Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक घटक आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवून त्यांचे जीवन अधिक सुखकर बनविण्यासाठी प्रशासनामार्फत सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजना व कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. वसंत टेकडी येथे असलेल्या भाऊसाहेब फिरोदिया वृद्धाश्रम येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकीसन देवढे, ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष श्री क्षीरसागर, उद्योजक पंकज ठाकूर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे एकत्र कुटुंब पध्दती लयास चालली आहे. आई-वडिल आयुष्यभर काबाडकष्ट…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष @ प्रवीण पुरो वकूब नसलेल्या व्यक्तीला एखाद्या पक्षाचा अध्यक्ष बनवला की तो कसा वाह्यात वागतो याचं उत्तम उदाहरण चंद्रशेखर बावनकुळे यांचं देता येईल. प्रदेशाध्यक्ष कसा नसावा याचे दाखले या प्रदेशाध्यक्षाने भाजपला घालून दिले आहेत. पात्रता नसताना मोठी जबाबदारी आल्यावर अशी माणसं सगळ्यांनाच मोजतात. बावनकुळे यांची गत तशीच झाली आहे. त्यांच्या या वाह्यातपणाचे भाजप वगळता सगळ्याच पक्षाचे नेते बळी ठरले आहेत. त्यांनी पत्रकारांनाही सोडलेलं नाही. आपल्या पक्षाला टिकेपासून दूर ठेवायचं असेल तर पत्रकारांना ढाब्यावर घेऊन जा, असा सल्ला त्यांनी आपल्या पक्षाच्या तालुका आणि जिल्हा पदाधिकार्‍यांना दिला आहे. तिथे त्यांना काळा चहा पाजायचा की दुधाचा, हे ठरवून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज स्वररंग युवक महोत्सवमध्ये सहकारमहर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात सहभाग घेऊन ९ कला प्रकारात यश संपादन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळामार्फत स्वररंग या विभागीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवातून विद्यार्थ्यांना त्यांच्यातील विविध कला अविष्कार सादर करण्याची संधी मिळते. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी कलावंताना आगामी राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवाकरिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून संधी दिली जाते. या युवक महोत्सवातून अनेक नामवंत कलाकार तयार होऊन त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झालेली आहे. समूह गीत गायनमध्ये समृद्धी अभंग, कार्तिक सोनवणे, प्रथमेश बिडवे, आदित्य साळवे, संज्योत कोल्हे, कावेरी बोऱ्हाडे यांना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज “आगामी निवडणुकीत आपण कोणतेही बॅनर किंवा पोस्टर लावणार नाही. कोणालाही लक्ष्मी दर्शन करणार नाही. मी कधीही लाच घेतली नाही, कोणाला घेऊही देणार नाही. इतकच काय आपण कोणालाही चहा पाजणार नसल्याचं” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केल आहे. यांची उपस्थिती : यावेळी खासदार भावना गवळी, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार राजेंद्र पाटणी, लखन मलिक, अमित झनक, तानाजी मुटकुळे यांच्यासह जिल्हाधिकारी एस. भुवनेश्वरी आदी उपस्थित होते. नितीन गडकरी यांनी भाजपा चंद्रशेखर बावनकुळेंना घरचा आहेर दिल्याची चर्चा यामुळे केली जात आहे. लोकार्पण सोहळा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वाशीम येथे 3655 कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१) व ३७(३) अन्वये १२ ऑक्टोबर,२०२३ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे… शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना हॅलोजन लावत असताना अचानकपणे वायरमनला विजेचा धक्का बसला आणि तो वायरला चिकटला. गर्दीमुळे हा प्रकार कोणाच्याच लक्षात आला नाही मात्र विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी थांबलेल्या सारिका दावणपल्लीच्या प्रसंगावधानामुळे या वायरमनचा जीव वाचला. काय होती घटना: गुरुवारी संगमनेरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुक चालु असताना नगरपालिकेसमोर एका दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर वायरमन हॅलोजन लावायचे काम करत असताना शॉक लागून तो वायरला चिटकला. सारिकाच्या लक्षात आला प्रकार: मदत मिळण्यासाठी खुप प्रयत्न करीत होता पण मिरवणुकीच्या धाम-धुमीमुळे कोणाच्याच ते लक्षात आले नाही. मिरवणुक बघण्यासाठी महाराणा प्रताप महिला मंडळाच्या सदस्या सारिका दावनपल्ली नगरपालिकेजवळ आपल्या परिवाराबरोबर उभी होती. सारिकाचे लक्ष…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील सुमारे 81 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराने संगमनेरातील पतसंस्थांचे अर्थकारण धोक्यात आले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दूधगंगा पतसंस्थेचा चेअरमन आणि राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित असलेला पुढारी भाऊसाहेब कुटे याच्यासह तब्बल 21 जणांविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल झाला असला तरी यामागील मुख्य सूत्रधार, मास्टरमाईंड हा भाऊसाहेब कुटेच असल्याचे दिसते. चेअरमन असलेल्या कुटे याच्या दहशत आणि दबावाला संस्थेतील अधिकारी कर्मचारी बळी पडल्याचे दिसते. “विना सहकार नाही उद्धार” याप्रमाणे चालणारा सहकार हा संगमनेरच्या अर्थकारणाचा पाया आहे. भाऊसाहेब थोरात यांनी रुजविलेल्या सहकाराचे रोपटे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात सर्वत्र फोपावले. येथील सहकार राज्यासाठी दिशादर्शक ठरला…

Read More

संगमनेर पंचायत समितीचा महिला शिक्षिकांसाठी उपक्रम महाराष्ट्र संवाद न्यूज कोविड कालावधीनंतर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी भ्रमणध्वनी देणे आवश्यक झाले आहे. एकदा स्मार्टफोन हातात आला की, त्यावर इंटरनेटच्या माध्यमातून येणारी माहिती आणि त्यातून कळत नकळत घडलेल्या सायबर चुकांचा मोठा परिणाम भोगावा लागू शकतो. म्हणूनच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे गांभीर्य समजावून सांगत त्याचे धडे देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संगणक तज्ञ वैशाली खैरनार यांनी केले. उपक्रमशील गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या पुढाकारातून संगमनेर पंचायत समितीमध्ये गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थी व महिलांसाठी सायबर सुरक्षा या विषयावरील कार्यशाळेत खैरनार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड होते. यावेळी सहाय्यक लेखाधिकारी प्रदीप वर्पे, राजेंद्र भालारे उपस्थित होते. अशोक देशमुख यांच्या ताण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सध्या सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सर्रासपणे दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर पोलिसांकडून हा उपद्रव थांबवण्यासाठी गुरुवारी अवैध दारू विक्रेत्यांची धरपकड करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 68 खाली या सर्वांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती संगमनेरचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी दारू दुकाने बंद असली तरी अवैध विक्री करणाऱ्यांकडून मध्य प्राशन करणाऱ्यांना दारू उपलब्ध होत असते. दारू पिणारे लोक दारू पिऊन मिरवणुकांमध्ये गैरवर्तन करतात. त्यामुळे गणपती मंडळाची देखील बदनामी होते. शिवाय विविध प्रकारचे गुन्हे देखील घडतात. या गैरप्रकाराना प्रतिबंध होऊन सार्वजनिक गणपती मंडळाच्या मिरवणूक शांततेमध्ये पार पाडाव्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अन्य सर्व मार्ग बंद झाल्याने गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीवर जाण्यासाठी केवळ अकोले रोड कडून मालपाणी हेल्थ क्लब मार्गे गंगामाई घाटाकडे जाणारा एकमेव रस्ता सुरू असल्याने गणेश भक्तांचे मोठे हाल झाल्याचे बघावयास मिळाले. मुख्य मानाच्या गणेश विसर्जन मार्गावरील प्रवरा नदीकडे जाणाऱ्या परदेशपुऱ्यातील मठाजवळील रस्ता रस्त्यावर इतर गणेश भक्तांना परवानगी नसल्याने बंद असतो. त्यामुळे स्वामी समर्थ मंदिराजवळील पुलावरून प्रवरा नदीवरील गंगामाई घाटाकडे जाणारा, अकोले रोड मार्गे मालपाणी हेल्थ क्लबच्या बाजूने गंगामाई घाटाकडे जाणारा रस्ता गणेश विसर्जनाकरिता खुला असतो. या दोन मार्गाने विसर्जन केले जाते. मात्र गेल्या वर्षभरापासून स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिरा दरम्यानचा पूल खचल्यामुळे वाहतुकीसाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मानाच्या पहिल्या श्री सोमेश्वर मित्र मंडळाच्या श्री गणेशाची आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पूजा आणि आरती करून संगमनेरच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे, प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, मनीष मालपाणी, सोमेश्वर मंडळाचे किशोर पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. धार्मिक विद्वेष आणि अशांतता बाजूला ठेवून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विसर्जनाच्या दिवशी सकाळी आठ वाजता गणरायाची पूजा करून मिरवणुकीला प्रारंभ होतो. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही गेले 21 वर्ष विसर्जन मिरवणुकीला उपस्थित राहण्याची परंपरा…

Read More

गुन्हा दाखल होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी आर्थिक गुन्हे शाखा एकाही आरोपीला ताब्यात घेऊ शकलेली नाही महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर व्हाईट कॉलर क्रिमिनल आणि दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष असलेला भाऊसाहेब कुटे आणि त्याच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने फेटाळून चार दिवसांचा कालावधी उलटत आहे. तरीदेखील तपास यंत्रणा कुटे आणि त्याच्या परिवारापर्यंत अद्यापही पोहोचत नसल्याने याप्रकरणी तपास यंत्रणेवर असलेले संशयाचे सावट अधिक गडद झाले आहे. दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात अडकलेल्या आरोपींसह तपास यंत्रणा आणि ज्यांच्यावर या सर्व कारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती त्या सहकार विभागाबद्दल आता संशयाचे वातावरण निर्माण झाले…

Read More

पकडलेल्या आरोपीकडून दोन खुनाचा उलगडा; पीडित मुलीसोबत पैशासाठी आईचीही हत्या केल्याचे निष्पन्न महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेरमधील जुन्या आणि निर्जन असलेल्या चंदनापुरीच्या घाटात 24 सप्टेंबरला एका अल्पवयीन मुलीचा विद्रूप अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. प्राथमिकदृष्ट्या घातपात असल्याचे स्पष्ट करणाऱ्या या घटनेत पोलिसांसमोर या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान असताना अवघ्या काही तासात पोलिसांनी केवळ मृत मुलीची ओळखच पटविली नाही तर आरोपीदेखील गजाआड केला. यातील कौतुकास्पद बाब म्हणजे आरोपीने एक नव्हे तर दोन खून केल्याची उकल करण्यात पोलीस यशस्वी झाल्याची माहिती संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. दारू पाजून अल्पवयीन मुलीची हत्या:  अल्पवयीन पीडित मुलीची डोक्यात दगड टाकून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – हजारो नागरिकांच्या अभूतपूर्व जल्लोषामध्ये अमृतवाहिनी महाविद्यालय ते बसस्थानक या ‘हॅपी हायवे’चे लोकार्पण होत आहे. तालुक्यात फोनाफोनी झाली. मात्र हा तालुका एक परिवार आहे. संगमनेरच्या विकासात ज्या-ज्या वेळी अडचणी आणण्याचा प्रयत्न झाला त्या-त्या वेळी हा तालुका एकवटला आहे. संगमनेरकरांचा आनंद काही लोकांना पहावत नसल्याने हा कार्यक्रम होऊ नये यासाठी अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या. आनंदाच्या क्षणी सर्वांनी एकत्र यावे ही अपेक्षा होती मात्र काही लोकांनी यामध्ये विनाकारण राजकारण केल्याचे प्रतिपादन माजी मंत्री काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात यांच्या प्रयत्नातून झालेल्या अमृतवाहिनी महाविद्यालय ते बस स्थानक या हॅप्पी हायवेचे लोकार्पण मंगळवारी संध्याकाळी थोरात यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर अमृतवाहिनी महाविद्यालय ते रायतेवाडी फाटा बाह्यवळण मार्गापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी देण्यात आला. अमृतवाहिनी महाविद्यालयाचे बस स्थानकापर्यंत काम झाल्याने लगेचच त्याच्या उद्घाटनाची घाई का असा प्रश्न उपस्थित करत रस्त्याच्या पूर्णतेनंतर उद्घाटन केले असते तर बरे झाले असते. श्रेयवादासाठीचा तमाशा संगमनेर शहराने मंगळवारी अनुभवला. केवळ नगरपालिका निवडणुका केव्हाही होऊ शकतात त्यामुळे त्याच्या देखाव्यासाठी हा उद्घाटनाचा अट्टाहास होता का? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख सोमनाथ कानकाटे यांनी उपस्थित केला आहे. कानकाटे म्हणाले, संगमनेरमधील जनता भोळी नाही, ती सर्व जाणून आहे. ती तिसरा नेत्र उघडेल तेव्हा सर्व राजकीय पुढाऱ्यांना जनतेची ताकद…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर येथे राज्यस्तरीय अबॅकस व मानसिक अंकगणित या विषयाच्या स्पर्धेत ३ मिनीटात १०० गणिते सोडविण्याचा अद्भुत विक्रम येथील देवांग क्रिएशनच्या विद्यार्थ्यांनी केला. साऊथ कोरिया येथून जागतिक अबॅकस स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याप्रसंगी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यांच्या उपस्थितीत समारंभ: रविवारी (दि. २४ सप्टेंबर) मालपाणी हेल्थ क्लब या ठिकाणी झालेल्या या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते व रोटरी आय केअर ट्रस्टचे विश्वस्त सुनील कडलग, डॉ. भानुदास डेरे इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या प्राचार्या रेखाताई पवार आणि देवांग क्रिएशनच्या संचालिका सोनाली डोखे उपस्थित होत्या. येथील स्पर्धकांचा सहभाग: या स्पर्धेत अमरावती, सातारा, बदलापूर, मुंबई, पुणे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  आश्वी – संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील निशिकांत सोन्याबापू बर्डे (वय २७) या तरुणाचे सोमवारी रात्री अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली असून मंगळवारी या तरुणावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. आश्वी खुर्द येथील निशिकांत बर्डे हा तरुण राहाता येथिल बंधन बॅकेत नोकरी करत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी तो कामावर गेला होता. सायंकाळी अंदाजे ८ ते ९ च्या दरम्यान राहत्याहून दुचाकीवरून घराच्या दिशेने येत होता. यांचकाळात जोरदार पाऊस सुरू असल्याने समोरुन येणाऱ्या वाहणाने निशिकांत बर्डे यांच्या दुचाकीला निर्मळ पिप्रीं – लोणी रस्त्यावर हुलकावणी दिली. त्यामुळे झालेल्या भीषण आपघातात बर्डे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  अहमदनगर – धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनर व सुरेश बंडगर यांची मंगळवारी (26 सप्टेंबर) प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर अण्णासाहेब रुपनर व सुरेश बंडगर यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन रूपनर व बंडगर यांनी उपोषण सोडले. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे, माजी आमदार अण्णासाहेब डांगे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अण्णासाहेब बाचकर, बाळासाहेब दोडतले आदी उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नासंदर्भात 21 सप्टेंबरला यशवंत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यातील सरकारी शाळा कंपन्यांनी चालवायचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, शैक्षणिक दृष्ट्या अन्यायकारक ठरणारा हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी छात्रभारतीच्यावतीने संगमनेर बस स्थानकासमोर मंगळवारी आंदोलन करण्यात आले. हा निर्णय मागे घेतला जावा, यासाठी छात्र भारतीच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. सरकारी शाळा बंदीचा निर्णय मागे घ्या. शिक्षणाचे कंत्राटीकरण थांबवा. राज्यातील सरकारी शाळा खाजगी कंपन्यांना चालविण्यास देण्याचा निर्णय गोरगरीब, आदिवासी, शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण संपविणारा आहे. सरकारच्या या एका निर्णयामुळे राज्यातील जवळपास 14 हजार पेक्षा जास्त शाळा बंद केल्या जाणार आहे. तर 65 हजार पेक्षा जास्त शाळा कंपन्यांना चालविण्यास दिल्या जातील. या निर्णयामुळे लाखावर शाळांचे पर्यायाने विद्यार्थ्यांचे…

Read More

संगमनेरकर कलारसिकांचा उदंड प्रतिसाद महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आपल्यावर मनापासून निस्वार्थी प्रेम करणारा माणूस सापडण्यासाठी भाग्य लागतं. असा माणूस प्रत्येकालाच भेटेल असेही नाही; आणि भेटलाच तर तो आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर भेटेल याचाही भरवसा नसतो. परंतु समोरच्याने आपल्यावर केलेल्या प्रेमाला ओळखून त्याचा आदर केला, तर ते नातं अधिक बहरतं. त्यातील नात्यात एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती असली तर ते तुटण्याचाही प्रश्‍न नसतो. असाच काहीसा संदेश देत रविवारी सादर झालेल्या ‘मी, स्वरा आणि ते दोघं’ या नाट्यप्रयोगाने संगमनेर फेस्टिव्हलचा समारोप झाला. राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूह आयोजित संगमनेर फेस्टिव्हलमध्ये रविवारी प्रसिद्धी मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मी,…

Read More