Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री लेजंड एंटरटेनमेंटच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्यावतीने करण्यात आल्यानंतर तो रद्द करण्याची आफत संयोजकांवर ओढवली आहे. नाशिक-पुणे महामार्गालगत असलेल्या मालपाणी लॉन्स येथे लेजंड एंटरटेनमेंट या ग्रुपने नववर्ष स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्रीच्या युवक-युवतींना इंस्टाग्रामवरील स्टारचे आकर्षण दाखवून व युवकांना २०० रुपये फी आकारून महिला-युवतींना विनामूल्य प्रवेश देत या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. मात्र या कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या संबंधित विभागाकडून घेतल्या नसल्याचा तसेच सदर कार्यक्रमाची तिकीट विक्री महाविद्यालयात जाऊन युवक-युवतींना पाश्चात्य संस्कृतीचे आकर्षण दाखवून केली जात असल्याचा आक्षेप घेत या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्याची मागणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील मेधा संस्कृतिक महोत्सव हा महाराष्ट्राचा मानबिंदू ठरला असून या सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत झालेल्या ‘स्वरामृत’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी केलेले गायन व वादन हे संस्मरणीय ठरले. या कार्यक्रमामुळे अमृतवाहिनीतील वातावरण संगीतमय झाले होते. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने गायन व वादन कलेची स्वरामृत म्युझिकल नाईट पार पडली. यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, संस्थेच्या विश्वस्त शरयूताई देशमुख, झी मराठी सारेगमपचा उपविजेता सारंग भालके, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, डॉ. बी. एम. लोंढे, मेधाचे समन्वयक प्रा. जी.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये सुरु असलेल्या तिसर्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेच्या तिसर्या दिवशी रात्री मंचावर खास महाराष्ट्राच्या मातीतील मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. ही चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहताना देशभरातील २९ राज्यांमधून आलेल्या स्पर्धकांसह प्रेक्षकांमध्येही वीरश्री संचारली. शक्ती आणि चपळता यांचा संगम असलेल्या साहसी खेळांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. यावेळी भारत माता की जय आणि वंदे मातरच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मंगळवारपासून (२७ डिसेंबर) संगमनेरात राष्ट्रीय योगासन स्पर्धा सुरु आहे. शुक्रवारी या स्पर्धेचा समारोप होणार आहे. देशातील २९ राज्यांमधून आलेले स्पर्धक, प्रशिक्षक, पंच, पालक या सर्वांच्या मनोरंजनासाठी गुरुवारी रात्री विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : उत्तर नगर भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने “अटल डिबेटिंग क्लब” अंतर्गत संगमनेर मध्ये गुरुवारी घेण्यात आलेल्या अटल वकृत्व स्पर्धेत ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. १२ जानेवारीला होणाऱ्या राज्यस्तरीय अटल वकृत्व स्पर्धेसाठी विजेत्यांमधून स्पर्धक निवडले गेले. भारतीय जनता पक्ष व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने २५ डिसेंबर ते १२ जानेवारीपर्यंत राज्यभरात “अटल युवा पर्व”चे आयोजना अंतर्गत भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची लोकांशी संवाद साधण्याची कला आणि अतुलनीय वक्तृत्व हे राष्ट्र व युवकांसाठी सदैव प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तृत्वाचा वारसा जपण्यासाठी व वक्तृत्वाची कला अंगी असणाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्याच्या हेतूने भारतीय जनता युवा मोर्चामार्फत वक्तृत्व…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अकोले : पंचायत समिती सभागृहात झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय ग्राहक दिनात ग्राहक, नागरिकांनी विविध तक्रारी उपस्थित केल्या. याबाबत तहसीलदारांनी संबंधित खात्यांना सुचना देऊन त्वरीत योग्य सेवा देण्यास सांगितले जाईल असे सांगितले. ग्राहक दिनात विविध विषयावर सखोल चर्चा होऊन ग्राहकांनी अनेक तक्रारी मांडल्या. यात प्रामुख्याने अकोले, देवठाण, सिन्नर रस्त्याचे रूंदीकरणाचे कामात खडीवर माती टाकल्याचे फोटो अधिकार्यांना दाखविण्यात आले. तर कोल्हार घोटी राज्य मार्गाचे काम अत्यंत संथगतीने चालु असल्याची तक्रार देखील माडण्यात आली. शिवाय रस्त्याच्या कामाचा दर्जा देखील निकृष्ट असल्याचे सांगण्यात आले. याबाबत तहसिलदार सतीश थेटे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांना तातडीने सुचना दिल्या. याशिवाय अकोले तालुक्यातील आदिवासी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक : एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयातील कॅन्टीन चालकाच्या हलगर्जीपणामुळे एमबीबीएस शाखेत शिकणाऱ्या दीडशे विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. बाधित विद्यार्थ्यांवर एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. नामांकित महाविद्यालयात विषबाधेची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथे असलेल्या नामांकित एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयात ही घटना घडली. महाविद्यालयाच्या कॅन्टीन मध्ये बुधवारी (दि.२८) रात्री विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर त्यांना त्रास झाल्याची माहिती समोर येत आहे. एकूण दीडशे विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. महाविद्यालयात असलेल्या कॅन्टीनच्या चालकाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अशी घटना घडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान या प्रकाराला एसएमबीटीकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. असाच काहीसा प्रकार काही महिण्यापूर्वी इगतपुरी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिकमधील सुश्रुत हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. प्राची पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे कारण फरार हल्लेखोरांना पकडल्यानंतर समोर आले आहे. प्राथमिक चौकशीत कोवीड काळात झालेल्या आत्याच्या मृत्युचा राग मनात धरून हा हल्ला केल्याच हल्लेखोरांनी सांगितल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिली. राष्ट्रवादीच्या नेत्या असलेल्या डॉ. प्राची पवार ह्या नाशिकचे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते डॉ. वसंत पवार आणि मविप्र संस्थेच्या माजी सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार यांच्या कन्या आहेत. डॉ. प्राची पवार यांच्यावर १३ डिसेंबर रोजी गोवर्धन शिवारात जीवघेणा हल्ला झाला होता. पवार यांच्यावर कोणी आणि कशासाठी हल्ला केला याचा उलगडा होत नव्हता. अखेर बुधवारी रात्री नाशिक ग्रामीण पोलिसांना हल्लेखोरांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेर येथील देवांग कोष्टी समाजाच्या युवक अध्यक्षपदी विशाल भारत ढोले यांची उपाध्यक्षपदी अक्षय भागवत यांची, श्री चौंडेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी दिपाली खोजे, उपाध्यक्षपदी संगीता भंडारे यांची निवड करण्यात आली. संगमनेर येथील मेनरोडवर असलेल्या देवांग कोष्टी समाजाचे चौंडेश्वरी देवीचे मंदिरामध्ये कोष्टी समाजाची युवक समितीची नूतन कार्यकारिणी निवडीसाठी नुकतीच बैठक पार पडली. यावेळी देवांग कोष्टी समाज पदाधिकारी यांनी युवक व महिला यांची एक समिती नेमण्यात यावी यासाठी प्रयत्न केले. त्यांनतर ही समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये देवांग कोष्टी समाजाच्या युवक अध्यक्षपदी विशाल भारत ढोले, उपाध्यक्षपदी अक्षय भागवत, कार्याध्यक्षपदी आलेख कुदळ, खजिनदारपदी स्वप्नील खोजे, सचिवपदी अजित बडदे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : राज्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. यामुळे गुणवत्तेवर याचा मोठा परिणाम होत असल्याने जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांच्या जागा तातडीने भरजे गरजेचे असून सरकारने शिक्षकांच्या सर्व जागांसाठी तातडीने भरती करावी, अशी आग्रही मागणी विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रासह विविध मागण्याही त्यांनी आग्रहपूर्वक मांडल्या आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे आमदार डॉ. तांबे मागणी करताना म्हणाले की, राज्यात आज मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषद शाळेमध्ये या रिक्त असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या जागा त्वरित भरणे आवश्यक आहेत. हजारो…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : रस्त्यावर दुकान टाकून बॅग विकण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाची परिणती थेट चाँपरचा वापर करत हल्ल्यापर्यंत जाऊन पोहोचली. यात एक जण जखमी झाल्याने शहर पोलीस ठाण्यात दहा ते अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेर मेहबूब पारवे असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर निखिल मुर्तडक, श्याम अरगडे, नयन मुर्तडक, सुनील धात्रक, सागर (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यासह आणखी पाच ते सहा जणांचा आरोपीमध्ये समावेश आहे. शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात जखमी युवकाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. बुधवारी सायंकाळी फिर्यादीचा मुलगा आणि आरोपींमध्ये बॅग विकण्याच्या कारणावरून वाद झाला होता. फिर्यादीचा मुलगा व त्याचे मित्र रात्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : राष्ट्रीय योगासन क्रीडा स्पर्धेच्या दुसर्या दिवस अखेर महाराष्ट्र संघाने चमकदार कामगिरी करून उपांत्य फेरीत भक्कम आघाडी घेतली आहे. २७ डिसेंबर पासून ध्रुव ग्लोबल स्कुलच्या क्रीडा संकुलात तिसरी राष्ट्रीय योगासन स्पर्धा सुरू आहे. देशातील २९ राज्यातील ७८९ योगासनपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. महाराष्ट्राला प्रथमच राष्ट्रीयस्तरावरील योगासन स्पर्धा आयोजित करण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे. महाराष्ट्र संघातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याने उपांत्य फेरीत जोरदार आघाडी घेतली आहे. महाराष्ट्राच्या खालोखाल असणार्या तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, हरयाणा, कर्नाटक इत्यादी राज्यांच्या खेळाडूंमध्ये अंतिम फेरीमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. योगासनांचे पारंपरिक (ट्रॅडिशनल) सादरीकरण, त्याचप्रमाणे संगीतमय कलात्मक (आर्टिस्टिक) सादरीकरण, तालात्मक…
अवैध ठिकाणी मद्यप्राशन कराल तर होईल कारवाई महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत मोठया उत्साहाने केले जाते. या कालावधीमध्ये अवैध, परराज्यातील, बनावट मद्यविक्रीची शक्यता लक्षात घेता ते रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत नियोजन करण्यात आलेले असून या अवैध मद्य विक्री, वाहतूक तसेच अवैध ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कार्यकारी अधिकारी व भरारी पथके तसेच अकार्यकारी घटकावरील काही अधिकारी यांची आठ विशेष पथके जिल्हयात नेमली असून त्यांच्या कार्यक्षेत्रात सातत्याने रात्रगस्त घालण्यात येणार आहे. या पथकाद्वारे रात्र…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : पदवीधर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शासकीय व निमशासकीय, अशासकीय कर्मचारी, यांच्या विविध प्रश्नांसाठी विधानपरिषदेत सातत्याने पाठपुरावा करणारे, ‘नेता नव्हे मित्र’ अशी ओळख असलेले नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांची विधानपरिषदेच्या काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली आहे. आमदार डॉ. तांबे यांनी बी. जे. मेडिकल सारख्या देशातील नावाजलेल्या महाविद्यालयातून एम. एस. शिक्षण घेतल्यानंतर संगमनेरमध्ये चार दशके गोरगरिबांना आरोग्य सेवा दिली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरच्या सहकार, शिक्षण, समाजकारण, कृषी अशा विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देताना आदिवासी, अपंग व मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी मोठे काम केले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : पोस्टर फाडण्याचा राग मनात धरून राजकीय वर्चस्व वादातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोघा तरुणांची गोळ्या घालून हत्या केल्याप्रकरणी आरोपी गोविंद दत्तात्रय गायकवाड याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर उर्वरित 13 आरोपींची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची साडेचार वर्षांपूर्वी २८ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळच्या वेळी बीड रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारा समोर एका हॉटेलमध्ये चहा पीत असताना या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यामुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. राजकीय वर्चस्ववादातून झालेल्या या दुहेरी हत्याकांड प्रकरणी तत्कालीन पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अनंत पांगारकर संगमनेर : म्हाळुंगी नदीला आलेल्या पुरानंतर स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर, गंगामाई घाटाकडे जाणारा पूल खचल्याने तब्बल अडीच महिन्याच्या कालावधीनंतर देखील त्याची दुरुस्ती प्रशासनाला करता आलेली नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना या पुलावरून जीवघेणी कसरत करावी लागत आहे. पुलावरील शॉर्टकट प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे धोकादायक ठरण्याची चिन्हे आहेत. या धोकादायक शॉर्टकटचा व्हिडिओ येथील नागरिकांनी महाराष्ट्र संवाद न्यूजला पाठवला आहे. यावर्षी म्हाळुंगी नदी वारंवार आणि दीर्घकाळ प्रवाही राहिली आहे. त्यातच झालेल्या पावसामुळे नदीला पूर आल्याने नदीवरील घोडेकर मळ्याकडे जाणारा कच्चा फुल वाहून गेला. मात्र या लगतच असलेला साई मंदिर, पंपिंग स्टेशन, गंगामाई घाट, घोडेकर मळा, वेताळेश्वर महादेव…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेर साहित्य परिषद आणि पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत १० तालुक्यातील ७३ विद्यालयामधील २४६ स्पर्धकांच्या सहभागामुळे या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे हे बारावे वर्ष होते. परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख आणि संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर यांच्या उपस्थितीत केलेल्या दीप प्रज्वलनाने स्पर्धेची सुरुवात झाली. यावेळी माजी प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे, डॉ. जी. पी. शेख, डॉ. हनुमंत मोटेगावकर, प्रा. शशांक गंधे, नंदकुमार बेल्हेकर, प्रकल्प सचिव कैलास काळे, सुरेश ठोंबरे, माजी गटशिक्षणाधिकारी सुभाष पवार, प्राचार्य मुकुंद डांगे, स्वाती देशमुख, प्रकल्पप्रमुख बाळकृष्ण महाजन, विभागप्रमुख ललित शेळके…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : १ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन नगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा आणि नगरहून सरळ पुण्याकडे जाणारी वाहतूक दोन दिवसांसाठी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर ते २ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत आदेश काढले आहेत. अहमदनगरकडून पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावरून जाणाऱ्या वाहन धारकांसाठी पर्यायी मार्ग.. बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी बेलवंडी फाटा, दैवदैठण, ढवळगाव, पिंपरी कोळंडर, उक्कडगाव, बेलवंडी, नगर-दौंड महामार्गावरून लोणी व्यंकनाथ, मढेवडगाव, काष्टी, दौंड-सोलापूर-पुणे महामार्गामार्गे पुण्याकडे जावे लागेल. तर नगरकडून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्य शासनाने आधार प्रमाणीकरण करण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. माजी महसूल मंत्री विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून दुसऱ्या यादीमध्ये संगमनेर तालुक्यातील ७४१६ शेतकऱ्यांची नावे असून त्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात व तालुका विकास अधिकारी अशोक थोरात यांनी दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना विनाअट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली होती. तसेच नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. राज्याचे तत्कालीन…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कोकमठाण : आपत्तीच्या काळात मानवतेच्या दृष्टीकोनातून केलेली मदत समाजाला एकसंघ ठेवण्याचे काम करते. असे प्रतिपादन कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी केले. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. २६ डिसेंबर २०२२ ते ६ जोनवारी २०२३ पर्यंत चालणाऱ्या १२ दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन कोकमठाण येथील आत्मा मलिक ध्यानपीठ येथे सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे, अहमदनगर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी शंकर मिसाळ,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : खून, दरोडे, चोऱ्या संगमनेरमध्ये नित्याची बाब बनले आहे. सोमवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घुलेवाडीमधील खाबीया अॅब्रोसिया या पॉश निवासी संकुलात एकाचवेळी काही घरांमध्ये चोरीचा प्रयत्न केला. एका बंद घरातून सुमारे पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला असल्याचे समोर आले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे आरोपी शोधण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यामुळे चोरटे, दरोडेखोर स्थानिक पोलीस यंत्रणेला दररोज नवनवे आव्हान देताना दिसतात. शहराच्या काही भागात नागरिकांना चोर, दरोडेखोरांचे दर्शन देखील झाल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरातील प्रभारी पोलिस राज संपवून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संगमनेरसाठी खमके अधिकारी देण्याची गरज व्यक्त होत आहे.…
