Author: Annant Ppangarkar
संगमनेर, प्रतिनिधी- कृषी क्षेत्र हे अत्यंत व्यापक असून यामध्ये संशोधनासह आर्थिक समृद्धीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्रातील नवनवीन माहितीसाठी ‘कळस कृषी प्रदर्शन’ हे संपूर्ण राज्यात लोकप्रिय ठरले असून, अमृतवाहिनीतील या प्रदर्शनाच्या माध्यमातून अद्ययावत तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. शिवछत्रपती प्रतिष्ठान व अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्यावतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात आयोजित ‘कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाचे’ शानदार उद्घाटन थोरात यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, थोरात कारखान्याचे उपाध्यक्ष…
संगमनेर, प्रतिनिधी- तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायतीचा अत्यंत बेजबाबदार आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. गावाच्या स्वच्छतेसाठी शासनाकडून आलेली लाखो रुपयांची घंटागाडी गेल्या चार वर्षांपासून एका गोदामात सडत पडली असतानाच, याच गोदामात आपल्या देशाच्या महापुरुषांचे फोटो अत्यंत विदारक आणि अपमानस्पद अवस्थेत फेकल्याचे समोर आले आहे. थेट व्हिडिओ पुराव्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभाराचे वाभाडे निघाले असून संपूर्ण तालुक्यातून संतापाची लाट उसळली आहे. गावातील घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्यासाठी जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून शिबलापूर गावाला लाखो रुपये किमतीची घंटागाडी देण्यात आली होती. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे ही गाडी नागरिकांच्या सेवेत येण्याऐवजी एका खासगी गोदामाची शोभा वाढवत आहे. गावात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असताना सरकारी मालमत्तेची…
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी धावपळीचा आणि मेहनतीचा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे, जी तुम्ही आत्मविश्वासाने पूर्ण कराल. आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर जुनी देणी फेडण्यात तुम्हाला यश येईल आणि गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः डोळ्यांच्या तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे सततच्या कामातून विश्रांती घेणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधल्याने मानसिक ताण कमी होईल. वृषभ – वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कौटुंबिक सौख्याचा असेल. घरातील वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबत असलेले छोटे-मोठे मतभेद संपुष्टात येतील. व्यवसायात भागीदारीत काम करणाऱ्यांनी व्यवहारात पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात गैरसमज होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात…
संगमनेर, प्रतिनिधी- निवडणुकीच्या काळात ‘लाडकी बहीण’ म्हणत मतांची बेगमी करणाऱ्या महायुती सरकारने आता आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली असून संगमनेर तालुक्यातील तब्बल १७,९६७ महिलांना या योजनेतून अपात्र ठरवत डच्चू दिला आहे. यामुळे संपूर्ण तालुक्यात महायुती सरकारबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली असून, निवडणुकीपुरता बहिणींचा वापर करून आता सरकारने विश्वासघात केला आहे, अशी घणाघाती टीका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अर्चनाताई बालोडे यांनी केली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील विकसित तालुका असलेल्या संगमनेरमध्ये, जनतेला सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालय नेहमीच अग्रेसर असते. याच भावनेतून यशोधनच्या यंत्रणेने रात्रंदिवस काम करून तालुक्यातील सुमारे ९० हजार महिलांचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेरच्या स्थानिक राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे यांनी 2.0 च्या माध्यमातून आगामी काळातील विकासाचे रणशिंग फुंकले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगरपालिकेच्या नव्या कारभाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अधिकृत प्रक्रियेत नगरसेविका दिपाली पंचारिया यांची संगमनेर नगरपालिका गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगर परिषदेमध्ये ‘संगमनेर सेवा समिती’ने मोठे यश मिळविले आहे. 30 पैकी तब्बल 27 नगरसेवक सेवा समितीचे निवडून आले आहे. तर महायुतीची केवळ एकमेव महिला विजयी झाले आहे. उर्वरित दोन अपक्ष उमेदवार सेवा समितीचे…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. म्हाळुंगी नदीवर वेल्हाळे गावठाण ते राजापूर रस्ता ते निमगाव भोजापूर रस्ता, गणपती मळ्याजवळ जोडणाऱ्या पुलाच्या बांधकामासाठी नाबार्ड ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार खताळ यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पुलाच्या कामामुळे घुलेवाडी आणि धांदरफळ गटातील वेल्हाळे, राजापूर, निमगाव भोजापूर, गुंजाळवाडी आणि चिकणी या पंचक्रोशीतील नागरिकांचा प्रवास आता सुखकर होणार आहे. आमदार खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे या कामासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला…
श्रीरामपूर – श्रीरामपूर विभागातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गहाळ झालेले सुमारे ६ लाख रुपये किमतीचे ५२ मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही कामगिरी केली असून, जप्त केलेले सर्व मोबाईल आज त्यांच्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. अहिल्यानगर उत्तर विभागातील १७ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही काळात नागरिकांचे महागडे मोबाईल गहाळ झाले होते. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल होत्या. या तक्रारींचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाने तांत्रिक तपास सुरू केला होता. या तपासामध्ये श्रीरामपूर शहर, राहुरी, अकोले, संगमनेर आणि…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज विविध अवैध धंद्यांनी वेढलेल्या संगमनेरमध्ये आता गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सांगवी गावातील ‘हॉटेल रानवारा’ येथे सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या (IG) पथकाने थेट ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. या धडक कारवाईत १७ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याकडून ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवून झालेल्या या कारवाईमुळे तालुक्यातील पोलीस प्रशासनाचे अक्षरशः ‘पितळ’ उघडे पडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे, त्या आरोपींची नावे अशी, अंकुश मधुकर…
संगमनेर, प्रतिनिधी- अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून थोरात सहकारी साखर कारखान्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा जन्मदिवस ‘प्रेरणा दिन’ म्हणून संपूर्ण संगमनेर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून कारखान्याच्या अतिथीगृहात अर्पण रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत १०१ बाटल्या रक्ताचे संकलन केले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, विज्ञानाने आज सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती केली असली, तरी रक्ताची कृत्रिम निर्मिती करणे अद्याप मानवाला शक्य झालेले…
श्रीरामपूर – पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी श्रीरामपुरातील वॉर्ड नं. १, इराणी गल्ली परिसरात आलेल्या पोलीस पथकावर हिंसक जमावाने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. जमावाने दगडफेक करत आरोपीला पोलिसांच्या ताब्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला, तसेच एका तरुणाने लोखंडी कोयत्याने पोलिसांवर वार केले. परिस्थिती अत्यंत गंभीर बनल्याने पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी हवेत एक राऊंड गोळीबार केला. या घटनेत एक पोलीस हवालदार गंभीर जखमी झाला असून परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. तळेगाव दाभाडे (पुणे) पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपी आयद बाबूलाल सय्यद (रा. इराणी गल्ली, श्रीरामपूर) हा पोलिसांना हवा होता. त्याचा शोध घेण्यासाठी उपनिरीक्षक मुकेश मोहरे,…
संगमनेर: प्रतिनिधी मकर संक्रांतीचा सण जवळ येत असतानाच संगमनेर शहरात नायलॉन मांजामुळे अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या चार-पाच गंभीर घटनांमुळे नागरिक संतप्त झाले असून, आता याविरोधात संगमनेर शहर भाजप आक्रमक झाली आहे. बंदी असलेल्या नायलॉन आणि चिनी मांजाची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा कार्यकर्ते स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करतील, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. शहरात नुकत्याच घडलेल्या काही घटनांमध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या गळ्याला, कानाजवळ नायलॉन मांजा अडकून गळा, कान कापला जाण्याचे प्रकार घडले आहेत. नायलॉन मांजावर शासनाची बंदी असूनही शहरातील काही दुकानदार छुप्या पद्धतीने याची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. या गंभीर…
घारगाव (अहिल्यानगर)- संगमनेर तालुक्यातील जांबूत खुर्द येथे एका गर्भवती महिलेचा अपमान करून तिला जातिवाचक शिवीगाळ केल्याची आणि तिच्या पतीला मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी दोन सख्ख्या भावांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, दि. २ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला शेतातून घरी परतत असताना, आरोपी दस्तगीर शब्बीर पठाण याने त्यांना रस्त्यात अडवले. यावेळी आरोपीने महिलेच्या चारित्र्यावर संशय घेणारे आक्षेपार्ह वक्तव्य करून तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. इतकेच नव्हे तर, पीडित महिला ही अनुसूचित जमातीची असल्याचे माहित असतानाही तिला जातीवरून हीन वागणूक देत…
मेष – आजचा दिवस कष्टाचा परंतु फलदायी राहील. नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग असून वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. व्यापारात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. घरातील वडीलधार्या व्यक्तींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सायंकाळी एखादी आनंदाची बातमी मिळेल. वृषभ – तुमच्या कार्यक्षेत्रात आज तुमचे वर्चस्व राहील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नवीन वस्तू खरेदी करण्याचे बेत आखाल. खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात, सावध राहा. मिथुन – आज मनात नवीन विचार आणि कल्पना येतील. बौद्धिक कामात रस वाढेल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल, ज्यामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल. प्रवासाचे योग आहेत, जो सुखद ठरेल. जोडीदारासोबतचे मतभेद मिटतील. कर्क – आज…
संगमनेर | अनंत पांगारकर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सहसा विजयोत्सवाचा धुरळा शांत व्हायला अनेक दिवस लागतात, परंतु संगमनेरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांनी मात्र एक वेगळाच पायंडा पाडला आहे. परदेशातून परतल्यानंतर त्यांनी नगरपालिकेचा पदभार हाती घेतात कामाला सुरुवात केली आहे. तांबे यांनी केवळ कार्यालयात बसून कामकाजाला भर न देता आभार दौऱ्याच्या निमित्ताने प्रभागनिहाय भेटी देण्याचे काम सुरू केले आहे. या भेटीदरम्यान ते केवळ नवनिर्वाचित नगरसेवक, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह प्रभागात फिरत नाही तर मुख्याधिकारी आणि त्यांची सर्व प्रशासकीय टीम त्यांच्यासोबत प्रभागनिहाय दौरे करत आहे. तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्यकाळात शहरात मोठी विकास कामे झाली. शहर स्वच्छतेचे काम या…
संगमनेर | प्रतिनिधी शहरात व परिसरात मकरसंक्रांत सणाच्या काळात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करून विक्रीसाठी आलेला साठा जप्त करावा, अशा कडक सूचना आमदार अमोल खताळ यांनी पोलीस अधिकारी आणि पालिका प्रशासनास दिल्या आहेत. आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, नायलॉन मांजाचे अनेक दुष्परिणाम होत असून या जीवघेण्या मांजामुळे अनेक नागरिक आणि मुले जखमी होण्याच्या घटनांचे गांभीर्य मोठे आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. हा मांजा मानवी जीवनासह पशू-पक्ष्यांसाठीही जीवघेणा ठरत असल्याने त्याचा वापर, साठवणूक आणि विक्री पूर्णपणे बंद करणे गरजेचे आहे. नायलॉन मांजाची चोरटी विक्री रोखण्यासाठी शहरातील उपनगरांमधील सर्व दुकानदारांना सूचना देऊन त्यांच्यावर…
संगमनेर / अकोले- नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प सुरुवातीच्या सर्वेक्षणाप्रमाणे म्हणजेच अकोले-संगमनेर मार्गेच व्हावा, या मागणीने आता पुन्हा एकदा जोर धरला आहे. या भागातील जनभावनेची सरकारने तातडीने दखल घ्यावी, यासाठी आता थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात येणार आहे. ‘नांदूर खांदरमाळ’ येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ठरल्यानुसार, सर्व तालुक्यांमध्ये ‘लेटर टू सी. एम.’ ही व्यापक मोहीम राबवण्याचा निर्धार करण्यात आला असल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. विद्यार्थी आणि नागरिकांच्या सहभागातून उभी राहणार चळवळ- रेल्वेची ही मागणी तळागाळातील जनतेपर्यंत आणि सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ही मोहीम अधिक आक्रमक केली जाणार आहे. यामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांनी मोठ्या…
संगमनेर- मराठी साहित्याचा गौरव करण्याची परंपरा जपत ‘काव्यप्रेमी शिक्षक मंच’च्या वतीने सन २०२६ सालासाठी विविध साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत यंदा कवितासंग्रह, गझल, कथा, कादंबरी, ललित, बालसाहित्य, विनोद, चरित्र आणि आत्मचरित्र अशा विविध साहित्य प्रकारांसाठी एकूण १२ स्मृती पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्व. यशवंत चिंधू नेरे, स्व. विष्णूपंत माळोकार, स्व. सुंदर बोंगाळे, स्व. दिलीप दमाणे, स्व. रुक्मिणीबाई चवडेकर, शंकर घोरसे, स्व. भिमाई बाविस्कर, स्व. जयवंती तावडे, स्व. रत्नाबाई घोडके, स्व. शालिनी चिंचवडकर, ॲड. मदन फडणीस आणि स्व. पुष्पावती धर्माधिकारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुरस्कारांचा समावेश आहे. साहित्य पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी १५०१/- रुपये रोख, १०००/- रुपयांची पुस्तके,…
संगमनेर (प्रतिनिधी): मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करत असताना, मानवी जीवन आणि मुक्या प्राण्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. अत्यंत घातक ठरणाऱ्या ‘चायनीज’ नायलॉन मांजामुळे होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी संगमनेरकरांनी या मांजाचा वापर पूर्णपणे टाळावा, असे कळकळीचे आवाहन संगमनेर नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी केले आहे. चायनीज मांजा हा काच, धातू आणि विविध रासायनिक घटकांपासून बनवलेला असल्याने तो मानवी जीवितासह पक्षी, पाळीव प्राणी आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरत आहे. दरवर्षी संक्रांतीच्या काळात या मांजामुळे अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी होतात, तर शेकडो निष्पाप पक्षी आपले प्राण गमावतात. हा मांजा निसर्गतः लवकर नष्ट होत नसल्याने तो झाडाझुडपांमध्ये अडकून दीर्घकाळ पर्यावरणाला हानी…
संगमनेर, प्रतिनिधी- भारतीय संविधानावर विश्वास ठेवून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत राहण्याच्या उद्देशाने प्रहार जनशक्ती पक्षाने आपल्या संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर, पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चुभाऊ कडु यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर सांगळे व जिल्हाध्यक्ष युवक अहिल्यानगर उत्तर ॲड. पांडुरंग औताडे यांच्या आदेशानुसार, अकोले-संगमनेर समन्वयकपदी ॲड. शेखर श्रीरंग गवांदे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष (युवक) ॲड. पांडुरंग केशव औताडे पाटील यांच्या स्वाक्षरीने त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले. ॲड. शेखर गवांदे हे उच्चशिक्षित वकील असून त्यांचा सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा विचारात घेऊन ही जबाबदारी सोपवण्यात आली…
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेचा आणि उत्साहाचा असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील, ज्या तुम्ही यशस्वीरीत्या पार पाडाल. व्यापारात धनलाभाचे योग असून जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. कौटुंबिक आघाडीवर वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबत सुरू असलेले मतभेद मिटतील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे, मात्र कामाच्या गडबडीत विश्रांती घेण्यास विसरू नका. वृषभ – आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेणे फायायदे ठरेल. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे. घरातील लहान मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंधांमध्ये अधिक गोडवा येईल.…
