त्यावर यशस्वीपणे मात कराल. आरोग्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. मिथुन आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक आहे. नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कर्क आज तुम्ही भावनिकदृष्ट्या स्थिर असाल. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध सुधारतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. सिंह आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात मान-सन्मान मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे. कन्या आज तुम्हाला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेरमध्ये ४० वर्षांची मक्तेदारी उलथवून टाकणाऱ्या मतदारांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर आभार मानले. अमोल खताळ हे ‘जायंट किलर’ असले तरी, खरे ‘जायंट किलर’ तुम्ही मतदार आहात, असे सांगत शिंदे यांनी मतदारांचे कौतुक केले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून शिवसेनेचे खताळ निवडून आल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी शिंदे संगमनेरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी थोरात यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. शिंदे म्हणाले, हेलिकॉप्टरमधून यायला तीन तास लागले, पण संगमनेरमध्ये लोटलेला जनसागर पाहता भगवं वादळ इथे आल्याचं जाणवतं. अमोल खताळ हा सर्वसामान्य कार्यकर्ता असून त्याने संधीचं सोनं केलं आहे. त्याला निवडून देणारे तुम्ही मतदारच खरे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रविवारी झालेल्या संगमनेर दौऱ्यादरम्यान त्यांच्या रॅलीत मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. रॅलीच्या वेळी सभेच्या ठिकाणाजवळ काही शिवसैनिकांनी गोंधळ घातला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आमदार अमोल खताळ यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. यादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांची संगमनेरमध्ये भव्य रॅली काढण्यात आली होती, त्यानंतर त्यांची जाणता राजा मैदानावर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, रॅली सभास्थळी पोहोचताच मंचाजवळ अचानक काही कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला आणि गोंधळ वाढू लागला. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करूनही गोंधळ…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन शहरातील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या गुन्हेगारांवर जालना पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम’ अर्थात ‘मोक्का’ (MCOCA) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहे. भोकरदन नाका परिसरातील व्यापारी चंदन बंसतीलाल गोलेच्छा यांना धमकावून खंडणी मागणारे विठ्ठल अंभोरे, अक्षय गाडेकर आणि राहुल गंगावणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तपासात असे समोर आले की, मुख्य आरोपी विठ्ठल अंभोरे आणि त्याच्या साथीदारांचा एक पूर्वेतिहास आहे. त्यांनी जालना तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. या टोळीचा वाढता उपद्रव लक्षात घेता, पोलिसांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संगमनेर दौऱ्यामुळे येथील राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, या दौऱ्याची खरी उत्सुकता केवळ राजकीय भाषणांपुरती मर्यादित नसून, एका स्थानिक नागरिकाने सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या पत्राने ती आणखी वाढवली आहे. या पत्रात, सामान्य नागरिकाने एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट संगमनेरच्या विकासासाठी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामुळे, आता उपमुख्यमंत्री या मागण्यांवर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा दौरा राजकीय सभांपेक्षा स्थानिक जनतेच्या अपेक्षांशी अधिक जोडला गेला आहे, असे दिसते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेले असे आहे सामान्य नागरिकाचे पत्र … माननीय उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: शेअर मार्केटमध्ये आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अहिल्यानगरमध्ये तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी विशाल तुकाराम चव्हाण आणि कृष्णा दगडू शिंदे यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये, अर्जुन गिते यांची २५.५ लाख रुपये आणि इतर तीन जणांची २५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. तक्रारदार अर्जुन गिते यांची २०२२ मध्ये आरोपी विशाल चव्हाण याच्याशी ओळख झाली होती. विशालने ‘व्ही.सी. इन्व्हेस्टमेंट’ या नावाने शेअर मार्केट कंपनी सुरू केल्याचे सांगितले. त्याने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर नफ्याचे आकर्षक व्हिडिओ दाखवून गिते यांच्यासह स्नेहा जोशी, शीतल चव्हाण, आनंद जोशी, आणि…
लोकशाही प्रणालीतील अनेक संस्था या व्यक्तीमुळे सरस ठरत असतात. तर बदनाम प्रमुखामुळे चांगल्या संस्थाही बदनाम ठरतात. देशाच्या निवडणूक आयोगाला टी. एन. शेषन यांनी ज्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं ती उंची केंद्रातल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या निवडणूक आयुक्तांनी मातीमोल करून ठेवली आहे. देशाच्या निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदावर विराजमान झालेला व्यक्ती हा भाजपसाठी दलाली करण्यात मश्गूल बनला असल्याचा आरोप होतो आहे. या आयुक्तामुळे टी. एन. शेषन यांच्या काळातील आयोगाचा मानमरातब कधीच लोप पावला आहे. आपण कोणाला तरी विकलो गेलो आहोत, असा उघड आरोप तरी होऊ नये, असंही या आयोगाच्या आयुक्तांना वाटत नाही. एकाच्या बाजूने निकाल दिला की दुसरा दोष द्यायला मोकळा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष (Aries) आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुमच्या कामात शिस्त आणि नियमितता राखणे महत्त्वाचे आहे. कुटुंबातील प्रश्न सामंजस्याने सुटतील. व्यवसायात काही नवीन सौदे निश्चित होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्या आणि पोटाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ (Taurus) आज तुम्हाला कामात काही अडथळे जाणवू शकतात, ज्यामुळे मन थोडे उदास होऊ शकते. तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. व्यवसायातील सुधारणांसाठी अनुभवी लोकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. प्रेम जीवनात काही गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम ठेवा. मिथुन (Gemini) आज तुमच्या कामात काही बदल होण्याची शक्यता आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: सध्या संगमनेर तालुक्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आपल्या जनावरांना लम्पी प्रतिबंधक लस देण्याचं आवाहन केलं आहे. दूध संघात स्वयंरोजगार केंद्राधिकारी यांचे आढावा बैठकी प्रसंगी ते बोलत होते. देशमुख यांनी लम्पी चर्मरोगाची काही प्रमुख लक्षणे सांगितली. जर जनावरांच्या शरीरावर, विशेषतः डोके, मान, पाय, कास, आणि तोंडात २ ते ५ सेमी आकाराच्या गाठी आढळल्यास, किंवा डोळ्यांमध्ये जखमा झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. देशमुख यांनी या वेळी बोलताना शासनाकडेही…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन शांत होईल. वृषभ (Taurus): आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. पैशांची आवक वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. मित्रांसोबत बाहेर जाण्याचा योग येऊ शकतो. मिथुन (Gemini): आज महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अनावश्यक खर्च टाळा. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा राहील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. कर्क (Cancer): आज तुम्ही भावनिक आणि संवेदनशील राहाल. कामाच्या ताणामुळे थोडे अस्वस्थ वाटू शकते. ध्यान आणि योगामुळे तुम्हाला फायदा होईल. प्रवासाचे योग आहेत. सिंह (Leo): आज तुमचे नेतृत्व गुण दिसून येतील.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | अनंत पांगारकर संगमनेर – पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये बोलविण्यात आलेल्या गणेश मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी जोरदार चर्चा झाली. चर्चेत शांतता समिती संदर्भात मुद्दे उपस्थित झाल्यानंतर गणेश मंडळांमधील वादावरून शाब्दिक गुद्द्याची बाचावाची आणि नेहमीच्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने येणाऱ्या समस्यांवर जोरदार चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर दोन मंडळांमधील वाद सामंजस्याने मिटणार नसेल तर दोघांनाही परवानगी देऊ नका अशा स्पष्ट सूचना श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी स्थानिक पोलीस आणि प्रशासनाला दिल्या. येत्या बुधवारी (२७ ऑगस्ट) श्री गणेशाचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, शासकीय विभागाचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा महाराष्ट्राच्या प्रादेशिक तसेच राष्ट्रीय विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा उपक्रम आहे. या प्रकल्पाचा मूळ मंजूर मार्ग कायम ठेवण्याची तातडीची गरज असल्याचे सांगत आमदार सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना स्मरणपत्र दिले आहे. या पत्रात आमदार तांबे यांनी स्पष्ट केले आहे की मूळ मार्गानुसार नाशिक – पुणे या दरम्यान सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव व राजगुरुनगर अशा भागातून जातो. या सर्व भागांना औद्योगिक व आर्थिक विकासाची संधी मिळावी यासाठीच मूळ मार्ग निश्चित करण्यात आला होता. परंतु सध्या प्रकल्पाचा मार्ग शिर्डीकडे वळविण्याचा विचार सुरू असून त्यामुळे हा भाग वंचित राहील.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: शहरातील कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहायक फौजदार राजेंद्र प्रभाकर गर्गे आणि चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक रामचंद्र गायकवाड यांना लाच प्रकरणी एसीबी ने ताब्यात घेतले आहे. गांजा प्रकरणात मदत करण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करून दीड लाख रुपयांची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) त्यांना रंगेहाथ पकडले. या घटनेने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका गांजा प्रकरणात तक्रारदाराला आरोपी न बनवता साक्षीदार बनवण्यासाठी सहायक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी ५ लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ही रक्कम १.५० लाख रुपये निश्चित झाली. पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरच्या रोटरी क्लब आणि रोटरी आय केअर ट्रस्टने, दर्शन रोटरी नेत्र रुग्णालया अंतर्गत एक अत्याधुनिक ‘रोटरी डोळ्यांचा फिरता दवाखाना’ सुरू केला आहे. मंगळवारी (१९ ऑगस्ट) मालपाणी लॉन्स येथे एका शानदार कार्यक्रमात या फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उद्योजक राजेश मालपाणी, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातुरे, आणि आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे या व्हॅनचे अनावरण करण्यात आले. संजय आणि गिरीश मालपाणी यांच्यासह संपूर्ण मालपाणी परिवार या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होता. प्रकल्प प्रमुख रो. संजय राठी यांनी या फिरत्या दवाखान्याची गरज आणि महत्त्व विशद केले,…
