Author: अनंत पांगारकर
गुरुवार, ०६ नोव्हेंबर संगमनेर – तुमचा आत्मविश्वास गेला आहे, तुम्ही भाषणाला घाबरू लागलात त्यामुळे आता आमच्या सभांमध्ये जॅमर बसविले जाऊ लागले आहे. लोकांना म्हणणं देखील ऐकू द्यायचं नाही, नाहीतरी आम्ही तुमच्या एवढे वाईट बोलत नाही, का घाबरताय तुम्ही? अशा झोंबणाऱ्या शब्दात राज्याचे माजी मंत्री, काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांनी विखे पिता-पुत्रांवर टीका केली. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आश्वी खुर्द येथील सभेत थोरात बोलत होते. डॉ. जयश्री थोरात, प्रभावती घोगरे, शिवसेनेचे सचिन कोते, बाळासाहेब गायकवाड, सचिन चौगुले, सोनल जगताप, प्रतिभा जोंधळे, ॲड. रामदास शेजुळ आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. शिर्डी मतदार…
संगमनेरच्या प्रचार सभेत सत्ताधाऱ्यांवर घणाघात! गुरुवार, ७ नोव्हेंबर संगमनेर – येथे काही लोकांचा असा समज झाला आहे की, त्यांचा जन्म हा राज्य करायला, तुमच्या डोक्यावर बसायला, बँका, साखर कारखाने, लोकांच्या जमिनी, लोकांचे धंदे, दूध डेअरी, सहकार बँका स्वतःच्या खिशात टाकण्यासाठी झाला आहे. मात्र आता तुम्हाला हे ठरवावे लागेल तुमचा जन्म स्वतःला सिद्ध करण्यासाठी झाला की प्रस्थापितांच्या पोरांची मक्तेदारी चालविण्यासाठी, यांच्या सतरंज्या उचलण्यासाठी झाला आहे का? असा सवाल करत हे ठरविण्याची वेळ आता आली आहे. इतके दिवस एकच खानावळ होती आता मात्र आपल्याला स्वतःची खानावळ सुरू करावी लागेल वंचितची खानावळ सुरू करण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर…
मुंबई | विशेष प्रतिनिधी निवडणूक आयोगाच्या आदेशाने बदली करण्यात आलेल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या जागी आणण्यात आलेल्या संजय वर्मा यांची नियुक्ती तात्पुरत्या काळासाठी करण्याचे आदेश काढत राज्य सरकारने निवडणूक आयोगालाही ठेंगा दाखवला आहे. शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून निवडणूक आयागाने संजय वर्मा यांना पोलीस संचालकपदी नियुक्त करताना काढलेल्या आदेशात तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख केलेला नाही, तरीही राज्य सरकारच्या आदेशात मात्र तात्पुरती नियुक्ती असा उल्लेख का करण्यात आला? या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. २४ तासाच्या आत संजय वर्मा यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीचे आदेश काढा, अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करु, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे…
बुधवार, ०६ नोव्हेंबर संगमनेर – संगमनेर तालुक्यात बिबट्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मंगळवारी रात्री शहरालगत असलेला खांडगाव शिवारातील बाह्यवळण मार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने एका दोन वर्षे बिबट्याच्या मादीला जोराची धडक दिली. जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेल्या बिबट्याची ही मादी रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे जखमी मादी बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली. अनेक जण आपल्या दुचाकीच्या हेडलाईटच्या प्रकाशात जखमी बिबट्याच्या मादीला बघत होते. यावेळी चवताळलेल्या जखमी अवस्थेत मादी बिबट्याने जमावावर हल्ला केला. यात तिघेजण जखमी झाले. दोघा जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. दादू मधुकर रूपवते आणि गोविंद बाबाराजा गायकवाड…
बुधवार, ०६ नोव्हेंबर मुंबई – राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. महायुती आणि महाविकास आघाडीच्या बहुतेक इच्छुकांनी पक्षाचा आदेश न पाळता निवडणुकीसाठी अर्ज भरत बंडखोरी केली. या पार्श्वभूमीवर पक्षाचा आदेश न पाळल्याचा ठपका ठेवत भारतीय जनता पक्षाने ४० जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे मतदार संघाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि श्रीगोंदा येथील सुवर्णा पाचपुते यांचा समावेश आहे. महायुतीच्या उमेदवाराविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या बंडखोरांना भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले होते. पक्षाचा आदेश मानत बहुतेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र तरीदेखील पक्षाचा आदेश न पाळता…
बुधवार, ०६ नोव्हेंबर संगमनेर – अज्ञात चोरट्यांनी ब्युटी पार्लर आणि बंद असलेला बंगला फोडत रोख रकमेसह सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरी चोरून नेले असल्याचा प्रकार समोर आला असून या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शहरातील जाणता राजा मैदान परिसरात ब्युटी पार्लर अज्ञात चोरट्यांनी फोडत १ लाख ६१ हजार ८०० रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली. दुसऱ्या घटनेत घुलेवाडी हद्दीतील मालपाणी नगरमध्ये बंगला फोडण्यात आला. यातही रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहे. निकिता अजित साळवे यांचे जाणता राजा मैदान परिसरात मेहेर शाळेजवळ कांसा ब्युटी सलून नावाचे पार्लर आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे…
बुधवार, ०६ नोव्हेंबर नवी दिल्ली : सार्वजनिक हितासाठी सर्व खासगी मालमत्ता ताब्यात घेऊन त्याचे वाटप करण्याचा अधिकार घटनेने सरकारला दिलेला नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाने मंगळवारी ७:२ अशा बहुमताने दिला आहे. घटनापिठाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक संपत्ती समाजासाठी उपयुक्त मालमत्तेचे संसाधन असेलच असे नाही. म्हणजे, प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक मालमत्ता समाजासाठी वापरता येईलच असे नाही. स्वतःच्या कमाईची खासगी मालमत्ता संविधानाच्या अनुच्छेद ३९ (बी) अंतर्गत समाजासाठी उपयुक्त मालमत्ता मानली जाऊ शकत नाही, असे घटनापीठाने स्पष्ट केले. तथापि, काही प्रकरणांमध्ये खासगी मालमत्तेवर दावा केला जाऊ शकतो, असेही घटनापीठाने म्हटले आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड…
वंचितचे उमेदवार अजीज वोहरांच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकर संगमनेरमध्ये… बुधवारच्या सभेकडे लागले लक्ष
मंगळवार, ०५ नोव्हेंबर संगमनेर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल अजीज वोहरा यांच्या प्रचारासाठी वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर बुधवारी संगमनेरमध्ये येत आहे. वंचित घटकातील तरुणांमध्ये सुजात यांची मोठी क्रेझ असल्याने ते संगमनेरमध्ये काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर करत निवडणुकीत रंगत आणली होती. या मतदारसंघातून युवा कार्यकर्ते अब्दुल अजीज वोहरा यांना वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संधी दिली आहे. येथील मतदारांच्या एका विशिष्ट वर्गावर आंबेडकर यांचा प्रभाव आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांना आपल्या मतदार संघात प्रचार करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे…
मंगळवार, ०५ नोव्हेंबर अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ मतदारसंघांपैकी ५ विधानसभा मतदारसंघांत महायुतीच्या तर ४ विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही बंडखोरांचा त्रास सहन करावा लागणार आहे. केवळ संगमनेर, कोपरगाव, कर्जत-जामखेड हे तीन मतदारसंघ बंडखोरांच्या बंडखोरीतून सेफ राहिले आहे. महायुतीतील ५ जागांपैकी ३ जागांवर भाजपच्या, २ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. तर महाविकास आघाडीमधील ४ पैकी ३ जागांवर ठाकरे गटाने तर एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) बंडखोरी केली आहे. काँग्रेसच्या एका महिला पदाधिकाऱ्याने नगर शहरात बंडखोरी केली आहे. अकोल्यात महायुतीचे विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या विरोधात…
मंगळवार, ०५ नोव्हेंबर मुंबई : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना सोमवारी चार नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने पदावरून हटविल्यानंतर त्यांच्या जागी राज्याचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी असलेले वर्मा आता राज्याचे नवे पोलीस महासंचालक असतील. रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवलं होतं. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. राज्यात सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रितेश कुमार, विवेक फणसाळकर आणि संजय वर्मा यांची नावे पोलीस महासंचालकपदासाठी आघाडीवर होती. अखेर संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने…
