Author: Annant Ppangarkar
मंगळवार, ३० जुलै विशेष प्रतिनिधी / मुंबई उरण हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी दाऊद शेखला कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली. दाऊदचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दाऊदचे मित्र, नातेवाईकांची मदत घेतल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी पत्रकारांना सांगितलं. मुख्य संशयित आरोपी दाऊदच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके कर्नाटकात पाठवण्यात आली होती. उरणमध्ये एका २२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी संशयित आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला कसं पकडलं याची माहिती दिली. यासह पीडितेची हत्या कशी झाली, यावरही पोलिसांनीही भाष्य केल. तरुणी तसंच आरोपी यांच्यात मैत्री होती. मृत तरुणीचा आरोपीशी गेल्या तीन-चार वर्षांपासून संपर्क नव्हता. त्यातूनच…
मंगळवार, ३० जुलै खासदार निलेश लंके यांच्या उपोषणानंतर अहमदनगर जिल्ह्यात नगरच्या पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचा भ्रष्टाचार समोर आला असतानाच आता एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे देखील हप्तेखोरी समोर आली असून या भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली आहे. एस टी महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी हप्ते घेऊन संगमनेर तालुक्यात व नगर जिल्ह्यात हॉटेल, ढाब्यांवर एसटी बसेससाठी अनधिकृत थांबे तयार केले आहेत. या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करत आहे. हप्ते घेऊन बेकायदेशीररित्या सुरू असलेले अनधिकृत थांबे त्वरित बंद करून अधिकारी, कर्मचारी, बस चालकांवर कारवाई करण्याची मागणी कतारी यांनी केली आहे. संगमनेर तालुक्यात…
मंगळवार, ३० जुलै अवैध धंद्यांवर कारवाईसाठी जिल्हा पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली असल्याचे वृत्त असून अहमदनगर एलसीबीने १६ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात २२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. एकीकडे पोलीस ॲक्शन मोडवर आले असले तरी, दुसरीकडे मात्र संगमनेरमध्ये सर्व काही आलबेल असून येथील अवैध धंदे नियमितपणे सुरळीत सुरू आहेत. या धंद्यांवर कारवाईसाठी पोलिस नावाच्या यंत्रणेकडे वेळ नसल्याचे दिसते. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कारवाया करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी पोलिस ठाण्यांना भेटी देऊन कारवायांचा आढावा घेतला आहे. पोलिस ठाण्यांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र अवैध धंद्यांवरील कारवाईचे…
मंगळवार, ३० जुलै सर्वत्र डिजेला बंदी आहे, तरीही संगमनेरमध्ये जमिनीला हादरे देणारे कर्णकर्कश आवाजाचे डीजे सर्रासपणे दणदणाट करत आहे. बंदी असलेल्या या डीजेच्या आवाज बंद करण्याची मागणी संगमनेरमधील जेष्ठ नागरिकांनी पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ज्येष्ठ नागरिकांनी म्हटले आहे की, शहर व तालुक्यातील अनेक गावात डीजेचा दणदणात सुरू असल्याने त्याच्या कर्कश आवाजाने नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. लहान मुले, आजारी असलेले नागरिक यामुळे त्रस्त झाले आहे. सरकारने ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत कायदा करून देखील सर्व नियम धाब्यावर बसवून परिसरात…
मंगळवार, ३० जुलै मोठ्या आवाजातील फटाके फोडणारे सायलेन्सर, कंटाळा बसविणारे सायलेन्सर, चित्रविचित्र हॉर्न वाजवत रस्त्यावर स्टंटबाजी करत रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचविण्याची शक्यता निर्माण करणाऱ्या हुल्लडबाजांवर संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी कारवाईचा हिसका दाखविला आहे. सोमवारी संगमनेर शहरातील शासकीय विश्रामगृह ते अमृतवाहिनी कॉलेज पर्यंतच्या जुन्या मार्गावर दोन मोटरसायकलस्वारांनी स्टंटबाजी करत आपल्या दुचाकी भरधाव वेगाने नेल्या होत्या. याच दरम्यान या रस्त्यावरून जाणाऱ्या काही दक्ष नागरिकांनी या हुल्लडबाज, स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचे फोटोग्राफ्स, व्हिडिओ काढून ते संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांना व्हाट्सअपवर पाठविले होते. बघा व्हिडिओ… वाघचौरे यांनी हे व्हिडिओ फोटोग्राफ्स बघितल्यानंतर ताबडतोब दोन्ही मोटर सायकलस्वार तरुणांचा शोध घेण्याच्या…
मंगळवार, ३० जुलै विशेष प्रतिनिधी / मुंबई – राज्यातील उद्योगधंदे हे त्या राज्यातील तरुण-तरुणी यांच्या हाताला काम देतात. रोजगार देतात. परिणामी त्या राज्यातील बेकारी कमी होऊन तरुणांच्या हाताला रोजगार मिळतो. मात्र कोरोनाच्या महामारीनंतर म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये आणि महायुतीच्या सरकारमध्ये जुलै २०२० ते जुलै २०२४ या मागील चार वर्षांत राज्यातील बारा हजार लघुउद्योग बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात मागील अडीच वर्षांपासून महायुतीचे सरकार आहे. या अडीच वर्षांत राज्यातील अनेक उद्योगधंदे हे परराज्यात गेले. गुजरातमध्ये उद्योगधंदे पळवल्याची ओरड विरोधकांकडून होत आहे आणि हे सरकार गुजरात धार्जिने, महाराष्ट्र विरोधी असल्याची टीका विरोधकांकडून होत होती. मात्र या अडीच वर्षातच नाही…
सोमवार, २९ जुलै अहमदनगर – नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये अहमदनगर जिल्हा तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये ६४ हजार ७२२ प्रकरणे निकाली निघाली असून यामध्ये १ अब्ज ३८ कोटी २२ लाख ५१ हजार ३०४ रुपयांची वसुली झाली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा सरकारी वकील ॲड. सतीश पाटील, अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नरेश गुगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधिक्षक (गृह) हरीश खेडकर, ॲड. भूषण बऱ्हाटे, ॲड. विक्रम वाडेकर, ॲड. सागर पादिर, ॲड. राजाभाऊ शिर्के, ॲड. पिंटू…
सोमवार, २९ जुलै अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी एलसीबीतील भ्रष्टाचाराविरोधात एल्गार देत जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषण केले. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या आश्वासनामुळे लंके यांनी आपले उपोषण मागे घेतले असले तरी संगमनेरमधील अवैध धंदे सुरूच आहे. लंके यांच्या उपोषणाकडे पाठ फिरविणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यांकडे देखील दुर्लक्ष केले की काय? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. अवैध धंद्याच्या माध्यमातून एलसीबी भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे. खासदार लंके यांनी उपोषणादरम्यान जाहीर केलेल्या या भ्रष्ट शाखेच्या रेटकार्डचा जर विचार केला तर तब्बल तीस कोटी रुपयांचा हप्ता दरमहा एलसीबी गोळा करते. या रेडकार्ड मध्ये लंकेंकडून राहिलेली…
सोमवार, २९ जुलै – प्रतिनिधी घराबाहेर खेळणाऱ्या पाच-सहा लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने या संबंधीचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांची धरपकड सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पालिका प्रशासनाला धन्यवाद दिले आहे. संगमनेर शहरात दहशत निर्माण केलेल्या मोकाट कुत्र्यांनी शुक्रवारी रात्री नाशिक-पुणे महामार्गालगतच्या मोगलपुरा (राजवाडा) भागात घराबाहेर खेळणाऱ्या लहान मुलांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात पाच ते आठ वर्षे वयोगटातील पाच सहा लहान मुले गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यामुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मोकाट कुत्र्यांचा हल्ल्यात पाच-सहा लहान बालके गंभीर जखमी झाल्याचे वृत्त महाराष्ट्र संवाद न्यूजने आपल्या वेब पोर्टलवर…
सोमवार, २९ जुलै पोलीस इन्स्पेक्टर बोलतोय, “माझा माणूस दुकानात येईल, त्याला जी वस्तू हवी ती द्या,” असे सांगत दुकानदारांना लुटणाऱ्या दोघांपैकी पोलीस असलेल्या तोतयाला अटक करण्यात आली असून तोतया पोलीस इन्स्पेक्टरचा शोध सुरू आहे. नितीन बोराडे असे तोतया पोलिसाचे नाव असून त्याचा साथीदार गणेश पुजारी याचा शोध सुरू आहे. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गणेश पुजारी हा दुकानदारांना फोन करत “मी पोलीस इन्स्पेक्टर बोलत आहे, माझा माणूस दुकानात येईल. त्याला जी वस्तू हवी आहे ती द्या”, असे सांगत असे. त्यानंतर नितीन बोराडे त्या दुकानात जायचा. वस्तू घ्यायचा, पैसे साहेब देतील, असे सांगून तेथून निघून जात असे. गणेश पुजारी…
सोमवार, २९ जुलै अंगणवाडी बांधकामाचे बिल काढण्यासाठी लाच घेताना अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि सहाय्यक लेखाधिकार्यास न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लाचखोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या टक्केवारीच्या मागणीबाबत चर्चा सुरू आहे. अक्कलकुवा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय लोंढे (वय ३९) व सहाय्यक लेखाधिकारी रवींद्र सुखदेव लाडे (वय ४७) अशी पोलीस कोठडी देण्यात आलेल्या लाचखोर आरोपींची नावे आहे. अंगणवाडी बांधकामाचे बिल काढण्यासाठी लाच घेताना नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले होते. दोन्ही लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात लाच लुचपत विभागाच्या कारवाईनंतर अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सोमवार, २९ जुलै शेतामध्ये गवत कापत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने वयोवृद्ध महिलेवर हल्ला करत तिला शेतात ओढून नेत असताना नातवाच्या हा प्रकार लक्षात आल्याने बिबट्याच्या मागे धाव घेत बिबट्याच्या तावडीतून त्याने आजीचा जीव वाचविण्याची घटना समोर आली. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी महिलेवर संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संगमनेर तालुक्यातील देवगाव गावामध्ये ही घटना रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. भिमाबाई लक्ष्मण लामखडे (वय ७५, रा. देवगाव, संगमनेर) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीमाबाई लामखडे आपल्या शेतामध्ये गवताची कापणी करत होत्या. यावेळी जवळच बिबट्या दबा धरून बसला होता. जवळ असलेला…
रविवार, २८ जुलै मुंबई – नुकत्याच निवडून आलेल्या विधान परिषदेच्या ११ जागांवरील नवनिर्वाचित सदस्यांना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज रविवारी (२८ जुलै) विधान परिषद सदस्यत्वाची शपथ दिली. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे पाच, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) दोन काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रत्येकी एक आमदाराचा समावेश आहे. निवडून आलेल्या योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव यांचा शपथ घेणाऱ्या सदस्यात समावेश आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडले होते. निवडून आलेल्या या सर्व सदस्यांना…
रविवार, २८ जुलै संगमनेर – केंद्रातील भाजप सरकारने स्वायत्त असलेल्या ईडी, सीबीआयसारख्या संस्था आपल्या गुलाम बनविल्या. दबावाचे राजकारण सुरू केले. देशात महागाई, बेरोजगारी वाढीस लागले असून शेतकरी, कामगार, सर्वसामान्य माणूस अडचणीत आला असताना त्याकडे सरकारने लक्ष दिले नाही. प्रचंड जातीभेद आणि घमेंड असलेल्या केंद्रातील भाजप सरकारला रोखण्याचे काम महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि येथील जनतेने केले आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी येथे आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून ५ कोटी २७ लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे,…
रविवार, २८ जुलै मुंबई – शिळफाटा येथील एका मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा तपास जलदगतीने करण्यात येणार आहे. दोशींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी कार्यवाही करत हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार असून विशेष सरकारी वकील म्हणून या खटल्यात उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाणे नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना दिल्या आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून याप्रकरणी ठाणे आणि नवी मुंबई पोलीसांकडे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटना शिळफाटा, ठाणे येथे घडली असून तेथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
रविवार, २८ जुलै स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि घंटागाडीवर घरोघर जात कचरा गोळा करण्याचे काम करणाऱ्या कामगारांच्या प्रश्नी ठेकेदार आणि संगमनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांसह १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संगमनेर शहर व उपनगरातील कचरा उचलणाऱ्या ठेकेदार कंपनीने “स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर” या ब्रीद वाक्याची पूरती वाट लावली आहे. या कंपनीशी संलग्न असलेल्या घंटा गाडीवरील कचरा गोळा करणारा कामगारांच्या उघड्यावरच निर्माण केलेल्या वस्तीमुळे या कामगार, त्यांच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. वारंवार निवेदने देऊन तक्रारी करून देखील संगमनेर नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल वाघ…
रविवार, २८ जुलै नवी दिल्ली : शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दहा राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपालांच्या बदल्या तसेच नियुक्त्यांचे वृत्त जारी करण्यात आले. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राला तिसऱ्यांदा नवे राज्यपाल मिळाले आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. राष्ट्रपती भवनाकडून याविषयी परिपत्रक प्रसिद्धीस देण्यात आले. त्यानुसार संबंधित नेत्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून या नियुक्त्या लागू होतील. राधाकृष्णन सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. त्यांच्या जागी संतोषकुमार गंगवार यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात येईल. तमिळनाडूचे ६७ वर्षीय राधाकृष्णन भाजपचे नेते आहेत. त्यांचा जन्म चार मे १९५७ रोजी तिरुपूरमध्ये झाला. वयाच्या १६…
दुसर्यावर आरोप करणारा आपण किती पाण्यात आहोत, याचा विचार कधीच करत नसतो. नैतिकता गुंडाळलेल्यांकडून तर याची अपेक्षाही नसते. तेव्हा अमित शहा आणि त्यांच्या कंपुतली माणसं कोणावर काय टीका आणि आरोप करतात याकडे पाहावं अशी परिस्थिती नाही. मात्र यामुळे परिस्थिती बिकट बनते, अनेकांच्या भावना दुखावतात, मनं विस्कळीत होतात, असं होणं हेही अयोग्यच. म्हणूनच अशा बावळट आणि अहंकार्यांचा समाचार घेणं अगत्याचं ठरतं. गेल्या रविवारी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा पुण्यात येऊन गेले. लोकसभा निवडणुकीत सपाटून आपटलेल्या भाजपच्या पदाधिकार्यांना जागं करण्यासाठी पक्षाने पुण्यात कानफुंकणीचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात विरोधकांवर मनसोक्त टीका करून शहांपासून…
रविवार, २८ जुलै – अहमदनगर जीवन एक तडजोड आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येकाने तडजोड करायला शिकले पाहिजे. आप आपसात तडजोड करून जास्तीत जास्त वादातील प्रकरणी मिटविले पाहिजे. लोक अदालत मध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महसूल, वीज वितरण, बँका, पतसंस्था, इन्शुरन्स कंपनीचा सहभाग असतो. त्यामुळे लोक अदालत हा एक महायज्ञ असून त्यामध्ये प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन अहमदनगरचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर बार असोसिएशन आणि सेंट्रल बँक असोसिएशनच्यावतीने शनिवारी (२७ जुलै) आयोजित केलेल्या लोक अदालतीचे उद्घाटन न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, अतिरिक्त पोलीस…
शनिवार, २७ जुलै पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वाचे काम दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून संगमनेरमध्ये सुरू आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या कामाची दखल काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर युनोस्कोत घेतली गेली असून तालुक्यात वृक्षांची संख्या वाढली असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट, युवक काँग्रेस आणि कऱ्हे ग्रामस्थांच्यावतीने संगमनेरजवळ नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कऱ्हे घाटामध्ये शनिवारी थोरात यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. थोरात म्हणाले, स्वर्गीय भाऊसाहेब थोरात…
