Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अखिल भारतीय किसान सभेचे 23 वे अधिवेशन अकोलेमध्ये 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या दरम्यान होत आहे. अधिवेशनाची सुरुवात पहिल्याच दिवशी जाहीर सभेने होणार असून या सभेमध्ये ओल्या दुष्काळा प्रश्न आरपार लढायचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती डॉ. अजित नवले यांनी दिली. सोमवारी 31 ऑक्टोबरला होत असलेल्या या सभेसाठी डॉ. अशोक ढवळे, पी. कृष्णप्रकाश, माजी आमदार जे. पी. गावित, किसन गुजर, आमदार विनोद निकोले, अर्जुन आडे, उमेश देशमुख आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. राज्य अधिवेशनापूर्वी किसान सभेची राज्यभर रीतसर गाव, तालुका व जिल्हा अधिवेशने घेण्यात आली असून जिल्हा अधिवेशनांमध्ये निवडलेले ३०० प्रतिनिधी व किसान सभेचे…
प्रशांत गुंजाळ (लेखक सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक असून संगमनेर न्यायालयात वकील आहेत) सन 2014 च्या मे महिन्यामध्ये मी एका पक्षकाराचे घटस्फोटाचे प्रकरण संगमनेरच्या न्यायालयात दाखल करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी तत्कालिन न्यायाधीशांनी माझ्या असं निदर्शनास आणून दिले की, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये जवळपास शंभर घटस्फोटाची प्रकरणे न्यायालयात निवाड्यासाठी दाखल झाली आहेत. माननीय न्यायाधीश साहेबांनी त्यावर चिंता व्यक्त करत एक भिती बोलून दाखविली होती. दुर्दैवाने आता ती भिती आता खरी होताना दिसत आहे. गत दोन दशकांच्या कालावधीत वेगवेगळ्या कारणांनी समाजातील एकत्र कुटूंब पध्दती लयाला गेली. याच काळात एकत्र कुटूंब पध्दती जावून विभक्त कुटूंब पध्दती समाजात निर्माण झाली. याचे धोके आता…
मुंबई । प्रविण पुरो (लेखक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक आहेत) प्रिय पवार साहेब, गेल्या काही वर्षांपासून देशातील बदलत्या राजकीय वातावरणाची आपणास पूर्ण जाणीव असेल. विशेषत: महाराष्ट्रात या राजकारणाने घेतलेल्या निचत्तम पातळीने भाजप वगळता आपण सारेच घायाळ झालो आहोत. 2014पासून महाराष्ट्र एका वेगळ्या वळणावर आहे. लोकशाही नावाची संकल्पना ही केवळ नावापुरती शिल्लक राहिली असल्याचं आपण आणि आपल्या पक्षासह काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी अनेकदा बोलून दाखवलं आहे. विरोधकांना जगणं मुष्कील करून ठेवण्याच्या या कृतीची करावी तितकी निर्भत्सना कमीच आहे. हे करतं कोण? घडवतं कोण? हे आपण जाणता. यात आपले कार्यकर्ते असलेले मंत्री अनील देशमुख, नवाब मलिक, सहकारी मित्र असलेले संजय राऊत…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नवीन ट्रॅक्टर घेण्यासाठी पत्नीने माहेराहून पाच लाख रुपये आणावेत, या कारणासाठी तिचा छळ करुन खून केल्याच्या आरोपातून पती सुरेश पंकज बिबवे याच्याबरोबर सर्व आरोपींची संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. संगमनेर तालुक्यातील निमज येथे २०१७ मध्ये हा प्रकार घडला होता. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात सुजीत पावसे याच्या तक्रारीवरुन विवाहितेचा पती सुरेश बिबवे, सासरा पंकज लक्ष्मण बिबवे, अमोल पंकज बिबवे, मंगल पंकज बिबवे, अविनाश लक्ष्मण बिबवे, सुरेखा अविनाश बिबवे, वच्छला लक्ष्मण बिबवे आणि लक्ष्मण बुवाजी बिबवे यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना अटक करत तत्कालिन पोलीस निरीक्षक…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क लंम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव पुशधनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकट्या संगमनेर तालुक्यामध्ये लम्पी चर्मरोगाने मृत झालेल्या पशुधनाची संख्या मंगळवारपर्यत ६५ वर गेली आहे. यापैकी ४२ पशुधनाचे नुकसान भरपाईचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केले असून उर्वरित प्रस्ताव दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली. राज्यात उद्भवलेल्या गो व महिप वर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या तालुकास्तरीय समितीची बैठक संगमनेरमध्ये तहसीलदार निकम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीसाठी गटविकास अधिकारी अनिल नागणे, सहाय्यक आयुक्त डॉ. जे. के. तिटमे, पशुधन विकास अधिकारी डॉ. नितीन जोंधळे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ऑक्टोंबरमध्ये झालेल्या पावसामूळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला केल्या आहेत. तसेच येत्या दोन दिवसात मंत्री स्वत: नुकसानग्रस्त तालुक्यांची पाहणी करणार असून यावेळी सर्व शासकीय यंत्रणेने उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल, पशु संवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घेत अतिवृष्टीमूळे जिल्ह्यात झालेले नुकसान, पशुधनावरील लंम्पी आजार, आनंदाचा शिधा किट वाटपाचा आढावा घेतला. बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, जिल्हा कृषी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जोर्वे येथे एकविरा फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी अंगणवाडीतील मुलांसोबत अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे असले तरी अनेक लोकांना दिवाळीचा आनंद घेता येत नाही. याच हेतूने लहान बालकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी या चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य आणि दिवाळीचा फराळ वाटप करीत एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी या चिमुकल्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत तरुणांनी ग्रामस्थांच्या मदतीने लोकसहभागातून गावातील अंगणवाडी डिजिटल बनविली. अनोखा आदर्श घालून देत डिजिटल बनविलेल्या या अंगणवाडीला जयश्री थोरात यांनी भेट दिली आणि डिजिटल अंगणवाडीचे कौतुक केले.
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कमी पटसंख्येच्या कारणावरून राज्यभरातील हजारो शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या धोरणाचा निषेध म्हणून छात्रभारती संघटनेने राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना काळा आकाश कंदील भेट पाठविला आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्याने ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठी गैरसोय होणार आहे. दूरवर असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी जाणार नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी सरकारच्या या धोरणामुळे मुकण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्यास या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने छात्रभारती संघटनेने सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहा बाहेर जाणार असल्याने छात्रभारती संघटनेने अनेक शाळांवर जाऊन यासंबंधीच्या सर्वे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जाणता राजा म्हणून ओळख असलेले शरद पवार केंद्रात कृषी मंत्री होते. या पवारांनीच राज्यातील सहकारी साखर कारखानदारी संपविली. अशी गंभीर टीका राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिकमध्ये केली. नाशिक साखर कारखान्याच्या पळसे येथील गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी मंत्री विखे बोलत होते. विखे पाटील म्हणाले, पवार कृषिमंत्री असताना पंधरा वर्षांपूर्वीच साखर कारखानदारी संदर्भात निर्णय व्हायला हवे होते. इथेनॉल बद्दल धोरण राबवायला हवे होते. त्यांनी त्यावेळी योग्य धोरण राबविले असते तर आज राज्यातील साखर कारखाने कवडीमोल भावाने विकले…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सहकारी साखर कारखानदारीत अवघ्या देशासाठी अनुकरणीय ठरलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे.माजी मंत्री काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आणि विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने साखर कारखानदारीत वेगवेगळे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. ऊस उत्पादकांना सर्वाधिक भाव देणारा साखर कारखाना म्हणून या कारखान्याने राज्यभरात ख्याती मिळविली आहे. या कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट ऊस विकासाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. याशिवाय या कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनादेखील गोवा येथे एका कार्यक्रमात उत्कृष्ट कार्यकारी संचालक म्हणून गौरविण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सांत्वनपर भेटीच्या चढाओढीनंतर अखेरीस संगमनेर तालुक्यातील त्या विजेच्या दुर्घटनेत मृत पावलेल्या चार भावंडांच्या वारसांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी चार लाख रुपये मदतीचे धनादेश शुक्रवारी देण्यात आले. राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा बर्डे कुटुंबीयांची भेट घेतली. संगमनेर तालुक्यातील खंदरमाळच्या वांदरकडा येथे वीजवाहक तार पाण्यात पडल्याने झालेल्या दुर्घटनेत अनिकेत अरूण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे व विराज अजित बर्डे या चार कुमारवयीन भावंडांचा मृत्यू झाला होता. या मृत मुलांच्या वारसांना मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी चार लाख रुपयांचे धनादेश आणि जनसेवा फाउंडेशनच्या वतीने…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बापानेच आपल्या स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना संगमनेरमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नातीवर झालेल्या या अत्याचाराची मुलाविरोधात आजीनेच तक्रार दिल्याने हा प्रकार समोर आला. या विकृताची पत्नी दहा वर्षापूर्वीच त्याला सोडून गेली आहे. त्यावेळेपासून दोन नातवंड व त्यांच्या वडील मुलाचा सांभाळ फिर्यादी करत आहे. मोलमजुरी करुन ही वृध्दा मुलगा आणि नातवंडाचा सांभाळ करते. आरोपी कामधंदा न करता घरीच असतो. गेल्या आठवड्यात नातीने आपल्या पोटात दुखत असल्याची तक्रार आजीकडे केली. त्यामुळे आजीने तिला घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात तपासण्यासाठी नेले. तेथून औषधे घेवून घरी आल्यानंतर आजीने नातीस पोट दुखण्याचे कारण विचारले असता…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गोमातेपासून आपणास दूध मिळते. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या दुग्ध व्यवसायावर चालतो. वसुबारसेला गोमातेचे पूजन करणे ही आपली परंपरा व संस्कृती आहे. जसा बैलपोळा साजरा होतो तशीच संगमनेर तालुक्यात मोठ्या उत्साहात वसुबारस साजरी होत असते. मात्र यावर्षी लंम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी कारण पशुधनाचे शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे महत्त्व असल्याचे प्रतिपादन राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केले आहे. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघामध्ये अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते गाय पूजन करून वसूबारस साजरी करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, संचालक विलास कवडे, संतोष मांडेकर, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, फायनान्स…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क म्युच्युअल फंडाला गुंतवणूकदारांची पसंती मिळत असल्याने त्यात गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. येत्या चार ते पाच वर्षांत हा उद्योग १०० लाख कोटींचा होईल आणि भारत शक्तीशाली अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत असताना गुंतवणूकदार संपत्ति निर्माण करतील असा आशावाद आर्थिक गुंतवणूक तज्ज्ञ सुनील कडलग यांनी व्यक्त केला. घारगाव येथे साईनाथ उद्योग समूहाच्या दिपावली निमित्त आयोजित स्नेहबंध मेळाव्यात कडलग प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईनाथ उद्योग समूहाचे संस्थापक बजरंगशेठ वाकळे उपस्थित होते. प्रास्तविक भाषणात साईनाथ उद्योग समूहाचे संचालक सुदिप वाकळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. समाजातील प्रत्येक घटक अर्थसाक्षर झाल्यास जीवनातील समस्या दूर होतील व संपत्ती निर्माण होईल…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क दीपावलीच्या पहील्या दिवशी वसुबारसेला म्हणजेच गोपाष्टमीला शुक्रवारी सकाळी संगमनेरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने गो ग्राम परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. मोठ्या उत्साहात ही गो ग्राम परिक्रमा आणि गो पूजन सकाळी सात वाजता पार पडले. वसुबारसेला अतिशय श्रद्धेने गोमातेचे पूजन केले जाते, अशा पवित्र गोमातेचे रक्षण करणे हे आपले हिंदू धर्मीय म्हणून प्रथम कर्तव्य आहे. सद्यस्थितीत देशभरात हजारोंच्या संख्येने गोमातेची कत्तल होत असल्याने तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गोमातेला सांभाळणं शेतकऱ्याला आर्थिक दृष्टीने परवडत नसल्याने तो कसायांना गाई विकतो. शहरात आपल्याला गाई पाळणे शक्य नाही परंतु शेतकऱ्यांच्या गाई वाचवणं आपल्या हातात आहे. गोमाता कामधेनु आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर नगर परिषदेने आपल्याकडे सेवेत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना विविध देय रकमेपोटी सुमारे एक कोटी रुपयांचे वाटप केले आहे. अशी माहिती पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे आणि मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. दीपावली सण उत्साहात व आनंदात साजरा करण्यासाठी नगर परिषदेचे प्रशासक डॉ. शशिकांत मंगरुळे व मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करतांना कायम सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे दीपावली सण अग्रीम तसेच कायम कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या फरकापोटी ही रक्कम अदा करण्यात आली आहे. तसेच शासन निर्णयाप्रमाणे दीपावली सणानिमित्त माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन 22 तारखेपर्यंत करणार असल्याची…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून ‘ईडी’ सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली होती, त्या बहुचर्चित बदल्या अखेरीस करण्यात आले आहे. आपल्या पोलीस दलातील पहिल्याच नियुक्तीत श्रीरामपूरमध्ये अपर पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेल्या राकेश ओला यांची अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे. शिंदे फडणवीस सरकारने प्रथमत:च आयपीएस अधिकाऱ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या आहेत. ऐन दीपावलीच्या तोंडावर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील 45 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश अखेर गृह विभागाने काढले आहेत. यातील 24 जणांना नियुक्ती देण्यात आली आहे. तर अन्य अधिकाऱ्यांना अद्याप नियुक्ती देण्यात आली नसून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यात अहमदनगरचे सध्याचे एसपी मनोज पाटील यांचाही…
शिर्डी | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यातील सरकार हे जनतेच्या मनातील सरकार असल्याने गरिबांच्या हिताचे निर्णय सरकार घेत आहे. ‘आनंदाचा शिधा’ देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी केले. सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड व्हावी; म्हणून शासनाने जाहीर केलेला ‘आनंदाचा शिधा’चे कीट जिल्ह्यात पोहचले आहेत. या शिधा वाटप उपक्रमाचा जिल्ह्यातील शुभारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याहस्ते आज राहाता येथून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विखे म्हणाले की, आनंदाच्या शिधा’ कीटच्या माध्यमातून गरिबांना १०० रूपयांत प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ व एक लीटर पामतेल वाटप केले…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत शिवसेना विरोधात अंधेरी पूर्व मध्ये पोट निवडणुकीत भाजपने उमेदवार देऊ नये, अशी विनंती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. भाजपने त्यांच्या विनंतीला मान दिल्यानंतर आता ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने उमेदवार देऊ नये, अशी मागणी केल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ठाकरे यांच्या विनंतीला मान देत भाजपने आपले अधिकृत उमेदवार…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क देशात उत्तम प्रकारच्या सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून स्वस्थ भारत बनविण्यासाठी केंद्र सरकार कटीबध्द असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण, रसायने व खते मंत्री डॉ. मनसुख मंडविया यांनी केले. अहमदनगरच्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल फाऊंडेशन, मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे आयोजित कॅन्सर सेंटर, न्युक्लियर मेडिसिन सेंटर, उद्घाटन समारंभात मंडविया बोलत होते. मंडविया यांच्या हस्ते राळेगणसिध्दी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचा पायाभरणी व पढेगांव येथे नव्याने उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण दुरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आले. कार्यक्रमाला राळेगणसिध्दी येथुन दुरदृष्य प्रणालीद्वारे ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभुषण आण्णा हजारे, कार्यक्रमस्थळी खा. डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार…
