Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली – काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. “भारत न्याय यात्रा” असं नाव या यात्रेला देण्यात आल असून १४ जानेवारीला मणिपूर पासून ही यात्रा सुरू होणार असल्याची घोषणा काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी केली. खासदार गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी दक्षिण भारतातील कन्याकुमारीपासून उत्तर भारतातील काश्मीरपर्यंत काढलेली ही भारत जोडो यात्रा देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. या यात्रेचा दुसरा टप्पा लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू होईल अशी शक्यता होती. मात्र २२ जानेवारीला होत असलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अति भव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आता ही यात्रा १४ जानेवारीला मणिपूर पासून…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी (ता. २८ डिसेंबर) नागपूरमध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा १३८ वा स्थापनादिन साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यामधून बुधवारी दुपारी १० हजारावर काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी नागपूरला जाणार आहे. मंगळवारी संगमनेरमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे यासाठी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव धीरज गुजर, योगेंद्र बंटी पाटील, आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, करण ससाने, हेमंत…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी दैनिक नगर स्वतंत्रचे संपादक सुभाष चिंधे, सचिवपदी राजेंद्र वाडेकर तर नगर शहराध्यक्षपदी संतोष आवारे यांच्या निवडीची घोषणा संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष राजा माने यांनी केली. नगर शहरातील हॉटेल फरहत येथील हॉलमध्ये डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली शहरासह जिल्ह्यातील डिजिटल मीडिया संपादक, पत्रकारांची बैठक पार पडली. यावेळी जेष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर, बाबा जाधव, मकरंद घोडके, इकबाल शेख, विजय सांगळे, जितेंद्र गांधी, दैनिक नगर स्वतंत्रचे कार्यकारी संपादक सुभाष मुदळ, मनोज सातपुते, लेटस्अपचे प्रवीण सुरवसे, अमोल भिंगारदिवे, श्रीकांत खांदवे, सागर गोरखे, प्रशांत शिंदे, नगर घडामोडीचे सागर तनपुरे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून वंचित राहिलेल्या घटकांना लाभ देण्यासाठी संगमनेर शहरात दिनांक २७ व २८ डिसेंबर रोजी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध योजनांसाठी पात्र असलेले परंतु लाभापासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणे , जनजागृती करणे याबरोबरच लाभार्थ्यांशी संवाद करून या विकसित यात्रेत अंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. शहरातील बस स्थानक परिसर येथे उद्या, दि. २७ रोजी दुपारी २.३० वाजता व २८ डिसेंबर रोजी सकाळी १०…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : आगामी निवडणुकीत भाजपाला ३५० ते ३७५ जागा मिळतील आणि पुन्हा भाजपा सत्तेत येईल. भाजपा देशात उत्तम काम करत आहे. त्यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपला नक्कीच यश मिळेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील. देशाकडे भाजपाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे मोठे वक्तव्य नाना पाटेकर यांनी केले आहे. नाना पाटेकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. ज्यावेळी त्यांनी निवडणुका आणि देशाचे राजकारण याबाबत वक्तव्य केले आहे. नानांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकारणात याबाबतची जोरदार चर्चा रंगली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांनाच लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. ज्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष हे…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून काही दिवसांपूर्वी मानद डॉक्टरेट ही पदवी देण्यात आली होती. आता त्या पाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली जाणार आहे. मंगळवारी संध्याकाळी मुंबई विद्यापीठाच्या दिक्षांत सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे. फडणवीस यांनी केलेल्या कार्याची दखल घेत ही पदवी प्रदान केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीसांचे जपानमध्ये मराठमोळ्या पद्धतीने जोरदार स्वागत करण्यात आले होते. जपान आणि भारतातले संबंध दृढ करण्यासाठी हा दौरा त्यांनी केला होता. त्यानंतर आज जपानकडून त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात येणार आहे. विशेष बाब…
संगमनेरमध्ये विद्यार्थ्यांवर उपचार सुरू महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरकडे येणाऱ्या एसटी बसचा एक्सेल तुटल्याने एसटी बस पलटी झाली. या अपघातामध्ये साधारणता ४० विद्यार्थी जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी संगमनेरमध्ये आणण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस राहुरीहून सकाळी संगमनेरच्या दिशेने येत असताना पिंपरणे गावाच्या शिवारात हा अपघात झाला. या बसमध्ये बहुसंख्य विद्यार्थीच होते. हे सर्वजण संगमनेरला येत असताना मंगळवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक आणि यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मानवता हाच जगातील सर्वात मोठा धर्म आहे. सुख समाधान व शांतीसाठी सर्वांनी प्रेमाने एकत्र राहावे, हा संदेश देणारा नाताळ सण असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी करीत नाताळ व नवीन वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी ‘गाणी येशू जन्माची’ या कार्यक्रमानंतर शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, विश्वास मुर्तडक, प्रा. बाबा खरात, आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. बाबा खरात यांच्या मार्गदर्शनाखाली जॉर्ज चोपडे, ॲड. अरविंद राठोड, सत्यानंद कसाब, विजय खंडीझोड, राजेंद्र सांगळे, स्वप्नील कसाब, भाऊसाहेब नेटके, डॉ. हेमलता राठोड, प्रतीक खरात, प्रांजल…
महाराष्ट्र संवाद न्यूज जिथे आपण सर्वजण एकत्र राहतो, एकमेकांना आधार देतो, सुखदुःखे वाटून घेतो. ती वास्तू फक्त आनंदी नसावी तर समाधानी असावी. आनंद हा भौतिक पातळीवर असतो आणि समाधान आत्मिक पातळीवर असते. साखर, लिंबू, मीठ हे सारे पदार्थ आपापल्या आनंदात एकत्र रहातात. पण जेंव्हा ते एकमेकांत मिसळतात, तेंव्हाच विलक्षण मधुर चवीचे सरबत तयार होते. त्यासाठी लिंबाला कापून आणि पिळून घ्यावे लागते तर मीठ व साखरेला पाण्यात विरघळून एकजीव व्हावे लागते. म्हणून पती-पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत. कारण गृहमंदिरात जर पती-पत्नी मनाने एकरूप झाले, तर चवदार सरबत नाही तर मधुर-अमृत तयार होईल. आपले आईबाबा एकमेकांशी किती प्रेमाने वागताहेत हे बघून…
महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – मैत्रिणींसह अकोले तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या सांदण दरीचे निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी आलेल्या मुंबईतील तरुणीचा दरीत कोसळून मृत्यू झाला. ऐश्वर्या खानविलकर (वय 24 वर्ष, रा. दहिसर, मुंबई) असे या तरुणीचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून राजुर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत या तरुणीचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठविला आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. मुंबईतून काही मैत्रिणी भंडारदरा धरण परिसरासह सांदण दरी बघण्यासाठी आल्या होत्या. यावेळी यातील ऐश्वर्या खानविलकर हिचा खडकावरून पाय घसरल्याने ती खाली पडली. खडकावर पडल्याने डोक्याला मार लागून या तरुणीचा मृत्यू झाला. घटनेची…
महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री, काँग्रेस नेते, आमदार सुनील केदार यांना न्यायालय पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आता केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर नागपूर पोलिसांनी विधीमंडळाला केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली. यासंबंधीचे न्यायालयाचे आदेश देखील विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवण्यात आले आहे. त्यानंतर केदार यांची २२ डिसेंबर पासून आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला. २००१-२००२ मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विसेस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्विसेस या खाजगी कंपन्यांच्या मदतीने बँकेच्या रकमेतून सरकारी रोखे खरेदी केले होते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज प्रवीण पुरो @ 9869991868 प्रचंड तटबंदी असलेल्या लोकसभेच्या सभागृहात दोन तरुणांनी अनाहुत केलेल्या प्रवेशाने सारा देश अचंबित झाला. असुक्षित म्हणून ज्या जुन्या संसद भवनावर बोट दाखवणार्या सत्ताधार्यांनी उभ्या केलेल्या नव्या संसद भवनाचा तट ओलांडून थेट संसदेच्या सभागृहात उड्या मारत हल्ला करता येऊ शकतो, हे या तरुणांनी सार्या देशाला आणि जगाला दाखवून दिलं. नवं संसद भवन आणि त्याला असलेली सुरक्षा किती तकलादू आणि कामचलाऊ आहे, याचं प्रत्यंतर या घटनेने देशाला दिलं आहे. आता या तरुणांचे पाठीराखे कोण याचा शोध घेऊन त्या घटनेशी काँग्रेस वा इतर विरोधकांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न होईल. लातूर आणि चेन्नईच्या नावामुळे त्या चर्चेला ऊत आला…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – एरव्ही त्याच्या दहशती आणि जीवघेण्या कृत्याबद्दल सर्वच ऐकून होते. शुक्रवारच्या सकाळीच त्याने नासिक-पुणे महामार्ग ओलांडत मालपाणी लॉन्समध्ये प्रवेश केला. थोडा वेळ तेथे रेंगाळल्यानंतर त्याने भिंतीवरून उडी घेत थेट मागच्या बाजूला असलेल्या पद्मनगर तेथून जवळच्याच आदर्श कॉलनीमध्ये प्रवेश केला. थांबण्यासाठी तेथे त्याला पत्र्याचे शेड दिसली आणि त्याने तेथेच काही काळ मुक्काम ठोकला. परिसरासह आसपास असलेल्या नागरिकांचे भीतीने गाळण उडाली आणि बघता बघता ही वार्ता शहरात पसरली. शुक्रवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास नाशिक पुणे हायवेलगत असलेल्या मालपाणी लॉन्स मध्ये एका बिबट्याने प्रवेश केला होता. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार पाहिल्यानंतर त्याने लगेचच तेथील कर्मचाऱ्यांना याची माहिती…
महाराष्ट्र संवाद न्यूज धुळे – शालेय विद्यार्थी सनी साळवे यांच्या खून प्रकरणात धुळे न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर उर्वरित तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार झालेली ही जन्मठेपेची राज्यातील पहिलीच ऐतिहासिक घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. धुळ्यातील देवपूर भागात २०१८ मध्ये झालेल्या सशस्त्र हल्ल्यात सनी साळवे याचा खून करण्यात आला होता. देवपूरमधील नरसिंह बियर बार जवळ गाडीला कट मारल्याच्या कारणातून झालेल्या वादात सनी साळवे, सुमेध सूर्यवंशी आणि सागर साळवे यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोपींनी रुग्णालयातही जाऊन जखमींना धमकावण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – नगरपरिषद प्रशासनाने शहरातील घरांच्या संकलित करामध्ये दहा टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे. ही दरवाढ अन्यायकारक असून महागाई, बेरोजगारी व व्यापार मंदीच्या काळात नागरिकांना परवडणारी नाही. त्यामुळे प्रस्तावित करण्यात आलेली ही दरवाढ तातडीने रद्द करावी, अशी मागणी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारकडे केली. यामुळे वाढीव दरवाढीस स्थगिती मिळण्याची चिन्हे असून यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. या संदर्भात थोरात म्हणाले, संगमनेर नगर परिषद हद्दीत संकलित कर आकारणीबाबत चतुर्थ वार्षिक रिविजन पूर्ण झाली असून सन २०२३-२४ या वर्षासाठी प्राथमिक कर निर्धारण करण्यात आले आहेत. यात शहरातील घरांच्या संकलित करात…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शालेय जिल्हास्तरीय रस्सीखेच क्रीडा स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल अव्वल ठरली. जिल्ह्यातील विविध शाळांच्या ३७ संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेत ध्रुवच्या १४, १७ व १९ वर्षांखालील रस्सीखेच खेळाडूंनी २७ सुवर्णसह १९ कांस्यपदकांची कमाई केली. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या ध्रुवच्या खेळाडूंची विभागीय रस्सीखेच स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने संगमनेरातील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या प्रांगणात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. चौदा वर्षांखालील मुलींच्या गटात खेळतांना ध्रुव ग्लोबल स्कूलच्या पूर्वा पवार, आर्या पाटील, श्रद्धा साठे, ज्ञानेश्वर देवकर, पालवी चुत्तर, कादंबरी, तन्वी ठोंबरे, वैष्णवी तनपुरे व स्वरा वलवे यांनी सुवर्ण पदके पटकाविली. तर, याच वयोगटातील मुलांमध्ये श्रेयस…
महाराष्ट्र संवाद न्यूज साखर कारखानदारीसाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने २०२४-२०२५ या गळीत हंगामात ऊस लागवड, खोडवा, निडवा पीक घेणाऱ्या ऊस उत्पादकांसाठी अमृत शक्ती दाणेदार सेंद्रिय खत ५० टक्के अनुदानावर सुरू करण्यात आल्याची माहिती कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या सहकार महर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याने उच्चांकी भावासोबतच ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व कामगारांचे हित जोपासले आहे. कारखाना कार्यक्षेत्रात वाढीसाठी कारखान्याच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतीमालासाठी सातत्याने रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीची उत्पादक क्षमता देखील कमी होत आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज प्रिय ददू, अनेक आशीर्वाद ! या वर्षी तू आमदार झालास तेव्हापासून सतत कामानिमित्त दौऱ्यांवर किंवा फिरतीवर असतोस. या आधी तुला कधी पत्र लिहावं असं वाटलं नाही. पण नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी यंदा तू पहिल्यांदाच आमदार म्हणून गेलास आणि मनात अनेक आठवणी जाग्या झाल्या. विधान परिषदेतली तुझी कामगिरी आम्ही बघत आहोत. लोकांच्या मनाला भिडणारे अनेक प्रश्न तू सभागृहात मांडत आहेस. तुझ्या अभ्यासपूर्ण मांडणीचं कौतुक वाटतं. पण आजचं हे पत्र त्याबद्दल नाही. तू नागपूरला गेल्यापासून एक प्रसंग मला राहून राहून आठवतोय. कदाचित तुला आज त्याची आठवण नसेल. तू फक्त ६-७ वर्षांचा होतास. खूप वर्षं लोटली त्या गोष्टीला. ९० च्या विधानसभा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडून सुमारे पाच लाख रुपयांची रोकड लांबविली असल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम मशीन फोडले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक व उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे घटनास्थळी दाखल झाले होते. प्राथमिक माहितीनुसार या एटीएम मशीन मधून अज्ञात चोरट्यांनी चार लाख 84 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकाने नगरहून फिंगरप्रिंट व श्वानपथकाला घटनास्थळी पाचारण केले आहे. संबंधित बँकेचे अधिकारी घटनास्थळी आल्यानंतर या संदर्भात अधिक माहिती समोर येणार असून त्यानंतर संगमनेर…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा करण्यात पोलीस यशस्वी झाले आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे समोर आले असून पोलिसांनी मृताच्या जावयासह आणखी एकाला अटक केली असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत साकुर जवळील घाटामध्ये १६ डिसेंबरला फॉरेस्ट जमिनीत बांधावर एका पुरुषाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत आढळून आले होते. त्यावेळी ही व्यक्ती कोण आहे याचा खुलासा झाला नव्हता. हा घातपाताचा प्रकार असल्याचे लक्षात घेत पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला होता. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यापासून खून करणाऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.…
