Author: Annant Ppangarkar

दि. १४ मार्च, संगमनेर शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. यासाठी दरवर्षी शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या कार्यकारी यांच्या अध्यक्षपदी सागर बागे याची तर उपाध्यक्षपदी सौरभ उमरजी यांचे निवड करण्यात आली आहे. ग्रामदैवत असलेल्या चंद्रशेखर चौकातील मारुती मंदिरात उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी केलेल्या प्रास्ताविकानंतर कार्यकारिणीची निवड सर्वांनुमते करण्यात आली. यावर्षी उत्सव समितीच्या माध्यमातून साजरा केला जाणारा कार्यक्रमांची माहिती पत्रकार मंगेश सालपे यांनी दिली. उत्सव समितीची कार्यकारणी पुढील प्रमाणे… सागर बागे (अध्यक्ष), सौरभ उमरजी (कार्याध्यक्ष), मयूर जाधव व सागर पगारे (उपाध्यक्ष), किरण…

Read More

दि. १४ मार्च, संगमनेर सहकाराच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब माणसांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आदर्श तत्व आणि विचार घेऊन सहकार चळवळीत मोठे योगदान दिले. तालुक्याच्या विकासाची रचनात्मक पायाभरणी करताना त्यांनी समाज विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले असून त्यांचे जीवन कार्य पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे अमृत उद्योग समूहाच्यावतीने आयोजित १४ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, सुधाकर जोशी,…

Read More

दि. १३ मार्च, नवी दिल्ली २०२४ च्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ७२ उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी जाहीर केली. या यादीत राज्यातील २० उमेदवारांचा समावेश असून बहुतांश उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर मधून उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्यासह पंकजा मुंडे बीडच्या उमेदवार असतील. तर अहमदनगर दक्षिण मधून उमेदवार बदलाची चर्चा सुरू असतानाच भाजपाने विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. भाजप उमेदवारांच्या यादीत डॉ. हिना विजयकुमार गावित (नंदुरबार), डॉ. सुभाष भामरे (धुळे), श्रीमती स्मिता वाघ (जळगाव), रक्षा खडसे (रावेर), अनुप धोत्रे (अकोला), रामदास तडस (वर्धा), सुधीर मुनगंटीवार…

Read More

दि. १३ मार्च, संगमनेर संगमनेरच्या शांततेला गालबोट लावणारे जोर्वेनाका येथील प्रकरण न्यायप्रविष्ट होत नाही तोच आता पुन्हा एकदा कोल्हेवाडी-दिल्ली नाका रस्त्यावर जमावाकडून चिमुकल्या लेकींसमोर पित्यासह तिघांना मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शहरातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात दंगल नियंत्रक पथकाची कुमक देखील मागविण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर रात्री उशिरा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांचा मोठा जमाव जमला होता. घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत असून दरम्यान या प्रकरणी शहर पोलिसांनी काय कारवाई केली याबाबत दुपारपर्यंत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. राहुल सोपान गुंजाळ (वय ३८ वर्ष, रा. कोल्हेवाडी, ता.…

Read More

दि. १२ मार्च, नवी दिल्ली २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने ४३ उमेदवारांची आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नसून तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. आसाम मध्य प्रदेश आणि राजस्थान मधील उमेदवारांचा या यादीत समावेश आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथून सध्याचे खासदार नकुलनाथ यांना काँग्रेसने पुन्हा तिकीट दिले आहे. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत, २००१-२०१६ पर्यंत आसामचे मुख्यमंत्री राहिलेले तरूण गोगई यांचे सुपुत्र गौरव गोगोई यांनाही काँग्रेसने आपल्या दुसऱ्या यादीत स्थान…

Read More

दि. १२ मार्च, संगमनेर शहरालगत असलेल्या लक्ष्मी नगरमध्ये मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास जमावाने दोन जणांना शस्त्रांसह बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी जखमीच्या जबाबावरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. जमावाच्या मारहाणीत हुसेन बाबामियां शेख (रा. मालदाड रोड, तिरंगा चौक, संगमनेर) हा गंभीर जखमी झाला आहे. या संदर्भात मिळाली माहिती अशी, मित्राला होत असलेली मारहाण पाहून त्याला वाचवण्यासाठी हुसेन शेख मदतीला गेला आणि भांडणांमध्ये मध्यस्थी करू लागल्याने जमलेल्या तरुणांच्या जमावाने त्यालाही मारण्यास सुरुवात केली. तसेच या बेदम मारहाणीत त्याच्यावर कोयत्याने वार करीत…

Read More

दि. १२ मार्च, संगमनेर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ३ कोटी १५ लाख ८ हजार १०० रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांनी दिली. सरकारच्या माध्यमातून सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वर्गासाठी विविध योजना राबविल्या जातात. यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय दिव्‍यांग निवृत्‍ती वेतन योजना, राष्‍ट्रीय कुटूंब लाभ योजना अशा योजनांचा समावेश आहे. जानेवारी व फेब्रुवारी २०२४ चे संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत सर्वसाधारण ५२४८ लाभार्थ्याना १ कोटी ५५…

Read More

दि. ११ मार्च, मुंबई नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटना व तत्सम बाबींची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. या समितीने तीन महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या विरोधात केलेल्या विधानांचे पडसाद उमटले होते. भाजपाचे आमदार आशीष शेलार यांनी विधानसभेत अंतरवली सराटी प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या हिंसक घटनांची चौकशी…

Read More

दि. ११ मार्च, मुंबई खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. दुपारी दोन वाजता यात्रा नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यानंतर १३ मार्चला धुळे, मालेगाव, १४ मार्चला नाशिक, १५ मार्चला पालघर, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा १६ मार्चला मुंबईत दाखल होणार आहे. १७ मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर होत असून याचवेळी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात १५ जानेवारीला मणिपूरमधून करण्यात आली असून यात्रेची सांगता मुंबईत होत आहे. ही यात्रा १५ राज्ये, १०० जिल्हे, ११० लोकसभा मतदारसंघातून ६७ दिवसांत ६७०० किमीचा प्रवास करत आहे.…

Read More

दि. ११ मार्च, संगमनेर राज्यभर निर्भय बनो आंदोलनाच्यावतीने सभांचा धडाका सुरू आहे. या सभांना मोठा प्रतिसाद मिळत असून संगमनेर मध्ये बुधवारी १३ मार्चला या सभेचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी या सभेला मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. जनतेला निर्भयपणे आपले म्हणणे मांडता यावे यासाठी वातावरण निर्मिती करणे, हा या सभेचा मुख्य उद्देश आहे. निर्भय बनो अंतर्गत सुरू असलेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, वकील असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्या सभांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अकोले बायपास रस्त्यावरील स्वयंवर मंगल कार्यालयात बुधवारी (१३ मार्च) दुपारी तीन वाजता निर्भय संगमनेरकर आयोजित प्रबोधन सभा…

Read More

भोजापूर पूरचारीच्या २ कोटी १२ लाख रुपयांच्या निधीतून सोळा किलोमीटर लांबीच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन ७७ कोटी रुपयांचा निधी मिळवला, मात्र सत्ता बदल होताच नव्या सरकारने या निधीला स्टे लावला दि. १० मार्च, संगमनेर तळेगाव भागातील दुष्काळी गावांना पाणी मिळावे, या हेतूने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून भोजापूर पूरचारी करण्यात आली. दरवर्षी कारखाना या चारीची दुरुस्ती करत असतो. यामुळे परिसरातील गावांना पाणी मिळते. मात्र या चारीच्या कामात ज्या लोकांचे योगदान नाही, ज्यांचा हेतू चांगला नाही, असे लोक या परिसरात येऊन आपसात मनभेद निर्माण करत आहे. अशा प्रकारच्या लोकांना थारा देऊ नका, असे स्पष्ट करत नव्याने सोनेवाडी ते तिगाव…

Read More

जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसा प्रचारातील रंग वाढत जाणार. प्रचार म्हटला की नेत्यांच्या तोंडाला आवर घालणं अवघड. त्यात भारतीय निवडणूक आयोग सत्ताधारी भाजपला विकला गेल्याने सत्ताधार्‍यांवर त्याचा काहीही अंकुश नाही. यामुळे भाजपसाठी वक्र प्रचाराची संधीच संधी आहे. वायफळ टीका टिपण्णी करणार्‍या सत्ताधारी भाजप नेत्यांना हात न लावणारा हा आयोग विरोधकांसाठी मात्र गले की हड्डी बनला आहे. आयोगाच्या आंधळेपणामुळे निवडणूक जाहीर होण्याआधीच भाजपच्या नेत्यांनी ओकार्‍या करायला सुरुवात केली आहे. अबकी बार ४०० पारचा नारा लावणार्‍या भाजपसाठी महाराष्ट्रातली परिस्थिती अनुकूल नाही.  मतांची आणि उमेदवारांची विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी राज्याच्या दौर्‍यावर आलेले अमित शहा हे भाजपचे तारणहार, देशाचे गृहमंत्री. विरोधी पक्षांना अडकवण्यासाठीच्या सर्वोत्तम…

Read More

मुंबई, दि. ८ मार्च खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात आली असून नंदूरबार जिल्ह्यातून १२ तारखेला ही न्याय यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल. १७ मार्च रोजी या यात्रेची सांगता शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या जाहीर सभेने होणार आहे. यासाठी प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार काँग्रेस पक्षाने यासाठी समन्वय समित्या गठीत केल्या आहेत. भारत जोडो न्याय यात्रेच्या समन्वयासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीत विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, काँग्रेस कार्यसमिती सदस्य…

Read More

दि. ९ मार्च रक्तपेढीच्या तपासणीत त्रुटी न काढण्यासाठी रक्तपेढी चालकाकडे एक लाख दहा हजाराची लाच मागणाऱ्या उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी असलेल्या अस्थिरोगतज्ञाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. अश्विनी किशनराव गोरे (वय ४२ वर्षे) व डॉ. प्रितम तुकाराम राऊत (वय ४८ वर्षे, दोघे रा. क्वॉटर्स क्र.३, क्लास १ क्वॉटर्स, सिव्हील हॉस्पिटल कॅम्पस, मारवाडी गल्ली, धाराशिव, जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टर दांपत्याची नावे आहेत. डॉ. अश्विनी गोरे या उदगीरच्या जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असून त्यांच्याकडे प्रादेशिक रक्त संक्रमण अधिकारी वर्ग १ या पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांनी…

Read More

दि. ८ मार्च, मुंबई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. जागा वाटपावरून महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत असून हे दोन्ही नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळवण्यात यश मिळवतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे पक्षांतर्गत सर्व्हेनंतर भाजपकडून तब्बल डझनभर खासदारांची तिकिटे कापले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात टीव्ही नाईन मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, भाजप महाराष्ट्रात ३६ पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटाची धाकधूक वाढल्याची…

Read More

दि. ८ मार्च, संगमनेर राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असताना त्याचे उल्लंघन करत एका पिकअपमधून निर्दयतेने वाहतूक केली जात असलेली ३६ जिवंत वासरांची सुटका करत ही वासरे संगमनेर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलीस कॉन्स्टेबल अनिल उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अबूबकर इसाक शहा (रा. ममदापुर, ता. राहता) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्त्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असताना कत्तलीच्या उद्देशाने एका पीकअप मधून जिवंत वासरांची निर्दयतेने वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.…

Read More

दि. ८ मार्च प्रत्येक क्षेत्रात महिलांनी केलेली कामगिरी ही अभिमानास्पद आहे. याच पार्श्वभूमीवर क्रिकेटमध्ये देखील भारतीय मुलींची कामगिरी देशवासीयांसाठी अभिमानास्पद ठरत आहे. कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून एकविराच्यावतीने सुरू झालेल्या महिला क्रिकेट व विविध क्रीडा स्पर्धांमुळे तालुक्यातील मुली व महिलांसाठी मोठे व्यासपीठ निर्माण झाले असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात एकविरा फाउंडेशनच्यावतीने महिला टेनिस बॉल क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी समवेत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, पद्मा थोरात, सुनंदा जोर्वेकर, शितल…

Read More

नाशिक, दि. ८ मार्च कॉलेज परिसरात कॅफे चालवून विद्यार्थ्यांना चुकीच्या कृत्यासाठी आडोसा करून देतो, थांब तुझ्यावर कारवाई करतो असे धमकावत कॅफे चालकाकडून दरमहा २००० ते ३००० रुपये हप्त्याच्या रूपात उकळणारा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुरुवारी अडीच हजार रुपये घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला. शंकर जनार्दन गोसावी (रा. टाकळी रोड, नाशिक) असे लाचखोर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. लाचखोर गोसावी हा पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत कार्यरत आहे.शहरातील एका कॉलेजच्या परिसरात तक्रारदाराचे कॅफे आहे. या कॅफेमध्ये येणाऱ्या जोडप्यांना प्रायव्हसी मिळावी यासाठी तेथे व्यवस्था (आडोसा) करण्यात आली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोसावी याने कॅफे चालकाची भेट घेत त्याच्यावर कारवाईचा…

Read More

अहमदनगर, दि. ७ मार्च केवळ सत्तेसाठी भाजपमध्ये नव्याने आलेल्या लोकांमुळे जुन्या निष्ठावंतांवर अन्याय सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षांच्या एका निर्णयामुळे संगमनेर भाजपाची अंतर्गत धुसफूस समोर आली, असे असले तरी स्वतःचाच निर्णय पुन्हा फिरविण्याची आफत भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर ओढावली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर नगर जिल्ह्यातही विखे व्हर्सेस भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमधील हा संघर्ष सातत्याने बघावयास मिळत आहे. नव्या जुन्यातील संघर्ष आणि अंतर्गत वादामुळे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे चांगलेच अडचणीत सापडले असल्याचे दिसत आहे. बुधवारी संगमनेर तालुका मंडळ कार्यकारिणी रद्द केल्याचा स्वतःचाच दिलेला आदेश गुरुवारी पुन्हा २४ तासाच्या आत फिरविण्याची व आहे तीच कार्यकारिणी…

Read More

कोल्हापूर, दि. ७ मार्च मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बाहेर पडताना गद्दारीचा शिक्का माथी बसलेल्या मुख्यमंत्री शिंदे गटातील काही खासदारांचा पत्ता भाजप कट करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या खासदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून काहीही करा, पण उमेदवारी द्या, धनुष्यबाण मिळणार नसेल तर कमळावर लढू! असं साकडं या खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना घातल आहे. या मागणीसाठी खासदारांनी दबाव गट तयार केला अजून दोन दिवसात ते एकत्रित भेटणार असल्याचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिले आहे. शिवसेना फुटीवेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील तेरा खासदार गेले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारी आणि भरपूर निधी असा शब्द त्यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी…

Read More