Author: Annant Ppangarkar

संगमनेर, प्रतिनिधी –  काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर पुण्यात झालेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद संगमनेरमध्ये उमटले आहेत. राहुल गांधी समर्थक संघ, महाराष्ट्र (TEAM RGSS) यांच्या वतीने संगमनेर शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. पोलीस प्रशासनाने या प्रकरणी तातडीने पावले उचलून न्याय मिळवून द्यावा, अशी भावना यावेळी उपस्थित समर्थकांनी व्यक्त केली. पुणे येथे तुषार दामगुडे नामक व्यक्तीने हनुमंत पवार यांच्यावर केलेल्या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये अशा हिंसक घटनांना स्थान नसून हा हल्ला लोकशाही मूल्यांवर झालेला मोठा आघात आहे. राजकीय कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला असून पोलीस…

Read More

दैनिक राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जावान असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे चीज होईल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल, मात्र जोडीदारासोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करा. आर्थिक बाबतीत आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा असून गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घेणे हिताचे ठरेल. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान मिळेल. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल आणि नवीन करारातून लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला तुम्हाला आज मोठ्या संकटातून वाचवू शकतो. मिथुन: आजचा दिवस संमिश्र फलदायी असेल. कामाचा…

Read More

मुंबई: संगमनेर शहराच्या सुनियोजित विकासाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी आणि ‘व्हिजन २.०’ ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकाराने संगमनेर सेवा समितीच्या नगरसेवकांचा मुंबई महानगरपालिका अभ्यास दौरा सुरू आहे. शहराच्या भविष्यातील गरजा ओळखून आधुनिक नागरी सुविधा आणि प्रगत व्यवस्थापन प्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी या विशेष दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या दोन दिवसीय दौऱ्याच्या पहिल्या दिवशी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आणि नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांच्यासह संगमनेर सेवा समितीचे सर्व नगरसेवक व नगरपरिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ वॉर्ड कार्यालयाला भेट दिली. यावेळी प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता आणि वेगवान निर्णयांची प्रक्रिया समजून घेण्यावर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त निर्मित ‘शतक’ या चित्रपटाला देशभरात मोठा प्रतिसाद मिळत असताना, संगमनेरमधील मालपाणी मल्टीप्लेक्समध्ये अद्याप हा चित्रपट प्रदर्शित न झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपा महायुतीच्या वतीने चित्रपटगृह व्यवस्थापकांना निवेदन देऊन तातडीने शो सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मालपाणी मल्टीप्लेक्सच्या व्यवस्थापकांची भेट घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रदीर्घ समाजकार्याचा इतिहास आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावे, हा ‘शतक’ चित्रपटाचा मुख्य उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले. स्थानिक प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता असूनही तो प्रदर्शित…

Read More

संगमनेर | अनंत पांगारकर –  संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गोवंश हत्या आणि अवैध मांस विक्रीचे प्रमाण वाढल्याने हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील सराईत कसाई आणि गो-तस्करांच्या विरोधात कठोर कायदेशीर पावले उचलून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) आणि ‘एमपीडीए’ (MPDA) अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना देण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्याला असलेला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जपण्यासाठी गोवंश हत्या रोखणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अनेकदा कारवाया…

Read More

संगमनेर | प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आणि महिला व युवतींच्या सक्षमीकरणाचा वारसा पुढे चालवत, संगमनेरमध्ये एकविरा फाउंडेशनच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाअंतर्गत ७ मार्च ते १२ मार्च २०२६ या कालावधीत टेनिस बॉल क्रिकेट, रस्सीखेच आणि बॅडमिंटन स्पर्धा रंगणार आहेत काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेर मध्ये या स्पर्धा होत आहेत. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या स्पर्धांचे हे सलग पाचवे वर्ष असून, अल्पावधीतच या उपक्रमाने राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शालेय विद्यार्थिनींपासून…

Read More

दैनिक राशीभविष्य: २४ फेब्रुवारी २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचा ठसा उमटेल, ज्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. आर्थिक आघाडीवर काही जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. मात्र, घरातील मोठ्या व्यक्तींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ आज तुम्हाला संयम राखण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च वाढल्यामुळे आर्थिक ताण जाणवू शकतो, त्यामुळे नियोजित बजेटनुसार चालावे. व्यवसायात मोठे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. संवादातील गोडव्यामुळे कौटुंबिक वाद मिटण्यास मदत होईल. आरोग्यासाठी योगासने आणि संतुलित आहार आवश्यक आहे. मिथुन तुमच्यासाठी आजचा दिवस प्रगतीकारक असेल. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान…

Read More

संगमनेर | अनंत पांगारकर  सध्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत देशाला पुन्हा एकदा महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या अधिष्ठानाची नितांत गरज आहे. या महापुरुषांचे विचार पद्धतशीरपणे बाजूला सारण्याचे प्रयत्न हे लोकशाहीसाठी घातक असून, त्यांना नाकारणे म्हणजे आधुनिक भारताच्या अस्तित्वालाच नाकारण्यासारखे आहे, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे यांनी केले. संगमनेर येथील सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने आयोजित ‘सत्यशोधक व्याख्यानमाले’तील दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. “गांधी, नेहरू का नकोत?” या विषयावर रविवारी व्यापारी असोसिएशनच्या हॉलमध्ये पार पडलेल्या या व्याख्यानासाठी जनसमुदायाची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय थोरात होते, तर व्यासपीठावर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर नगरपरिषदेच्या विशेष अर्थसंकल्पीय बैठकीत सत्ताधाऱ्यांनी प्रस्तावित केलेल्या करवाढीला शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी तीव्र विरोध दर्शवला. पालिकेच्या या बैठकीत जनसामान्यांवर लादल्या जाणाऱ्या संभाव्य दरवाढीवरून जोरदार चर्चा झाली, यामध्ये सूर्यवंशी यांनी आक्रमक भूमिका घेत सर्वसामान्यांची बाजू लावून धरत या दरवाढीला तीव्र विरोध दाखविला. यासंदर्भात त्यांनी, नगराध्यक्ष, पीठासन अधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांकडे आपला लेखी विरोध सादर केला. या अर्थसंकल्पीय बैठकीपूर्वीच शहरात मोठ्या प्रमाणावर करवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. संगमनेर नगरपालिकेतील एकमेव विरोधी नगरसेविका सूर्यवंशी यांच्यासह व्यापाऱ्यांनी या दरवाढीबाबत आधीच चिंता व्यक्त करत आपला विरोध नोंदवला होता. वाढत्या लोकभावनेची दखल घेत आमदार सत्यजित तांबे यांनी संबंधितांची बैठक…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य आणि आदर्श संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या गळीत हंगामाचा सांगता समारंभ बुधवारी (२५ फेब्रुवारी) होणार आहे. सकाळी ९ वाजता आयोजित या सोहळ्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे. स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा वारसा जपत या कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीतही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने दिलासा दिला आहे. यंदाच्या हंगामातही कमी पर्जन्यमान आणि ऊस टंचाईचे आव्हान असताना, कारखान्याने यशस्वीरित्या गाळप पूर्ण…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  सणासुदीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात एकीकडे पोलीस कडेकोट बंदोबस्त आणि रूटमार्च काढून आपण सज्ज असल्याचे मिरवत असताना, दुसरीकडे गुन्हेगारांनी पोलिसांना उघड आव्हान दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरात नशेबाजांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून किरकोळ कारणावरून इंदिरानगरमध्ये रविवारी रात्री एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आल्याने संपूर्ण शहरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेरमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरानगर परिसरातील रहिवासी आणि रुद्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रोहित वाळके याच्यावर अज्ञात इसमाने कोयत्याने भीषण हल्ला केला. हा हल्ला इतका भयानक होता की रोहित वाळके यामध्ये गंभीर जखमी झाले असून…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – रोटरी क्लब संगमनेरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आनंदी रस्ते’ या उपक्रमाने रविवारी संगमनेर शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण केले. रोटरी इंटरनॅशनलच्या १२१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष होते. या सोहळ्याला संगमनेरकरांनी आबालवृद्धांसह मोठी गर्दी करत प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार अमोल खताळ, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ चे असिस्टंट गव्हर्नर अमोल वैद्य आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. रो. दिलीप मालपाणी यांनी दहा वर्षांपूर्वी संगमनेरमध्ये रुजवलेली ही संकल्पना आता जनचळवळ बनली आहे. यावर्षीच्या उपक्रमात सांस्कृतिक आणि…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  संगमनेर शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि नगरपरिषदेचा महसूल वाढवण्यासाठी मालमत्ता व पाणीपट्टी कर वेळेत भरणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर, शहरातील सर्व मालमत्ता व पाणीपट्टी कर धारकांनी आपल्याकडे असलेल्या कराचा भरणा वेळेत करून नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा डॉ. सौ. मैथिली तांबे यांनी केले आहे.  विशेषतः ज्या मालमत्ता धारकांकडे अनेक वर्षांपासून कराची रक्कम थकीत आहे, त्यांच्यासाठी नगरपरिषदेने ‘अभय योजना’ जाहीर केली असून, या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीनुसार, थकबाकीदार मालमत्ता धारकांच्या करावर दरमहा दोन टक्के या दराने शास्ती (दंड) आकारली जाते. मात्र, अभय योजनेअंतर्गत या शास्तीच्या रकमेत ५०…

Read More

दैनिक राशीभविष्य: २३ फेब्रुवारी २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ: आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मात्र बोलताना संयम बाळगणे हिताचे ठरेल. नवीन व्यवसायाची संधी चालून येईल. मिथुन: तुमच्या बौद्धिक क्षमतेचा कस लागेल अशा काही घटना आज घडू शकतात. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील, पण तुम्ही त्या समर्थपणे पेलू शकाल. मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल आणि एखादा सुखद प्रवास घडण्याची…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  पर्यावरण संवर्धन आणि निसर्ग रक्षणाच्या चळवळीत संगमनेर तालुक्यातील खांडगाव ग्रामपंचायतीने राज्याच्या नकाशावर आपली मोहोर उमटवली आहे. राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत २,५०० ते ५,००० लोकसंख्या गटात खांडगावने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. या यशाबद्दल गावाला राज्यस्तरीय पुरस्कार आणि ५० लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये या विशेष गौरव सोहळ्याचेआयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते खांडगावच्या पदाधिकाऱ्यांनी हा बहुमान स्वीकारला. खांडगावने राबविलेले पर्यावरणपूरक उपक्रम आणि ग्रामस्थांच्या…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  निळवंडे डाव्या कालव्याच्या माध्यमातून कासारे येथील पाझर तलावात पाणी सोडण्यात आल्याने या भागातील शेतीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. रविवारी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या पाण्याचे विधिवत पूजन करून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले.  याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, लोहारे-कासारे आणि मेंढवण हा परिसर पूर्वीपासूनच दुष्काळाच्या झळा सोसत आला आहे. अनेक पिढ्यांनी येथे भीषण पाणीटंचाई अनुभवली असून, येथील शेती पूर्णपणे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून होती. अनेकदा पाझर तलाव कोरडे राहत असल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाया जात असत.  मात्र, आता राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी – लोकशाहीमध्ये ग्रामसभा ही नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठीचे हक्काचे व्यासपीठ मानले जाते. मात्र, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे एका तरुणाला मूलभूत पाणी प्रश्नावर आवाज उठवणे चांगलेच महागात पडले आहे. प्रश्न विचारल्याचा राग मनात धरून बाजार समितीच्या संचालकाने तरुणाला मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. धांदरफळ खुर्द येथे नुकतीच ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विविध विषयांवर चर्चा सुरू असताना पियुष ठोंबरे या तरुणाने, आमच्या घरी नळाचे पाणी का येत नाही? असा साधा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नामुळे संतप्त झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश विश्वनाथ खताळ यांनी तू असे प्रश्न का विचारतो? तुला पाहून घेईन, अशी…

Read More

जगाला हादरवून सोडणार्‍या जेफ्री एपस्टिनच्या भुताने भारताला हैराण करून सोडलं आहे. बाहेर येणार्‍या एकेका गोष्टीने जग हदरतो आहेच. पण स्वत:ला संस्कृती आणि परंपरेचा पायिक समजणार्‍या भारताचं आणि इथल्या राजकारण्यांचं नाव बाहेर येऊ लागल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झालीय. फाईलमध्ये आपलं नाव येऊ नये म्हणून सत्ता ज्या प्रकारे अमेरिकेपुढे लोटांगण घालत आहे, ते पहाता हे देशाच्या अस्तित्वासाठी अतिगंभीर होऊ शकतं. एपस्टिनच्या फाईलमध्ये अडकलेला एका राष्ट्राचा प्रमुख इतर देशांना कसा ब्लॅकमेल करतो, हे भारताच्या सत्ताधार्‍यांना लक्षात आलं नसेल तर दुर्देवच. असल्या विकृतीच्या मागे लागल्यावर देशाचं भलं होईल, असं ज्यांना वाटतं ते त्याहून अधिक विकृतीने पछाडलेत असंच म्हणायला हवं. ज्या महिला पत्रकाराने हे प्रकरण…

Read More

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य असला तरी, जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रलंबित असलेली सरकारी कामे मार्गी लागतील. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस मोठ्या नफ्याचा ठरू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि संध्याकाळी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मिथुन आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. विचारांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेताना गोंधळ होऊ शकतो. नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेल्या खंबीर पावलांमुळे संगमनेर नगरपरिषदेने ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात ५० हजार ते १ लाख लोकसंख्या गटातील ‘अमृत’ शहरांच्या श्रेणीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शहराला हा बहुमान प्रदान करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे, तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि…

Read More