Author: Annant Ppangarkar

मुंबई – गुरुवारी झालेल्या काँग्रेस पक्षाच्या महत्त्वपूर्ण असलेल्या बैठकीला जे सात आमदार गैरहजर होते त्यांनी पक्षाला गैरहजर राहण्याचे कारण पत्राच्या माध्यमातून कळविले होते, अशी माहिती काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमधील हालचालींना वेग आला आहे. गुरुवारी (ता. १५ फेब्रुवारी) काँग्रेसची महत्त्वाची बैठक विधिमंडळात पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे 30 पेक्षा अधिक आमदार उपस्थित होते. या बैठकीनंतर थोरातांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होत असल्याच्या चर्चे संदर्भात थोरात म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. आम्हालाही प्रसार माध्यमांकडूनच याबद्दल…

Read More

संगमनेर – अनंत पांगारकर घरच्यांनीच केलेल्या गद्दारीमुळे सत्तेतून पायउतार व्हाव्या लागलेल्या माजी मुख्यमंत्री शिवसेना शहरप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुधवारचा संगमनेरचा जनसंवाद दौरा त्यांच्या भाषणाने, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या जाहीररीत्या केलेल्या कौतुकाने चर्चेत आला असताना दुसरीकडे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी निघालेली मोटार सायकल रॅली चर्चेत आली आहे. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर शिवसेनेत अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. अनेक निष्ठावंत शिवसैनिकांना फोडत शिंदे गटाने त्यांच्यासाठी पायघड्या टाकल्या. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अनेक जण ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या सोबत जाण्याच्या तयारीत असतानाच शिवसेनेत पुन्हा एकदा पक्षांतर्गत घडामोडी घडल्या आणि उत्तर नगर जिल्ह्यातील कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आले. यात अनेक निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना डावलत…

Read More

संगमनेर – तुम्ही आणि तुमच्या पुढच्या पिढ्या या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये जगणार आहेत की भाजपच्या हुकूमशाहीच्या गुलामगिरीत जगणार आहेत, हे ठरविणारी येणारी निवडणूक आहे. लढाई मोठी आहे असे सांगत भाजपने आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत बेंबीच्या देठापासून ओरडत ज्या भ्रष्ट लोकांविरोधात आरडाओरडा केला, ज्यांच्या-ज्यांच्यावर चिखल उडविला त्यांचीच धुनी धुण्याची वेळ त्यांच्यावर आली. ज्यांना फोडाफोडी शिवाय दुसरा धंदा नाही कपट कारस्थान, नीच कारस्थान करणारे गृहमंत्री ‘फोडणवीस’ हे घरफोडे मंत्री आहेत, अशा शब्दात भाजपच्या केंद्रीय व राज्यातील नेतृत्वावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी संगमनेरमध्ये आले होते यावेळी ते बोलत होते. ठाकरे यांच्या समवेत…

Read More

संगमनेर – पाठ्यक्रमासह विविध कलाविष्कार आणि खेळांमध्ये नैपूण्य दाखवणार्‍या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चमकले. जम्मु-काश्मिरमध्ये झालेल्या ९ व्या राष्ट्रीय स्पोर्ट्स डान्स चॅम्पियनशीप स्पर्धेत ध्रुवच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सादरीकरण करताना ३५ सुवर्णसह तब्बल ४५ पदकांची लयलुट केली. स्पर्धेतील उत्कृष्ट प्रदर्शनाच्या बळावर ध्रुव ग्लोबल स्कूलला राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक देवून गौरविण्यात आले आहे. स्पोर्ट्स डान्सच्या वैयक्तिक प्रकारात ९ वर्षांखालील गटात तेजस्विनी क्षितीज मोहापात्रा हिने हर हर गंगे नृत्य सादर करीत सुवर्ण पदक मिळवले. १३ वर्षांखालील गटात रित चेतन राजपालने राधाराणी नृत्यावर तर, १७ वर्षांखालील गटात सौम्या सचिन जोशीने सुवर्ण पदक मिळवताना शाळेच्या कामगिरीचा आलेख उंचावला. युगल प्रकारातही हाच…

Read More

रमेश चेन्नीथला, नाना पटोले यांचीही चव्हाणांवर टीका… काँग्रेसने अशोक चव्हाण यांना आणि त्यांच्या वडिलांना खूप काही दिले मात्र आता काँग्रेसच्या तत्त्वज्ञानात असा कोणता दोष निर्माण झाला की ज्यामुळे चव्हाण यांना काँग्रेसच सोडावी लागली? चव्हाण यांच्यावर काही दबाव होता का? असा सवाल उपस्थित करत ते एखाद्या दबावाने किंवा स्वार्थापोटी भाजपमध्ये गेले असावेत, अशी थेट सडकून टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार…

Read More

संगमनेर – राज्याचे माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील महिला-युवतींचे सबलीकरण आणि आरोग्याच्या प्रश्नासाठी काम करणाऱ्या एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून ८ ते १० मार्च दरम्यान युवती व महिलांसाठी टेनिस बॉल क्रिकेट, कुस्ती, बॅडमिंटन व रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती एकविराच्या अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी दिली. थोरात म्हणाल्या, ८ मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा होतो. यानिमित्त संगमनेर तालुक्यात महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असते. सर्व क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे ही सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. गतवर्षी महिला क्रिकेटमध्ये आयपीएल सुरू झाला. त्याला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. महिला दिनाच्या…

Read More

अहमदनगर – नेवासा येथील संशयित आपल्या साथीदारांसह नगरमध्ये गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर दबा धरून बसलेल्या नगर एलसीबीच्या पथकाने तिघा जणांना गावठी कट्यासह पकडले असून त्यांच्याकडून सुमारे एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. लखन भाऊसाहेब आल्हाट, लखन उर्फ लक्ष्मण सुधाकर सरोदे व अविनाश उर्फ देविदास उर्फ आबा विक्रम उर्फ विक्रांत आल्हाट (तिघे रा. मोरया चिंचोरे, ता. नेवासा, जि. अहमदनगर) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना हवाई दरीत्या शास्त्रीय बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.…

Read More

मुंबई -माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसचा हात सोडल्यानंतर पक्षात मोठी खळबळ उडाली. चव्हाण यांच्या निर्णयामुळे पक्षातील अनेक जण व्यथित झाले असून चव्हाण यांच्या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. चव्हाण यांच्यासोबत अनेक नेते काँग्रेस सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर पक्षात अंतर्गत हालचाली वेगात सुरू झाल्या असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीला रवाना झाले आहे. तेथे ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करतील तत्पूर्वी ते छत्तीसगड मध्ये खासदार राहुल गांधी यांना भेटून या संदर्भात माहिती देतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तातडीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेत काँग्रेस एक संघ…

Read More

संगमनेर – काँग्रेसला मोठा धक्का देत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाबरोबर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तसे पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे. आपल्या राजीनाम्यासंदर्भात चव्हाण यांनी ‘एक्स’वर माहिती दिली असून येत्या १५ फेब्रुवारीला ते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. आमदार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालट सुरू असून चव्हाण यांच्यासोबत आणखी कोण आमदार भाजपच्या वाटेवर आहे याची चर्चा सुरू झाली आहे. चव्हाण यांच्या राजीनाम्या संदर्भात उपमुख्यमंत्री…

Read More

संगमनेर – अहोरात्र काबाडकष्ट करणारी आई, जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी बाप आणि आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे शिक्षक हेच आपल्या जीवनातील आदर्श असावे. त्यांना आदर्शस्थानी ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील ध्येय व स्वप्न साकार करावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व रोटरी आय केअर ट्रस्टचे विश्वस्त सुनील कडलग यांनी केले. श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात कडलग बोलत होते. स्कूल कमिटीचे चेअरमन शिवाजीराव खुळे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य श्रीकांत माघाडे, अशोकराव दिघे, बाबासाहेब वामन, बबन दिघे, विजय वामन, रंगनाथ खुळे, राम दिघे, चांगदेव वामन, खुळे सर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कडलग यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींना पारितोषिके…

Read More

पुणे – भाजपाच्या विचारांच्या विरोधात कोणी भूमिका घेत असेल तर सत्तेचा दुरुपयोग करून कारवाई केली जात आहे. यापूर्वी लोकांना फारसा माहिती नसलेला ईडी हा शब्द आता भाजप सरकारच्या काळात देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. गेल्या काही वर्षात ईडीने ६ हजार गुन्ह्यांची नोंद केली चौकशीअंती यात सत्यावर आधारित केवळ २५ खटले निघाले. त्यापैकी अवघ्या दोघांना शिक्षा झाली. या गुन्ह्यांच्या तपासासाठी ईडीने ४०४ कोटी रुपये खर्च केले. याशिवाय जे आज पक्ष सोडून विकासासाठी भाजपसोबत गेले असे सांगत आहेत, त्यात तथ्य नसून काही नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती. ती चौकशी सत्तेत गेल्यानंतर बंद झाली. त्यामुळे विकासासाठी पक्ष सोडला, असं म्हणणं चूक असल्याचं सांगत…

Read More

रविवार विशेष | प्रवीण पुरो भारतीय जनता पक्षाला अपेक्षित होतं ते झालं. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या ताब्यात गेली. पवारांसमोरची राजकीय स्पर्धा संपली, असं भाजपच्या नेत्यांना वाटलं असेल. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची त्या पक्षाची आणि पक्षाच्या नेत्यांची तयारी आहे. महाराष्ट्र त्यासाठी सुपिक क्षेत्र. ईडी आणि सीबीआयच्या धाकाने कोणालाही वाकवता येतं हे अमित शहांना ठावूक आहे. त्यात देवेंद्र फडणवीसांसारखा नेता असेल तर ते अधिक जलद घडवता येऊ शकतं, याची खात्री असल्याने अशा काळ्या राजकीय खेळासाठी भाजपने महाराष्ट्राची निवड केली. दिली जबाबदारी फडणवीसांनी यथोचित पार पाडली. शिवसेनेची दोन शकलं झाली. बापाची मालकी गेली. राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले. काकांच्या मालकीचा पक्ष पुतण्याने…

Read More

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकारण्यांमध्ये गोळीबाराच्या घटना सर्रास घडू लागल्या आहेत. त्यामुळे राज्यातील घटनाबाह्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केल्यानंतर आता हीच मागणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडूनही करण्यात आली आहे. ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेद्वारे त्यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. ठाकरे म्हणाले,…

Read More

महायुती सरकारने निळवंडे पाणी वाटपाचा प्रस्ताव मार्गी लावला नाही तर आगामी काळात आमचे महाविकास आघाडीचे सरकार मार्गी लावेलच! नगर : आठमाही धरण असलेल्या निळवंडे प्रकल्पाचे पाणीवाटप कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत असला तरी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक प्रस्ताव पाठवला आहे. सरकारने त्याचा अभ्यास करावा व निर्णय घ्यावा, शेवटचा शेतकरी पाण्यापासून वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी. एका नव्या मॉडेलचा प्रयोग सरकारने यशस्वी करून दाखवावा असे आवाहन त्यांनी केले आहे. सध्याच्या महायुती सरकारने निळवंडे पाणी वाटपाचा प्रस्ताव मार्गी लावला नाही तर आगामी काळात आमचे महाविकास आघाडीचे सरकार मार्गी…

Read More

पुणे – ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर शनिवारी पुण्यात हल्ला करण्यात आला होता. तसेच भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन देखील करण्यात आले याप्रकरणी पुणे पोलिसांनी भाजपचे शहाराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह ४३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्रकार निखील वागळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, वकील असीम सरोदे यांचा ‘निर्भय बनो’ कार्यक्रम पुण्यातील राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयात शनिवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जात असताना निखील वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. तसेच त्यांच्या गाडीवर शाईफेक करण्यात आली. निखील वागळे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी निखील…

Read More

पुणे : ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला करण्यात आला. ही घटना शनिवारी (९ फेब्रुवारी) सायंकाळी घडली. हल्ला झाल्यानंतर राष्ट्रसेवा दलाच्या कार्यक्रम स्थळी निर्भय बनो सभेत पोहोचलेल्या पत्रकार निखिल वागळे यांनी जोरदार भाषण केले. या भाषणात नेमकं काय म्हणाले वागळे त्याचा हा संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या वाचकांसाठी देत आहोत… https://youtu.be/cN6tg80_qj4?si=OhOT3pCcCl__j21o पुण्यात निर्भय बनो कार्यक्रमाचे साने गुरुजी हॉलमधे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाआधी पत्रकार निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी पुणे भाजपने गुन्हा दाखल केला होता. तसेच हा कार्यक्रम उधळून लाऊ असाही इशारा दिला होता. मात्र भाजपने कार्यक्रमास विरोध केल्यास आपण या कार्यक्रमास…

Read More

संगमनेर – सून आणि नातवासह शाळेचे स्नेहसंमेलन पाहण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मनी मंगळसूत्र धूम स्टाईलने दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी समोर आली. यासंदर्भात भारती मधुकर वनम (वय ५८ वर्ष, रा. लवअंकुश कॉलनी, मालदाड रोड, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती वनम शुक्रवारी सायंकाळी शहरातील पोदार इंग्लिश मीडियम येथे शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी गेल्या असताना शाळेच्या जवळील कॉर्नरला भरधाव वेगात आलेल्या अज्ञात दोघा दुचाकीस्वारानी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावत तेथून पोबारा केला. पोलीस पुढील तपास करत आहे.

Read More

संगमनेर – अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदी जयंत रामनाथ वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते वाघ यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. वाघ यांना शुभेच्छा देताना थोरात म्हणाले, ‘काळ संघर्षाचा आहे मात्र भविष्य काँग्रेस पक्षाचे आहे, त्यामुळे झोकून देऊन काम करा. आपण जिल्ह्यात काँग्रेस बळकटीने उभी करू.‘ काँग्रेसच्या अध्यक्षपदी वाघ यांच्या नियुक्तीचा आदेश प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या सहीने निर्गमित करण्यात आला. वाघ हे नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे विश्वस्त आहेत. यशवंतराव चव्हाण व्यासपीठचे उपाध्यक्ष, कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष असून विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांवर ते सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत.…

Read More

नवी दिल्ली – देशाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या माजी पंतप्रधान नरसिंहराव व चौधरी चरण सिंह यांच्यासह कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या वैज्ञानिक एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची मोठी घोषणा आज शुक्रवारी ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) केली आहे. ‘एक्स’वर पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या विषयी म्हटले आहे की, आमच्या सरकारला देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचे सौभाग्य मिळाल आहे. चौधरी चरणसिंह यांनी शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी आणि कल्याणासाठी काम केलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री ते पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं. आणीबाणीचा देखील त्यांनी विरोध केल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं…

Read More

संगमनेर – नुकत्याच पार पडलेल्या संगमनेर-अकोले डेंटिस्ट असोसिएशनच्या बैठकीमध्ये अध्यक्षपदी प्रसिद्ध डेंटल सर्जन डॉ. सुचित गांधी, सेक्रेटरीपदी डॉ. सागर गोपाळे व ट्रेझररपदी डॉ. सुनील बोऱ्हाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. इंडियन डेंटिस्ट असोसिएशनच्या (IDA) अंतर्गत असलेल्या संगमनेर-अकोले डेंटिस्ट असोसिएशनची पदाधिकारी निवडीसाठी सोमवारी बैठक या बैठकीत या निवडी सर्वानुमते करण्यात आल्या. यावेळी डॉ. केदार सराफ यांनी ‘CBCT – advance technology’ या विषयावर बैठकीत उपस्थित दंतरोग तज्ञांना मार्गदर्शन केले. नव्या कार्यकारिणीच्या कार्यकाळात यावर्षी मुख कर्करोग संबंधित विविध लेक्चर्स, सेमिनार, तपासणी शिबीर, सदस्यांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा मानस असल्याचे नव्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Read More