Author: Annant Ppangarkar
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: कर्म म्हणजे केवळ जगण्याची धावपळ किंवा जबाबदारीची पूर्तता नसून, आपल्या वाट्याला आलेले प्रत्येक काम परमेश्वराला अर्पण करण्याची वृत्ती म्हणजे कर्मयोग आहे. कर्माच्या फळाची आसक्ती न ठेवता प्रत्येक कृतीतून अंतःकरणातील ईश्वराशी संवाद साधणे, हाच संत ज्ञानेश्वर माउलींच्या ज्ञानेश्वरीतील कर्मयोगाचा खरा गाभा आहे, असे प्रतिपादन गीता विशारद् डॉ. संजय मालपाणी यांनी केले. राजस्थान युवक मंडळाच्या वतीने आयोजित मनःशांती आणि जीवनविकास व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पात डॉ. मालपाणी ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या व चौथ्या अध्यायाचे निरुपण करत होते. ‘कर्माकडून कृतार्थतेकडे’ या विषयावर बोलताना त्यांनी कर्मापासून पळून जाण्याऐवजी कर्मातच साधना शोधण्याचा ज्ञानेश्वरीचा मार्ग उपस्थितांसमोर स्पष्ट केला. माणसाच्या आयुष्यात श्वास असेपर्यंत कर्म…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील खर्डा पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांविरोधात एक मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे. सोमवारी (२४ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून तब्बल ५१ लाख ४१ हजार ४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांना गुप्त बातमीदाराद्वारे बातमी मिळाली होती की, धाराशिवकडून बीडकडे जाणाऱ्या एका आयशर टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गाने घेऊन जाण्यात येत आहेत. या माहितीच्या आधारे खर्डा पोलिसांनी जातेगाव फाटा येथे तातडीने नाकाबंदी लावली.…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : संगमनेर शहरातील सह्याद्री कॉलेज शेजारी, ऑरेंज कॉर्नर परिसरात असलेल्या ‘बर्गेज कॅफे’मध्ये कॉलेजच्या मुला-मुलींना जास्तीचे पैसे घेऊन अश्लील चाळे करण्यासाठी बेकायदेशीरपणे जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमनेर शहर पोलिसांनी सोमवारी (२४ ऑगस्ट) सकाळी पावणेअकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास या कॅफेवर बनावट ग्राहक पाठवून धाड टाकली आणि या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीची खात्री करण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत आणि पथकाने दोन सरकारी पंचांच्या समक्ष नियोजन केले. एका पंचाला बनावट ग्राहक बनवून एक हजार रुपयांची रोख रक्कम देऊन बर्गेज…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर तालुक्यातील निमोण आणि सोनेवाडी येथील अनेक युवा कार्यकर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या कामाची पद्धत, विकासकामे मार्गी लावण्याची तत्परता आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे निमोण व सोनेवाडी परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार आहे. आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षाच्या माध्यमातून सामाजिक आणि विकासात्मक कामांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार निमोण येथील अमोल आंधळे, विकास आंधळे, दीपक आंधळे, रवी शिंदे, आदेश शेळके, रिजवान पठाण, सुयोग आंधळे, सचिन मंडलिक, रितेश आंधळे, सुरज घुगे, हसन आत्तार,…
आजचे राशीभविष्य- मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने मन प्रसन्न होईल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यापारात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. आरोग्याची उत्तम साथ लाभेल. धनलाभाचे योग आहेत, परंतु विनाकारण होणारे खर्च टाळणे आवश्यक आहे. वृषभ- आज दिवसभरात संयम राखणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हाने समोर येऊ शकतात, परंतु तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने त्यावर मात कराल. आर्थिक व्यवहारात घाईगडबड करू नका. कौटुंबिक वातावरणात सुसंवाद राहील. जोडीदाराच्या विचारांचा आदर करा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. संध्याकाळी मनःशांतीसाठी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे फायदेशीर ठरेल.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या यशोधन जनसंपर्क कार्यालयाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तालुक्यातील असंघटित आणि घरेलू कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या एका वर्षात तब्बल ८ हजार ६०० कामगारांच्या बँक खात्यावर विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून १० कोटी १६ लाख रुपयांचा निधी थेट वर्ग करण्यात आला असल्याची माहिती इंद्रजीत थोरात यांनी दिली. बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील सर्वांगीण विकासासोबतच गोरगरीब, निराधार, वृद्ध नागरिक व विधवा महिलांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. याच उद्देशाने यशोधन कार्यालयात असंघटित व घरेलू कामगारांसाठी एक स्वतंत्र आणि अद्ययावत विभाग सुरु करण्यात आला असून, तिथे चार पूर्णवेळ…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जागतिक वडापाव दिनानिमित्त सोशल मीडियावर वडापावसोबत लसूण चटणी की तळलेली मिरची, असा प्रश्न विचारत पोस्ट केली. या पोस्टला प्रतिक्रिया देताना आमदार सत्यजीत तांबे यांनी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मुद्दा पुन्हा एकदा मांडला. ‘लसूण चटणी किंवा तळलेली मिरची? दोन्हीपैकी काहीही चालेल. फक्त पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेत हा वडापाव खाण्याची संधी मिळाली पाहिजे. यासाठीच आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत,’ अशी प्रतिक्रिया तांबे यांनी दिली. मात्र, या प्रतिक्रियेतून त्यांनी या रेल्वे मार्गाशी जोडलेल्या सर्वसामान्यांच्या भावना प्रभावीपणे मांडल्या. काहींसाठी वडापाव ही मौजमजा असेल पण, रेल्वेच्या अभावामुळे घरापासून लांब राहणाऱ्या तरूणांसाठी हीच उपजीविका आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा प्रयत्न राहील; मात्र आघाडी झाली किंवा नाही झाली तरी निमोण गटात शिवसेना शंभर टक्के निवडणूक लढवणार आणि जिंकणारच, असा वज्रनिर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख सचिन कोते-पाटील यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यात शिवसेनेची ताकद आणि ‘८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण’ हे सूत्र घराघरात पोहोचवून आगामी निवडणुकांमध्ये भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक पूर्ण ताकदीने सज्ज झाले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि तालुकाप्रमुख अमर कतारी व भीमाशंकर पावसे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात शिवसेनेच्या ‘झंझावात दौऱ्याला’ आणि आढावा बैठकांना धडाक्यात सुरुवात झाली आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: ‘जेन झी’ ही आपल्या राष्ट्राची मोठी संपत्ती व शक्ती असून, प्रगतीची पालखी या युवाशक्तीच्या बलशाली खांद्यांवरच पुढे न्यायची आहे. त्यामुळे तरुणाईने शिव्यांची नव्हे तर संतांच्या ओव्यांची संगत धरावी, असे आवाहन कीर्तनकार ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांनी केले. राजस्थान युवक मंडळाच्या वतीने श्रावण मासानिमित्त मालपाणी लॉन्सच्या उत्सव सभागृहात आयोजित ‘मन:शांती व जीवनविकास व्याख्यानमाला’ सलग पाचव्या वर्षी सुरू असून, या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी ‘विश्व स्वधर्म सूर्ये पाहो’ या विषयावर त्या बोलत होत्या. या दीड तासाच्या कीर्तनाला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. संतांच्या आणि महापुरुषांच्या विचारांचा वारसा व्याख्यानादरम्यान परांजपे यांनी भारतीय संस्कृती आणि इतिहासातील महान व्यक्तींचे दाखले दिले. अवघ्या ३९…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: वृत्तपत्रामध्ये विरोधी बातम्या छापल्याच्या रागातून आणि अपघाताच्या कारणावरून पत्रकारावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या तीन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने छत्रपती संभाजीनगर येथील वाळुंज एमआयडीसी परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, समतानगर सावेडी येथील पत्रकार सुशिल थोरात (वय ४९) यांच्या कारला २० ऑगस्ट २०२६ रोजी सोनू कोहक याने मोपेडवरून धडक दिली होती. या अपघाताच्या कारणावरून तसेच विरोधी बातम्या लावल्याच्या रागातून सोनू कोहक, पप्पू मते, विकी ढवण, प्रशांत निक्रड आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी पहिलवानाने पत्रकार थोरात आणि त्यांच्या मुलास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सोनू…
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल आणि नवीन संधी चालून येतील. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता राहील. आर्थिक बाबतीत थोडी काळजी घेणे गरजेचे आहे, अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याची साथ उत्तम मिळेल. वृषभ आज मनात प्रसन्नता राहील आणि विचार सकारात्मक बनतील. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने मोठा दिलासा मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. मित्रांकडून पूर्ण सहकार्य लाभेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवा. मिथुन आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. कामाचा ताण थोडा वाढू शकतो, त्यामुळे डोके शांत ठेवून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पठारभागातील कौठे मलकापूर येथे प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी सरकारी गट क्रमांक १६२ मधील १०.८३ हेक्टर शासकीय जमीन हस्तांतरित करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या जमिनीवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत प्रस्तावित असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाला स्थगिती देण्याचे थेट आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना दिले आहेत. या निर्णयामुळे कौठे मलकापूर येथील औद्योगिक वसाहतीच्या उभारणीचा मार्ग पूर्णपणे सुकर झाला असून, पठारभागातील हजारो स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या अपेक्षांना मोठे बळ मिळाले आहे. आमदार खताळ यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कौठे मलकापूर परिसरात एकूण २२७.५३ हेक्टर क्षेत्रावर भव्य औद्योगिक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : बालवयातच आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर प्रचंड हालअपेष्टा, बहिष्कार आणि अपमान सहन करूनही अजिबात निराश न होता जगाला आशेची संजीवनी देणारे संत ज्ञानेश्वर माऊली हेच आजच्या युगातील युवकांचे खरे आदर्श असायला हवेत, असे प्रतिपादन कीर्तन-प्रवचनकार ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांनी केले. श्रावण मासानिमित्त राजस्थान युवक मंडळाच्या वतीने आयोजित ‘मनःशांती व जीवनविकास’ या पाचव्या सलग व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात मालपाणी लॉन्सच्या उत्सव सभागृहात त्या बोलत होत्या. ‘विश्व स्वधर्म सूर्य पाहो’ या विषयावर आधारित सुमारे दीड तासांच्या रसाळ व ओघवत्या प्रवचनातून त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संतांचे विचार ही आयुष्यभर पुरणारी शिदोरी असल्याचे सांगत, माणसाजवळ आर्थिक धनासोबत विचारांचे धन असेल…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: जन आरोग्यम संचलित जाणीव फाउंडेशनच्या वतीने लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार २०२६ ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात जीवन गौरव पुरस्कार, दंडकारण्य अभियान पुरस्कार, लोकनेते बाळासाहेब थोरात समाज रत्न पुरस्कार, लोकनेते बाळासाहेब थोरात टीचर आयकॉन पुरस्कारांचा समावेश आहे. समाजात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी जाणीव फाउंडेशनच्या वतीने ‘संगमनेर २०२६ पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवारी (३० ऑगस्ट) सकाळी ११ वाजता सह्याद्री महाविद्यालयातील के. बी. दादा देशमुख सभागृहात पार पडणार आहे. कार्यक्रमाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर…
प्रवीण पुरो जेनझींच्या जंतरमंतरवर झालेल्या ऐतिहासिक आंदोलनाचं कवित्व कमी होण्याचं नाव घेत नाहीये. या आंदोलनात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांवर अनन्वित अत्याचार आणि क्रूर कारवाई करूनही विद्यार्थ्यांनी राखलेल्या संयमाने हे आंदोलन यशस्वी पार पडलं. ‘राजीनामा आमच्या सरकारच्या कोषात नाही’, अशा मग्रुमीत असलेल्या मोदी सरकारला विद्यार्थ्यांच्या ताकदीपुढे नाक घासावं लागलं आणि गैर वागणार्या मंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा लोकशाहीने दिलेला अधिकार विद्यार्थ्यांना प्राप्त झाला. मंत्र्याच्या राजीनाम्याने सारं काही अलबेल, असं मानण्याचं कारण नाही; मात्र वाह्यात मंत्र्यांना ताळ्यावर आणण्याचा मार्ग शाबूत आहे, याची जाण सत्ताधार्यांना करून देण्याची आवश्यकता होती. या एका राजीनाम्याने सत्तेची घमेंड मोडलीच, पण केंद्रात आणि राज्याराज्यात सत्तेच्या नशेने बेफाम झालेल्यांनाही या आंदोलनाने जमिनीवर…
आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका. कौटुंबिक वातावरणात आनंद आणि सौहार्द टिकून राहील. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आज आर्थिक व्यवहारात विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अचानक झालेल्या खर्चामुळे तुमचे नियोजन विस्कटू शकते. नोकरीत किंवा व्यवसायात सहकाऱ्यांशी वाद घालणे टाळा, नम्रता ठेवल्यास कामे सहज पूर्ण होतील. संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवल्याने मन शांत होईल आणि नवा ताण दूर होईल. मिथुन – आजचा दिवस तुम्हाला संमिश्र फळ देणारा ठरेल. नवीन योजनांवर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर | पंकज पडवळ संगमनेर शहरातील लॉ कॉलेजच्या पाठीमागील भागात असलेल्या घुलेवाडी परिसरातील एकता चौकात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अघोरी व तांत्रिक वस्तू टाकण्याचे प्रकार समोर येत असल्याने परिसरात मोठी घबराट पसरली आहे. हा परिसर उच्चशिक्षित नागरिक, व्यावसायिक आणि शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांची वस्ती म्हणून ओळखला जातो. अशा सुशिक्षित भागातच अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे कृत्य वारंवार घडत असल्याने स्थानिक रहिवाशांमधून अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अमावस्या, पौर्णिमा आणि अष्टमीच्या दिवशी एकता चौकात संशयास्पद वस्तूंचा खच पाहायला मिळतो. यापूर्वी अनेकदा येथे चपलांचे ढीग, शेंदूर लावलेले नारळ आणि कणकेचे पेटते दिवे आढळून आले आहेत. शनिवारी सकाळी या प्रकाराने अधिकच…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत कोपरगावातून पळवून आणलेल्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीची दरेवाडी येथून सुखरूप सुटका केली आहे. या कारवाईदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांना पुढील तपासासाठी कोपरगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी कोपरगाव येथील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेले होते. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अकोले / संगमनेर: कुंभेफळ येथे घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या अंकुर प्रशांत कोटकर या तीन वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची थरारक घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. बालकाच्या आई, आजी, आजोबा आणि शेतातील कामगारांनी तातडीने प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला आणि बालकाची बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली. या हल्ल्यात जखमी झालेल्या अंकुरवर प्रथम सुगाव येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला संगमनेर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक पोपट कोटकर, बबन झोळेकर आणि वनपरीक्षेत्र अधिकारी आनंदा पाटील यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी बालकाची विचारपूस केली. या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: सारोळे पठार शिवारात पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर घारगाव पोलिसांनी अचानक छापा टाकून ५ आरोपींना रंगेहात पकडले आहे. या कारवाईत रोख रक्कम, तीन मोटारसायकली आणि पाच मोबाईल असा एकूण २ लाख ५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सारोळे पठार गावाच्या शिवारात बबन मुरलीधर फटांगरे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला काही इसम तिरट नावाचा हार-जितीचा जुगार खेळत आहेत. बातमीच्या आधारे पोलीस पथकाने पंचांसह छापा टाकला असता, त्या ठिकाणी पैशांची पैज लावून जुगार खेळणारे…
