Author: Annant Ppangarkar
संगमनेर दि. १३ फेब्रुवारी – संगमनेर तालुक्याच्या तहसील कार्यालयाचे विभाजन करून आश्वी बुद्रुक येथे नवे अपर तहसील कार्यालय प्रस्तावित करण्यात आले आहे. अनेक गावांसाठी गैरसोयीचा असलेला हा प्रस्ताव रद्द करण्यात यावा अशी मागणी होऊन देखील सरकार जर ऐकणार नसेल तर सरकार विरोधात जन आंदोलन उभे करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रस्तावित असलेल्या आश्वी बुद्रुक येथील अपर तहसील कार्यालय निर्मितीच्या विरोधात अनेक ग्रामपंचायत यांनी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव केल्यानंतर देखील या प्रस्तावात कोणत्याही सुधारणा झालेल्या नाही. माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रानुसार पूर्वीचाच प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रभावित गावातील नागरिक व जेष्ठ विधीज्ञांची बैठक माजी…
विशेष प्रतिनिधी / प्रवीण पुरो मुंबई – ठाकरे किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, तिथे एक रूपयांचा सुद्धा निधी देणार नाही. निधी पाहिजे, तर भाजपमध्ये प्रवेश करा. भरपूर निधी मिळेल. अन्यथा विकास होणार नाही, असा दम आणि आगाऊपणाची भाषा राज्याचे वादग्रस्त मंत्री नितेश राणे यांनी वापरली आहे. नितेश राणे यांच्या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. देशात लोकशाही शिल्लक आहे का? असा सवाल शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांच्या विधानावरून उपस्थित केला आहे. भाजपच्या ओरोस मंडलचा कार्यकर्ता मेळावा ओरोस येथे भाजपचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पालकमंत्री…
विशेष प्रतिनिधी / मुंबई अँटी करप्शन ब्युरोच्या कारवाईने संकटात सापडलेले शिवसेनेचे कोकणचे कट्टर सैनिक राजन साळवी यांनी अखेर शिवसेनेला रामराम ठोकला. मात्र हे करताना त्यांनी एसीबी कारवाईविषयी ब्र न काढता पक्ष सोडण्याला विनायक राऊत कारणीभूत असल्याचं सांगत आपली कातडी वाचवली आहे. सुमारे चार कोटीच्या बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचं निमित्त करत एसीबीने त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवरही कारवाईची टांगती तलवार उगारली होती. एकीकडे बेहिशेबी मालमत्तेचं प्रकरण डोक्यावर असताना विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे राजन साळवी गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. याच कारणामुळे ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. अशातच त्यांनी बुधवारी पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा देत ठाकरेंची…
अहिल्यानगर दि. १३ – अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २३ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अहिल्यानगर, दि. १३ – शिर्डी शहराच्या मध्यवर्ती भागातून गेलेल्या नगर-मनमाड रोडवरील वाढत्या ट्रॅफिकमुळे आणि भाविकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आणि शहरातील नागरिकांना नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी अतुल चोरमारे यांनी शिर्डी शहरातील अवजड व तत्सम वाहतूक दि. ११ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२५ या कालावधीत पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. लक्ष्मीनगर टी पॉईंट, अहिल्यानगर-मनमाड हायवे (पूर्व बाजू) ते आर.बी.एल. बँक चौक, नगर-मनमाड हायवे (पूर्व बाजू) जाणारी अवजड वाहतूक हॉटेल ऋषिकेश, १८ मीटर रिंगरोड ते आर.बी.एल. बँक चौक १८ मीटर रिंगरोड या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. नगर-मनमाड हायवे (पश्चिम बाजू)…
संगमनेर, दिनांक १३ – पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेच ठेवण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली असून, या संदर्भात दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आमदार अमोल खताळ यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथील लोकसभा सचिवालय येथे भेट घेतली. या भेटीत सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते. रेल्वेमंत्री यांनी संगमनेर मार्गेच हा रेल्वे मार्ग जाईल, असे सकारात्मक आश्वासन दिले. आमदार खताळ यांनी या भेटीत रेल्वे मंत्र्यांना पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेच जावा याबाबतचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. या पत्रात त्यांनी या मार्गाचा शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या…
संगमनेर – दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढणाऱ्या आरोपी अकबर युनूस शेख याच्या गावात पीडितेला न्याय मिळावा तसेच जिहादी प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी यावेळी आरोपीच्या पुतळ्याचे दहन केले. अनुसूचित जातीच्या एका दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा शेजारीच राहणाऱ्या आरोपी अकबर युनूस शेख याने घराच्या छतावर जाऊन, पीडित मुलगी आंघोळ करत असतानाचा व्हिडिओ काढल्याचे घटना मंगळवारी घडली होती. आंघोळ करणाऱ्या अल्पवयीन पीडितेला याची जाणीव होताच तिने आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी घरात असलेले आई-वडील धावत मुलीकडे आले. त्यावेळी या प्रकाराचा उलगडा झाला. परंतु घटनेनंतर गावातील काही बड्या नेत्यांनी सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र…
अहिल्यानगर, दि. १२ फेब्रुवारी – संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखालील महसूलच्या पथकावर झालेल्या हल्ला प्रकरणातील दोघा मुख्य आरोपींना पकडण्यात आहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेने या दोन्ही आरोपींना पकडून तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. विशाल हौशीराम खेमनर (वय ३३, रा. अंभोरे, ता. संगमनेर) व सागर गोरक्षनाथ जगताप (रा. कनोली, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) अशी पकडलेल्या दोघा आरोपींची नावे आहे. हे दोघेही प्राणघातक हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे सांगितले जाते. तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाचे रात्रगस्तीपथक रविवारी रात्री प्रवरा नदीपात्रात कनोली येथे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. येथे पथकाला जेसीबीच्या सहाय्याने वाळू…
संगमनेर, दि. ११ फेब्रुवारी – वारकरी परंपरेचे सामाजिक समतेसाठी मोठे योगदान राहिले आहे. वारकरी संतांचे कार्य सामाजिक जडणघडणीसाठी ऐतिहासिक ठरले आहे. खऱ्या अर्थाने वारकरी धर्माने मराठी मनाची मशागत केली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले. साहित्यिक पठारे यांच्या हस्ते ह. भ. प. ज्ञानेश्वर बंडगर लिखित ‘होय होय वारकरी’, व डॉ. श्रीरंग गायकवाड यांच्या संत एकनाथ महाराजांवरील विशेष अंकाचा प्रकाशन सोहळा रविवारी पार पडला. संगमनेर तालुका वारकरी संघटना, श्री विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाज आणि सांदिपनी गुरुकुल, घुलेवाडी यांच्यावतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाजाच्या जनसखा भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…
मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी – तत्कालीन महसूलमंत्र्यांचे सातत्याने फसलेले वाळू धोरण महसूल विभागाच्या जीवावर बेतले आहे. गेल्या काही वर्षातील एकही महसूल मंत्री अथवा महसूल प्रशासन या वाळू तस्करांचा माज उतरवू शकलेले नाही. राजकीय पक्ष नेत्यांच्या वरदहस्ताने संगमनेर तालुक्यातील सर्व नद्यांचे वाळूच्या रुपाने लचके तोडण्याचे काम तस्करांकडून सुरू आहे. अशाच एका अवैध वाळू उपशावर महसूल विभागाची रविवारी मध्यरात्री वक्रदृष्टी पडली होती. महसूल विभागाच्या रात्र गस्तीवर असलेल्या पथकाने संगमनेर तालुक्यातील कनोली येथे प्रवरा नदीपात्रातून सुरू असलेल्या वाळू तस्करीवर कारवाईचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या वाळूतस्करांनी थेट या पथकाच्या अंगावरच जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला, प्रसंगावधान राखत पथकातील अधिकारी कर्मचारी बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला…
मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे सोलापूरकरांविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळी वंचित बहुजन आघाडी आणि आरपीआयने सोलापूरकर यांच्या घरासमोर आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर सोलापूरकर यांच्या कोथरूड येथील घराबाहेर ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले होते. सोलापूरकर यांच्या घराबाहेर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. मात्र शिवाजी महाराजांबद्दल आक्षपार्ह वक्तव्य प्रकरण कुठे थांबत नाही तोच आता पुन्हा सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब…
संगमनेर, दि. ११ फेब्रुवारी – घरासमोर तात्पुरता आडोसा करून उभारण्यात आलेल्या बाथरूममध्ये आंघोळ करत असताना तिचा व्हिडिओ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अकबर युनूस सय्यद (रा. चिंचोली गुरव, संगमनेर) या आरोपी विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो), अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा, भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील दहावीमध्ये शिकत असलेली सोळा वर्षीय वयाची पीडित तरुणी घरासमोर बॅनरच्या कागदाचा आडोसा करून तयार करण्यात आलेल्या बाथरूममध्ये सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आंघोळ करत होती. वरतून छत नसलेल्या…
मुंबई, दि. ११ फेब्रुवारी – गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्क्यावर धक्के दिले जात आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळातील लोकप्रिय योजनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रेक लावल्याची माहिती समोर आली आहे. लाडक्या बहिणींना द्यावयाच्या प्रत्येकी दीड हजार रुपयांनी सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडल्याने आता हा ताण कमी करण्यासाठी ‘आनंदाचा शिधा’, ‘शिवभोजन थाळी’ आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना थांबविण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदी असताना एकनाथ शिंदेंनी तीर्थदर्शन योजनेची घोषणा केली होती. ज्येष्ठ नागरिकांना प्रमुख स्थळांचे तीर्थदर्शन मोफत घडवले जात होते. मात्र आता ही तीर्थदर्शन योजना थांबवण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे.…
मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी – सराईत गुन्हेगार असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील शाहरुख रज्जाक शेख (वय ३२, रा. खैरी, ता. श्रीरामपूर) याला अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने गावठी कट्ट्यासह पकडले आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल, चार जिवंत काडतुस, एक टोयोटा कंपनीची फॉरच्युनर, एक मोबाईल असा एकुण १० लाख ७४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान…
अहिल्यानगर, दि. ११ फेब्रुवारी – मतदान यंत्र पडताळणी प्रक्रियेत केवळ नेवासा मतदारसंघातील शिवसेनेचे (ठाकरे गट) पराभूत उमेदवार शंकरराव गडाख यांचाच अर्ज राहिल्याने गडाख यांच्या अर्जानुसार मतदान यंत्राची पडताळणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीतील एक व विधानसभा निवडणुकीतील १० अशा एकूण ११ पराभूत उमेदवारांनी निवडणुकीतील मतदान यंत्र पडताळणीसाठी अर्ज केले असले तरी प्रत्यक्षात मात्र आता केवळ एकच उमेदवार पडताळणीच्या रिंगणात राहिला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अहिल्यानगर मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी तसेच विधानसभा निवडणुकीनंतर बाळासाहेब थोरात (काँग्रेस, संगमनेर), प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी-शरद पवार), प्रभावती घोगरे (काँग्रेस, शिर्डी), अभिषेक कळमकर (अहिल्यानगर, राष्ट्रवादी-शरद पवार), संदीप वर्पे (राष्ट्रवादी-शरद पवार, कोपरगाव), राम शिंदे (भाजप,…
मुंबई, दि. ११ फेब्रुवारी – मंगळवारपासून (११ फेब्रुवारी) राज्यात बारावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. ११ ते १८ मार्च दरम्यान ही परीक्षा होत आहे. राज्यभरातून या परीक्षेला पंधरा लाखाहून अधिक विद्यार्थी सामोरे जात आहे. यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेला एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या एकूण संख्येपैकी ८ लाख १० हजार ३४८ मुले, तर ६ लाख ९४ हजार ६५२ मुली आहेत. याशिवाय या परीक्षेला ३७ तृतीयपंथीयांनी देखील नोंदणी केली आहे. महाराष्ट्रात एकूण १० हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ३ हजार ३७३ मुख्य केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.…
विशेष प्रतिनिधी / मुंबई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुहेरी धक्का दिला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडील एसटी महामंडळाची जबाबदारी सनदी अधिकाऱ्याकडे देण्याचा निर्णय घेत पहिला धक्का दिला. आता राज्याच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणावरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान न देण्याचा निर्णय घेत फडणवीस यांनी या प्राधिकरणातून शिंदे यांना बाजूला केल्याची चर्चा सुरु झाली आहे. जुलै २००५ रोजी मुंबईत आलेल्या महापुराच्या धर्तीवर राज्य शासनाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना केली होती. मात्र, आता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेत काही सुधारणा करण्यात आल्यात. यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वगळ्यात आलंय. त्यामुळं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
संगमनेर, दि. १० फेब्रुवारी – तिळगुळ देणे हा सण भारतीय परंपरेत पवित्र मानला जातो. मात्र तिळगुळ या समारंभाच्या नावाखाली महिलांना एकत्र करून तमाम महिला भगिनीसमोर लोकप्रतिनिधींनी वेगवेगळ्या गाण्यांवर केलेला डान्स आणि धांगडधिंगा घालून संगमनेरमधील महिला भगिनींचा अपमान करणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. संगमनेर तालुक्यात अशी असभ्य संस्कृती मान्य नसल्याने संपूर्ण तालुक्यामध्ये या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे. शहरातील जाणता राजा मैदानावर तिळगुळ या कार्यक्रमाच्या नावाखाली महिलांना एकत्र करण्यात आले. अत्यंत गोंधळ झालेल्या या कार्यक्रमात महिलांची कोणतीही सुविधा नव्हती. फक्त राजकीय उद्देशाने सर्व महिलांना एकत्र केले होते. बक्षिसाच्या नावाखाली महिला भगिनींना लाच देण्याचा प्रकार काहीसा यामधून दिसत होता. बेशिस्त आणि…
संगमनेर दि. १० फेब्रुवारी – जनसेवा फाउंडेशनच्यावतीने मकर संक्रांतीनिमित्त संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा-सन्मान महिलांचा’ या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ‘झालय झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट’ आणि ‘मै हु डॉन’ या गाण्याच्या तालावर लहान बालगोपाळांमध्ये सहभागी होऊन माजी खा. डॉ. सुजय विखे व आ. अमोल खताळ यांनी ठेका धरत नृत्य सादर केले. त्यांच्या साथीला उपस्थित असलेल्या महिलांनी सुद्धा या गाण्याच्या तालावर ठेका धरत नृत्य सादर करत एकच जल्लोष साजरा केला. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे माजी खा. डॉ. सुजय विखे आणि रणरागिनी महिला…
अहिल्यानगर दि. १० – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणाच्या बळावर परीक्षेला सामोरे जावे आणि यश संपादन करावे, अशा शुभेच्छा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. ‘आनंददायी परीक्षा’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. बालपणापासून केलेल्या शिक्षण साधनेची ही परीक्षा असून अशा महत्त्वाच्या प्रसंगी आई-वडिल, शिक्षक आणि राज्यशासनही विद्यार्थ्यांसोबत असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात जिल्हाधिकारी म्हणतात, विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी लेखनातील मुद्देसूदपणा, एकाग्रता आणि अभ्यासातील सातत्य या त्रिसूत्रीच्या बळावर परीक्षा आनंददायी बनवावी. आवृत्ती, पाठांतर आणि अखंड स्मरणाच्या आधारे परीक्षेला सोपे करून घ्यावे. प्रत्येक विषयाच्या परीक्षेला सामारे जातांना…
