Author: Annant Ppangarkar
मंगळवार, दि.३० एप्रिल तब्बल गेली १५ वर्षे ट्रक चालवणारी भारताची ही पहिली महिला ट्रक ड्रायव्हर, सध्या ३० टनांचा १४ चाकांचा अजस्त्र ट्रक घेऊन भोपाळ ते केरळ मधल्या पलक्कड पर्यंत रोज सतत पुरुष ट्रक ड्रायव्हर्सना अचंबित करेल अश्या ट्रिप्स करतेय… स्वतःचा ट्रक्सचा व्यवसाय सांभाळून. या सर्वाची सुरुवात झाली २००३ साली भोपाळ इथे… योगिता आणि तीचे पती, राजबहादूर रघुवंशी, त्यावेळी महाराष्ट्रात राहणाऱ्या योगिता यांचा विवाह होऊन त्या भोपाळ इथे गेल्या. स्वतः वकिल म्हणून या वकिल माणसाशी लग्न केले पण लग्नावेळी वकील म्हणून सांगितलेल्या रघुवंशी यांचा ट्रकचा छोटासा व्यवसाय असल्याचे धक्कादायक वास्तव योगिता यांना भोपाळला गेल्यावर कळले. तरीही कॉमर्स तसेच वकिलीचे शिक्षण झालेल्या आणि साधेसेच…
अनंत पांगारकर | सोमवार, दि.२९ एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शिर्डी आणि अहमदनगरमधील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या दोन्ही मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा सामना करावा लागणार आहे. वंचितच्या उमेदवारांमुळे या मतदारसंघातील लढती चर्चेत आल्या आहे. शिर्डीमध्ये दोघांनी तर अहमदनगरमध्ये तब्बल अकरा जणांनी माघार घेतल्याने शिर्डीत २० तर अहमदनगरमध्ये २५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात एकमेकांसमोर उतरले आहे. दोन्ही मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढविली आहे. दोघात तिसरा आल्याने या मतदार संघातील राजकीय गणित बदलण्याची चिन्हे निर्माण झाली असल्याने प्रतिस्पर्धी उमेदवारांनी याचा धसका घेतला आहे. शिर्डीत वंचित बहुजन आघाडीच्या…
शिर्डी, सोमवार, दि.२९ एप्रिल श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे निवडणूक भरारी पथकाने १ लाख १९ हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. रविवारी दुपारी पावणेतीन वाजता ही कारवाई करण्यात आली. शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी दिनकर सचिन सुरेश यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत पथकाने ही कारवाई केली आहे. नियमित तपासणी करत असताना नेवासा-श्रीरामपूर रोडवर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या गाड्यांची तपासणी करत असतांना एका चारचाकी गाडीतून ही रक्कम हस्तगत करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ५० हजार रुपयांच्या वरील रकमेचा हिशोब संबंधितास व्यवस्थित न देता आल्यास सदर रक्कम जमा करण्यात येत असते. शिर्डी लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी…
सोमवार, दि.२९ एप्रिल राज्यात दोन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता पुढच्या टप्प्यातील प्रचाराने वेग घेतला आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात सभांचा धडाका लावला असताना सोमवारची पुण्यातील त्यांची सभा एका सुशिक्षित बेरोजगार तरुणामुळे चर्चेत आली आहे. पुणे शिरूर बारामती आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महा विजय संकल्प सभेचे पुण्यातील वानवडी येथील रेस कोर्स मैदानावर आज (सोमवारी) संध्याकाळी साडेपाच वाजता आयोजन करण्यात आले आहे. सभेसाठी जवळपास दोन लाखावर लोकांची उपस्थिती राहील, या दृष्टीने सभेची जय्यत तयारी आठवडाभरापासून सुरू होती. यातच आता एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाने या परिसरात लावलेले फ्लेक्स चर्चेत आले…
भाग – ४ | प्रवीण पुरो एखाद्या व्यक्तीने किती खोटं बोलावं याला काही मर्यादा असतात. महत्वाच्या पदावर असणार्या व्यक्तीचा प्रत्येक शब्द ताऊन सुलाखून व्यक्त झाला पाहिजे. वाह्यात बोलणं संकटात टाकू शकतं. बेरक्या माणसाला त्याचं काही वाटत नसलं तरी अशा व्यक्तीमुळे पदाची आणि देशाचीही गरीमा खालावते. देशाच्या प्रधान मंत्र्याने वा राष्ट्राध्यक्षाने तर अशावेळी कमालीची सजगता राखली पाहिजे. सरकारचा प्रमुख म्हणून तर त्याच्या सहकार्यांचंही माप अशा जबाबदार व्यक्तीकडे असतं. दुर्देवाने आपल्या देशाच्या पंतप्रधानाने या सार्या गोष्टीला फाटा देत देशाचं नाव जगभरात काळवंडलं आहे. स्वत:ला देशाचा चौकीदार म्हणवून घेणार्या पंतप्रधान मोदींनी केलेल्या थापेबाजीची दखल आंतरराष्ट्रीय जगताने घेतली आहे. इंटरनेटच्या मायाजाळात आपल्या या चौकीदाराची…
शनिवार, दि.२७ एप्रिल सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे. एकीकडे उन्हाचा पारा उच्चांकाकडे सरकत असताना दुसरीकडे लोकसभा निवडणुक प्रचार देखील तापू लागला आहे. अशा स्थितीत संगमनेर करांना दिलासा देणारी बातमी समोर आली असून संगमनेरची अमृतवाहिनी असलेली प्रवरा नदी महिनाभर वाहती राहणार आहे. त्यामुळे उन्हाच्या आणि निवडणुकीच्या गर्मीमध्ये पाण्याचा थंडावा मिळणार आहे. उन्हाळी हंगामातील पिण्यासाठी व शेतीच्या सिंचनासाठी निळवंडे धरणातून शनिवारी सायंकाळी प्रवरा नदीपात्रात १३५० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. या आवर्तनामुळे शेती पिकांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. महिनाभरासाठी हे आवर्तन असल्याने प्रवरा नदी वाहती राहणार आहे. ऐन उन्हाची लाही-लाही त्यातच लोकसभा निवडणुकीचा चढलेला ज्वर यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वातावरण…
शनिवार, दि.२७ एप्रिल अनेक दिवसांपासून वेटिंगवर असलेल्या पुनम महाजन यांच्या तिकीट कापत भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ कायदे तज्ञ उज्वल निकम यांना मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड यांच्यासोबत निकम यांची लढत होईल. भाजपने शनिवारी उमेदवारांची पंधरावी यादी जाहीर केली. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी पुनम महाजन इच्छुक होत्या. मात्र भाजपकडून महाजन यांना शेवटपर्यंत वेटिंगवर ठेवत अनपेक्षितरित्या उज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाजन यांना मतदारसंघात असलेला मोठ्या प्रमाणातील विरोध हे त्यांचे तिकीट कापण्यामागील कारण असल्याचे सांगितले जाते. भारतीय जनता पक्षासाठी हा मतदारसंघ महत्त्वाचा मानला जात असल्याने…
शनिवार, दि.२७ एप्रिल काँग्रेसच्या सरकारने अनेकवर्ष राज्य केले. आघाडीच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिपदे भोगले. पण जनतेला फक्त चॉकलेट दिले. दुसरीकडे आपण ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य देण्याचे काम केले, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली. सांगली लोकसभा मतदारसंघात महायुती उमेदवाराच्या प्रचाराची सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली. फडणवीस म्हणाले, या निवडणुकीत दोनच पर्यांय आहेत. एक पर्यांय नरेंद्र मोदी आणि दुसरा पर्याय राहुल गांधी. एकीकडे आपली महायुती तर दुसरीकडे राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी आहे. ही लढाई दोन व्यक्तिमत्वामधील आहे. आपल्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे मजबूत इंजिन आहे. त्या इंजिनबरोबर वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे…
शनिवार दि. २७ एप्रिल सध्या देशात आणि राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. शिंदे-फडणवीस-पवार यांचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील, नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे, अशा ‘त्रास देणाऱ्यांची दुरुस्ती पुढील काळात होणार आहे’ असा सज्जड इशारा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. अकोले (अहमदनगर) येथे शुक्रवारी महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, कॉ. डॉ. अजित नवले, अमित भांगरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप वर्पे, संभाजी ब्रिगेडचे संदीप कडलग, काँग्रेस पक्षाचे शिवाजी नेहे, जगदीश चौधरी, राजू पाटील, अशोक…
शनिवार दि.२७ एप्रिल देशाच्या सीमांवर जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दहा वर्षात ज्या हजारो सैनिकांच्या हत्या झाल्या त्या सैनिकांच्या वीर पत्नी आणि वीर माता यांना देशासाठी मंगळसूत्र बलिदान कराव लागलं, त्या मंगळसूत्रांचा हिशेब कोण देणार? असा घनाघाती सवाल करत जो महिलांच्या मंगळसूत्राला हात घाल तो ‘भारतीय जनता पक्षच मंगळसूत्र चोरांची टोळी’ असल्याचा हल्लाबोल शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अकोले (अहमदनगर) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शुक्रवारी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, कॉम्रेड डॉ. अजित नवले, अमित भांगरे,…
अहमदनगर, शुक्रवार दि.२६ एप्रिल शुक्रवारी झालेल्या उमेदवारी अर्ज छाननी नंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात ३६ उमेदवारांचे अर्ज करण्याची माहिती देण्यात आली आहे. तर प्राजक्त प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांच्यासह सहा उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्जांची छाननी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत पार पडली. छाननीमध्ये हनुमंत देविदास पावणे (अपक्ष), शरद बाबुराव माघाडे (अपक्ष), ज्ञानदेव कारभारी पाडळे (अपक्ष), विश्वनाथ श्रीरंग शेळके (अपक्ष), छगन भिकाजी पानसरे (अपक्ष) व प्राजक्त प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. तर छाननी नंतर निवडणूक रिंगणात राहिलेले उमेदवार पुढीलप्रमाणे… उमाशंकर श्यांमबाबु यादव (बहुजन…
शिर्डी, दि.२६ एप्रिल लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी (२६ एप्रिल) दाखल झालेल्या उमेदवारी अर्ज यांची छाननी करण्यात आली. यात ३१ उमेदवारांपैकी २२ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरले तर ९ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज बाद ठरविण्यात आले. छाननी नंतर हे २२ उमेदवार निवडणूक रिंगणात… भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे), लोखंडे सदाशिव किसन (शिवसेना), चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष), अभिजीत अशोकराव पोटे (अपक्ष), भारत संभाजी भोसले (समता पार्टी), नितीन दादाहरी पोळ (बहुजन भारत पार्टी), बागुल गोरक्ष तान्हाजी (अपक्ष), अॅड. सिध्दार्थ दिपक बोधक (अपक्ष) , अशोक रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी), सतिष भिवा पवार (अपक्ष), संजय पोपट भालेराव (अपक्ष), रामचंद्र…
शुक्रवार, दि.२६ एप्रिल लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारणात कुठेही दिसणार नाही, फोन टॅपिंग प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात जाण्याची भीती वाटत होती, असे मोठे विधान करत पहिल्या दोन टप्प्यातील तेरा पैकी दहा जागा महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई दक्षिण मध्य मतदार संघातील उमेदवार अनिल देसाई, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी शिर्डी साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी राऊत बोलत होते. आतापर्यंत राज्यात दोन टप्प्यात मतदान पूर्ण होत आहे. पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघात मतदान झाले तर आज आठ मतदारसंघात मतदान होत आहे. या दोन्ही…
शुक्रवार दि.२६ एप्रिल सध्या ऐरणीवर असलेल्या संगमनेरच्या गोवंश हत्या आणि कत्तलखाने पुन्हा एकदा गाजू लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसात तीन ते चार वेळा या ठिकाणी छापे घालून गोवंश मांस व तस्करी करणारे पकडले आहेत. गुरुवारी रात्री पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने एका वाहनातून २८ गोवंश वासरे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्याला जेरबंद केले आहे. उपअधीक्षक वाघचौरे यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती की, एका पिकअप गाडीमध्ये कत्तलीकरिता गोवंश जनावरे आणलेली आहेत. ती संगमनेरच्या कत्तलखान्यात दिली जाणार आहेत. ही गाडी संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड या परिसरात आहे. पथकाने सदर ठिकाणी पाहणी केली असता एक पांढऱ्या रंगाची पीकअप दिसून आली. पोलिसांना पिकअप…
अनंत पांगारकर | शुक्रवार, दि.२६ एप्रिल शिर्डी आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अडचणीत आणण्यासाठी नवी खेळी खेळली गेली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नावाशी नामसाधर्म्य असलेले उमेदवार मैदानात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी ही खेळी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडली आहे. ठाकरे गटाकडून या मतदारसंघात माजी खासदार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली. वाकचौरे यांच्या उमेदवारी विषयी मतदार संघात मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण असताना आता वाकचौरे यांच्या नावाशी मिळताजुळता उमेदवार शेवटच्या क्षणी मैदानात उतरला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांच्याबरोबर आता…
शिर्डी, गुरुवार दि.२५ एप्रिल शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे प्राथमिक चित्र आज स्पष्ट झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल ३१ उमेदवारांनी ४० अर्ज दाखल केले आहे. गुरुवारी १६ उमेदवारांनी २३ उमेदवारी अर्ज दाखल केले. सत्ताधारी महायुती, विरोधी महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख उमेदवारांसह अन्य काही प्रमुख पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक तिरंगी होण्याची चिन्हे गडद झाली आहे. अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच ‘आपला विजय निश्चित या हवेत असलेल्या’ उमेदवारांचा फुगा देखील येत्या एक-दोन दिवसात फुटेल आणि त्यांना जनतेसमोर जावे लागणार आहे.…
अहमदनगर दि. २६ एप्रिल अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी २७ उमेदवारांनी ३२ नामनिर्देशन पत्र दाखल केले असून आतापर्यंत या मतदारसंघात ४३ उमेदवारांनी ५५ नाम निर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती देण्यात आली. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी गोरख दशरथ आळेकर (अपक्ष), डॉ. योगिता प्रविण चोळके (अपक्ष), उमाशंकर श्यानमबाबु यादव (बहुजन समाजपार्टी), सुर्यभान दत्तात्रय लांबे (अपक्ष), जहीर युसुफ जकाते (अपक्ष), प्रा. सुनिलराव मोहनराव पाखरे (अपक्ष व भारतीय जनता पार्टी), शिवाजीराव वामन डमाळे (सैनिक समाज पार्टी), कलीराम बहिरु पोपळघट (भारतीय नवजवान सेना पक्ष), शितोळे सुदर्शन लक्ष्मण (अपक्ष व हिंदू एकता आंदोलन पार्टी), शेकटकर अनिल गणपत (अपक्ष), मुक्ता…
गुरुवार, दि.२५ एप्रिल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसने आमदार वर्षा गायकवाड यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. त्यांच्या विरोधातील महायुतीचा विशेषतः भाजपाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला मुंबईतून अपेक्षित जागा मिळू न शकल्याने गायकवाड नाराज होत्या. मात्र आता ऐनवेळी काँग्रेसने त्यांना उमेदवारी जाहीर करत त्यांची नाराजी देखील दूर केल्याचे बोलले जाते. वर्षा गायकवाड या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष असून शालेय शिक्षण मंत्री देखील राहिल्या आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघात चर्चेतील लढत होणार आहे. आता महायुतीकडून त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी दिली जाते याकडे लक्ष लागले आहे.
अहमदनगर, बुधवार दि.२४ एप्रिल अहमदनगर लोकसभा मतदारसंघात बुधवारी सात उमेदवारांनी ११ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार प्राजक्त तनपुरे यांचा देखील समावेश आहे. याशिवाय अकरा इच्छुकांनी अठरा नामनिर्देशन पत्र नेल्याची माहिती देण्यात आली आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये मदन कानिफनाथ सोनवणे (राईट टु रिकॉल पार्टी), रवींद्र लिलाचंद कोठारी (अपक्ष), अमोल विलास पाचुंदकर (अपक्ष), प्राजक्त प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), महेंद्र दादासाहेब शिंदे (वंचित बहुजन आघाडी व अपक्ष), मच्छिंद्र राधाकिसन गावडे (अपक्ष) व छगन भिकाजी पानसरे (अपक्ष) यांचा समावेश आहे. निवडणुकीतील दोन प्रमुख उमेदवार महायुतीचे डॉ. सुजय विखे व महाविकास आघाडीचे निलेश लंके यांनी…
शिर्डी, बुधवार दि.२४ एप्रिल शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस उरला आहे. तत्पूर्वी या मतदारसंघातून महाविकास आघाडी, महायुतीच्या उमेदवारांपाठोपाठ बुधवारी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघातील तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. रूपवते यांच्यासह बुधवारी या मतदारसंघात नऊ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. तर अन्य सात जणांनी आणखी चौदा नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने या मतदारसंघात नेमके किती अर्ज दाखल होत आहे स्पष्ट होईल. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये उत्कर्षा प्रेमानंद रूपवते (वंचित…
