Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा परिषदेतील लाचखोर शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार याला एका शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षाकडून २५ हजाराची लाच घेतांना सोलापूर लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. यामूळे राज्याच्या शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली असून वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्याचा लाचखोरीचा विषय चव्हाट्यावर आला आहे. लोहार याच्याविरोधात सोलापूर शहरातील सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्रीपर्यत सुरु होती. शिक्षणाधिकारी लोहार याने एका शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षाकडे ऑनलाईन असलेल्या युडायस प्लस या प्रणालीमध्ये त्यांच्या शाळेचे ८ वी ते १० वी चे वर्ग वाढ करण्याबाबत अर्ज केला असून संबधित संस्थेचे तक्रारदार अध्यक्ष हे या अर्जाबाबत पाठपुरावा करत असतांना शिक्षणाधिकारी लोहार याने ऑनलाईन असलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांची तयार झालेली पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यभर ३६ लाख हेक्टरवरील पिके बरबाद झाली आहेत. शेतकऱ्यांना अशा आपत्तीच्या काळात सरकारने तातडीने भरपाई व मदत देणे अपेक्षित असताना राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार मात्र केवळ घोषणा व दिखावा करत आहे. शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या मनात सरकारच्या या दुर्लक्षाच्या विरोधात तीव्र संताप खदखदत आहे. सोमवारी (३१ ऑक्टोबर) अकोले येथे अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाला उत्साहात सुरुवात झाली. ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर असे तीन दिवस चालणाऱ्या अधिवेशनासाठी किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, केंद्रीय कोषाध्यक्ष पी. कृष्णप्रसाद, किसान सभेचे नेते…
मुख्यमंत्री शिंदे गटाच्या कार्यकारिणीला अखेर मुहूर्त लाभला; नव्या पदाधिकाऱ्यांचा खासदारांच्या हस्ते शिर्डीत सत्कार महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या संपर्क प्रमुख पदे बाजीराव दराडे आणि बाळासाहेब उर्फ निरंजन पवार यांची तर जिल्हाप्रमुख पदी कमलाकर कोते आणि राजेंद्र देवकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय उत्सुकता लागलेल्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी रमेश काळे आणि राजेंद्र सोनवणे यांच्यासह शहराध्यक्षपदी दिनेश फटांगरे यांची वर्णी लागली आहे. शिवसेना फुटीनंतर प्रतीक्षेत असलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाची शिर्डी लोकसभा मतदारसंघाची कार्यकारिणी अखेर जाहीर करण्यात आली आहे. नव्या निवडीमुळे शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. खासदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बँकांचे राष्ट्रीयीकरण, ऑपरेशन ब्लू स्टारसह बांगलादेशची निर्मिती करणाऱ्या इंदिरा गांधी या देशाच्या कणखर नेत्या होत्या. देशाच्या विकासात ‘इंदिरा पर्व’ अत्यंत महत्त्वाचे असून भारताच्या एकात्मता व अखंडतेसाठीच त्यांनी बलिदान दिल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाद सबनीस यांनी केले आहे. अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित स्व. इंदिरा व सरदार पटेल यांना अभिवादन व पुष्पांजली कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, सौ. ललिताताई सबनीस, इंद्रजीत थोरात, रामहरी कातोरे, सिताराम राऊत, अभिजीत ढोले, मिलिंद कानवडे, कार्यकारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्या वादात अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे. या मध्यस्थीनंतर आमदार राणा यांनी आपला आरोप मागे घेतला तर आमदार कडू यांनी कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले. यामुळे बच्चू कडू यांची वेगळीच भूमिका समोर आली असून ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या घटक पक्षांमधील दोघा आमदारांमधील वाद ५० खोक्यांच्या आरोपावरून विकोपाला गेला होता. पोलीस ठाण्यापासून न्यायालयापर्यंत पोहोचणाऱ्या या वादात ऐनवेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी उडी घेत मध्यस्थी केली. राणा आणि कडू या दोघांनाही मुख्यमंत्र्यांनी आपल्या वर्षा निवासस्थानी चर्चेसाठी बोलाविले होते.…
विद्याचंद्र सातपुते महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अनेक शेतकरी पिढीजात फुलशेती करत असले तरी सध्या वाढती मागणी आणि बदलते तंत्रज्ञानामुळे पारंपरिक फुलांसह नानाविध फुले शेतात बहरु लागली आहेत. पारनेर तालुक्यातील हंगा येथील नितीन साठे यांनी अशाच शेवंती फुलांची लागवड करुन फुलशेतीत वेगळी वाट शोधली आहे. शेवंती फुलशेतीतून साठे यांना अवघ्या पाच महिन्यात खर्च वजा जाता तीन लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. तालुक्यातील शेती हंगामी व पावसावर अवलंबून असून, बहुतेक क्षेत्र कोरडवाहू आहे. तालुक्यातील हंगा हे गाव भौगोलिक दृष्ट्या आकाराने व क्षेत्रफळाने मोठे आहे. याच गावात पारंपरिक शेती करताना नितीन साठे या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नूतनीकरण करत पाच दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेला गुजरातच्या मोरबीतील मच्छू नदीवरील केबल सस्पेन्शन ब्रिज कोसळल्याने आतापर्यंत साठ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यावेळी पुलावरून ये-जा करणारे सुमारे चारशे लोक नदीपात्रात पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतामध्ये दहाहून अधिक बालकांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. तर जवळपास शंभरहून अधिक लोकांना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. गुजरात सरकारमधील मंत्री ब्रजेश मेरजा घटनास्थळी दाखल झाले असून मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल देखील घटनास्थळी भेट देण्यास निघाले होते. गेल्या सहा महिन्यांपासून बंद…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क टाटा एअरबससह चार मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहे. त्या पाठोपाठ नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प देखील हैदराबादला गेल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राज्यात मोठा प्रकल्प येईल असा लॉलीपॉप दाखविला जात असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. माध्यमांशी साधलेल्या संवादावेळी सुळे बोलत होत्या. पुढच्या वेळी यापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात येईल, असा लॉलीपॉप दाखविला जात आहे. मी तर म्हणते की, सगळेच प्रकल्प राज्यात यायला हवेत. मात्र राज्यात ईडी सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे प्रकल्प येथून राज्याबाहेर जात आहे. हे सरकार सत्तेत येऊन तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला असला तरी राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पाचे खापर महाविकास…
आमच्या सुरक्षिततेची काळजी जनतेला, जनता आमचे रक्षण करेल : काँग्रेस नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नेत्यांना सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. सरकारने विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा काढली, काही हरकत नाही. आमच्या सुरक्षिततेची काळजी जनतेला आहे. जनता आमचे रक्षण करेल, असे माजी महसूल मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. पुढील महिन्यात खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रा’ राज्यात प्रवेश करत आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी थोरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह शेगावमध्ये आले होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी राजकारणाच्या घसरत्या पातळी बद्दल खंत बोलून दाखवत राज्य सरकारवर हल्ला चढविला. राज्य सरकारने बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील आदी राज्यातील पंधरा बड्या नेत्यांची सुरक्षा काढून घेतली यावर त्यांना छेडले असता त्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ५० खोक्यांच्या आरोपावरून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा या सत्ताधारी घटक पक्षातील दोन नेत्यांमधील वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. या वादात आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करणार आहेत. त्यासाठी त्यांनी या दोन्ही आमदारांना मुंबईत दुपारी तीन वाजता बोलावून घेतले आहे. मुख्यमंत्री शिंदे या दोन नेत्यांमधील वादात नेमका काय तोडगा काढतात याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेतील मोठ्या बंडखोरी नंतर प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आमदार बच्चू कडू हे देखील शिंदे गटासोबत गुवाहाटीमध्ये होते. यावेळी आमदार फोडाफोडीत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा राज्यात सर्वत्र असताना भाजपाशी सलगी असलेले आमदार रवी राणा यांनी देखील बच्चू…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आमच्या पक्षाचे राजकुमार पटेल हे सर्वप्रथम गुवाहाटीला गेले होते. त्यांच्या पाठोपाठ मी गेलो. तेथे मी शिंदे गटासोबत आहे एवढे त्यांच्याशी बोलून परत यायचं होतं, असे ठरले होते. खरंतर मला तिथे थांबायचं नव्हतं. पण ती वेळच तशी होती की, आलेला माणूस जाऊ द्यायचा नाही. राजकारणात ते करावं लागतं, त्यात काही चुकीचं नाही, असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. आमदार कडू एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. कडू यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आजही आस्था आहे आणि ती कायम राहील, उद्धव ठाकरे ‘मातोश्री’वर जितके मजबूत आणि शोभून दिसायचे तितके…
रविवार विशेष : प्रवीण पुरो (लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक आहेत.) “ राज्याच्या राजकारणात कटुता आल्याची जाहीर कबुली देत राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च आत्मपरीक्षणाची जागा निर्माण केली आहे. त्यांनी स्वत:च हे जाहीरपणे मान्य केलं हे बरं झालं. कारण राज्यात राजकीय कटूता निर्माण करण्यात त्यांचाच हात होता, हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. संसदीय राजकारणात देशात प्रगल्भ मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या इतिहासात इतक्या टोकाचा कडवटपणा आजवर कोणी पाहिला नाही. दाद मागण्याच्या व्यासपीठावर एकमेकांवर टीका करणारे त्या व्यासपीठावरून खाली आले की मागचं सारं विसरून जायचे. कारण त्यांच्या टीकाटिपण्णीत स्वार्थ आणि मतलबीपणा नसायचा. केवळ राज्याचं भलं चिंतण्याचीच त्यामागे तळमळ असायची.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क वाळू तस्करी करणारा डंपर पकडल्यानंतर त्याची माहिती मिळूनदेखील कारवाई न करता उलट तस्करांबरोबर संधान साधणाऱ्या धांदरफळचे तलाठी मुळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जनसेवा समता युवक संघटनेचे अध्यक्ष साहेबराव वलवे यांनी करताच प्रांताधिकाऱ्यांनी तातडीने वलवे यांच्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार अमोल निकम यांना तलाठी मुळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना यासंदर्भात वलवे यांनी शुक्रवारी एक निवेदन दिले असून त्यात त्यांनी म्हटले की, वलवे गुरुवारी सायंकाळी त्यांच्या गावी जात होते. यावेळी ६ वाजून ४० मिनीटांनी त्यांना भोकनळ वस्तीपासून धांदरफळकडे वाळू तस्करी करणारा एक डंपर जातांना दिसला. त्यांनी याची माहिती प्रांताधिकारी डॉ.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क किरकोळ भांडणातून सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आल्याचा प्रकार नासिकमध्ये समोर आला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच जामीनावर हा आरोपी नाशिक मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला होता. अक्षय उत्तम जाधव असे होऊन झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान अंबड परिसरातील महालक्ष्मी नगरमध्ये किरकोळ भांडणातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमध्ये नाशिक पोलिसांनी तन्मय मनोज गोसावी आणि आकाश अनिल साळुंखे या दोघा संशयतांना सापळा रचून अटक केली आहे. तर मृत अक्षय उत्तम जाधव याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, शासकीय नोकऱ्यांवर हल्ला, जबरी चोरी, घरफोडी, चोरी यांसारखे १५ गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर अंबड…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्य सरकारने मोठा गाजावाजा केलेल्या सर्वात मोठ्या पोलीस भरतीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून या बहुचर्चित पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती. त्याशिवाय राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल १४९५६ पदांसाठी ही भरती होणार होती. आता या भरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात ही भरती थांबविण्यात आली असली तरी ती निश्चित केव्हा होणार याबाबत अनिश्चितता आहे. भरती संदर्भातील निर्णय सरकार पुढील आठवड्यात घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मागील तीन वर्षांमध्ये पोलीस भरती झाली नव्हती. त्यामुळे अनेक इच्छुक तरुणांची…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री असताना ज्यांनी ”मातोश्री”चा उंबरठा ओलांडला नाही ते उद्धव ठाकरे आता सत्ता गेल्यावर बांधावर जाण्याची नाटके करीत आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना संकटातील शेतकऱ्यांना किती मदत दिली याचा हिशोब द्यावा आणि मगच शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जावे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नगर (उत्तर) जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी हुशार आहे. ती उद्धव ठाकरेंच्या ढोंगीपणाला बळी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. गोंदकर यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना घरकोंबडा मुख्यमंत्री अशी पदवी जनतेने दिली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना अनेकदा अतिवृष्टी , गारपीट यासारख्या संकटांना तोंड द्यावे…
उपजिल्हाप्रमुख पदी मुजीब शेख; शिर्डी लोकसभा जिल्हा संघटक आप्पा केसेकर; तालुका प्रमुखपदी भाऊसाहेब हासे यांच्या निवडी जाहीर महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी यांची पाचव्यांदा तर उपनगर शहर प्रमुखपदी प्रसाद पवार यांची दुसऱ्यांदा शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय उप जिल्हा प्रमुखपदी मुजीब शेख, शिर्डी लोकसभा जिल्हा संघटक आप्पा केसेकर, तालुका प्रमुखपदी भाऊसाहेब हासे यांच्या देखील निवडी जाहीर झाल्या आहेत. संगमनेरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी बदलण्यासाठी अंतर्गत वारे वाहत होते. यासाठी अनेकांनी देव पाण्यात टाकले, मात्र नव्या निवडी जाहीर झाल्याने या सर्वांच्या पदरी निराशा पडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेनेत राहून देखील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांच्याशी सलगी ठेवणाऱ्या तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांची तालुकाध्यक्षपदावरून गच्छंती करण्यात आली आहे. आहेर यांच्या जागेवर उपजिल्हाप्रमुख असलेल्या भाऊसाहेब हासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून एक मोठा गट घेऊन बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचे दोन गटात विभाजन झाले. त्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने हा लढा थेट न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव देखील तात्पुरत्या स्वरूपात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गोठविले गेल्यामुळे पदाधिकारी कार्यकर्ते देखील दोन गटात विभागले गेले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भारतीय सैन्य दलाच्या तोफखाना केंद्राच्या २८५ मिडीयम रेजिमेंटचे लान्सनायक आणि नाशिकचे भूमिपुत्र संतोष विश्वनाथ गायकवाड यांना आसाममध्ये वीरमरण आले आहे. सर्वत्र दीपावलीचा सण उत्साहात व आनंदात साजरा होत असताना गायकवाड कुटुंबीयांसह नाशिकवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गायकवाड यांचे पार्थिव नाशिकरोडच्या तोफखाना केंद्रात रात्री बारा वाजेपर्यंत येण्याची शक्यता लष्कराने वर्तवली आहे. शहीद गायकवाड यांच्या लहवित गावी त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. वीरमरण आलेले गायकवाड सिक्कीमच्या उत्तरेला आसाम राज्यातील होजाई जिल्ह्यात लंका शहराजवळ बर्फाळ प्रदेशात कर्तव्यावर असताना रक्त गोठविणाऱ्या थंडीमुळे त्यांना अचानक मेंदूमध्ये त्रास झाला. त्यांना रेजिमेंट कडून तात्काळ कोलकत्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाभारताचे युद्ध पांडवांनी जिंकले याचे कारण त्यांचा सल्लागार कृष्ण होता. आपल्या जीवनामध्ये आर्थिक नियोजनासाठी आणि आपले ध्येय प्राप्त करण्याकरता तज्ज्ञ सल्लागार असेल तरच ते ध्येय साध्य होईल, असे प्रतिपादन आर्थिक गुंतवणूक तज्ज्ञ सुनील कडलग यांनी केले. येथील औद्योगिक वसाहतीमधील सह्याद्री ऍग्रोव्हेेटतर्फे कामगारांच्या जीवनामध्ये आर्थिक नियोजनासाठी मार्गदर्शन मेळावा म्हणून ‘चला अर्थसाक्षर होऊयात’ हा उपक्रम राबवण्यात आला. त्यावेळी कडलग बोलत होते. अध्यक्षस्थानी सह्याद्री ॲग्रोव्हेटचे संचालक नितीन हासे होते. व्यासपीठावर धनश्री हासे, टीव्ही अभिनेते सुरेश डोंगरे आदी उपस्थित होते. कडलग म्हणाले, जीवनामध्ये सल्लागाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या जीवनात मुला-मुलींचे शिक्षण, त्यांचे लग्न, आपली सेवानिवृत्ती आणि जीवनामधील अल्पकालीन व दीर्घकालीन…
