Author: Annant Ppangarkar

सोमवार, दि. २० मे  देशात पाचव्या टप्प्यातील मतदानाला प्रारंभ झाला आहे. राज्यातील १३ जागांसह एकूण ४९ जागांवर आज मतदान होत आहे. आतापर्यंत देशात चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून आज पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. आजच्या मतदानानंतर राज्यातील सर्व जागांवरील मतदान झाल्याने मतदान प्रक्रिया संपणार आहे. शेवटचे दोन टप्पे उरले असून ४ जूनला निवडणुकीचा निकाल समोर येईल. त्यानंतर देशात कोणाची सत्ता असेल हे स्पष्ट होईल. या राज्यात आज मतदान… महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड आणि जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ४९ जागांवर मतदान होत आहे. महाराष्ट्रात येथे सुरू आहे आज मतदान… धुळे,…

Read More

रविवार, दि. १९ मे  बीडमधील जिजाऊ मल्टीस्टेट १०० कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोपी करण्याची भीती दाखवून बिल्डरकडे १ कोटी रुपयांची लाच मागून त्यातील पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्यानंतर आर्थिक गणेश शाखेचा पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक फौजदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आता त्या पाठोपाठ या दोघांनाही निलंबित करण्यात आलेले आहे. बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे आणि सहाय्यक फौजदार रवीभूषण जाधवर अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. १ कोटीच्या लाचेचे प्रकरण समोर आल्यानंतर हे दोघेही अधिकारी फरार झाले आहेत. अद्यापही हे दोघे सापडू शकलेले नाही. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या घर झडतीमध्ये लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांच्या…

Read More

रविवार, दि. १९ मे छात्रभारतीच्या विद्यार्थी संघटनेच्या संगमनेर तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वरी सातपुते, कार्याध्यक्षपदी मोहम्मद कैफ तांबोळी यांची निवड करण्यात आली. संघटनेची अन्य कार्यकारिणी पुढील प्रमाणे… सुरेश गाडे (तालुका संघटक), सुहानी गुंजाळ (तालुका उपाध्यक्ष), निकिता शिंदे (तालुका युवती संघटक), सुमित खरात, आकांक्षा जमधडे (तालुका सदस्य), अपेक्षा गुंजाळ (अभ्यास मंडळ प्रमुख), श्रेया शिंदे (सह्याद्री कॉलेज अध्यक्ष) छात्रभारतीचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर साथी भास्कर दुर्वे नाना स्मारक या ठिकाणी पार पडले. येथे या निवडी करण्यात आल्या. प्रा. तुळशीराम जाधव, डॉ. सागर भालेराव, राजाभाऊ अवसक, अनिकेत घुले यांनी यावेळी सर्वांना मार्गदर्शन केले. छात्रभारतीचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, कृष्णामाई जाधव,…

Read More

प्रवीण पूरो | मुंबई  राजकारणात खरं सांगायला काही नसेल तर खोट्याचा आसरा घेण्याशिवाय पर्याय नसतो. लोकसभेच्या सुरू असलेल्या निवडणूक प्रचारात राजकीय पक्षांच्या नेत्यांनी खोटेपणाची हद्द पार करून टाकली. विशेषत: भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी प्रचारादरम्यान तोडलेले तारे पाहिले की इतकं खोटं बोलण्याचा सराव या मंडळींनी केला तरी कधी, असं राहून वाटतं. बरं खोटं किती बोलावं याला काही मर्यादा? या सार्‍या मर्यादा पार केल्याने या मंडळींचा समाचार घेण्यावाचून पर्याय नाही. घरातली प्रमुख कर्ती व्यक्ती जेव्हा खोटेपणाचा आसरा घेते, तेव्हा त्याच्या नेतृत्वाखाली काम करणारे पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते खोटेपणाचा बेमालूम वापर करतात. महाराष्ट्रात सुरू असलेल्या प्रचारात भाजपच्या नेत्यांनी हेच दाखवून दिलंय.  २०१४ च्या…

Read More

रविवार, दि. १९ मे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न वाळू तस्करांनी केल्याचा प्रकार राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये समोर आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथे ही घटना घडली असून पोलिसांनी याप्रकरणी भामाठाण येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी वाळूने भरलेल्या दोन ट्रॅक्टरसह बारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. श्रीरामपूर तालुक्यातील कमालपुर येथे गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांना शुक्रवारी (दि. १७) मिळाली होती. त्यामुळे कारवाईसाठी…

Read More

शनिवार, दि. १८ मे पतसंस्थेला कर्जाच्या थकबाकी पोटी दिलेला धनादेश न वटल्याने संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी न्यायालयाने शनिवारी संगमनेरातील सुवर्ण व्यावसायिकाला तब्बल चार लाख रुपयांचा दंड आणि एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. रुपेश सुभाष वर्मा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आर्थिक संस्थांना न वटणारे धनादेश देणाऱ्यांमध्ये चपराक बसली असल्याचे मानले जाते. संगमनेरच्या बाजारपेठेतील सुवर्ण व्यावसायिक रुपेश सुभाष वर्मा यांनी शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेकडून तीस लाख रुपयांचे जमीन व गृहतारण कर्ज २०१८ मध्ये घेतले होते. आज अखेर या कर्जाची थकबाकी ६७ लाखावर गेली आहे. संस्थेने वारंवार त्यांच्याकडे कर्ज रकमेची मागणी केल्यानंतर वर्मा…

Read More

शनिवार दि. १८ मे दुचाकीवरून आपले चेहरे रुमालाने झाकून आलेल्या आलेल्या सात जणांनी सोनाराला शस्त्राचा भाग दाखवत दरोडा टाकत सराफी पेढी लुटण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील वानवडीत मोहम्मदवाडी रोडवर ही घटना घडली. शनिवारी दुपारी सराफी पेढी लुटण्याचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे. या प्रकाराने पुण्यात खळबळ उडाली असून चोरटे दुचाकीवरून पसार झाल्याने पोलिसांनी हडपसर, वानवडी, कोंढवा परिसरात नाकाबंदी करत संशयित वाहनांची तपासणी सुरू केली होती. महम्मदवाडी रस्त्यावरील वाडकर मळा परिसरात असलेल्या बी.जी.एस. ज्वेलर्स सराफी पेढीमध्ये शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास दरोड्याची घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारी खरेदीच्या बहाण्याने चोरटे सराफी पेढीमध्ये शिरले होते. त्यांनी मालक आणि कर्मचाऱ्यांना शस्त्राचा…

Read More

शनिवार, दि. १८ मे दुचाकीसह दागिने चोरांनी पोलीस यंत्रणेला भंडावून सोडले असतानाच ११२ क्रमांकावर आलेल्या फोनच्या माध्यमातून संगमनेर पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे दरोड्याच्या तयारीत असलेली गुन्हेगारांची टोळी पोलिसांच्या हाती लागले. टोळीतील तिघांना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले असले तरी सहा जण मात्र पळून गेले आहे. संगमनेरच्या आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार समोर आला. संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पानोडी ते वरवंडी दरम्यान असलेल्या घाटात एम.एच. १७ सी.व्ही. १०८४ या क्रमांकाचा मालवाहू टेम्पो आणि त्यात असलेल्या नऊ लोकांकडे लोखंडी कटावणी, कटर, कुऱ्हाड, लाकडी दांडे, दोरी, मिरची पावडर असे साहित्य असून…

Read More

शनिवार, दि. १८ मे  डॉ. ऋषिकेश मालाणी यांचा विद्यावाचस्पती प्रबंध आता ई-पुस्तक स्वरूपात उपलब्ध झाला असून ही पुस्तक रूपातील प्रबंधाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे. डॉ. मालाणी संगमनेरमधील ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे कार्यरत आहे. त्यांनी अहमदनगर व नाशिक जिल्ह्याच्या विशेष संदर्भासह महाराष्ट्रातील नागरी पतसंस्था व सहकारी संस्थांच्या समस्या व संभावनांचा विस्तारित अभ्यास करून विद्यावाचस्पती प्राप्त केली आहे. या प्रबंधाचे आता ई-पुस्तक रूपात प्रकाशन करण्यात आले. हे ई-पुस्तक अमेझॉन आणि पोती या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यांच्या या शोधनिबंधाचा बँकिंग प्रणाली व सहकारी पतसंस्थेच्या कार्यप्रणालीबद्दल नवयुवकांना फायदा होणार आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. डी. मुळे संचालक…

Read More

शनिवार, दि. १८ मे लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी आठ दिवसानंतर राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ८ मे रोजी संजय राऊत यांनी नगरच्या जाहीर सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यामुळे राऊत यांच्याविरुद्ध अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार अतुल काजळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय होती घटना… नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी ८ मे रोजी अहमदनगरमध्ये जाहीर सभा घेण्यात आली होती.…

Read More

दाखल गुन्ह्यात सर्रासपणे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून केली जाते लाचेची मागणी दाखल गुन्ह्यांचा तपास होणार तरी कसा लाचखोरांकडून शेपन्नास, हजारावरून लाचेची मागणी आता लाखाच्या, कोटीच्या घरात! शनिवार, दि. १८ मे महावितरणमध्ये नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्यावर दाखल असलेल्या मीटर चोरीच्या गुन्ह्यात पुढील कारवाई न करण्यासाठी उपनिरीक्षकाने तक्रारदार आरोपीकडे पाच लाखाची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रेय सर्जेराव शेगर असे या लाचेची मागणी करणाऱ्या, गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून पुण्याच्या चंदननगर पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही कारवाई केली असून अँटी करप्शनकडे…

Read More

अनंत पांगारकर | शुक्रवार, दि. १७ मे बहुचर्चित नगर अर्बन बँकेतील २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात ३३ कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा करणाऱ्या व न्यायालयीन कोठडीत असलेल्या संगमनेरमधील उद्योजक अमित पंडित याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. यामुळे पंडितचा कोठडीतील मुक्काम वाढला असून पंडित याच्यासह बँकेचे माजी अध्यक्ष दिवंगत दिलीप गांधी यांचे सुपुत्र देवेंद्र गांधी आणि सून प्रगती गांधी या दांपत्याचादेखील अटकपूर्व जामीन अर्ज अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. आर्थिक कर्ज घोटाळाप्रकरणी उद्योजक अमित पंडित गेल्या तीन महिन्यापासून कोठडीत आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर पंडित याने २६ मार्चला जिल्हा न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला होता. गेल्या काही दिवसांपासून या…

Read More

संगमनेर, शुक्रवार दि. १७ मे केंद्रीय अभ्यासक्रमाच्या (CBSE) जाहीर झालेल्या शालांत परीक्षांच्या निकालात संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने शंभर टक्के निकालाची आपली परंपरा कायम राखली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये भाविन कटारियाने ९८ टक्के तर, बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेच्या पाखी दातीरने ८८ टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. यावर्षी दहावीच्या निकालात शाळेतील ३० टक्के मुलांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. तर ८६ टक्के गुणांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला प्रथमेश घुले अतिशय खडतर समजल्या जाणार्‍या जेईई मेन्ससाठी पात्र ठरला आहे. ध्रुव ग्लोबल स्कूलमधील इयत्ता दहावीच्या भाविन कटारियाने ९८ टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक मिळवला. आयुष सराफ आणि अदिती लाहोटी यांनी प्रत्येकी…

Read More

अनंत पांगारकर | शुक्रवार, दि. १७ मे  संगमनेरच्या आर्थिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थे पाठोपाठ आता अहमदनगरमधील ध्येय मल्टीस्टेट निधी लिमिटेडचा मोठा आर्थिक घोटाळा समोर आला आहे. ठेवीवर मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे आमिष दाखवून ११२ ठेवीदारांची सुमारे सहा कोटी फसवणूक केल्याप्रकरणी नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात संस्थेच्या अध्यक्षासह सात संचालकांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये ध्येय मल्टीस्टेट निधी लिमिटेड चा अध्यक्ष विशाल लक्ष्मण भागानगरे (रा. पंचपीरचावडी, माळीवाडा, अहमदनगर) याच्यासह उपाध्यक्ष रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहररोड, सावेडी, अहमदनगर), संचालक सीईओ राहुल बबन कराळे (रा. टोकेवाडी, ता. अहमदनगर), संचालक निलेश शिवाजी फुंदे (रा. राजलक्ष्मी सेंटर, सावेडी,…

Read More

शुक्रवार, दि. १७ मे एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घरी केलेल्या कारवाईत अँटीकरप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांना मोठं घबाड सापडल आहे. यात एक कोटी रुपयांची रोख रक्कम आणि ९७० ग्रॅम सोने आणि ५ किलो चांदीचा समावेश आहे. पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या लाचखोरीच्या या प्रकरणात आरोपी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घराची अँटी करप्शन विभागाकडून (ACB) झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये खाडे यांच्या घरातून एक कोटी आठ लाख रुपयांची रोकड, ९७० ग्रॅम सोने व पाच किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खाडे याच्या नावावर पाच ते…

Read More

गुरुवार, दि. १६ मे  देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. राज्यातील निवडणूक अंतिम टप्प्याकडे जात असताना राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार असून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार गटात मोठी फूट पडणार असल्याचा भाजप नेते मोहित कंबोज यांनी मोठा दावा केला आहे. लोकसभा निवडणूक राज्यात शेवटच्या टप्प्याकडे जात असताना निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. त्यातच कंबोज यांनी समाज माध्यमातून केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना वेग आला आहे. राज्यात निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान २० मे रोजी पार पडत आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळाला ४ जूनच्या निकालाचे वेध लागण्यापूर्वीच कंबोज यांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा…

Read More

गुरुवार, दि. १६ मे बँक अपहार प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी करून मालमत्ता जप्त करण्याची भीती दाखवत तक्रारदार आणि साक्षीदाराकडे तब्बल एक कोटी रुपयांची आर्थिक गुन्हे शाखेचा तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक, सहाय्यक फौजदाराने लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार बीडमधून समोर आला आहे. पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहाय्यक फौजदार रवीभूषण जाधवर आणि व्यापारी कुशाल प्रवीण जैन अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत. बीड येथील जिजामाता मल्टीस्टेट प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरकडून पोलीस अधिकाऱ्याने एक कोटी रुपयांची लाच मागितली तडजोडीअंती ठरलेल्या लाचेचा पहिला हप्ता व्यापाऱ्याकडे देण्यास सांगितले. व्यापाऱ्याने लाचेची रक्कम स्वीकारताच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. कुशाल प्रवीण जैन…

Read More

बुधवार, दि. १५ मे शाळा बंद असल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी आणि शाळेची आरटीई मान्यता वर्धित करण्याचे काम करून दिल्याच्या बदल्यात पन्नास हजार रुपयांची लाच घेणारा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) बुधवारी एसीबीच्या जाळ्यात अडकला. सतीश सुरेश चौधरी (वय ५२ वर्ष, रा. शांतीनगर, नंदुरबार) असे लाचखोर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याचे नाव असून ते नंदुरबार येथे कार्यरत आहे तक्रारदार यांना नवापूर शहर नगरपालिका हद्दीत मालमत्ता क्रमांक ८२६, सिटी सर्वे क्रमांक ६२४, पंचरत्न शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे नम्रता हॉटेल सुरू करावयाचे असल्याने सदर परिसरात ७५ मीटर अंतरावर बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा असल्याने उत्पादन शुल्क विभागाने FL३ परवाना देण्यास हरकत घेतली होती. परंतु सदर शाळा इमारत ही जीर्ण…

Read More

बुधवार, दि. १५ मे बांधकाम कार्यारंभ आदेश देण्यापूर्वीच १५ टक्क्यांप्रमाणे १ लाख ८२ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मुख्याधिकारीपदाचा पदभार असलेल्या नायब तहसीलदारासह नगराध्यक्ष, बांधकाम समिती सभापती, नगरसेवक, नगरसेविकाचा पती आणि एका व्यापाऱ्यावर लाचलुचपत विभागाने मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या यांचा आहे समावेश… गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी नगरपंचायतीमध्ये लाचखोरीचा हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नगरपंचायतीची कामे घेणाऱ्या ठेकेदाराच्या वडिलांनी गोंदिया लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. तेजराम किसन मडावी (वय ६६ वर्ष, नगराध्यक्ष), सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार असलेले नायब तहसीलदार शरद विठ्ठल हलमारे (वय ५६ वर्ष), नगरपंचायतीच्या बांधकाम समितीचे सभापती आश्लेष मनोहर अंबादे (वय ३५…

Read More

मंगळवार, दि. १४ मे  घाटकोपरमध्ये मोठे होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेत १४ लोक ठार तर ८० लोक जखमी झाले असून ही काही साधी घटना नाही. घाटकोपर दुर्घटनेची राज्य सरकारने सखोल चौकशी करुन या घटनेला जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी राजावाडी हॉस्पिटला भेट देऊन घाटकोपर दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली व डॉक्टरांकडून माहिती घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले, घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेला राज्य सरकार व मुंबई महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. दोन वर्षांपासून महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत…

Read More