Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील सुमारे 81 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराने संगमनेरातील पतसंस्थांचे अर्थकारण धोक्यात आले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दूधगंगा पतसंस्थेचा चेअरमन आणि राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित असलेला पुढारी भाऊसाहेब कुटे याच्यासह तब्बल 21 जणांविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल झाला असला तरी यामागील मुख्य सूत्रधार, मास्टरमाईंड हा भाऊसाहेब कुटेच असल्याचे दिसते. चेअरमन असलेल्या कुटे याच्या दहशत आणि दबावाला संस्थेतील अधिकारी कर्मचारी बळी पडल्याचे दिसते. “विना सहकार नाही उद्धार” याप्रमाणे चालणारा सहकार हा संगमनेरच्या अर्थकारणाचा पाया आहे. भाऊसाहेब थोरात यांनी रुजविलेल्या सहकाराचे रोपटे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात सर्वत्र फोपावले. येथील सहकार राज्यासाठी दिशादर्शक ठरला…

Read More

संगमनेर पंचायत समितीचा महिला शिक्षिकांसाठी उपक्रम महाराष्ट्र संवाद न्यूज कोविड कालावधीनंतर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी भ्रमणध्वनी देणे आवश्यक झाले आहे. एकदा स्मार्टफोन हातात आला की, त्यावर इंटरनेटच्या माध्यमातून येणारी माहिती आणि त्यातून कळत नकळत घडलेल्या सायबर चुकांचा मोठा परिणाम भोगावा लागू शकतो. म्हणूनच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे गांभीर्य समजावून सांगत त्याचे धडे देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संगणक तज्ञ वैशाली खैरनार यांनी केले. उपक्रमशील गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या पुढाकारातून संगमनेर पंचायत समितीमध्ये गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थी व महिलांसाठी सायबर सुरक्षा या विषयावरील कार्यशाळेत खैरनार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड होते. यावेळी सहाय्यक लेखाधिकारी प्रदीप वर्पे, राजेंद्र भालारे उपस्थित होते. अशोक देशमुख यांच्या ताण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सध्या सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सर्रासपणे दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर पोलिसांकडून हा उपद्रव थांबवण्यासाठी गुरुवारी अवैध दारू विक्रेत्यांची धरपकड करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 68 खाली या सर्वांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती संगमनेरचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी दारू दुकाने बंद असली तरी अवैध विक्री करणाऱ्यांकडून मध्य प्राशन करणाऱ्यांना दारू उपलब्ध होत असते. दारू पिणारे लोक दारू पिऊन मिरवणुकांमध्ये गैरवर्तन करतात. त्यामुळे गणपती मंडळाची देखील बदनामी होते. शिवाय विविध प्रकारचे गुन्हे देखील घडतात. या गैरप्रकाराना प्रतिबंध होऊन सार्वजनिक गणपती मंडळाच्या मिरवणूक शांततेमध्ये पार पाडाव्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अन्य सर्व मार्ग बंद झाल्याने गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीवर जाण्यासाठी केवळ अकोले रोड कडून मालपाणी हेल्थ क्लब मार्गे गंगामाई घाटाकडे जाणारा एकमेव रस्ता सुरू असल्याने गणेश भक्तांचे मोठे हाल झाल्याचे बघावयास मिळाले. मुख्य मानाच्या गणेश विसर्जन मार्गावरील प्रवरा नदीकडे जाणाऱ्या परदेशपुऱ्यातील मठाजवळील रस्ता रस्त्यावर इतर गणेश भक्तांना परवानगी नसल्याने बंद असतो. त्यामुळे स्वामी समर्थ मंदिराजवळील पुलावरून प्रवरा नदीवरील गंगामाई घाटाकडे जाणारा, अकोले रोड मार्गे मालपाणी हेल्थ क्लबच्या बाजूने गंगामाई घाटाकडे जाणारा रस्ता गणेश विसर्जनाकरिता खुला असतो. या दोन मार्गाने विसर्जन केले जाते. मात्र गेल्या वर्षभरापासून स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिरा दरम्यानचा पूल खचल्यामुळे वाहतुकीसाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मानाच्या पहिल्या श्री सोमेश्वर मित्र मंडळाच्या श्री गणेशाची आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पूजा आणि आरती करून संगमनेरच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे, प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, मनीष मालपाणी, सोमेश्वर मंडळाचे किशोर पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. धार्मिक विद्वेष आणि अशांतता बाजूला ठेवून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विसर्जनाच्या दिवशी सकाळी आठ वाजता गणरायाची पूजा करून मिरवणुकीला प्रारंभ होतो. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही गेले 21 वर्ष विसर्जन मिरवणुकीला उपस्थित राहण्याची परंपरा…

Read More

गुन्हा दाखल होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी आर्थिक गुन्हे शाखा एकाही आरोपीला ताब्यात घेऊ शकलेली नाही महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर व्हाईट कॉलर क्रिमिनल आणि दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष असलेला भाऊसाहेब कुटे आणि त्याच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने फेटाळून चार दिवसांचा कालावधी उलटत आहे. तरीदेखील तपास यंत्रणा कुटे आणि त्याच्या परिवारापर्यंत अद्यापही पोहोचत नसल्याने याप्रकरणी तपास यंत्रणेवर असलेले संशयाचे सावट अधिक गडद झाले आहे. दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात अडकलेल्या आरोपींसह तपास यंत्रणा आणि ज्यांच्यावर या सर्व कारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती त्या सहकार विभागाबद्दल आता संशयाचे वातावरण निर्माण झाले…

Read More

पकडलेल्या आरोपीकडून दोन खुनाचा उलगडा; पीडित मुलीसोबत पैशासाठी आईचीही हत्या केल्याचे निष्पन्न महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेरमधील जुन्या आणि निर्जन असलेल्या चंदनापुरीच्या घाटात 24 सप्टेंबरला एका अल्पवयीन मुलीचा विद्रूप अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. प्राथमिकदृष्ट्या घातपात असल्याचे स्पष्ट करणाऱ्या या घटनेत पोलिसांसमोर या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान असताना अवघ्या काही तासात पोलिसांनी केवळ मृत मुलीची ओळखच पटविली नाही तर आरोपीदेखील गजाआड केला. यातील कौतुकास्पद बाब म्हणजे आरोपीने एक नव्हे तर दोन खून केल्याची उकल करण्यात पोलीस यशस्वी झाल्याची माहिती संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. दारू पाजून अल्पवयीन मुलीची हत्या:  अल्पवयीन पीडित मुलीची डोक्यात दगड टाकून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – हजारो नागरिकांच्या अभूतपूर्व जल्लोषामध्ये अमृतवाहिनी महाविद्यालय ते बसस्थानक या ‘हॅपी हायवे’चे लोकार्पण होत आहे. तालुक्यात फोनाफोनी झाली. मात्र हा तालुका एक परिवार आहे. संगमनेरच्या विकासात ज्या-ज्या वेळी अडचणी आणण्याचा प्रयत्न झाला त्या-त्या वेळी हा तालुका एकवटला आहे. संगमनेरकरांचा आनंद काही लोकांना पहावत नसल्याने हा कार्यक्रम होऊ नये यासाठी अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या. आनंदाच्या क्षणी सर्वांनी एकत्र यावे ही अपेक्षा होती मात्र काही लोकांनी यामध्ये विनाकारण राजकारण केल्याचे प्रतिपादन माजी मंत्री काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात यांच्या प्रयत्नातून झालेल्या अमृतवाहिनी महाविद्यालय ते बस स्थानक या हॅप्पी हायवेचे लोकार्पण मंगळवारी संध्याकाळी थोरात यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर अमृतवाहिनी महाविद्यालय ते रायतेवाडी फाटा बाह्यवळण मार्गापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी देण्यात आला. अमृतवाहिनी महाविद्यालयाचे बस स्थानकापर्यंत काम झाल्याने लगेचच त्याच्या उद्घाटनाची घाई का असा प्रश्न उपस्थित करत रस्त्याच्या पूर्णतेनंतर उद्घाटन केले असते तर बरे झाले असते. श्रेयवादासाठीचा तमाशा संगमनेर शहराने मंगळवारी अनुभवला. केवळ नगरपालिका निवडणुका केव्हाही होऊ शकतात त्यामुळे त्याच्या देखाव्यासाठी हा उद्घाटनाचा अट्टाहास होता का? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख सोमनाथ कानकाटे यांनी उपस्थित केला आहे. कानकाटे म्हणाले, संगमनेरमधील जनता भोळी नाही, ती सर्व जाणून आहे. ती तिसरा नेत्र उघडेल तेव्हा सर्व राजकीय पुढाऱ्यांना जनतेची ताकद…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर येथे राज्यस्तरीय अबॅकस व मानसिक अंकगणित या विषयाच्या स्पर्धेत ३ मिनीटात १०० गणिते सोडविण्याचा अद्भुत विक्रम येथील देवांग क्रिएशनच्या विद्यार्थ्यांनी केला. साऊथ कोरिया येथून जागतिक अबॅकस स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याप्रसंगी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यांच्या उपस्थितीत समारंभ: रविवारी (दि. २४ सप्टेंबर) मालपाणी हेल्थ क्लब या ठिकाणी झालेल्या या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते व रोटरी आय केअर ट्रस्टचे विश्वस्त सुनील कडलग, डॉ. भानुदास डेरे इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या प्राचार्या रेखाताई पवार आणि देवांग क्रिएशनच्या संचालिका सोनाली डोखे उपस्थित होत्या. येथील स्पर्धकांचा सहभाग: या स्पर्धेत अमरावती, सातारा, बदलापूर, मुंबई, पुणे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  आश्वी – संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील निशिकांत सोन्याबापू बर्डे (वय २७) या तरुणाचे सोमवारी रात्री अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली असून मंगळवारी या तरुणावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. आश्वी खुर्द येथील निशिकांत बर्डे हा तरुण राहाता येथिल बंधन बॅकेत नोकरी करत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी तो कामावर गेला होता. सायंकाळी अंदाजे ८ ते ९ च्या दरम्यान राहत्याहून दुचाकीवरून घराच्या दिशेने येत होता. यांचकाळात जोरदार पाऊस सुरू असल्याने समोरुन येणाऱ्या वाहणाने निशिकांत बर्डे यांच्या दुचाकीला निर्मळ पिप्रीं – लोणी रस्त्यावर हुलकावणी दिली. त्यामुळे झालेल्या भीषण आपघातात बर्डे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  अहमदनगर – धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनर व सुरेश बंडगर यांची मंगळवारी (26 सप्टेंबर) प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर अण्णासाहेब रुपनर व सुरेश बंडगर यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन रूपनर व बंडगर यांनी उपोषण सोडले. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे, माजी आमदार अण्णासाहेब डांगे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अण्णासाहेब बाचकर, बाळासाहेब दोडतले आदी उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नासंदर्भात 21 सप्टेंबरला यशवंत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यातील सरकारी शाळा कंपन्यांनी चालवायचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, शैक्षणिक दृष्ट्या अन्यायकारक ठरणारा हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी छात्रभारतीच्यावतीने संगमनेर बस स्थानकासमोर मंगळवारी आंदोलन करण्यात आले. हा निर्णय मागे घेतला जावा, यासाठी छात्र भारतीच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. सरकारी शाळा बंदीचा निर्णय मागे घ्या. शिक्षणाचे कंत्राटीकरण थांबवा. राज्यातील सरकारी शाळा खाजगी कंपन्यांना चालविण्यास देण्याचा निर्णय गोरगरीब, आदिवासी, शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण संपविणारा आहे. सरकारच्या या एका निर्णयामुळे राज्यातील जवळपास 14 हजार पेक्षा जास्त शाळा बंद केल्या जाणार आहे. तर 65 हजार पेक्षा जास्त शाळा कंपन्यांना चालविण्यास दिल्या जातील. या निर्णयामुळे लाखावर शाळांचे पर्यायाने विद्यार्थ्यांचे…

Read More

संगमनेरकर कलारसिकांचा उदंड प्रतिसाद महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आपल्यावर मनापासून निस्वार्थी प्रेम करणारा माणूस सापडण्यासाठी भाग्य लागतं. असा माणूस प्रत्येकालाच भेटेल असेही नाही; आणि भेटलाच तर तो आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर भेटेल याचाही भरवसा नसतो. परंतु समोरच्याने आपल्यावर केलेल्या प्रेमाला ओळखून त्याचा आदर केला, तर ते नातं अधिक बहरतं. त्यातील नात्यात एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती असली तर ते तुटण्याचाही प्रश्‍न नसतो. असाच काहीसा संदेश देत रविवारी सादर झालेल्या ‘मी, स्वरा आणि ते दोघं’ या नाट्यप्रयोगाने संगमनेर फेस्टिव्हलचा समारोप झाला. राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूह आयोजित संगमनेर फेस्टिव्हलमध्ये रविवारी प्रसिद्धी मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मी,…

Read More

शाळा बंद करण्यापूर्वी स्थानिकांचा विचार घ्यावा शिक्षणाचा मूलभूत हक्काची पायमल्ली होऊ नये महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – राज्य सरकारने सुमारे 14783 शाळा बंद करून त्या समूह शाळा करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत दुर्दैवी आहे. यामुळे गोरगरिबांची वाडी-वस्तीवर शिकत असलेली मुले शिक्षणापासून वंचित राहणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे मूलभूत शिक्षण हक्काची पायमल्ली होणार आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक ठिकाणी स्थानिक नागरिकांचा विचार घेतला पाहिजे. सरकारी शाळा बंद करण्याचा शासनाचा डाव असून हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. कमी पटसंख्या शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात दिलेल्या प्रसिद्धी…

Read More

गणेशच्या निवडणुकीत दहशतीचे झाकण उडाले आणि गणेश परिसराने मोकळा श्वास घेतला : शिवाजीराव लहारे महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता : स्वाभिमानी गणेश परिसरासाठी मंगळवारी (ता. २६ सप्टेंबर) घातलेली वार्षिक सर्वसाधारण सभा महत्त्वाची असणार आहे. गेले दहा वर्ष गणेश कारखान्याचे कामगार सभासद आणि शेतकरी अन्याय आणि दहशतीच्या वातावरणाखाली होते. नुकत्याच झालेल्या गणेशच्या निवडणुकीत दहशतीचे झाकण उडाले आणि गणेश परिसराने मोकळा श्वास घेतला. गणेश कारखाना सभासदांच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे लढा देईल असा विश्वास ज्येष्ठ नेते तथा गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे यांनी व्यक्त केला. सोबतच प्रवरेच्या नेतृत्वाने मोठे मन दाखवून गणेश कारखान्याला सहकार्य करावे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सभा:…

Read More

न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले होते लक्ष महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेरच्या सहकारावर अविश्वासाचे सावट निर्माण करणाऱ्या आणि दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज सरकारी वकिलांच्या जोरदार युक्तिवादानंतर फेटाळण्यात आला तर अन्य चौघांचा जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी मंगळवारी मंजूर केला. तपास अधिकारी, ठेवीदारांच्या भूमिकेकडे लक्ष: गेल्या महिनाभरापासून ठेवीदारांना न्यायालयाच्या या निर्णयाचे प्रतीक्षा लागली होती. भाऊसाहेब कुठे आणि अन्य आरोपींच्या जामीन अर्जाला सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी न्यायालयासमोर हरकत घेत युक्तिवाद करत या प्रकरणातील गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे…

Read More

इंजिनिअरिंग कॉलेज ते बसस्थानक रस्त्यावर लखलखाट होणार महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सुसंस्कृत व प्रगतशील संगमनेरच्या वैभवात भर घालणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बसस्थानक या हॅपी हायवेचे लोकार्पण गणेश उत्सवाच्या आनंदी काळात मंगळवारी (दि. 26 सप्टेंबर) सायंकाळी 5 वाजता काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे. तांबे म्हणाल्या, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून व मार्गदर्शनातून इंजिनिअरिंग कॉलेज ते बसस्थानक हा मॉडेल रस्ता तयार झाला आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणासह दुतर्फा पादचारी मार्ग आहेत. मध्यभागी डिव्हायडरसह विविध वृक्षांचे रोपण केले…

Read More

संगमनेर कारखाना देणार कार्यक्षेत्रातील ऊसाला 2835 रुपयांचा भाव महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सरकार गेलं आणि आपल्याला त्रास सुरू झाला. तालुक्यातील विकास काम बंद केले गेले. दहशत निर्माण करून विकास थांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र दहशतीने येथील विकास थांबणार नाही. ते मोडायला येतात आणि आम्ही घडवायला जातो, असे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. यांची उपस्थिती: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार बाळासाहेब थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ओहोळ होते. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह संगमनेर तालुका…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – वैवाहिक जीवन एकमेकांच्या विश्‍वासावर अवलंबून असते. त्यात संशय निर्माण झाला की प्रेमाच्या आणाभाका घेणारी जोडपीही परस्परांकडे संशयाने पाहू लागतात आणि त्यातून संसारातील गोडवा नाहीसा होतो. अशाच कथानकाचा समावेश असलेल्या आणि सरतेशेवटी नातेसंबंधातील विश्‍वास जपण्याचा संदेश देणार्‍या केदार शिंदे लिखित, भरत जाधव यांच्या तब्बल चौदा वेगवेगळ्या भूमिकांचा समावेश असलेल्या ‘तू तू मी मी’ या धमाल विनोदी नाट्यप्रयोगाने संगमनेर फेस्टिव्हलच्या चौथ्या दिवशी प्रेक्षागारात हास्याचे कारंजे फुलवले. कमलाकर सातपुतेसह अन्य तिघांनी वठवलेल्या भूमिकेने उपस्थित प्रेक्षकांना मनात डोकवायलाही भाग पाडले. राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूह आयोजित संगमनेर फेस्टिव्हलमध्ये शनिवारी अभिनेता भरत जाधव, कमलाकर सातपुते, निखिल चव्हाण, रुचिरा…

Read More