Author: Annant Ppangarkar
विशेष प्रतिनिधी / मुंबई उप मुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री खा. सुनील तटकरे यांच्या बरोबरच आता राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही ३३ कोटी रुपयांच्या वृक्ष लागवडीच्या भ्रष्टाचार प्रकरणी क्लीनचिट देण्यात आली आहे. मुनगंटीवार यांना देण्यात आलेल्या क्लीनचिटमुळे शिंदे सरकारवर क्लीनचिट सरकार अशी शेरेबाजी केली जावू लागली आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राज्यात राबवलेल्या महत्त्वाकांक्षी ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिम प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार न झाल्याचे समितीने स्पष्ट केलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट मिळाली असली तशीच याआधीही महायुतीतील अनेक नेत्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. राज्यात तत्कालीन…
मंगळवार १६ जुलै | अनंत पांगारकर दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील सुमारे ८१ कोटी रुपयांचा अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी राजकीय आसामी असलेला चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ सध्या अटकेत आहेत. यातील भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी जेल प्रशासनाला प्रोडक्शन वॉरंट काढण्यात आले आहे. पतसंस्थेतील या घोटाळ्याप्रकरणी चेअरमन असलेला कुटे अनेक महिने फरार होता. त्याच्या कुटुंबीयांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाल्यानंतर तो स्वतःहून पोलिसात हजर झाला. तर या गुन्ह्यातील दुसरा प्रमुख आरोग्य पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ हा देखील गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसातच स्वतःहून पोलिसात हजर झाला होता. त्या वेळेपासून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्यासह सहा जणांविरोधात न्यायालयात…
मंगळवार, १६ जुलै ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ यावर्षी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी गावाच्या चंदनगड डोंगरावर बुधवारी (१७ जुलै) सकाळी नऊ वाजता होणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिली. अभियानाचे यंदाचे १९ वे वर्ष आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करणे प्रत्येकाची मुलभूत जबाबदारी बनली असून वृक्षारोपन व पर्यावरणाचे संवर्धन करणे भावी पिढयांसाठी काळाची गरज बनली आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मागील १८ वर्षात तालुक्यातील विविध संस्था, विद्यालये, कार्यकर्ते…
मंगळवार, १६ जुलै म्युच्युअल फंड्स गुंतवणूक, जीवन विमा, मेडीक्लेम विमा क्षेत्रातील प्रथितयश ब्रँड म्हणून नावारूपास आलेल्या कडलग इन्व्हेस्टमेंट या फर्मच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी माईंड एक्सलंस प्रोग्रामचे प्रशिक्षण माईंड एक्सलंस कोच व ट्रेनर सुधीर फरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले आहे. माईंड एक्सलंस टेक्नॉलॉजीजद्वारे आयोजित हा १४ आठवड्यांचा कार्यक्रम अत्याधुनिक पद्धतीने संमोहन व NLP तंत्रांचा वापर करून व्यक्तिगत व व्यावसायिक क्षमतांचा विकास घडवून आणण्यासाठी बनवला आहे. कडलग इन्व्हेस्टमेंट फर्मचे संचालक सुनील कडलग व आदित्य कडलग यांच्या प्रेरणेतून या प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे पहिले सत्र नुकतेच पार पडले असून, फरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरू झाले आहे. यामुळे कर्मचार्यांचे मानसिक ताण तणाव कमी…
मंगळवार, १६ जुलै सध्या सुरू असलेल्या पावसामुळे संगमनेरमधून जाणाऱ्या कोल्हार-घोटी मार्गाच्या झालेल्या दुरवस्थेवर सोमवारी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने एका बातमीच्या माध्यमातून प्रकाश टाकताच काही वेळातच या मार्गाच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांसह स्थानिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. या मार्गाची काही छायाचित्रे या परिसरातील स्थानिक जागरूक नागरिकांनी महाराष्ट्र संवाद न्यूजला पाठविली होती. संगमनेर शहरातून जाणाऱ्या कोल्हार-घोटी मार्गाचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्णत्वास गेल्याने हा मार्ग अतिशय चांगला झाला, हा समज संगमनेरात सध्या सुरू असलेल्या पावसाने खोटा ठरविला असून यामुळे ठेकेदाराच्या कामाची पोलखोल झाली आहे. यामुळे सरकारचा या कामावरील पैसा पाण्यात गेला आहे. या संदर्भात महाराष्ट्र संवाद न्यूजने…
सोमवार १५ जुलै खरीप हंगामामध्ये सर्वसाधारण आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मुग, उडिद, सोयाबीन, भुईमूग व सुर्यफुल या ११ पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन या पीक स्पर्धेमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे. राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेमध्ये वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशिल शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पाकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढुन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकुण उत्पादनात भर पडेल, या…
विशेष प्रतिनिधी / मुंबई नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत सेनेच्या उद्धव ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांच्या नावाने बारावा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानेच शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचं स्पष्ट झालंय. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले होते. मात्र मिलिंद नार्वेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा उद्धव ठाकरेंचा हट्ट त्यांनी अखेरपर्यंत सोडला नाही. हीच जयंत पाटील यांच्यासाठी ती धोक्याची घंटा ठरली. अशात शरद पवार यांनी जयंत पाटील यांना पूर्ण पाठिंबा दिला असला तरी, उद्धव ठाकरे यांचा जयंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध होता, अशी चर्चा आता समोर आलीय. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्या विरोधात जयंत…
सोमवार १५ जुलै शहर आणि उपनगरात घंटागाड्यांच्या माध्यमातून फिरून स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या कामगारांच्या मोकळ्या मैदानावरील वस्तीमुळे, त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत. शहर स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने या सफाई कामगारांच्या राहण्याची व्यवस्था इतरत्र करावी, यासाठी परिसरातील नागरिक एकवटले असून या नागरिकांचे त्रासातून मुक्तता करण्यासाठी स्थानिक प्रशासन दखल घेत नसल्याने थेट आरोग्य मंत्रालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख प्रसाद पवार यांनी दिला आहे. शहर स्वच्छतेचा ठेका नाशिकच्या एका कंपनीला देण्यात आला या कंपनीशी संलग्न सफाई कामगारांची शहरातील परदेशपुरा भागातील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ अनाधिकृत वस्ती निर्माण करण्यात आली असून या…
सोमवार १५ जुलै दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून कोतुळ येथे शेतकरी गेली दहा दिवस धरणे आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी आज कोतुळ बाजारपेठ बंद ठेवून शेतकरी व ग्रामस्थांनी दूध उत्पादकांच्या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधले. कोतुळ येथील खटपट नाका चौकामध्ये शेकडोच्या संख्येने शेतकरी यावेळी एकत्र आले होते. आंदोलनाच्या मंडपाच्या समोर दूध हंडी फोडण्याचे आंदोलन यावेळी करण्यात आले. वारकरी संप्रदायाने यावेळी आंदोलनाला पाठिंबा दिला. अभंग व भजनाच्या निनादांमध्ये मध्यवर्ती चौकात बांधण्यात आलेली हंडी शेतकरी कार्यकर्त्यांनी फोडली व सरकारच्या निषेधार्थ प्रचंड घोषणा दिल्या. दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव मिळाला पाहिजे, दूध क्षेत्रातील अस्थिरता संपवण्यासाठी दुधाला…
सोमवार १५ जुलै ६५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या आणि १४ वर्षापेक्षा अधिक शिक्षा भोगलेल्या आरोपीला सोडून देण्यासाठी आवश्यक असणारे फिटफॉर सर्टिफिकेट देण्याकरिता तीस हजार रुपयांची लाच घेणाऱ्या नासिकमधील मध्यवर्ती कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यास एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. डॉ. आबिद आबू अत्तार (वय ४०, वर्ग- १ पद – मुख्य वैदयकिय अधिकारी, मध्यवर्ती कारागृह नाशिकरोड रा. मध्यवर्ती कारागृह वसाहत, नाशिकरोड) व डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार (वय ४२, वर्ग-२ पद- वैदयकिय अधिकारी, मध्यवर्ती कारागृह नाशिकरोड रा. इंदिरानगर, नाशिक) अशी लाच घेणाऱ्या दोघा डॉक्टरांची नावे असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या एसीबीने रविवारी ही कारवाई केली. अधिक माहिती अशी, एसीबीकडे तक्रार…
सोमवार १५ जुलै संगमनेर शहरातून जाणाऱ्या कोल्हार-घोटी मार्गाचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्णत्वास गेल्याने हा मार्ग अतिशय चांगला झाला, हा समज संगमनेरात सध्या सुरू असलेल्या पावसाने खोटा ठरविला असून यामुळे ठेकेदाराच्या कामाची पोलखोल झाली आहे. यामुळे सरकारचा या कामावरील पैसा पाण्यात गेला आहे. संगमनेरमधून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गाला बाह्यवळण मार्ग मिळाल्यानंतर त्या पाठोपाठ संगमनेरमधून जाणाऱ्या कोल्हार-घोटी मार्गाचेही काम झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी रुंद झाला होता. मात्र या रस्त्याच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट राहिल्याने वारंवार धुळीचा सामना करावा लागत होता. त्यातच आता पावसाळा सुरू झाल्याने वर्षभराच्या आतच या रस्त्याच्या कामाचे प्रगती पुस्तकच समोर आले आहे. या कामावर सरकारचा कोट्यावधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला…
सोमवार, १५ जुलै लग्नाच्या काही महिन्यानंतर किरकोळ कारणांवरून वाद उकरून काढत पतीपासून घटस्फोट मिळविण्यासाठी न्यायालयाची पायरी चढणाऱ्या महिलांना पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाने गेल्या आठवड्यात एका निकालाच्या माध्यमातून चपराक लगावली आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्यास तिची नैतिक अथवा आर्थिक जबाबदारी पतीवर राहत नाही, असे नमूद करीत न्यायालयाने पत्नी कमावती असल्याने तिचा पोटगीचा अर्ज नाकारत केवळ मुलीला पोटगी देण्याचा आदेश दिला. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश रघुवेंद्र आराध्ये यांनी हा निकाल दिला. दावा दाखल केल्यापासून याचिकेचा निकाल लागेपर्यंत मुलीला दरमहा पाच हजार रुपये पोटगी द्यावी, असे आदेशात नमूद आहे. राकेश आणि सीमा (नावे बदललेली) यांचा विवाह २९ डिसेंबर १९९६ रोजी झाला होता. या दांपत्याला एक…
रविवार, १४ जुलै उधारीवर घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यापोटी दिलेला चेक बँकेत न वठल्याने दाखल करण्यात आलेल्या खटल्यामध्ये संगमनेर न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी संदीप रंगनाथ आव्हाड या आरोपीला सहा महिने साधा कारावास आणि तक्रारदाराला ३ लाख ३८ हजार २६० रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली आहे. समीर महाले यांचे शिवसाई ज्वेलर्स नावाने दागिन्यांचे दुकान असून संदीप आव्हाड आणि तक्रारदार समीर महाले यांच्यात असलेल्या ओळखीतून आव्हाड याने जुलै २०१७ मध्ये ५० ग्रॅमची एक सोन्याची साखळी आणि ९.३२० मिलीची एक सोन्याची अंगठी असे १,६९,१३० रुपये किमतीचे दागिने तीन महिन्यांच्या उधारीवर घेतले होते. महाले यांनी वारंवार पैशाची मागणी केल्यानंतर आरोपीने संगमनेर शाखेचा बंधन बँकेचा १,६९,१३०…
रविवार विशेष | १४ जुलै एका एकरातील पिकावर कीटकनाशक फवारणीला दीड ते दोन तासांपेक्षा अधिक कालावधी लागतो. पिकांची वाढ होईल, तसा कीटकनाशक फवारणीचा वेळही वाढतो. आधुनिक तंत्रज्ञानाने ड्रोनद्वारे मात्र अवघ्या दहा मिनिटांत एका एकरातील पिकांवर औषध फवारणी शक्य झाली आहे. पाठीवर भलं मोठं ओझं घेऊन फवारणी करण्यापेक्षा ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्राधान्य दिलं आहे. ड्रोनच्या माध्यमातून आठ ते दहा मिनिटात एक एकरावर फवारणी होते. त्यासोबतच कीटकनाशकाची बचतही होते. अशा ड्रोन कॅमेरा ऊस पिकावर औषध फवारणी करण्यासाठी भाडेतत्त्वावर मिळत आहे. संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील कृषी पदवीधर सुप्रिया नवले यांनी परिसरातील शेतकऱ्यांची मेहनतीला पूर्णविराम देऊन सरकारच्या योजनेतून ड्रोन घेतले असून तीन…
आपल्याला नको असलेल्या व्यक्ती, संस्था यांचा काटा सरकार कसा काढते, याची असंख्य उदाहरणं गेल्या दहा वर्षांच्या केंद्रातल्या मोदी सरकारने आणि २०१४ नंतर राज्यातल्या युती सरकारने दाखवून दिली आहेत. खर्या गुन्हेगारांना आवर घालण्याचा यामागे आव असला तरी प्रत्यक्षात सत्तेला जाब विचारणार्यांची तोंडं बंद करण्याचा प्रयत्न यामागे असतो. सत्तेला जाब विचारणार्यांची मुस्कटदाबी करायची हा अत्यंत कुटील हेतू केंद्र आणि राज्य सरकारने गेली दहा वर्षं जपला आहे. याच कुटील हेतूचा नवा अंक महाराष्ट्रातल्या विद्यमान सरकारने सुरू केला आहे. या सरकारने राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर मंजुर करून घेतलेल्या क्रमांक २० च्या विधेयकाने सरकारचा हेतू स्पष्ट…
शनिवार १३ जुलै इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटटस ऑफ इंडियाच्यावतीने (आयसीएआय) मे 2024 मध्ये घेण्यात आलेल्या सीए फायनल परीक्षेत संगमनेर येथील ओंकार राजेंद्र मुळे (वय 22) उत्तीर्ण झाला. ओंकार हा संगमनेर ब्राह्मण परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र उर्फ बंडू मुळे यांचा मुलगा तसेच भाऊसाहेब थोरात पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रवीण मुळे यांचा पुतण्या आहे. ओंकार मुळे याचे प्राथमिक शिक्षण संगमनेरच्या सह्याद्री विद्यालयात व महाविद्यालयीन शिक्षण संगमनेर कॉलेजमध्ये झाले. तो पुण्यातील डीकेव्ही अँड असोसिएटस या संस्थेत आर्टिकलशीप करीत आहे. त्याला भाऊ आदित्य मुळे, मित्र सीए तेजस पवार व सीए हिमांशू रावलानी यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल ओंकारचे अभिनंदन होत आहे.
शनिवार १३ जुलै पावसाळी अधिवेशन संपताच संगमनेरमध्ये परतलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी सकाळीच तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील गडाख कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. बुधवारी सायंकाळच्या वेळी जनावरांना चारा कापण्यासाठी शेतात केलेल्या मातेच्या डोळ्यादेखत बिबट्याने तिच्या दीड वर्षीय चिमुकलीला आपल्या जबड्यात पकडून जवळच्या गवतात नेले होते. हा प्रकार लक्षात आल्याने नागरिकांनी बिबट्यामागे गवतात धाव घेत त्याला हूसकावून लावले. गंभीर जखमी झालेल्या दीड वर्षीय चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे ही दुर्घटना घडली. या घटनेत मृत्यू झालेल्या ओवी सचिन गडाख या दीड वर्षीय चिमुकलीच्या कुटुंबीयांचे…
शनिवार १३ जुलै संगमनेरच्या पठार भागातील आंबी खालसा परिसरात घडलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण पठार भागात उमटले असून शुक्रवारी कथित जिहादी प्रवृत्तीच्या विरोधात पठार भागातील गावांमध्ये बंद पाळत घारगावमध्ये सकल हिंदू समाज हिंदू संघटनांच्यावतीने आंबी खालसा ते घारगाव असा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिहादी प्रवृत्ती विरोधात जनजागृतीसाठी जाहीर सभा पार पडली. घारगाव परिसरातील एका तरुणाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची मदत घेऊन ७ जुलै रोजी साडेअकराच्या सुमारास घारगाव बसस्थानक परिसरातून एका तरुणीला पळवून नेले; परंतु घारगाव पोलिस ठाण्यात केवळ हरवल्याची नोंद करण्यात आली. या प्रकाराने हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनेचा निषेध व्यक्त केला जात होता. हिंदू संघटनांनी आंदोलनाचा इशारा देताच…
शनिवार १३ जुलै खरेदी केलेल्या शेत जमिनीची रजिस्ट्री करण्याकरिता लाचेची मागणी करणाऱ्या दुय्यम निबंधकासह दोन मुद्रांक विक्रेत्यांवर लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी शंकरराव उत्तरवार (दुय्यम निबंधक, उपनिबंधक कार्यालय हदगाव), मुद्रांक विक्रेता खासगी इसम समीउल्ला अजमतउल्ला शेख उर्फ शमी व शेख अबूबकर करीम सिद्दिकी उर्फ बाबू अशी गुन्हा दाखल झालेल्या लाचखोर आरोपींची नावे असून नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराने मौजे हदगाव (नांदेड) येथे २० गुंठे शेत जमीन खरेदी केली होती. या शेत जमिनीची नोंदणी करण्यासाठी तक्रारदाराने सोमवारी (ता. ८ जुलै) हदगाव येथील उपनिबंधक कार्यालयात…
स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय, पीएसआय आणि कर्मचारी हप्तेखोर आर्थिक लोभापाई दोन आस्थापनांचा कारभार एकाच निरीक्षकाकडे हप्ते गोळा करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची बघा नावानिशी यादी साई मंदिरच्या सुरक्षा विभागात नेमणूक असलेला रवींद्र कर्डिले मास्टरमाईंड आठवडाभरापूर्वी महाराष्ट्र संवाद न्यूजने टाकला होता प्रकाश! शनिवार १३ जुलै गेल्या काही दिवसापासून संपूर्ण नगर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेली आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांचा वरदहस्त लाभलेली अहमदनगरची स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) नगरचे खासदार निलेश लंके यांच्या रडारवर आली असून या गुन्हे शाखेचा कारभाराचा भांडाफोड करत लंके यांनी थेट मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली असल्याने नगर जिल्ह्याच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली…
