Author: Annant Ppangarkar
नासिक / संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) ब्रेक न लागल्याने एसटी बसने समोरून येणाऱ्या राजहंस दुधाच्या वाहनाला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील चार प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातातील जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सोमवारी दुपारी सिन्नर पासून तीन-चार किलोमीटर अंतरावर सिन्नर-नाशिक मार्गावर नाशिकच्या दिशेने एल अँण्ड टी फाट्याजवळ हा अपघात झाला. शहापूर आगाराची एसटी बस क्रमांक एम. एच. 06 एच. 8560 ही 40 प्रवासी घेऊन दुपारी शिर्डीहून शहापूरकडे निघाली होती. शहापूरच्या दिशेने जात असताना एसटी बस चालकाच्या बाजूने ओढली जात असल्याचे बस चालकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे सिन्नर बस स्थानकात येताच बस चालकाने सिन्नर…
मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर संगमनेरला नवे तहसीलदार मिळाले आहे महिनाभरापूर्वी 12 एप्रिलला बदलून गेलेल्या तहसीलदार अमोल निकम यांच्या जागेवर अमरावती विभागातून धीरज मांजरे बदलून आले आहे. याशिवाय शिर्डीच्या साईबाबा संस्थान मध्ये प्रशासन अधिकारी म्हणून श्रीमती प्रज्ञा भास्कर महांडुळे यांची प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून संगमनेरला नवीन तहसीलदारांच्या नियुक्तीची प्रतीक्षा होती. तहसीलदार अमोल निकम यांची नाशिकला बदली झाल्यापासून संगमनेरचे पद रिक्त होते. या पदावर शासनाकडून कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता होती. सोमवारी 8 मे रोजी राज्य शासनाने नासिक, अमरावती, पुणे, औरंगाबाद विभागातील तहसीलदारांच्या शासनाने केल्या बदल्या आहेत. अमरावती विभागामध्ये कारंजा येथे तहसीलदार म्हणून नियुक्ती असलेले धीरज…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) कल्चरल फाउंडेशन ऑफ इंडियाद्वारे गुणी विद्यार्थ्यांना देण्यात येणारा यंदाचा नृत्य कलाभूषण पुरस्कार ध्रुव ग्लोबल स्कूलच्या तीन विद्यार्थीनींनी पटकावला. सौम्या सचिन जोशी, अदिती राजेश लाहोटी व श्रिया अमोल मुळे या विद्यार्थीनींचा यात समावेश आहे. नागपूरच्या रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात झालेल्या शानदार सोहळ्यात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या पुरस्कारासाठी देशभरातील दीडशे स्पर्धकांमधून 27 विद्यार्थ्यांची निवड झाली, त्यात ध्रुव ग्लोबलच्या तिघींचा समावेश आहे. नटराज आर्ट अँड कल्चरलचे प्रा. रवींद्र हरदास, आसमान फाउंडेशनचे संस्थापक डॉ. रवी गिरे, भरतनाट्यम गुरू माडखोलकर, प्रा. डिंपल साखरे, प्रा. सुंदरी पिसिपती, अनिल कावडे, ममता जयस्वाल, प्रा.…
अकोले (महाराष्ट्र संवाद न्यूज) लाभक्षेत्रातील शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी निळवंडे धरणातून रविवारी सायंकाळी सहा वाजता पाणी सोडण्यात आल्याची माहिती भंडारदरा धरणाचे शाखा अभियंता अभिजीत देशमुख यांनी दिली. भंडारदरा धरणामध्ये सद्यस्थितीत 59.60% पाणीसाठा शिल्लक असून निळवंडे धरणामध्ये सद्यस्थितीत 57.12% पाणीसाठा शिल्लक आहे. रविवारी सायंकाळी निळवंडे मधून 600 क्युसेकने हे पाणी सोडण्यात आले असून साधारणतः 20 ते 25 दिवस हे आवर्तन सुरू राहणार आहे. भंडारदरा प्रकल्प लाभक्षेत्राच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार निळवंडे धरणातून हे पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली. ऐन उन्हाळ्यात सोडण्यात आलेल्या या आवर्तनामुळे शेती पिकांना याचा फायदा होणार आहे.
गोंदिया (महाराष्ट्र संवाद न्यूज) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या शैक्षणिक संस्थेला कर्मचाऱ्यांचे 65 कोटी रुपये चुकविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे पटेल यांच्या अधिपत्याखाली असलेल्या आणि सध्या बंद पडलेल्या संस्थेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या अधिपत्याखाली गोंदिया येथे मनोहरभाई पटेल इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी ही संस्था कार्यरत होती. मात्र ही संस्था बंद पडल्याने अध्यापन आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या फुल अँड फायनल सेटलमेंटचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचला होता. गोंदिया एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था खासदार पटेल यांचे कुटुंबीय चालवीत आहेत. 2018 मध्ये संस्थेत एकही प्रवेश नोंदविला गेला…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सर संघचालक गोळवळकर गुरुजी यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील काँग्रेसच्या हरिभाऊ सोळंके यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश मनोहर सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी सोळंके यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० व ५०१ अन्वये हा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, ६ मे २०२३ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईल वरील संस्कृती संवर्धन नावाच्या व्हाट्सअप ग्रुपवर एक लिंक आली. सूर्यवंशी यांनी आलेली लिंक क्लिक करून ओपन…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) चपराक प्रकाशनाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या संदीप वाकचौरे यांच्या शिक्षणावरील “ऐसपैस शिक्षण” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संगमनेर येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक, लेखक सुनील माळी, प्रकाशक घनश्याम पाटील, सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य व पत्रकार प्रकाश टाकळकर आदींच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संगमनेरमधील पत्रकार उपस्थित होते. चपराक प्रकाशनाच्यावतीने शिक्षणासंबंधीची बारा पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. त्या मालेतील संदीप वाकचौरे यांचे हे चौथे पुस्तक आहे. संदीप वाकचौरे यांचे चपराक प्रकाशनाच्यावतीने यापूर्वी शिक्षणाचे दिवास्वप्न, शिक्षणाचे पसायदान, पाटी पेन्सिल या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात झाले आहे. पुस्तकाला माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांची प्रस्तावना लाभली आहे. तर…
रविवार विशेष लेख (महाराष्ट्र संवाद न्यूज) भारतीय राजकारणात काही व्यक्ती इतक्या बनेल झाल्यात की त्यांची तुलनाच कोणाशी होऊ शकणार नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही असेच व्यक्तीमत्व बनलं आहे. जगज्जेते आणि सर्वव्यापी असल्याने त्यांनी केलेली कोणतीही कृती ही दैवी देणगीच जणू. ते कोणालाही काहीही बोलले तरी ते शब्द फुलोरे आणि त्यांना कोणी काही बोललं तर तो द्रोह, त्या म्हणजे लाखोल्या. त्यांनी कसंही वागलं तरी तो दैवी चमत्कार, इतरांसाठी मात्र तो व्यंग ठरतो. त्यांच्या अवगुणांवर कोणी बोट ठेवलं की जणू देवावरचाच हल्ला. यामुळे इतरांनी पंतप्रधानांवर टीका करू नये. तो अधिकार केवळ आणि केवळ मोदींचा आणि त्यांच्या पक्षाच्या वाचाळांचाच. कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) सध्या देशात धर्माच्या नावावर सुरू असलेले राजकारण लोकशाहीला घातक आहे. काँग्रेसचा विचार सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. देशात व राज्यात आगामी काळात सत्ता बदल निश्चित असून महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. याचबरोबर काँग्रेस पक्षात युवकांसाठी मोठ्या संधी असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात यांच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी डॉ. जयश्री थोरात, काँग्रेस शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे व रामहरी कातोरे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष निखिल पापडेजा आदींसह युवक पदाधिकारी उपस्थित होते. थोरात म्हणाले,…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेत उपलब्ध व्हावी यासाठी कृषी विभागाने काटेकोर नियोजन करावे. निविष्ठांचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्यादा दराने निविष्ठा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी जागरूकपणे काम करण्याचे निर्देश राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. विखे पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे,…
अहमदनगर जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ब्लू प्रिंट तयार करा: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) येत्या पंधरा दिवसात अहमदनगर जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ब्लू प्रिंट तयार करा, शासन आपल्या दारी उपक्रमात शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम तसेच जिल्हा विकास पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर शहरातील ज्योतिष व पौरोहित्य क्षेत्रात गेल्या तीन दशकांपासून योगदान देणाऱ्या प्रमोद बेल्हेकर (गुरु) यांना बेंगलोरच्या ‘नॅशनल इन्स्टिट्युट फॉर सोशल इकॉनॉमिक डेव्हलपेंट’च्यावतीने ज्योतिष व रत्नशास्त्रातील योगदानासाठी ‘नॅशनल ॲस्ट्रोरत्न अवार्ड’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. नॅशनल इन्स्टिट्युट फॉर सोशल इकॉनॉमिक डेव्हलपेंटचे चेअरमन व भारत सरकारच्या नीती आयोगाचे सदस्य सनदी अधिकारी डॉ. शिवप्पा यांच्या हस्ते तसेच हिंदी व दक्षिणात्य चित्रपट निर्माते भोलाराम मालवीय यांच्या उपस्थितीत ए. डी. ए. रंगमंदिर, बेंगलुरू येथे रविवारी (ता. ६ मे) हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. प्रतिवर्षी विविध क्षेत्रात योगदान, सेवा देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान ह्या संस्थेमार्फत केला जातो. बेल्हेकर गुरु म्हणून परिचित असणाऱ्या प्रमोद…
मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्यात मोठ्या प्रमाणात उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांचीदेखील बदली झाले आहे. त्यांना अद्याप नव्या नियुक्तीचे ठिकाण मिळाले नसून त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर वाशिम येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले शैलेश हिंगे यांचे नियुक्ती झाली आहे. मंगरुळे गेल्या चार वर्षापासून संगमनेर मध्ये कार्यरत होते गत विधानसभा निवडणुकीपासून संगमनेर मध्ये कार्यरत असलेल्या मंगरूळे यांचा येथील कार्यकाळ लौकिकास्पद ठरला आहे. विविध निवडणुकांसह कोरोना काळात त्यांनी केलेले काम लक्षवेधी ठरले होते. बदल्या झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अजित थोरबोले यांना दापोलीचे उपविभागीय अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. श्रीमती ज्योती कावरे यांची…
पुणे (महाराष्ट्र संवाद न्यूज) पुण्यातील वाघोली येथे एका गोडाऊनला लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. भीषण आगीमध्ये तिघांचाही कोळसा झाला असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. या धक्कादायक घटनेने पुणे हादरले आहे. वाघोलीच्या उबाळे नगर येथे शुक्रवारी रात्री लग्नाच्या सजावटीचे सामान असलेल्या गोदामाला भीषण आग लागली. रात्री पावणे बाराच्या सुमारास लागलेल्या आगीत चार सिलिंडरचा स्फोट झाला, ज्यामुळे भीषण आग लागली. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पीएमआरडीए वाघोली व पुणे महानगरपालिकेच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. बऱ्याच वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या भीषण आगीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती…
पुणे (महाराष्ट्र संवाद न्यूज) महिलेसोबत अश्लील संभाषण करून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असलेल्या निलेश अष्टेकर यांच्या विरोधात पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अष्टेकर काही वर्षांपूर्वी पुणे शहर पोलीस दलामध्ये नेमणुकीस होते. सध्या ते गुप्त वार्ता विभागात कार्यरत आहेत. पोलीस दलातील वड्या आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मूळची धुळ्याची असलेली ही 31 वर्षीय महिला सध्या ठाण्यामध्ये कळवा येथे राहावयास आहे. विधवा असल्याने धुण्याभांड्याची कामे करून ती आपला उदरनिर्वाह करते. अष्टेकर यांनी या महिलेच्या फेसबुक अकाउंटवर 19 फेब्रुवारी 2023 रोजी…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) वाळू खरेदी करणाऱ्या ग्राहकांना स्वखर्चाने ग्राहकांच्या इच्छित स्थळी वाळू पोहोच केली जाणार आहे. ग्राहकांना वाळू पोहच करण्याच्या अनुषंगाने सर्व गौण खनिज वाहतुकदार (सहा टायरपर्यंत असणारे टिप्पर टैम्पो व इतर ) यांनी www.mahakhanij.maharashtra.gov.in/mahatrack/login या प्रणालीवर जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन अहमदनगरचे अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केले आहे. राज्य शासनाने वाळू तस्करी थांबविण्यासाठी नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे या धोरणाच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यात वाळू उत्खनन वाळू डेपो निर्मिती व व्यवस्थापन अशा स्वरूपाच्या निविदा मागविण्यात आले आहे. त्या पाठोपाठ आता वाहतूकदारांना नोंदणी करावी लागणार आहे. वाळू धोरणानुसार ग्राहकांच्या स्वखर्चाने वाळू ग्राहकांच्या इच्छुक ठिकाणी पोहच करण्यात येणार आहे. ग्राहकांना…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) घरीच झालेल्या प्रसूतीनंतर पोट दुखत असल्याने ती ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आली. तिची शरीरयष्टी बघता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चूकचुकली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाईकांकडे रुग्णाच्या आधार कार्डची मागणी केली आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले आणि पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. संगमनेर तालुक्यातील कनोली येथे बालविवाहाची घटना पोलीस ठाण्यात पोहोचली असतानाच त्यापाठोपाठ संगमनेर तालुक्यातील ही दुसरी घटना समोर आली आहे. यामुळे संगमनेरमध्ये बालविवाहाचे प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले. दुसऱ्या घटनेतील पीडित बालिका संगमनेर तालुक्यातील असून तिचे सासर देखील संगमनेर तालुक्यातच आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात या पालिकेच्या तक्रारीवरून तिचा नवरा सासू-सासरे आणि आई-वडिल…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये मानवी तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी यातील रॅकेट उघड करत चौघा जणांना ताब्यात घेतलं असून चार जणांची सुटका केली आहे. मानवी तस्करी करणाऱ्या टोळीने लोकांना डांबून ठेवत, त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडून वेठबिगारी तसेच भीक मागून घेतली जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पिलाजी भोसले, अमोल भोसले, अशोक भोसले आणि गंजा काळे अशी बेलवंडी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे असून आणखी दोघा आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. परराज्यातील मनोरुग्ण किंवा भोळसट लोकांना महाराष्ट्रामध्ये पाच-पाच हजार रुपयात विकले गेले असल्याचे समोर आले असून आरोपींनी मानसिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना बेलवंडी…
शिर्डी, (महाराष्ट्र संवाद न्यूज) ‘‘लोणी जिल्हा परिषद शाळेची बीओटी तत्त्वावर सुंदर इमारत उभारण्यात आली आहे. लोणी जिल्हा परिषद शाळेचे हे बीओटी मॉडेल राज्यभर राबविण्यात येईल.’’ अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी केली. लोणी बु. येथे बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचे व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुल इमारतीचे लोकार्पण शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे-पाटील, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब…
आश्वी (महाराष्ट्र संवाद न्यूज) महिलांच्या चळवळीमधून भीमक्रांती अवतरेल. महामानव बाबासाहेबांच्या विचारांची आठवण करून देवून या देशात ब्राह्मणशाही व भांडवलशाही हे दोन प्रमुख शत्रू असून यांच्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत असल्याने त्यांना ओळखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शाहीर संभाजी भगत यांनी केले. तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्यावतीने आश्वी खुर्द येथे बुधवारी (ता. 3 मे) लोकशाहीर संभाजी भगत यांच्या शाहिरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे आश्वी परिसरातील नागरिकांनी न भूतो न भविष्यती असा डोळ्यांचे पारणे फेडणारा अविस्मरणीय सोहळा अनुभवला. कार्यक्रमास्थळी पेटत्या मशालीच्या ज्वाळा व हलगीच्या कडकडाटात प्रेक्षकांमधून जोरदार…
