Author: Annant Ppangarkar

सोमवार, १८ नोव्हेंबर संगमनेर – प्रतिनिधी राज्यातील मतदारांमध्ये महायुतीच्या कारभाराबद्दल प्रचंड रोषाचे वातावरण असून महाविकास आघाडीबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला १८० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त करत असंविधानिक, बेकायदेशीर भ्रष्ट सरकार सत्तेवरून घालून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणणे याला आमचे प्राधान्य असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार संपण्यापूर्वी थोरात सोमवारी दुपारी संगमनेरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जयश्री थोरात यादेखील उपस्थित होत्या. थोरात म्हणाले, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वत्र सायंकाळी प्रचाराची सांगता होत आहे. राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी, प्रचंड वाढली आहे. शेतीमालाला भाव नाही. दुधाला भाव नाही.…

Read More

२४३८ ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांचे गृह मतदान तर ५६ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान  ८५ वर्षांवरील २१०६ ज्येष्ठ नागरिक, ३३२ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान  सोमवार, १८ नोव्हेंबर  अहिल्यानगर – जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात तीन दिवस गृह मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली. यात २४३८ ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांचे गृह मतदान तर ५६ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ८५ वर्षांवरील आणि मतदान केंद्रापर्यत पोहोचू न शकणाऱ्या दिव्यांग मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती.…

Read More

सोमवार, १८ नोव्हेंबर संगमनेर – बी. जे. खताळ पाटील यांचे सुसंस्कृत राजकारण व समाजकारण संपूर्ण राज्याला परिचित आहे. मात्र या आडनावाचा वापर करून समोरील व्यक्ती प्रशासनावर दबाव निर्माण करत आहे. पालकमंत्र्याच्या माध्यमातून त्यांच्याकडून होत असलेली सेटलमेंट हा काय प्रकार सुरू आहे अशी टीका करताना भाजपकडून तालुक्यात सुरू झालेला धाक व दडपशाही प्रकार निंदनीय असल्याची टीका भाजपच्या आयटी सेलचे सहसंयोजक व नुकताच भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या विक्रमसिंह खताळ यांनी केली आहे. हॉटेल सेलिब्रेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समवेत पत्नी शिवांगी खताळ होत्या. विक्रमसिंह खताळ म्हणाले, महसूलच्या अनेक कामांची बंदी असताना एका विशिष्ट कुटुंबासाठी नियम शिथिल…

Read More

सोमवार, १८ नोव्हेंबर संगमनेर – साखर धंदा मोठ्या अडचणीतून वाटचाल करत आहे. कारखाना कार्यक्षेत्राबाहेरून ऊस आणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत भाव देण्याचा प्रयत्न करेल, अशी ग्वाही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिरोले यांनी दिली आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कौठे मलकापूर येथील ओसाड माळरानावर उभ्या राहिलेल्या श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड या कारखान्याच्या आठव्या गळीप हंगामाचा शुभारंभ व बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ कारखान्याचे अध्यक्ष रवींद्र बिरोले यांच्या पत्नी अश्विनी व मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी विधीवत व शास्त्रोक्त पद्धतीच्या वैदिक मंत्रोपचारात पार पडला. यावेळी बिरोले बोलत होते. बिरोले म्हणाले, कारखान्याच्या मशिनरीच्या देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून या गळीप हंगामात दैनंदिन साडेतीन हजार…

Read More

अहिल्यानगर दि.१७- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये निवडणूक कालावधीत मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. कोणत्याही मतदाराला मतदान केंद्रात मोबाईल सोबत बाळगता येणार नाही. उमेदवारांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीलादेखील सोबत मोबाईल बाळगता येणार नाही. मोबाईल बाळगल्यास मतदान केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. छुप्यारितीने मोबाईल बाळगल्यास व मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यात मतदान होणार असल्याच्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात मंडपे, दुकाने उभारण्यास बंदी राहील. तसेच मोबाईल फोन, स्मार्ट…

Read More

मुंबई दि. १७ : राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. १८ नोव्हेंबर) संध्याकाळी ६ वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू होणार आहे. मतदान संपेपर्यंतच्या ४८ तासांमध्ये, लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम १२६ अंतर्गत मतदारांवर प्रभाव टाकणारा प्रचार आणि सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास, उपस्थित राहण्यास अथवा सहभागी होण्यास मनाई आहे. या अटींचे उल्लंघन झाल्यास दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने निर्देश जारी केले आहेत.निवडणूक कालावधीत मुद्रित माध्यमांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या बाजूने किंवा विरोधात कोणतीही जाहिरात/ निवडणूकविषयक आशय-…

Read More

शनिवार, १७ नोव्हेंबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १२ वा स्मृतीदिन आहे आहे. दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत पोस्ट लिहून आदरांजली व्यक्त केली आहे. या पोस्टवर भाजप काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले असताना त्यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं की बाळासाहेब ठाकरेंसाठी दोन शब्द तरी राहुल गांधींकडून वदवून दाखवा. त्यामुळे राहुल गांधी यांची पोस्ट व्हायरल होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातले नेतेमंडळींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुंबईतल्या शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या समाधीस्थळी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे…

Read More

रविवार, १७ नोव्हेंबर येत्या २० तारखेला विधानसभा निवडणूक होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न होताना दिसतात. मात्र मतदानाच्या दिवशी मिळालेल्या सुट्ट्यांचा गैरफायदा घेत मतदान न करता अनेक जण बाहेरगावी सहलीसाठी जातात आणि त्याचा परिणाम मतदानावर होतो. निवडणुकीनंतर सध्याच्या राजकारणाला कंटाळल्याने मतदान न केल्याचे अनेक जण सांगतात. मात्र यामुळे निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरतो, त्यामुळे उमेदवार मान्य नसेल तर मतदान यंत्रावरील नोटाचे बटन दाबा मात्र मतदान आवश्य करा, मतदानाचे पवित्र कर्तव्य पूर्ण करा, असं आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक दीपक साळुंके यांनी केल आहे. बहुतेक मतदार संघात प्रमुख उमेदवारांच्या मतानंतर नोटाच्या मतांचा समावेश गेल्या काही निवडणुकांपासून…

Read More

विधानसभा निवडणूक स्पेशल अनंत पांगारकर राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. शेवटच्या टप्प्यात प्रचार येऊन ठेपला असतानाच आता संगमनेर मतदार संघात उभ्या असलेल्या विविध पक्षांच्या उमेदवारांच्या कोट्यावधीच्या निधीबाबत चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोट्यावधीच्या पेड न्यूजचे प्रकरण समोर आले असतानाच आता विविध उमेदवारांना मिळालेल्या निधीच्या चर्चा उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरू लागल्या आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर विधानसभा मतदारसंघ निवडणूक आयोगाने आर्थिक संवेदनशील जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पथके मतदार संघात कार्यरत असली तरी अद्याप शहरात समोर आलेले हवालाचे एक प्रकरण वगळता या भरारी पथकाच्या हाती काहीही लागलेले नाही. अशातच निवडणुकीच्या शेवटच्या दोन-तीन…

Read More

नागपूर – मुस्लीम मतदारांना प्रभावित करून महाविकास आघाडी वोट जिहाद करीत असल्याचा आरोप करत आपल्याला एक होऊन त्या विरोधात धर्मयुद्ध पुकाराव लागेल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नागपूर मधून निवडणूक लढविणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूरमध्ये प्रचार रॅली काढली होती. या रॅली त्यांनी पुन्हा एकदा वोट जिहाद संदर्भात पुनरुच्चार केला. फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस वोट जिहाद करीत असून ते खेदजनक आहे. निवडणुकीच्या काळात इतके लांगुलचालन यापूर्वी आम्ही कधी बघितले नव्हते. अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडी असले प्रकार करीत असेल तर त्याविरुद्ध आपल्याला एक व्हावे लागेल. धर्मयुद्ध पुकारावे लागेल. ऑल…

Read More

रविवार, १७ नोव्हेंबर  एवढी कामे करून मी दुसऱ्या मतदारसंघात उभा राहिला असतो तर निवडून आलो असतो, इतकी वर्षे काम करून देखील मला एवढा त्रास झाला नाही तो आता होत आहे. आता भावनिक झालात तर बारामतीला कोणी वाली राहणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या वक्तव्यांवरून बारामतीत काय होणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. पूर्वीच्या विधानसभा निवडणुकीकडे बारामती मतदारसंघात एवढे न फिरकणारे, दरवेळी समोरच्याचे डिपॉझिट जप्त करणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाऊले सध्या बारामतीतच खिळलेली दिसत आहेत. खुद्द शरद पवार यांनी अजित पवारांच्या पुतण्यालाच उभे केल्याने अजित पवार यांना बारामतीतच अडकून पडावे लागत आहे. कोणत्याही निवडणुकीत झाला नाही…

Read More

पायाखालची वाळू सरू लागली की माणूस सैरभैर होतो. काय करू, काय नको, असं त्याला होत असतं. राज्यात सुरू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत संकटाची चाहूल लागलेले आतापासूनच वायफळ बडबड करू लागले आहेत. त्यांना कधी ‘व्होट जिहादची’ स्वप्न पडतात तर कधी त्यांना ‘बटेंगे तो कटेंगे’ची भीती वाटते. खरं तर यातलं काहीही होत नसतं. पण अशी भीती घातली की हिंदू मतदार आपल्याच मतदान करतील, अशी त्यांची मानसिकता बनते. या माणसांचं राज्यात धर्मा-धर्मात, जाती-जातीत कटूता निर्माण व्हावी, असं वर्तन असतं. त्यांच्या या वर्तनाला घरातूनच विरोध होतो, हे मात्र त्यातल्या त्यात चांगलं लक्षण म्हणता येईल. महाराष्ट्राची विधानसभा आणि विधानसभेतील बहुमत आपल्याच हाती असलं पाहिजे या मानसिकतेत…

Read More

भाजप महायुतीमुळे महागाईचा दहशतवाद वाढला खोटे बोलणाऱ्या महायुती सरकारला हद्दपार करा प्रियंका गांधी यांचा भाजपसह महायुतीवर हल्लाबोल शिर्डी /संगमनेर – प्रतिनिधी भाजप व महायुती सरकारने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असून त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेण्याची पात्रता यांची नाही. महाराष्ट्रात तोडून फोडून आलेले हे सरकार जनतेला मान्य नाही. महाराष्ट्रातील युवक बेरोजगार करून अनेक उद्योग या सरकारने गुजरातला पळवले असून देशात व राज्यात महागाईचा दहशतवाद वाढला असल्याची टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली असून खोट्या बोलणाऱ्या महायुती सरकारला हद्दपार करा, असे आवाहन जनतेला केले आहे. शिर्डी येथे शनिवारी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत…

Read More

शनिवार, १६ नोव्हेंबर संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथील श्री गजानन महाराज शुगर लिमिटेडचा आठवा बॉयलर अग्नि प्रदीपन व गणित हंगामाचा शुभारंभ रविवारी (१७ नोव्हेंबर) होत आहे. कारखान्याचे संस्थापक चेअरमन रवींद्र बिरोले आणि त्यांच्या पत्नी अश्विनी यांच्या हस्ते हा समारंभ होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या आणि पाण्याची पुरेशी उपलब्धता नसलेल्या कौठे मलकापूरच्या माळरानावर आठ वर्षांपूर्वी संगमनेर तालुक्यातील पहिल्या खाजगी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिरोले यांनी रोवली होती. गेल्या सात वर्षात कारखान्याने उत्तरोत्तर प्रगती साधली आहे. कारखान्याला दरवर्षी कार्यक्षेत्र बाहेरून मोठ्या प्रमाणात ऊस आणावा लागतो. यावर्षी देखील कारखाना व्यवस्थापनाने नव्या जोमाने गळीत हंगामाची तयारी…

Read More

संगमनेर – अनंत पांगारकर विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला आहे तरी देखील सर्वच पक्षाचे निष्ठावंत म्हणविले जाणारे अद्याप प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसत नाही. एकीकडे ऐनवेळी दिलेला उमेदवार आणि दुसरीकडे उमेदवाराभोवती जमलेला लाभार्थ्यांचा मेळा यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्याची मोठी गोची झाली आहे. वर्षानुवर्ष विरोधात राहिल्यानंतर आता राजकीय तडजोडीमुळे ज्याला विरोध केला याचाच प्रचार करायची वेळ घेऊन ठेपल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेत स्वतःला विक्रीस काढले आहे. “साहेब, कार्यकर्ता विकणे आहे” अशा मिष्कील शब्दात राजकीय पक्षांचे निष्ठावंत (नाव न छापण्याच्या अटीवर) आपले दुःख व्यक्त करत आहे. राज्यात गेल्या पाच वर्षात राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलले आहे. कोणत्या…

Read More

शनिवार, १६ नोव्हेंबर संगमनेर विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून ज्या माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांच्या नावाचा उल्लेख करून निवडणुकीतील भाषणांना आणि थोरात यांच्यावरील टिकेला सुरुवात केली जाते, त्या खताळ पाटलांचे नातू आणि भारतीय जनता पक्षाच्या एका सेलचे पदाधिकारी असलेले विक्रमसिंह खताळ यांनी शनिवारी शिर्डीमध्ये प्रियंका गांधींच्या प्रचार सभेवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या काही वर्षांपासून विक्रमसिंह खताळ पाटील भारतीय जनता पक्षात सक्रिय होते. गेल्या वेळी तसेच यावेळी देखील खताळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक होते. मात्र दोन्ही वेळेला त्यांचा उमेदवारीचा पत्ता पक्षातील काही नेत्यांनी कापण्यात पुढाकार घेतला. एकीकडे खताळ पाटील यांच्या नावावर राजकारण करताना दुसरीकडे त्यांच्या नातवाला पक्षात डावले जात असल्याचे खाजगीत…

Read More

शनिवार, १६ नोव्हेंबर  विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच अहिल्यानगरमध्ये नाकाबंदी दरम्यान कोतवाली पोलिसांच्या पथकाने एका स्कार्पिओतून दोन लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. विशेष म्हणजे ही स्कार्पिओ श्रीगोंद्याच्या महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या कुटुंबीयांची असल्याची माहिती समोर येत असून या स्कार्पिओमध्ये नागवडे यांचा मुलगा देखील होता. अहिल्यानगर जिल्ह्यात राज्यातील महत्त्वपूर्ण लढतींचा समावेश आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण लढती असलेल्या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर सुरू असल्याचे समोर येत आहे. उमेदवाराला पक्षाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाल्याचे देखील चर्चा मतदारसंघांमध्ये सुरू आहे. अशातच नागवडे यांच्या पुत्रासह काहीजणांना रोकड रक्कम कोणत्याही पुराव्याशिवाय जवळ बाळगताना पकडण्यात आले आहे. श्रीगोंदा मतदार…

Read More

शुक्रवार, १५ नोव्हेंबर  मिळालेल्या संधीचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी केला. निळवंडे धरण आणि कालव्यांची कामे पूर्ण करून पाणी दिले, ज्या लोकांनी अडथळे निर्माण केले ते आता येथे येऊन विकासाच्या बाता मारत आहे. तुमचे वडील इकडे खासदार होते. ३५ वर्षात त्यांनी काय केले हे आधी सांगा. तुमचा खोटारडेपणा संपूर्ण राज्याने पाहिला असून मागील अडीच वर्षात तुम्ही तालुक्याचा छळ केला. पालकमंत्री हा मालक नसतो असे स्पष्ट करतानाच तुमची दडपशाही इकडे चालू शकणार नाही असा थेट इशारा राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांचे नाव न घेता दिला. विधानसभा निवडणूक प्रचारार्थ संगमनेर तालुक्यातील हिवरगाव…

Read More

शुक्रवार, १५ नोव्हेंबर अहिल्यानगर – विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने व्हाट्सअप ग्रुप वर विविध चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर व्हाट्सअप ग्रुप वरून खोटी माहिती प्रसारित केल्याने व्हाट्सअप ग्रुपच्या सदस्यांवर अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा ग्राहक सुरक्षा या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हा प्रकार घडला असल्याची माहिती अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली आहे. काय होता मेसेज… जिल्हा ग्राहक सुरक्षा या व्हाट्सअप ग्रुप वर एका मोबाईल क्रमांकावरून मतदार केंद्रावर ज्याचे नाव यादीतून वगळली आहेत, म्हणजेच यादीत नावावर डिलीट शिक्का लागला आहे ते मतदार मतदान केंद्रावर फॉर्म क्र. १७ भरुन आपले मतदार ओळखपत्र दाखवून…

Read More

शुक्रवार, १५ नोव्हेंबर संगमनेर – संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे गृह मतदानासाठी गेलेल्या मतदान पथकाचे रांगोळी काढून व फुले देऊन स्वागत करण्यात आले. मतदाराच्या कुटुंबियांनी केलेल्या या स्वागताने हे पथक भारावून गेले. ‘सकाळी झालेल्या स्वागताने दिवसभर काम करण्यासाठी उर्जा मिळाली’ अशी भावना मतदान पथकाने व्यक्त केली. संगमनेर तालुक्यात घुलेवाडी येथे वसुंधरा कृष्णराव डांगे (वय वर्ष ९०) या ८५ वर्षावरील मतदाराच्या गृह मतदानासाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे पथक सकाळी दाखल झाले. त्यावेळी त्यांना सुखद अनुभव आला. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत मतदान पथकाच्या स्वागतासाठी मतदाराच्या कुटुंबाने रांगोळ्या काढल्या होत्या. मतदान पथकातील सदस्यांचे फुले देऊन स्वागत करण्यात आले. ‘पंढरीची वारी करी वारकरी, त्याच श्रद्धेने राष्ट्रीय…

Read More