Author: Annant Ppangarkar
बुधवार, दि. २९ मे ५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाऱ्या त्रिकूटाला पोलिसांनी पकडले असून आणखी एकाचा शोध सुरू आहे. शेजारच्याच सिन्नरमधील एका हॉटेलमध्ये संशयित आरोपींकडून तयार केल्या जात होत्या. संगमनेरमध्ये देखील या नोटा आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकच्या अंबड पोलिसांनी ही कारवाई केली. संशयित अशोक अण्णा पगार (वय ४५ वर्ष, रा. मेंढी, ता. सिन्नर) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या कसून चौकशीत हा प्रकार समोर आला. पोलिसांनी या प्रकरणी हेमंत लक्ष्मण कोल्हे (वय ३२ वर्ष, रा. वाशी, नवी मुंबई) याला नाशिकमधून व नंदकुमार तुकाराम मुरकुटे (वय ५२ वर्ष, रा. सिन्नर) याला सिन्नरमध्ये सापळा रचून अटक केली असून…
मंगळवार, दि. २८ मे गेल्याच आठवड्यात व्हाट्सअपवर करण्यात आलेल्या माजी मुख्यमंत्री, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंवरील वादग्रस्त पोस्ट प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यापाठोपाठ आज पुन्हा एकदा याच ग्रुपच्या ॲडमिनवर वादग्रस्त पोस्ट टाकल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी संगमनेर शहर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये तेढ निर्माण होईल, दोन धर्मियांच्या भावना दुखावतील अशा प्रकारच्या पोस्ट काही विघ्न संतोषी लोकांकडून जाणीवपूर्वक समाज माध्यमांवर टाकल्या जातात. संगमनेरमधील माध्यमही यात मागे नाही. बऱ्याच व्हाट्सअप ग्रुपवर अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत असल्याने शहरातील शांततेला गालबोट लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पोलीस व प्रशासनाकडून अशा प्रकारच्या…
संगमनेर तालुक्यातील कासारे शिवारात कारवाई, दोघांना पकडले कार्यकर्त्यांच्या प्रखर भूमिकेमुळे वजन केल्यावर गोमांस भरले १३ टन मंगळवार, दि. २८ मे गोवंश हत्या बंदी कायद्यानंतर शेकड्याने कारवाया, आंदोलने करून देखील देशाच्या अनेक भागात, काना कोपऱ्यात गोमांस पुरविणारे संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने सुरूच आहे. कोणत्याही कायद्याचा धाक येथील कसायांना राहायला नसल्याने पोलीस दलाच्या नाकावर टिच्चुन किंबहुना त्यांच्याच काही लोकांच्या आशीर्वादाने हे कत्तलखाने सुरू असल्याचा आरोप संगमनेरकर नागरिकांमधून नेहमी होतो. मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल करून गोमांस वाहतूक होत असलेला एक आयशर ट्रक (MH17 BY7824) बजरंग दलाच्या श्याम प्रसाद थोरात, शाम रावबा नाईकवाडी, सुरेश मनोजकुमार कालडा यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासारे…
मंगळवार, दि. २८ मे पुण्यासह देशाला हादरवून सोडणाऱ्या पोर्शे कार अपघातानंतर आता पुन्हा दुसरी धक्कादायक बातमी समोर आली आहे. नगर रस्त्यावर खराडी जकात नाका येथे भरधाव ट्रकने दुचाकीस्वारांना दिलेल्या धडकेत तिघांपैकी दोघा महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मालवाहतूक ट्रक वाघोलीतून पुण्याच्या दिशेने जात असताना खराडी येथील जकात नाका चौकात हा अपघात झाला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून श्यामबाबू रामफळ गौतम असे या चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक गौतम हा ट्रक (MH12 VF6441) घेऊन चंदन नगरच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. जकात नाका…
सोमवार, दि. २७ मे संगमनेरमधील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांच्या कारवाया सातत्याने सुरू आहे. रविवारी रात्री देखील पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात कत्तल केलेल्या गोवंश जनावरांचे ६०० किलो गोमांस आढळून आले आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. उपअधीक्षक वाघचौरे यांना शहरातील जुना जोर्वे रोड लगत असलेल्या मदिना नगर मध्ये एका पांढऱ्या रंगाच्या (MH17 BD4182) बोलेरोमध्ये गोवंश जनावरांचे कत्तल केलेले नेले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी याची माहिती आपल्या पथकातील पोलीस कर्मचारी राहुल डोके व राहुल सारबंदे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी यांच्यासह पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीच्या…
मौलानासोबत मुलीचा विवाह करून देण्यास पित्याने दिला होता नकार साथीदारांच्या मदतीने खून करत मौलानाने घेतला बदला अकस्मात मृत्यू म्हणून नोंदल्या गेलेल्या प्रकरणाची महिनाभरात पोलिसांनी केली उकल सोमवार, दि. २७ मे गेल्या महिन्यात संगमनेर तालुक्यातील मालदाड गावच्या शिवारात असलेल्या जंगलामध्ये मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीची ओळख पटविल्यानंतर पोलीस दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र हा मृत्यू अकस्मात नसून संबंधित व्यक्तीचा घातपात झाल्याचे समोर आले असून याप्रकरणी संगमनेर पोलिसांनी उत्तर प्रदेश मधून मौलानासह त्याला मदत करणाऱ्या दोघांपैकी एकाला अटक केली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मृत व्यक्तीचा मुलगा जुनेद आहातेशाम अन्सारी याने दिलेल्या फिर्यादीवरून आहतेशाम इलियास अन्सारी यांचा खून केल्याप्रकरणी मौलाना…
सोमवार, दि. २७ मे नासिक पुणे महामार्ग लगत भर वस्तीत असलेल्या मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या चार जणांना पोलिसांनी पकडले. ही कारवाई रविवारी (दि. २६) दुपारी एक वाजेच्या सुमारास शहरातील शक्तिमान टॉवर परिसरात करण्यात आली. राजू कचरू मिसाळ (वय ४७, रा. गल्ली क्रमांक १५, गणेशनगर, संगमनेर), नितीन सुंदरलाल ठाणेकर ( वय ४५, रा. वाडेकर गल्ली, संगमनेर), राजेंद्र जिजाबा फटांगरे (वय ४७, रा. गल्ली क्रमांक ३, जनतानगर, संगमनेर) व नीलेश चंद्रकांत अष्टेकर (वय ५०, रा. डेरे शाळेच्या पाठीमागे, रहाणे मळा, संगमनेर) अशी पोलिसांनी पकडलेल्या जुगार खेळणाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी या चौघा जणांकडून जुगाराचे साहित्य, मोबाइल, रोख रक्कम असा एकूण ३६ हजार रुपयांचा…
सोमवार, दि. २७ मे संगमनेरमध्ये कंटेनर चालकाने कोल्हार-घोटी राज्य मार्गावर संगमनेरनजीक बुलेटस्वारांना दिलेल्या धडकेत बुलेटवरील दोघांचाही मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालक कंटेनर घेऊन फरार झाला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत रवींद्र भुजबळ (वय ३३ वर्ष) व गोरख सयाजी पर्वत (वय ४० वर्ष, दोघे रा. निंबाळे, ता. संगमनेर) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. रविवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील मृतक त्यांच्या ताब्यातील बुलेट मोटरसायकलवरून (एम. एच. १४ एच. टी. ५००६) कोल्हार-घोटी राज्य मार्गाने संगमनेर-लोणी रोडने घरी जात असताना लोणी रस्त्यावर फ्लॉवर मार्केटजवळ अज्ञात कंटेनर चालकाने बुलेटस्वारांना पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातातील…
सोमवार, दि. २७ मे व्हाट्सअप ग्रुपवर लोकमत न्यूजमधील व्हिडिओ टाकत त्याखाली टाकलेल्या एका मेसेजमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने मेसेज टाकणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अमोल चंद्रभान पेरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयुब लालखान पठाण (रा. तांदुळवाडी, ता. राहुरी, जि. अहमदनगर) याच्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम २९५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पठाण याने गावातील एका व्हाट्सअप ग्रुप वर लोकमत न्यूजमधील सुमारे दोन मिनिटांचा व्हिडिओ टाकत त्याखाली “अखेर डाव साधलाच. केंद्रापाठोपाठ आता महाराष्ट्रातील खाजगीकरण केलय. रद्द केलेला जीआर पुन्हा काढण्यात आला आहे.…
रविवार, दि. २५ मे अपघातातील जखमीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन येणारी रुग्णवाहिका आणि एसटी बसचा संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारात भीषण अपघात झाला. यात एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कोंची शिवारात अपघात झाल्याची माहिती मिळाल्याने येथील कुटे रुग्णालयाची रुग्णवाहिका (विंगर एम.एच. – १७ ए-जी ८००२) घटनास्थळी जखमींना आणण्याकरिता गेली होती. अपघातातील जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन येत असताना या रुग्णवाहिकेचा आणि एसटी बसचा (एम. एच. १४ बी.टी. ३८०३) कोकणगाव शिवारात अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहे. जखमीत रुग्णवाहिकेच्या चालकाचाही समावेश आहे.…
संडे स्पेशल फिनलँड हा उत्तर युरोपातला एक देश आहे. या देशाची लोकसंख्या फक्त पंचावन्न लाख आहे. इथली शिक्षणव्यवस्था निव्वळ जगावेगळी नसून ती जगातील सर्वात चांगली मानली जाते. फिनलँड शंभर टक्के साक्षर देश आहे. इथले विद्यार्थी जगात सर्वात जास्त हुशार विद्यार्थी म्हणून गणले जातात. पीआयएसए (प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट) म्हणजे “पिसा” नावाची संस्था जगातल्या पंधरा वर्षांच्या शिकणाऱ्या मुलांचं गणित, विज्ञान आणि इतर विषयांच्या अनुषंगानं परीक्षण करते, त्या संस्थेच्या परीक्षेत फिनलँडचे विद्यार्थी कायम सर्वोच्च स्थानी असतात. या देशात शिक्षण पूर्णपणे मोफत असून ते सर्वांसाठी ते उपलब्ध आणि अनिवार्यसुद्धा आहे. या देशातील प्रत्येक विद्यार्थी आपलं संपूर्ण शिक्षण फुकट घेतो. त्यासाठी त्याला एकही…
रविवार, दि. २६ मे | अनंत पांगारकर खचल्यानंतर तब्बल दीड वर्ष नव्या निर्मितीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाजत गाजत केलेल्या भूमिपूजनानंतरही दीर्घकाळ रेंगाळलेला म्हाळुंगी नदीवरील पूल पाडण्यास अखेर मुहूर्त सापडला आहे. शनिवारपासून खचलेला पूल पूर्णतः नामशेष करण्यास सुरुवात झाली. यामुळे दीर्घकाळ गैरसोयीला सामोरे जाणाऱ्या संगमनेरकरांना नव्या पुलाच्या निर्मितीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान खचलेला हा पूल गेल्या दीड वर्षांपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद होता. पुलाचा विषय राजकीय श्रेयवादात अडकल्याने संगमनेरकर यातून भेटीला धरले गेले होते. यासाठी म्हाळुंगी पूल बनाव कृती समितीच्या माध्यमातून एकवटलेल्या संगमनेरकरांना अखेर न्याय मिळाला आहे. समितीच्या माध्यमातून सातत्याने करण्यात आलेल्या मागणीमुळे केवळ हाच पूल…
संडे स्पेशल! पुण्यात झालेल्या ‘हिट अँड रन’ केसमध्ये एका बिल्डर व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने नशेत दीड ते दोन कोटी रुपयांच्या अतिशय महागड्या परदेशी बनावटीच्या कारने दोघांना चिरडले. त्यांचा अत्यंत दुर्दैवी पद्धतीने अंत झाला. घटनेतील दोषीला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोप असलेल्या बालगुन्हेगाराला (विधी संघर्षित बालक) ताब्यात घेऊन पोलिसांनी जुव्हेनाईल जस्टीस बोर्डासमोर हजर केले. त्याला बोर्डाच्या सदस्यांनी तात्काळ जामीन पुढील अटीवर दिला, अट ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची, मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेण्याची, १५ दिवस वाहतुकीचे धडे गिरवण्याची शिक्षा देऊन जामिनावर मोकळे केले. आरोपीला पोलिसांनी तसेच स्थानिक आमदारांनी मदत केली, असे आरोप करण्यात आले. ज्याने दोघांना चिरडलं, दोन कुटुंब उद्ध्वस्त केली, अशा प्रवृत्तीला ताब्यात घेतल्यावर…
ईडीच्या अधिकार्यांनी देशभर मांडलेल्या उच्छादाला सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याने चांगलंच उताणं पाडलंय. सत्ताधार्यांची मर्जी राखण्यासाठी लोकशाहीची उघड थट्टा उडवणार्या या विभागातल्या अधिकार्यांना आणि सत्तेसाठी निरपराधांवर खोटे गुन्हे लादणार्या सत्ताधार्यांच्या मस्तीला जमिनीवर आणणार्या सर्वोच्च न्यायालयाचे मानावेत तितके आभार कमी आहेत. असे निवाडे देताना संबंधितांच्या कृतीची चिकित्सा करण्याचं फर्मान न्यायालय काढतं. मात्र यावेळी ते निघाले नाहीत. ते निघाले असते तर गब्बर झालेल्या ईडी अधिकार्यांच्या लुटीचे सारे फेरे बाहेर आले असते. या विभागात आल्यापासून कोण किती श्रीमंत झाला ते जगापुढे आलं असतं. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्याला धरून आला असल्याने व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणार्यांनी किती कमाई केली, याचा लेखाजोखा बाहेर आणला…
शनिवार, दि. २५ मे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या सहा जणांच्या टोळीतील चौघांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रात्री यश आले असून उर्वरित दोघेजण मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले. पथकाने पकडलेले चौघे आणि पळून गेलेले दोघे सराईत गुन्हेगार आहे. ओसवाल इंपिरियअल चव्हाण (वय २८ वर्षे, रा. वाळुंज पारगांव, ता. जि. अहमदनगर), डेग विठ्ठल भोसले (वय २९ वर्षे, रा. आनंद चिखली, ता. आष्टी, जि. बीड, हल्ली रा. वाळुंज पारगांव, ता. जि. अहमदनगर), तुषार उर्फ नुटल्या इंपिरिअल भोसले (वय ३३ वर्षे, रा. वाळुंज पारगांव, ता. जि. अहमदनगर), व नागेश रेजा काळे (वय २५ वर्षे, रा. वाळुंज पारगांव, ता.…
१० हजार रुपयांची लाच भोवली; न्यायालयाने लाचखोर महिला अधिकाऱ्याला दिली ५ वर्षाची शिक्षा आणि केला दंड!
शनिवार, दि. २५ मे पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करून देण्यासाठी दहा हजार रुपयांची घेणाऱ्या ग्रामसेवक महिलेला अतिरिक्त सत्र न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. लाचेचे हे प्रकरण २०१७ मध्ये बारामतीच्या पंचायत समिती कार्यालयात घडले होते. पंतप्रधान घरकुल आवास योजनेतून घरकुल मंजूर करून देण्यासाठी सोनवडी-सुपेच्या (बारामती जि. पुणे) लोकसेवक ग्रामसेविका श्रीमती दिपाली जगन्नाथ कुतवळ (वय ३७ वर्ष) यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी पकडले होते. लाच लुचपतच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक अर्चना दौंडकर यांनी तपास करत बारामती न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते. बारामतीच्या…
शनिवार, दि. २५ मे नगर शहरात घडलेल्या चैन स्नॅचिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाला चोरीचे सोने विक्री करण्यासाठी बडी मज्जित मुकुंद नगर परिसरात एक संशयित आल्याची माहिती मिळाली. पथकाने संशयिताला पकडण्यासाठी या परिसरात लावलेल्या सापळ्यामध्ये दोघेजण पावणे दोन लाखाच्या मुद्देमालासह अलगद अडकले. त्यांच्या चौकशीत त्यांनी नगरच्या सावेडी, तारकपूर परिसरात केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. सलीम ऊर्फ सलीमोद्दीन अजोलोद्दीन शेख (वय ५४) व जिशान सलीम ऊर्फ सलीमोद्दीन शेख वय २१, दोघे रा. नवीन विडी वसाहत, कुंभारी, जि. सोलापुर मुळ रा. कासीम बऱ्ही दर्गा, पढेगांव, जि. छत्रपती संभाजीनगर) असे पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत. यातील सलीम ऊर्फ सलीमोद्दीन अजोलोद्दीन शेख…
शुक्रवार, दि. २४ मे बुधवार-गुरुवारी दोन दिवसात अकोले तालुक्यातील सुगावमध्ये प्रवरा नदीपात्रात बुडालेल्यांची संख्या सहावर गेली असताना संगमनेरमध्ये प्रवरा नदीपात्रात दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी समोर आली आहे. प्रवरा नदीचे या वेळचे आवर्तन अनेकांच्या जीवावर बेतले आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता जाणवत असताना नदीपात्रात आंघोळीसाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र नदीपात्रात वाळू तस्करांनी केलेल्या मोठमोठ्या खोल खड्ड्यामुळे पाण्याचा पोहणाऱ्यांना अंदाज येत नदीपात्रात वाळू तस्करांनी खोदलेले हे खड्डे नागरिकांसाठी मात्र जीव घेणे ठरत आहे. वाळू तस्करी थांबविण्यात अधिकाऱ्यांपासून मंत्र्यांपर्यंत कोणालाही यश आले नसल्याने तालुक्यातील सर्वच नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरूच आहे. सुगावमधील शोध कार्य…
शुक्रवार, दि. २४ मे दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी भाऊसाहेब कुटे याला आज संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत आता या घोटाळ्याच्या अनुषंगाने काय माहिती समोर येते याकडे लक्ष लागले आहे. दूधगंगा पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी २१ जणांविरुद्ध लेखापरीक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक स्वरूपाचा गुन्हा असल्याने अहमदनगर आर्थिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा तपास करत आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून प्रमुख आरोपी असलेला कुटे पोलिसांना सापडत नव्हता. यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आरोपींच्या अटकेसाठी व…
शुक्रवार, दि. २४ मे लोकसभा निवडणुकीदरम्यान जाहीर करण्यात आलेल्या आणि नंतर पुढे ढकलण्यात आलेल्या दोन शिक्षक व दोन पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांची नवी तारीख जाहीर करण्यात आली असून आता या निवडणुका २६ जूनला होणार आहे तर १ जुलैला मतमोजणी होईल. विधान परिषदेच्या मुंबई व कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघातील विद्यमान आमदारांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने या जागांसाठी निवडणूक होत आहे. यापूर्वी या जागांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती मात्र शिक्षकांनी लोकसभा निवडणुकीचे कारण देत तारीख बदलण्याची मागणी केली होती. त्यामुळे ही निवडणूक रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा नव्याने निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. असा आहे…
