Author: Annant Ppangarkar
मंगळवार, २३ जुलै लाडकी बहीण योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी सोमवारी पारनेरमध्ये (अहमदनगर) आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांना पिंक रंगाची ई-रिक्षा देण्याची घोषणा केली. राज्यातील प्रमुख १७ शहरात पहिल्या टप्प्यात ही योजना राबविली जाणार असून त्यानंतर जिल्हा नियोजन विकास मंडळाद्वारे टप्प्याटप्प्याने राज्यात सर्वत्र योजना राबविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान लाडकी बहीण योजनेत एकत्रित कुटुंबातील जावेचाही समावेश करण्याबाबत भविष्यात विचार करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेत दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. योजनेच्या प्रचार व प्रसाराची सुरुवात त्यांनी सोमवारी पारनेरमधून केली. यावेळी कृषी मंत्री…
मंगळवार, २३ जुलै विशेष प्रतिनिधी / मुंबई भारतीय जनता पक्षाचे सरकार हे अदानीसाठी काम करत असून महाराष्ट्रातील एकएक करून सर्व प्रकल्प अदानींच्याच घशात घालण्याचा सपाटा सुरु आहे. मुंबईतील महत्वाच्या जमिनी अदानीला कवडीमोल भावाने देण्याचे निर्णय होत असताना आता ऊर्जा प्रकल्पही अदानीलाच देण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या निर्देशाने १६०० मेगावॅटचा औष्णिक व ५००० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प अदानी समुहाला देण्यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. ६० हजार कोटी रुपयांचे हे दोन ऊर्जा प्रकल्पासाठी एकच टेंडर काढून अदानीला बहाल करण्याचा महायुती सरकारचा डाव आहे, असा गंभीर आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी केला आहे. यासंदर्भात अधिक…
सोमवार २२ जुलै गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या मार्गदर्शक, तत्वज्ञ, पाठीराख्यांचा विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. गुरुचरणी आपली श्रद्धा लीन करून पुढील आयुष्य सुखकारक व्हावे ह्या आशिर्वादासह शिष्य गुरुचरणी प्रार्थना करतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंची म्हणजे अध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे पूजन बऱ्याचदा केले जाते. आई-वडील यांच्यानंतर आपण आयुष्याचे गुरु मानत असलेले गुरुचरण हे अकलापूर येथील स्वयंभू श्री. दत्तमहाराज व त्यांच्यानंतर राजकीय गुरु म्हणून आमदार सत्यजीत तांबे यांची मोलाची भूमिका असल्याचा विचार संगमनेर तालुका विद्यार्थी कांग्रेसचे अध्यक्ष गौरव डोंगरे हे मानतात. आमदार सत्यजीत तांबे हे विधानपरिषदेवर निवडून यावेत यासाठी गौरव डोंगरे यांनी मतदानावेळी अकलापूर येथील जागृत दत्त देवस्थानाला अभिषेक करुन नवस केला होता.…
सोमवार, २२ जुलै सर्व काही लाडक्या खुर्चीसाठी सुरू आहे… बघा हा व्हिडिओ…
सोमवार, २२ जुलै मराठा आरक्षणाच्या सगेसोयऱ्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून उपोषण स्थळी वैद्यकीय पथकाकडून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे तसेच सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जरांगे यांनी पाचव्यांदा उपोषण सुरू केले आहे. सोमवारी त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास ओबीसी नेते विरोध करत आहे. लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर जरांगे यांनी आपल्या मागणीसाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.
सोमवार, २२ जुलै नगर जिल्ह्याच्या उत्तर भागाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे भंडारदरा धरण रविवारी निम्मे भरले. मुसळधार नसला तरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. धरण परिसर सततच्या पावसाने चिंब भिजला आहे. सुट्टी असल्यामुळे भंडारदरा घाटघर परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. गेल्या काही दिवसांपासून कळसुबाई, रतनगड, हरिचंद्रगडाच्या डोंगररांगेत पाऊस सुरू आहे. विशेष जोर नसला तरी पाऊस सातत्य टिकवून आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात नियमितपणे वाढ सुरू आहे. ११ हजार ३९ दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा सायंकाळी ५ हजार ५०८ दलघफू झाला होता. धरण ४९.९० टक्के भरले होते. निळवंडे धरण २१ टक्के भरले असून, या धरणाचा पाणीसाठा आज सकाळी २०.६९ टक्के…
सोमवार, २२ जुलै | अहमदनगर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या एका पत्राच्या माध्यमातून एलसीबीसह पोलीस दलातील भ्रष्टाचार समोर आणत कारवाईची मागणी केल्यानंतरदेखील कोणतीही कारवाई न झाल्याने अखेरीस अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. पोलीस दलातील भ्रष्टाचाराने बरबटलेल्या व्यवस्थेविरोधात थेट खासदारच उपोषणाला बसल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी देखील उपोषणात सहभाग घेतला आहे. सोमवारी, २२ जुलैला लंके यांनी उपोषण सुरू केले आहे. तत्पूर्वी भ्रष्टाचाराची मडकी घेऊन उपोषणकर्ते मोर्चा आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात आले. लंके यांच्यासोबत महाविकास आघाडीतील राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि पोलिसांकडून त्रस्त असलेले नागरिकदेखील सहभागी झाले आहे. लंके यांनी गेल्या आठवड्यात नगर जिल्ह्यातील पोलीस…
दूध दरासाठीची शेतकऱ्यांची शेकडो ट्रॅक्टर व ट्रॉलीची भव्य रॅली उद्या प्रांताधिकारी कार्यालयावर धडकणार
सोमवार, २२ जुलै दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये कोतुळ या ठिकाणी गेल्या सतरा दिवसांपासून शेतकरी धरणे आंदोलन करत आहे. या आंदोलनादरम्यान दूध हंडी, कोतुळ बंद, शेतकरी मेळावा अशा विविध मार्गाने आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा आंदोलक शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. कोतुळ आंदोलनाच्या १८ व्या दिवशी अकोले व संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोतुळ ते संगमनेर प्रांत कार्यालय या ५५ किलोमीटर अंतरामध्ये शेकडो ट्रॅक्टर व ट्रॉली यांची भव्य रॅली काढण्याचे नियोजन केले आहे. आंदोलनाच्या १८ व्या दिवशी…
सोमवार, २२ जुलै शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार असून त्यांनीच भ्रष्टाचाराला राजाश्रय दिल्याचा गंभीर आरोप करत उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. केंद्रीय गृहमंत्री शहा भाजपाच्या पुण्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. महाराष्ट्रात कधी नव्हे एवढा मोठा विजय यावेळी भाजप युतीचा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवितांना म्हणाले, पवार केंद्रात मंत्री होते, राज्यात त्यांचे सरकार होते त्यावेळी त्यांनी काय केले? असा प्रश्न उपस्थित करत केंद्राकडून मोठा निधी कधीही पवारांनी महाराष्ट्रासाठी आणला नाही, उलट मोदींनी खूप…
रविवार २१ जुलै लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात जनतेच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहे. मात्र नव्याने पुढारी होऊ पाहणारे काही लोक फक्त पत्रकबाजी करत आहेत. अनेक दिवस संजय गांधी निराधार योजनेच्या बैठका रखडल्याने गोरगरिबांची प्रकरणे प्रलंबित होती ती तात्काळ मार्गी लागावी यासाठी आमदार थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केल्यानेच या समितीच्या बैठका झाल्या. लाभार्थ्यांचे अडवणूक करणाऱ्यांसाठी ही मोठी चपराक होती, याच पोटदुखीतून ते पत्रकबाजी करत असल्याचे टिका काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी केली आहे. थोरात यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर या समितीच्या बैठका घेण्याच्या आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले होते. त्यानंतर समितीची बैठक पार पडली. मात्र या बैठकीवरून राजकारण…
रविवार, २१ जून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर युवक काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी युवा नेत्या, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आल्या असून शहराध्यक्षपदी निखिल पापडेजा यांची पुन्हा फेर निवड करण्यात आली. वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, युवक आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निखिल पापडेजा यांनी मागील पाच वर्षे शहराध्यक्षपद सांभाळले असून अनेक युवकांना मोठी संधी दिली आहे. त्यामुळे त्यांची शहराध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. कार्याध्यक्षपदी – वैष्णव राजकुमार मुर्तडक, अमित गुंजाळ, गोपी जहागीरदार तर उपाध्यक्ष म्हणून सुरभी असोपा, मनोज पुंड, श्रेयश…
रविवार २१ जुलै संगमनेरमधील ‘शक्तिमान टॉवर्स’मध्ये चालणाऱ्या अवैध व्यवसायावर ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या माध्यमातून प्रकाश टाकल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यापूर्वीच येथील वरच्या मजल्यावर सातत्याने आढळणारे गंजाडी, जुगारी आणि दारुडे शनिवार असताना देखील गायब झाल्याचे दिसून आले. मात्र या कॉम्प्लेक्समधील अवैध धंदे शनिवारी देखील सुरूच होते. सुसंस्कृत संगमनेरला अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने लागलेला अवैध धंद्यांचा कलंक अद्यापही कायम आहे. अवैध धंद्यांचा बीमोड करण्याची जबाबदारी ज्या यंत्रणांवर आहे त्या यंत्रणा सध्या तरी सुस्तावल्या असल्याने त्यांच्यावर बातम्यांचा फारसा परिणाम दिसत नाही. एकीकडे पोलीस खात्यातील एलसीबीच्या हप्तेखोरीवरून अहमदनगरचे खासदार उपोषणाच्या तयारीत असले तरी संगमनेरसह जिल्ह्यात अवैध धंदे मात्र अद्यापही जोरात सुरू आहे. खासदारासारखा लोकप्रतिनिधी या विरोधात उपोषणाचा मार्ग…
रविवार २१ जुलै तालुक्यातील लाभार्थ्यांना यापूर्वी प्रकरणे करण्यासाठी होणारा त्रास, दलालांपासून मुक्ती, दरमहा खात्यावर पैसे जमा, सन्मानजनक वागणूक, अडचणी येणाऱ्याच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे आज लोकांची ओढ वाढली असून, भाजपा व समितीचे काम उत्कृष्ट सुरू असल्यामुळे यशोधनला जाणाऱ्यांची संख्या घटल्यामुळे काही नेते व्यथित झाल्याचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांनी म्हटले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दि. १० मार्च २०२४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना संजय गांधी निराधार योजना समिती अशासकीय सदस्य नियुक्तीबाबत शिफारस केली होती. परंतु लोकसभा, शिक्षक विधानपरिषद निवडणुक आचारसंहिता सुरु झाल्याने समिती नियुक्ती प्रलंबित राहिली होती. आचार संहिता संपल्यानंतर समिती अध्यक्ष अमोल खताळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून समिती तात्काळ जाहीर…
रविवार २१ जुलै संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भाग नेहमीच अवैध सावकारकीच्या घटनांनी नेहमीच चर्चेत राहिला आहे. बिरेवाडीतील एका सावकार पिडीत व्यक्तीची आर्थिक पिळवणूक झाली, जमीन लाटण्याचा प्रकार केला, मानसिक त्रास देत पैशाचा तगादा लावत शिवीगाळ, मारहाण करण्याचे प्रमाण वाढल्याने या त्रासाला कंटाळून सबंधित व्यक्तीने संगमनेरच्या उपनिबंधकांकडे तक्रार केली. या रागातून तक्रारदाराबाबत नियोजित कट आखून भ्याड हल्ला करत संपूर्ण कुटुंब संपवायची धमकी दिल्याची घटना गुरूवारी (१८ जुलै) सकाळी बिरेवाडी परिसरात घडली. साकुरजवळील बिरेवाडी गावातील तरुण शेतकरी मुक्ताराम काशिनाथ सागर हे कुटुंबासोबत राहत आहे. याच गावातील सावकार लालू नारायण ढेंबरे व त्यांचा मुलगा योगेश लालू ढेंबरे हे अवैध सावकारकीचा व्यवसाय करत असून…
विशेष प्रतिनिधी / मुंबई सनदी प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर प्रकरणात काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उडी घेतली असून हा सरकारच्या दुर्लक्षतेचा परीणाम असल्याचा आरोप करत सरकारला घेरलं आहे. खेडकर यांच्याविरोधात दिल्ली क्राइम ब्रँचमध्ये एफआयआर दाखल केला आहे. बनावट कागदपत्र, फसवणूक, आयटी कायदा आणि अपंगत्व कायद्याच्या कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा खेडकर यांच्यामुळे यूपीएससीची प्रमाणपत्र प्रणाली आणि त्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. प्रियंका गांधी यांनी या प्रकरणावरुन सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. हे प्रकरण म्हणजे लाखो तरुणांच्या स्वप्नांवर आणि विश्वासावर हल्ला असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. प्रियंका गांधी वाड्रा यांनी शनिवारी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवर एक…
रविवार २१ जुलै विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शनिवारी संध्याकाळी नगर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. वादग्रस्त ठरलेल्या नगर एलसीबीच्या उपनिरीक्षक सोपान गोरे यांचा समावेश असून या शाखेत मोठे फेरबदल करण्यात आले आहे. तर जिल्हा पोलीस अधीक्षकांनीदेखील प्रशासकीय बदल्यांची कार्यवाही शनिवारी सुरू केली. शनिवारी पोलीस मुख्यालयात प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती दरम्यान जिल्ह्यातील कार्यकाळ संपलेल्या २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या दुसऱ्या जिल्ह्यात करण्यात आल्या आहे. खासदार निलेश लंके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या कारभाराच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असून या मागणीसाठी ते सोमवारपासून उपोषण करणार आहे. लंके यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षकांमार्फत…
महाराष्ट्रात सध्या जनलाचारीचा महिमा सुरू आहे. लोकांना काय पाहिजे याचा विचार न करताच राज्यातल्या शिंदे सरकारने आपला खजिना रिता करण्याचा खेळ सुरू केला आहे. आवश्यकता नसूनही तो आम्ही देणार अशा मानसिकतेत सरकारने आपली पोतडी खुली केली आहे. एखाद्या जपान वा स्वीस देशाने करावी अशी ही खिराफत महाराष्ट्रातील लोकांच्या वाट्याला आली आहे. एव्हाना आर्थिक धोरणाविषयी भली मोठी व्याख्यानं झोडणार्यांना जे जमलं नाही ते एकनाथ शिंदेंच्या सरकारने करून दाखवलं आहे. कमाईपेक्षा खर्च वाढला की घर चालवणं अवघड जातं. मग कर्ज आणि कर्ज. ते भरणं अवघड झालं की संकट आलंच म्हणून समजा. घरासारखीच अवस्था देशाची होत असते. देश रसातळाला जाऊ नये, म्हणून राज्यांवर…
शनिवार २० जुलै केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अध्यक्ष मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्या वैयक्तिक कारणास्तव हा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, पूजा खेडकर प्रकरणामुळे सोनींनी राजीनामा तर दिला नाही ना, याबाबतदेखील आता अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. सोनी यांनी गेल्यावर्षीच यूपीएससीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ आणखी चार वर्षांनी २०२९ मध्ये संपणार होता. परंतु, त्यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच अचानकपणे राजीनामा दिल्याने यूपीएससी चर्चेत आली आहे. या राजीनाम्याचा अर्थ खेडकर प्रकरणाशीही लावला जात असल्याने खळबळ उडाली आहे. सोनी २०१७ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या घटनात्मक मंडळाचे सदस्य झाले.…
खासदारांच्या एलसीबी विरोधातील लेटर बॉम्बकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठांचे दुर्लक्ष अहमदनगर पोलीस दलात नेमकं काय सुरू आहे? एलसीबीला नेमका आशीर्वाद कोणाचा? एलसीबीतील हप्तेखोरांची नावानिशी तक्रार करून अद्यापही दखल नाही शनिवार २० जुलै | अनंत पांगारकर अहमदनगर पोलीस दलातील विशेषत: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील (एलसीबी) भ्रष्टाचारा विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे खासदार निलेश लंके यांनी एका पत्राद्वारे तक्रार करून देखील आठवडा उलट झाला तरी दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे सोमवारपासून (२२ जुलै) लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे स्पष्ट केले. अहमदनगर एलसीबीच्या विरोधात…
विशेष प्रतिनिधी / मुंबई पक्ष फुटीचे अनेक दरवाजे ओलांडणारे काँग्रेसचे बांद्रा येथील आमदार बाबा सिद्धिकी यांचे पुत्र झिशान सिद्धिकी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून बांद्रा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून दबावतंत्राचा वापर सुरु केला आहे. उमेदवारी न मिळाल्यास महाविकास आघाडीला सांगलीप्रमाणे धडा शिकवू असा इशारा दिला आहे. महिन्याभरापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सांगली जागेवरून वाद झाल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता, याची आठवण झिशानने करून दिली आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडत अजित पवार गटात समावेश केला आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांचे पुत्रे झिशान सिद्दीकी हे एकटे पडले…
