Author: Annant Ppangarkar

रविवार, दिनांक ९ जून २०२४ लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहे. मोदी यांच्यासोबत त्यांच्या सहकारी मंत्रिमंडळाचा देखील शपथविधी होत असून या खास सोहळ्याला सुमारे आठ हजार पावणे उपस्थित राहणार आहे यात परदेशी पाहुण्यांचा देखील समावेश आहे. भारताच्या शेजारील आणि हिंद महासागर प्रदेशातील देशाच्या सन्माननीय प्रमुखांना या शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. शपथविधी सोहळ्याला श्रीलंकेचे अध्यक्ष रानी विक्रम सिंगे मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मोइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशचे पंतप्रधान प्रविंद कुमार, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल प्रचंडा, भुतानच्या पंतप्रधानांस अन्य काही राष्ट्राच्या प्रमुखांनी शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. त्यामुळे या…

Read More

मतदारांना गृहित धरणं किती घातक असतं हे भाजपच्या नेत्यांना कळलं असेल तर चांगलंच होय. कोणत्याही कर्तुत्वाशिवाय ‘अबकी बार चारसो पार..’चा नारा देताना आपण मतदारांनाही गृहित धरतो आहोत, याची जाण या पक्षाच्या नेत्यांनी ठेवली नाही. डोक्यात गेलेल्या हवेने ते बेफाम झाले होते. मागचा पुढचा विचार करण्याची त्यांची तयारीच नव्हती. सत्ता हे त्यांचं एकमेव साधन आहे. यासाठी संपत्तीचा आणि यंत्रणांचा वापर करत आपण कोणालाही विकत घेऊ शकतो, या मस्तीने त्यांच्या डोक्यात घर केलं होतं. याच मस्तीत भाजपच्या नेत्यांनी देशात नंगानाच सुरू केला होता. त्यांच्या पक्षाचा सामान्य कार्यकर्ताही नेत्यांच्या अशा वागण्याने हैराण झाला होता. जमीन सोडून वागणार्‍या नेत्यांना रस्त्यावर उतरवणं आवश्यक होतं, असं…

Read More

शनिवार, दिनांक ८ जून २०२४ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ठेवलेल्या प्रस्तावावर गौरव गोगोई, के. सुधाकरन, तारीक अन्वर यांनी समर्थन दिल्यानंतर काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची एकमताने निवड करण्यात आली. सोनिया गांधी फेब्रुवारीमध्ये राज्यसभा म्हणून राजस्थानमधून निवडून आल्या आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शनिवारी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. आजच काँग्रेसच्या कार्य समिती बैठकीत राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी घ्यावी असा काँग्रेसच्या नेत्यांचा आग्रह आहे. आज काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी राहुल गांधींना पार पाडण्याची विनंती करणारा ठराव मंजूर करण्यात आला. पण, राहुल गांधी यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला. 

Read More

शनिवार, दिनांक ८ जून २०२४ दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चैन हिसकावत पलायन केल्याची घटना शुक्रवारी संगमनेरमध्ये घडली. याप्रकरणी अज्ञात दोघा चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवण्याच्या घटना संगमनेरमध्ये वारंवार समोर येत आहेत. शुक्रवारी रात्रीदेखील साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास शहरातील नाशिक-पुणे महामार्गालगत असलेल्या कुंथूनाथ सोसायटीमध्ये जैन मंदिराजवळ सुनिता संतोष मेहता या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे तीन तोळे वजनाची चैन ओढून गाडी भरधाव वेगात नेत पळून गेले. सुनिता मेहता यांनी या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघा चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या विविध भागात तसेच बस स्थानकावर सातत्याने महिलांच्या गळ्यातील…

Read More

शनिवार दिनांक ८ जून २०२४ संसदेच्या विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काँग्रेसच्या बैठकीत एकमताने राहुल गांधी यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद देण्याचा ठराव संमत करण्यात आला, अशी माहिती काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. आज शनिवारी (ता. ०८ जून) दिल्लीत काँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत ही निवड करण्यात आली. संसदेत विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधीच नीट जबाबदारी पार पाडू शकतात, असेही वेणुगोपाल म्हणाले. राहुल गांधी यांनी सभागृहात काँग्रेसची धुरा सांभाळावी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते व्हावे, अशी मागणी काँग्रेसमधील खासदारांनी आधीपासूनच केली आहे. त्यामुळे या संदर्भात झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत यावर एकमताने निर्णय घेण्यात आला.…

Read More

शनिवार, दिनांक ८ जून २०२४ मनोज जरांगेंनी आजपासून पुन्हा आंतरवालीत उपोषण सुरू केले असून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जातीधर्माचे २८८ उमेदवार उभे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, तसेच विधानसभेला आम्ही नाव घेऊन पाडणार”, असा थेट इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील शनिवार (दि. ८) पासून पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. मात्र, त्याआधी आंतरवालीतील काही ग्रामस्थांनी जरांगेंच्या उपोषणाला परवानगी देऊ नये, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर पोलिसांनी जरांगेंच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली होती. मात्र, तरीही जरांगे उपोषणावर…

Read More

शनिवार, दिनांक ८ जून २०२४ संगमनेर शहरातील बेकायदा कत्तलखान्याचे नेटवर्क आता तालुक्याच्या ग्रामीण भागात हातपाय पसरू लागले आहे. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या गोवंश जातीच्या ११ वासरांची सुटका करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील कौठे धांदरफळ येथे ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल वनिता चोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष गंगाधर घुले आणि इम्तियाज मोमीन या दोघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरक्षक अविनाश शहा यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते. कौठे धांदरफळ (संगमनेर) येथे संतोष गंगाधर घुले याच्या घरासमोर गोवंश जातीची वासरं कत्तलीच्या उद्देशाने…

Read More

शनिवार, दिनांक ८ जून २०२४  देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तारूढ होत पंतप्रधान पदाचे हॅट्रिक साधणार आहेत. रविवारी सायंकाळी सव्वा सात वाजता मोदींसोबत त्यांच्या मित्र पक्षाचे १८ खासदार मंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्रातील कोणाला संधी मिळते याची उत्सुकता वाढली आहे. या १८ नव्या मंत्र्यांमध्ये ७ जण कॅबिनेट तर उर्वरित ११ खासदार स्वतंत्र मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून भाजपकडून दोघांना केंद्रीय मंत्री व दोघांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळू शकते. यासाठी नितीन गडकरी, पियुष गोयल, उदयनराजे भोसले, हेमंत सावरा आणि रक्षा खडसे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मित्र पक्षाचे खासदार देखील त्यांच्या…

Read More

शनिवार, दिनांक ८ जून २०२४ काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांना मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याने लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान आमदार थोरात यांना ताप आणि घशाच्या संसर्गाचा त्रास जाणवत होता, मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष करत आपल्या प्रचार सभा सुरूच ठेवल्या. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिक बिघडत गेली. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ जून रोजी त्यांना जास्त त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती सुधारत असून लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार…

Read More

शनिवार, दिनांक ८ जून २०२४ नाशिक जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय बिले पडताळणारा लिपिक ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकला आहे. संशयित लिपिक आतिश भोईर याने ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच त्याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी पकडले. जिल्हा रुग्णालयात काेणतीही वैद्यकिय देयके मंजूर करण्यासाठी टक्केवारीने पैसे उकळले जात असल्याची चर्चा असतानाच आता एकूण बिलाच्या रकमेत सहा टक्के रक्कम घेऊन बीले मंजूर करणाऱ्या कनिष्ठ लिपिकास अटक झाली आहे. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारी करून लाचलुचपत विभागाकडून (दि. ७) रोजी सापळा रचला. सायंकाळी सहा वाजता रुग्णालयात संशयित लिपिक आतिश भोईर याने ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्विकारली. त्यास लाच घेताना रंगेहाथ पकडत त्याला ताब्यात…

Read More

शुक्रवार दिनांक ७ जून २०२४ १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. लोकसभा निवडणूक पार पडली असून १८ वी लोकसभा अस्तित्वात येत आहे. सर्वात मोठा पक्ष ठरल्याने एनडीएचे (NDA) प्रमुख नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून निमंत्रण देण्यात आले आहे. राष्ट्रपतींना एनडीच्या नेत्यांचे समर्थन पत्र मिळाले त्यानंतर आता राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान व केंद्रीय मंत्री परिषदेच्या अन्य सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ ९ जून २०२४ ला संध्याकाळी सव्वा सात वाजता देतील. एनडीए गठबंधनचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या घरी भेट घेतली.…

Read More

शुक्रवार, दिनांक ७ जून २०२४ नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारचा अंतिम दिवस होता. शुक्रवारी अखेरच्या दिवसापर्यंत या मतदारसंघातून तब्बल ५३ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी नाशिक विभागीय आयुक्तालयात मोठी गर्दी केली होती. यांचा उमेदवारात आहे समावेश… विवेक बिपिनदादा कोल्हे, राजेंद्र एकनाथराव विखे पाटील, पै. डॉ. पानसरे छगन भिकाजी, निशांत विश्वासराव रंधे, राजेंद्र दौलत निकम, दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, कचरे भाऊसाहेब नारायण, अमृतराव रामराव शिंदे, किशोर भिकाजी दराडे, गव्हारे गजानन पंडित, रतन राजनदास चावला, महेंद्र मधुकर भावसार, दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, राजेंद्र दौलत निकम, दिलीप काशिनाथ…

Read More

शुक्रवार, दिनांक ७ जून २०२४ उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांसमोर आल्याने विभागीय महसूल कार्यालयात दोन्ही गटात जोरदार राडा झाला. दोन्ही गट समोरासमोर आल्याने घोषणाबाजी झाली. तसेच धक्काबुक्की देखील केल्याची चर्चा रंगली असून पोलिसांनी मध्यस्थी करत गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयात इच्छुक आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आकर्षण विषयी महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे आणि शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आपल्या समर्थकांसह एकाच वेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्त…

Read More

शुक्रवार, दिनांक ७ जून २०२४ NDA च्या संसदीय दलाच्या बैठकीनंतर दिल्लीत नवे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली वेगात सुरू झाले आहे. एनडीएचे नेते नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची हॅट्रिक साधणार आहे. त्यासाठी ९ जूनची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधानपदाची शपथ नरेंद्र मोदी रविवारी (९ जून) संध्याकाळी ६ वाजता घेणार असल्याचे निश्चित झाले असून त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या संसदीय दलाच्या बैठकीत संसदीय पक्षाच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव राजनाथ सिंह यांनी मांडला होता. या प्रस्तावाला अमित शहा, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, एचडी कुमारस्वामी यांनी अनुमोदन दिले होते. नितेश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भूमिकेकडे देशभरातील…

Read More

शुक्रवार, दिनांक ७ जून २०२४ लोकसभा निवडणुकीनंतर देशात नवे सरकार सत्तारूढ होत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशभरात लावण्यात आलेली आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने कळविल्याची माहिती राज्य निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. राज्यातील आचारसंहिता संपुष्टात आली असली तरी नाशिक, मुंबई आणि कोकण विभागातील आदर्श आचारसंहिता सुरूच राहणार असल्याची माहिती देखील निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. येत्या २६ जूनला मुंबई विभाग पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, मुंबई विभाग शिक्षक आणि नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने ही आचारसंहिता सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Read More

शुक्रवार, दिनांक ७ जून २०२४ पेट्रोल पंपावरील दोन कर्मचाऱ्यांना मुस्लिम समाजातील तरुणांकडून शिवीगाळ, मारहाण करत जीवे मारण्याची दिल्याची घटना संगमनेर तालुक्यातील आडवा ओढा येथे घडल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी ४ जूनला झालेल्या या मारहाणीसंदर्भात लखन बाबाराजा गायकवाड (वय २१ वर्षे, रा. वैदूवाडी, ता. संगमनेर) याने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी सहा जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, संगमनेरमधून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावरील आडवा ओढा येथे असलेल्या ढेरंगे पेट्रोल पंपावर मंगळवारी सकाळी सहा वाजण्याची सुमारास लाल रंगाच्या इंडिका व्हिस्टा कारमधून (क्रमांक MH 43 X 2749) आलेल्या एका मुस्लिम तरुणाने फिर्यादीला ‘एवढा हळू का येतो,…

Read More

शुक्रवार दिनांक ७ जून २०२४ नाशिक शिक्षक मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज (दि. ७) अखेरचा दिवस आहे. आत्तापर्यंत २२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महाविकास आघाडीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून ॲड. संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीचा उमेदवार अद्यापही निश्चित झालेला नाही. शिक्षक मतदार संघासाठी जाहीर झालेल्या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्यासाठी ७८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेले असून त्यापैकी केवळ २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने प्रमुख उमेदवार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार असल्याने विभागीय आयुक्तालय गजबजणार आहे. या मतदारसंघातून विद्यमान आमदार किशोर दराडे हे…

Read More

गुरुवार, दिनांक ६ जून २०२४ येत्या दोन-तीन दिवसात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे (NDA) सरकार स्थापन होण्याचे शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर शेअर मार्केट मधील मोठा घोटाळा बाहेर आला आहे. शेअर मार्केटमध्ये देशातील सर्वात मोठा घोटाळा भाजपाने केल्याचा आरोप करत त्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले होते. या सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपला ३०० च्या आसपास जागा दाखविण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये अचानक मोठ्या प्रमाणावर उसळी पाहायला मिळाली होती. मात्र, ४ जूनला निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शेअर मार्केट अचानक कोसळले होते. त्यामुळे अनेक…

Read More

गुरुवार, दिनांक ६ जून २०२४ राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जाचाला कंटाळून भाजपातील अनेक नेत्यांनी निलेश लंके यांना निवडणुकीत मदत केली, असा गौप्यस्फोट करत ज्याप्रमाणे राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुसरी जबाबदारी देण्याची मागणी पक्षाकडे करण्यात आली, त्याप्रमाणे जिल्ह्यातील दोन्ही जागा गमावल्याने पालकमंत्र्यांनीही अशीच पक्षशिस्त व नैतिकता दाखवावी असा सल्ला देत अप्रत्यक्षपणे त्यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केली. माध्यमांशी संवाद … नगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या विजयानिमित्त ‘मविआ’च्या पदाधिकाऱ्यांनी परस्परांना बुंदीचे लाडू भरवले. त्यावेळी फाळके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यांची उपस्थिती … यावेळी…

Read More