Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर उपविभागातील संगमनेर-अकोले तालुक्यातील रिक्त असलेल्या १५१ गावांमधील पोलीस पाटीलपदाच्या समांतर आरक्षणासाठी येत्या ७ डिसेंबरला सकाळी ११.०० वाजता नवीन नगर रोडवरील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सभागृहामध्ये आरक्षण सोडत काढली जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी दिली आहे. संगमनेर व अकोले तालुक्यातील रिक्त पदांवर पोलीस पाटील नेमण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत. रिक्त असलेल्या जागांवर प्रचलित शासन तरतुदीनुसार प्रवर्गनिहाय आरक्षण निर्धारित करावयाचे असून त्या अंतर्गत समांतर आरक्षण सोडत काढण्यासाठी प्रांताधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संबंधित गावातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रांताधिकार्‍यांनी केले आहे. रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांच्या गावांची नावे प्रांताधिकारी कार्यालयात उपलब्ध…

Read More

मुंबई @ प्रवीण पुरो (9869991868) मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बॅकफुटवर गेलेल्या भाजपने दोन समाजात तेढ निर्माण करून स्वत: मात्र पध्दतशीर नामेनिराळं राहण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा मोर्चांची राळ सुरू होती तेव्हाही भाजपने मराठा समाजाला इतरांच्या अंगावर सोडून स्वत:ला वेगळं ठेवलं. तेव्हा मराठा समाजातील भाजपला मानणारे याला कारणीभूत होते. आता महायुतीच्या सरकारमध्ये बसलेले मंत्री छगन भुजबळ जबाबदार ठरत आहेत. आपल्यावरचं संकट इतरांवर टाकण्यासाठीची ही खेळी भाजपने पध्दतशीरपणे खेळली आहे. यासाठी त्याने आता छगन भुजबळ यांचा उपयोग करून घेतल्याचं दिसतं. भुजबळ यांच्या या खेळीमागे ओबीसींवरचं प्रेम वैगेरे काहीही नाही. सत्तेत राहूनही अटकेचं संकट टाळणं हेच यामागचं कारण होय. मराठा समाजातील वंचितांना आरक्षण देण्याला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्याच्या सुनावणी प्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना नेते संजय राऊत शनिवारी (२ डिसेंबर) मालेगाव न्यायालयात उपस्थित झाले. त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने राऊत यांचा जामीन अर्ज मंजूर केला. आता या खटल्याची सुनावणी ३ फेब्रुवारीला होणार आहे. गिरणा सहकारी साखर कारखाना प्रकरणी बदनामी केल्याच्या कारणावरून मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव न्यायालयात खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला आहे. भुसे यांनी दाखल केलेल्या या दहाव्याच्या सुनावणीत खासदार राऊत आत्तापर्यंत दोनदा न्यायालयात गैरहजर राहिले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना वॉरंट काढले होते. राऊत शनिवारी न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांच्या…

Read More

अमृतवाहिनी सहकारी बँकेची ऑनलाइन प्रणाली कौतुकास्पद महाराष्ट्र संवाद न्यूज बँकिंग हा विषय आज प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा झाला आहे. ग्रामीण भागातील नागरी व सहकारी बँकांनी सर्वसामान्य माणसाला मोठा आर्थिक आधार दिला. आता बदलत्या काळात नवीन तंत्रज्ञान आणि ऑनलाईन प्रणालीचा वापर अनिवार्य ठरला असून या क्षेत्रात अमृतवाहिनी सहकारी बँकेने केलेले काम कौतुकास्पद ठरल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्यावतीने संगमनेरमध्ये ‘असोसिएशन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. तांबे बोलत होते. प्रशिक्षक लेखापरीक्षक अक्षय भाटे, उद्योजक राजेश मालपाणी, असोसिएशनचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सकाळी भारतीय वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने झापवाडी (ता.नेवासा) हेलिपॅड येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,‌ जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला यावेळी उपस्थित होते.

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गावठी कट्टा आणि दोन राऊंड सोबत बाळगत संशयास्पदरित्या फिरणाऱ्या श्रीरामपूरमधील व्यक्तीला संगमनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. विक्रीच्या उद्देशाने गावठी कट्टा आरोपीने जवळ बाळगण्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. अज्जू उर्फ अजीम अन्वर पठाण (वय 26 वर्ष, रा. वार्ड नंबर 1, मिल्लतनगर, श्रीरामपूर असे पोलिसांनी पकडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी वडगाव पान ते समनापुर दरम्यान ही कारवाई करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज गुरुवारी शनिशिंगणापूर दौऱ्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या संगमनेर पोलिसांनी परिसरातील हॉटेल, लॉजिंगची तपासणी व नाकाबंदी सुरू केली असताना त्यांना यासंदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले असून बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री अनुक्रमे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची संक्षिप्त माहिती खालील प्रमाणे – ???? अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.  ???? झोपडीधारकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात करण्यात आली आहे.  ???? राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान राबविण्याचा निर्णय़ झाला आहे. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.  ???? मराठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पर्जन्य छायेमुळे सातत्याने दुष्काळ, पाण्याची कमतरता असतानादेखील काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली येथील सहकारी संस्थांच्या माध्यमातून साधला गेलेला ग्रामीण विकास आणि तालुक्यातील सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक प्रगती या सहकारातून साधलेल्या पॅटर्नचे नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. नाबार्डच्या मुंबई विभागीय शाखेतील अधिकाऱ्यांच्या अभ्यास गटाने शनिवार व रविवारी अमृत उद्योग समूहाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या विविध सहकारी संस्थांना भेटी देत पाहणी केली. मुंबई मुख्यालयाचे डेप्युटी जनरल मॅनेजर राकेश सिंग, विजय तिरूमला, मंगला श्रॉफ, वंदना वेणुगोपाल, गीता यादव, विवेक खानोलकर आदींचा साठ अधिकाऱ्यांचा या अभ्यास गटात समावेश होता. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, जोर्वे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज देशाच्या स्वातंत्र्यात व राष्ट्र उभारणीत मोठे योगदान असणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विधिमंडळ पक्षनेते व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत राहता तालुक्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी तालुकाध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, सचिन चौगुले, विक्रांत दंडवते, नितीन सदाफळ, विनायकराव मते, प्रदेश काँग्रेसचे सचिव सचिन गुंजाळ, मुन्ना फिटर, अमोल आरने, अमोल बनसोडे आदी उपस्थित होते. यांचा झाला प्रवेश: याप्रसंगी निलेश यादव, रामदास गिधाड, नवनाथ गिधाड, सौरभ भाकरे, रविंद्र भाकरे, संजय गिधाड, हरीश गिधाड, प्रमोद गिधाड, विठ्ठल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई येथील मराठा मंदिर साहित्य शाखेच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्य पारितोषिक 2022 ची घोषणा करण्यात आली आहे. वैचारिक साहित्य प्रकारांमध्ये संगमनेरमधील लेखक संदीप वाकचौरे यांच्या ‘सृजनाची वाट’ या पुस्तकाला पारितोषिक जाहीर करण्यात आल्याची माहिती शाखेचे कार्याध्यक्ष प्रदीप विचारे यांनी दिली. वाकचौरे यांच्या सृजनाची वाट या पुस्तकाला वैचारिक साहित्य प्रकारातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषक जाहीर करण्यात आले आहेत. सनय प्रकाशनाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेले ‘सृजनाची वाट’ हे शिक्षण विषयावरचे पुस्तक आहे. मराठा मंदिर साहित्य शाखेच्यावतीने कादंबरी, कथा, काव्य, प्रवास, समीक्षा, संशोधन, चरित्र, बाल वांड:मय, ललित वांड:मय, वैचारिक साहित्य अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये साहित्य पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. वाकचौरे यांनी सृजनाची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर-२, मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्तसोहळा सोमवारी पार पडला. यावेळी सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली. त्यामुळे आता लवकरच 2024 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या २०२२ साली आलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर सुपरहिट कामगिरी केली. आनंद दिघे यांच्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे या सिनेमात पाहायला मिळाले. त्यानंतर धर्मवीर २ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून याची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात आहे. आता या चित्रपटाचा पुढील भाग येत असून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी 28 नोव्हेंबर संगमनेर आणि राहाता येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या सहा तालुक्यातील युवा वॉरियर्सशी संवाद साधून संघटनात्मक कार्याचा आढावा घेणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी दिली. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल तोंडावर असतानाच भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा मंगळवारी आढावा घेणार आहे. लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे राज्यातील मतदारसंघाचा दौरा करत आहे. या दौऱ्याअंतर्गत संगमनेर आणि राहाता येथे संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बावनकुळे यांचे सकाळी शिर्डी विमानतळावर आगमन झाल्यानंतर संगमनेरमध्ये…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यात संघटनात्मक बांधणीसाठी भर दिला असून त्यासाठी विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे देण्यात आली आहे. राऊत यांच्याकडे नगर, शिर्डीसह उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामुळे राऊत यांच्या नेतृत्वाखाली आता नव्याने संघटना बांधणीला वेग येण्याची चिन्हे आहे. या बांधणी दरम्यान काही पदाधिकारी देखील बदलले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, शिर्डी, पुणे, बारामती, शिरूर, मावळ या लोकसभा मतदारसंघासह विधानसभा मतदारसंघ पिंपरी चिंचवड व मावळची जबाबदारी राऊत यांच्यावर सोपविण्यात आली आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज एका लग्न समारंभात अल्पवयीन मुलीशी झालेल्या ओळखीनंतर तिचे नको त्या अवस्थेतील फोटो काढून ते समाज माध्यमात व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या फोटोग्राफरविरुद्ध अहमदनगर मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी महेश गोवर्धन कराळे (वय २३, रा. आगडगाव ता. नगर, हल्ली रा. नालेगाव, दिल्ली गेट) याच्याविरोधात विनयभंग, अत्याचार, पोक्सो आदी कलमान्वये गुरूवारी (दि. २३) रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. १४ डिसेंबर २०२२ रोजी पीडित मुलगी केडगाव येथे मावस भावाच्या लग्नासाठी गेली होती. त्यावेळी तिची तेथे फोटोग्राफीसाठी आलेल्या महेश कराळे सोबत तिची ओळख झाली होती. आरोपीने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच नगर, नाशिकच्या धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आल्याने समन्यायी पाणी वाटप कायदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये काँग्रेसने पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध दाखवत आंदोलन केले. प्रवरा उपखोऱ्यातील भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आलेल्या पाण्याला स्थगिती देण्याची मागणी करीत आंदोलन करण्यात आले. थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. का करावे लागले आंदोलन: अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा खोऱ्यातील भंडारदरा व निळवंडे लाभ क्षेत्रामध्ये यावर्षी सरासरी आठ ते दहा इंचापेक्षा कमी पर्जन्यमान झाले असल्याने भीषण पाणीटंचाई…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. वारकरी संप्रदायाने सर्व जाती व समाजांना एकत्र आणले. आता मात्र राजकारणाच्या नावावर समाज व जाती वेगळ्या केल्या जात आहे. राजकारणाचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या महाराष्ट्रात सध्या आरोप-प्रत्यारोपांची होणारी चिखलफेक अत्यंत वाईट असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी केले. संगमनेरच्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्यावतीने यशवंतराव चव्हाण यांच्या ३९ व्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित अभिवादन व प्रकट मुलाखती दरम्यान फुटाणे बोलत होते. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, शेतकरी कवी भरत दौंडकर, ॲड. आर. बी. सोनवणे, तुळशीनाथ भोर, सुधाकर जोशी, विष्णुपंत रहाटळ, सिताराम वर्पे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल अशी घोषणा केली आहे. या घोषणाचे स्वागत होत असतानाच संगमनेरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागणीने जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर एका शिष्टमंडळाने आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली असून थोरात यांनी सकारात्मक भूमिका स्पष्ट केली आहे, अशी माहिती शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा संदर्भात पालकमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचे समस्त नागरिकांनी स्वागत केले. मात्र संगमनेर तालुक्याचा इतिहास आणि परंपरा वेगळ्या आहेत याचा संबंधितांना विसर पडल्याची टीका कार्यकर्ते करू लागले. या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासंदर्भात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यात मोठ्या तोडफोडीनंतर शिंदे-फडणवीस-पवार सरकार सत्तेत आले असले तरी लोकसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वाट्याला जागा वाटपात किती जागा येणार यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फॉर्मुलाच सांगितला. लोकसभा निवडणुका नेमक्या कधी होणार याबाबत अद्यापही स्पष्टता नसली तरी देखील राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये थेट सामना होण्याची चिन्हे आहेत. महायुती व महाविकास आघाडीमध्ये सामील असलेल्या घटक पक्षांच्या वाट्याला लोकसभेच्या किती जागा येणार? यावर नेहमी चर्चा सुरू असते. अशाच एका मुलाखतीमध्ये महायुतीच्या जागांबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. फडणवीस यांनी या मुलाखतीत भारतीय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची संधी असताना देखील आपण केवळ निळवंडे धरण पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे राज्यमंत्रीपद मागून घेतले. त्यानंतर निळवंडे निर्मितीचा सर्व इतिहास समोर आहे. आता निळवंडेतून पाणी येत आहे. मात्र या कामासाठी ज्यांनी कष्ट केले, मदत केली, तो इतिहास आपण विसरून चालणार नाही, असे प्रतिपादन निळवंडे धरण व कालव्याचे निर्माते, जलनायक म्हणून ओळखले जाणारे आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुक्यातील लोहारे-मिरपुर येथे डाव्या कालव्याचे पाणी पूजन आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, मिलिंद कानवडे, संपत गोडगे, प्रभाकर कांदळकर, प्रल्हाद मुर्तडक, कृती समितीचे उत्तमराव घोरपडे, गंगाधर गमे, विलास गुळवे,…

Read More

रविवार विशेष लेख @ प्रवीण पुरो आपणच संस्कृतीचे कसे पायिक आहोत, आपल्याहून संस्कृतीची अक्कल कोणालाच कशी नाही, याविषयी अक्कलेचे तारे तोडणारे भाजपचे नेते दोन दिवसांपासून जमिनीवर आलेले दिसतात. आपल्या प्रदेशाध्यक्षाच्या द्युत क्रीडेचे गोडवे गाऊ लागल्यापासून पक्षातल्या बोलबच्चन टग्यांची बोलती बंदी झालेली दिसते. आपण करत असलेल्या गुन्ह्यांवर पांघरूण घालण्यासाठी हे टगे कसलीही उदाहरण पुढे करायचे. मकाऊला पोहोचलेल्या आपल्या नेत्याच्या काळ्या कारनाम्याचं उत्तर देतानाही या मुर्खांनी आदित्य ठाकरेंपुढच्या भरलेल्या ग्लासचं उदाहरण देण्याचा निर्लज्जपणा केला आणि मकाऊच्या कॅसिनोतील जुगार झाकण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. लाज विकलेलीच माणसं असले उद्योग करत असतात. आज भाजपचे नेते ते करत आहेत.  जगाला संस्कृतीचं ज्ञान शिकवणार्‍या या पक्षाच्या नेत्यांना…

Read More