Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पालिकेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कालावधी संपत असतांना करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाचा वर्षाच्या आतच बोजवारा उडाला आहे. रस्ते बनवितांना पुरेसे डांबर न वापरल्याने खडी उघडी पडली, क्रॉक्रीटीकरण करतांना निकृष्ठ व पुरेसे सिमेंट वापरले नाही. जे रस्ते किमान पाच वर्ष टिकणे अपेक्षित होते, त्याची वर्षातच दुरवस्था झाल्याचे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या रस्ते निरीक्षण पाहणीत समोर आले. येत्या निवडणूकीत रस्त्याचा विषय कळीचा मुद्दा बनविण्यासाठी त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. रस्ते निरीक्षण पाहणी अभियानात भाजपाचे माजी नगरसेवक व शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, माजी नगरसेवक शिरीष मुळे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, माजी उपनगराध्यक्ष व शहर संगठन सरचिटणीस जावेद जहागीरदार, उपाध्यक्ष सुनील खरे, भाऊ…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जाती-धर्माच्या नावावर देशात राजकारण सुरू असून वाढलेली महागाई, बेरोजगारी याविरुद्ध आवाज उठवत प्रेमाचा व एकतेचा संदेश देणारी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा ही महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील दांडीयात्रेप्रमाणे ऐतिहासिक ठरणार असल्याचे गौरवोद्गार भारत जोडो यात्रेचे समन्वयक कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. खासदार राहुल गांधी यांची ‘कन्याकुमारी ते काश्मीर’ ही सुरू असलेली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून महाराष्ट्रातील सर्व ठिकाणच्या तयारीचे व नियोजन जबाबदारी विधिमंडळ पक्षनेते आमदार थोरात यांचेवर असून ते यात्रेचे समन्वयक आहेत. थोरात म्हणाले, भारत जोडो यात्रेमध्ये देशभरातील पुरोगामी विचारांच्या संघटना आणि मित्र पक्षांचा मोठा पाठिंबा लाभत आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क हे कायद्याचे राज्य आहे. सरकार नियमानुसार चालते. लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाऊ शकते. परंतु कायदा हातात घेणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही असा सज्जड इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड विनयभंग प्रकरणावर दिला आहे. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नासिक-मुंबई महामार्गावर जाळपोळ करण्यात आली, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री म्हणाले कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव पोलिसांवर नाही. तसा दबाव टाकला ही जाणार नाही. पोलीस नियमानुसार गुन्ह्याची चौकशी करतील. तपास करतील, पडताळणी करतील. जी काही तक्रार असेल त्यात तर त्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेतल्यास मी तीन सहकारी नगरसेविकांसह बिनशर्त शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यास तयार आहे. अशा आशयाचे पत्र नाशिकच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका किरण गामणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे. विरोधकांवरच गुन्हे दाखल होत असून त्यांच्यावरच सरकार सूडबुद्धीने कारवाई करतय असा आरोप होत असतानाच आता नाशिकच्या ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेविकेने यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या पत्राद्वारे लक्ष करत त्यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांच्या या उपरोधिक पत्राची आता चांगलीच…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या महाविद्यालयात मागील दहा वर्षांपासून पुणे विद्यापीठाचे पदव्युत्तर पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाचे वर्ग चालविले जातात. नुकताच सन २०२१ -२२ या वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे आणि पुढील वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. कोणत्याही विद्याशाखेची पदवी असलेल्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी दिली आहे. ज्येष्ठ मुक्त पत्रकार डॉ. संतोष खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दहा वर्षांपासून हा अभ्यासक्रम सुरु आहे. पत्रकारिता करू इच्छिणाऱ्यांबरोबरच शिक्षक, वेगवेगळ्या आस्थापनात प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम करणारे किंवा करू इच्छिणाऱ्यांना हा पदविका अभ्यासक्रम उपयुक्त आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम लेखन कौशल्य, दूरचित्रवाणीवरील विविध…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून संगमनेर पंचायत समितीने तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या थकलेल्या घरपट्टी व पाणीपट्टीची तब्बल साठ लाख रुपयांची वसुली करण्यात यश मिळविले आहे अहमदनगर जिल्ह्यात अशा प्रकारची वसुली करण्यात संगमनेर पंचायत समिती अव्वल ठरली. गावच्या विकासात ग्रामपंचायतीचे योगदान महत्वाचे आहे. त्याकरीता घरपट्टी व पाणीपट्टीची वसूली देखील महत्वाची आहे. जनतेने सदरचा कर वेळेत भरल्यास विकासाच्या प्रक्रियेला हातभार लागण्यास मदत होते. नागरिकांनी कोणत्याही सरकारी कराचा भरणा करणे त्यांच्या हिताचे असते, मात्र ग्रामपंचायतीचा घरपट्टी, पाणीपट्टीचा कर थकविणारे अनेक महाभाग आहेत. वारंवार मागणी करून देखील घरपट्टी पाणीपट्टीचा भरणा न करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील १०२२० खातेदारांविरोधात थकबाकीचा भरणा करण्यासंबंधीच्या नोटीसा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा काही वेळापूर्वीच ट्विटरद्वारे केली आहे. जितेंद्र आव्हाड या घोषणेने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘पोलिसांनी माझ्याविरुद्ध ७२ तासात दुसरा खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४… मी ह्या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार… मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे… लोकशाहीची हत्या… उघड्या डोळ्याने नाही बघू शकत, असं म्हणत आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं ट्विटरवरुन जाहीर केलं आहे. आव्हाड यांनी नुकतच ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटात इतिहासाची तोडमोड केल्याचा दावा करत काही…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नासिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे आणि टोल प्रशासना विरोधात संगमनेर मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केलेल्या उपोषणाला आठवडा उलटत नाही तोच महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात आता खासदार अमोल कोल्हे संतप्त झाले असून त्यांनी थेट या खड्ड्यांमध्ये संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराच्या नावासह मोबाईल क्रमांकाचे फलक लावण्याचा इशारा दिला आहे. नासिक-पुणे मार्गाचे चौपदरीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे तसेच या मार्गावरील टोल नाके देखील सुरू झाले असून वाहन चालकांकडून टोल असलेली सुरू झाली आहे. मात्र या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे झाल्याने वाहन चालकांचे हाल होत आहे. यातून अपघाताच्या देखील अनेक घटना घडल्या. अनेक जण जायबंदी झाले तर अनेकांना आपले जीव गमवावे लागले. महामार्गावर…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सर्व वेळ शरद पवार आणि काँग्रेसला सांभाळण्यात गेला. महा विकास आघाडी सरकारच्या काळातील चुकांमुळे राज्यात येऊ घातलेले औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले. आणि त्याचे खापर मात्र शिंदे फडणवीस सरकारवर फोडले जात असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. बावनकुळे सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना उद्योजकांशी काहीही देणे-घेणे नव्हते. शरद पवार आणि काँग्रेसला सांभाळणारे ठाकरे बोलत नव्हते म्हणून त्यांचे आमदार देखील त्यांना सोडून गेले तर त्यांच्या कार्यकाळामध्ये राज्यातील उद्योग बाहेर का जाणार नाही असा प्रश्न उपस्थित केला. राज्यात गुंतवणूक व्हायचे असेल तर उद्योजकांचे चर्चा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी करून मुख्यमंत्री पद मिळविले. मुंबईतील अनेक प्रकल्प रोखण्याचे काम त्यांनी आणि त्यांच्या मुलाने केले. कोणताही व्यवसाय न करता ठाकरेंची करोडची संपत्ती कशी असा सवाल करत महापालिकेतून येणारे खोके बंद झाल्याने ते अस्वस्थ झाल्याची टीका भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर मुंबईचा’ या अभियानांतर्गत शनिवारी झालेल्या कांदिवलीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सावंत उपस्थित होते. भातखळकर म्हणाले, स्वतःला हिंदुत्वाचे ठेकेदार मानणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी हिंदू समाज आणि मुंबईतील जनतेत फूट पाडण्याचे घाणेरडे काम सुरु केले आहे. त्यांनी मुंबईच्या…
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीसाठी युवा सैनिकांनी सज्ज राहावे महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क युवा सेनेच्या कामाला गती येण्यासाठी जेथे पदाधिकाऱ्यांमध्ये बदल आवश्यक आहे तेथे, निश्चित बदल केला जाईल. मात्र ज्याचे काम चांगले आहे त्याचा देखील सन्मान केला जाणार असल्याचे प्रतिपादन युवा सेनेचे शिर्डी लोकसभा विस्तारक मितेश साटम यांनी केले. साटम यांच्या उपस्थितीत शनिवारी संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये युवा सेनेची बैठक पार पडली. यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अमित चव्हाण, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुजीब शेख, शिवसेना तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी, कोपरगाव येथील युवा नेते भैय्या तिवारी, पठार भागातील ज्येष्ठ शिवसैनिक रंगनाथ फटांगरे, माजी शहर प्रमुख संजय…
रविवार विशेष | प्रवीण पुरो (लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक आहेत) ईडीच्या नाचऱ्या मोराला न्यायालयाने अद्दल घडवली हे बरंच झालं. आपल्या मर्जीला येईल तसा सरकारी यंत्रणांचा वापर करू शकतो, असा अहंगड भाजप नेत्यांच्या डोक्यात गेला होता. 2014 पासून हे नेते सुटल्यासारखे वागत होते. ईडी आणि सीबीआयचा कसाही वापर करायचा आणि विरोधकांचा आवाज दाबायचा ही विकृती भाजप नेत्यांनी जोपासली होती. यातून सत्ता आणि मत्ताही हाती लागते. हे त्यांना ठावूक होतं. 2014 ची सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते फोडून भाजपने अशीच ताब्यात घेतली होती. पुढे हा मार्ग एकहाती अनुसरला गेला आणि फोडाफोडीचं घृण कृत्य भाजपने अवसरलं. लाचार झालेले…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बक्षीसपत्राने दिलेल्या जमिनीची सातबारा उताऱ्याव नोंद करण्याचे आदेश देण्यासाठी मॅडमनी एका मध्यस्थाच्या मार्फत तब्बल ५ लाखाची लाच मागितली. दुसऱ्या दिवशी ही रक्कम ३ लाखावर आली आणि २ लाख रुपयांची रोकड स्विकारतांना मध्यस्थ लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. मध्यस्थ जाळ्यात अडकताच तहसिलदार मॅडमच्या घरी लाच लुचपतने छापा टाकला आणि मॅडमलाही ताब्यात घेतले. नंतर मॅडमच्या घराची झडती घेतली असता तेथे ७५ हजाराची तर मुंबईतील विक्रोळी येथील घरात एक कोटीहून अधिक रोख रक्कम सापडली. संपत्तीची मोजदाद सुरु केल्यानंतर मॅडमकडे तब्बल ६० तोळे सोने असल्याचे आढळून आले. एखाद्या सामान्य अधिकाऱ्याची ही कथा नाही तर ती आहे अलिबागच्या महिला तहसिलदारांची. मिनल कृष्णा दळवी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ८७ वर्षीय कर्करोगग्रस्त वृद्ध रुग्णावर गुंतागुंतीची शस्रक्रिया करण्यात एसएमबीटीच्या कर्करोग तज्ञांना यश आले आहे. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी या रुग्णाने फेरफटका मारत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सकारात्मकता, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कुटुंबियांची साथ असेल तर कुठल्याही आजारावर मात करणे शक्य होते, असे म्हटले जाते. याच उक्तीचा प्रत्यय नाशिकमधील एसएमबीटी कॅन्सर इन्सिट्यूटमध्ये आला. धूम्रपान करणाऱ्या कोपरगाव येथील ८७ वर्षीय अजीज मन्सुरी यांना गेल्या काही दिवसांपसून खोकल्याचा त्रास होता. अनेक ठिकाणी त्यांनी वैद्यकीय उपचार केले मात्र निदान झाले नाही. काही दिवसांनी त्यांच्या खोकल्यातून रक्तदेखील पडू लागल्याने मन्सुरी यांच्या कुटुंबीयांनी त्यांना नाशिकमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णाची…
महाराष्ट्र संवाद न्यूज कुठलाही प्रकल्प तीन-चार महिन्यात येतो आणि जातो असे घडत नसते. ती काही जादूची कांडी नाही. फिरवली की आला आणि गेला. कोणताही प्रकल्प लगेचच राज्याबाहेर जात नाही. आरोप कोणीही करू शकतो. मात्र आमचे सरकार उद्योगाला चालना देणारे उद्योगांचे स्वागत करणारे सरकार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आणखीन एक प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये गेला आहे, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, तीन-चार महिन्यांपासून गेल्या अडीच वर्षात प्रलंबित असलेल्या कामांना चालना देण्याचे काम आमच्याकडून सुरू आहे. विकास प्रकल्पांना वॉर रूममध्ये घेतले असून, त्याचा दररोज आढावा घेतला जातोय. राज्याचा सर्वांगीण विकास करणे आणि थांबलेल्या प्रकल्पांना पुढे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात सत्तारूढ झालेल्या शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडका लावला असताना गरिबासाठी अन्नदात्री ठरलेली शिवभोजन थाळी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्यभरात या थाळ्यांचे यशदा आणि टीस या दोन संस्थांमार्फत ऑडिट केले जाणार आहे. नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर आधीच्या सरकारांच्या निर्णयांना जशी स्थगिती मिळाली तशाच पद्धतीने शिवभोजन थाळी देखील बंद केली जाण्याची चिन्हे होती. मात्र सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवभोजन थाळी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त होत आहे. शिवभोजन थाळी सुरू ठेवण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री शिवभोजन थाळीचा आढावा घेणार आहेत. तसेच राज्यभरात यशोदा आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात सत्ता बदल होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले. त्यामुळे लोकांच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने अकोले नगरपंचायतीला विविध विकास कामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, याशिवाय पुढील काळात भरघोस निधी मिळवून देण्याचे आश्वासन खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले. बाळासाहेबांच्या शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर खासदार लोखंडे आज प्रथमच अकोलेत आले असता त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे, जिल्हा संघटक विजय काळे, उपजिल्हा प्रमुख एकनाथ यादव, तालुका प्रमुख संजय वाकचौरे, शहराध्यक्ष गणेश कानवडे, संगमनेर तालुकाप्रमुख रमेश…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का देत शिवसेनेच्या आणखी एका खासदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची वाट धरली आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. शिंदे गटात गेलेले खासदार गजानन कीर्तिकर हे शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष आहेत. कीर्तीकर शिंदें सोबत गेल्याने स्थानिक लोकाधिकार समिती देखील त्यांच्या रूपाने शिंदे गटाची ताकद वाढविणारी ठरणार आहे. मुंबईतील माहीम विधानसभा नागरिक सत्कार सोहळ्यानिमित्त रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खासदार कीर्तीकर यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील (बाळासाहेबांची शिवसेना) पक्षात प्रवेश केला. यामुळे शिंदे गटातील खासदारांची संख्या आता तेरावर गेली आहे.…
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 202236 शेतकऱ्यांचे 121628.88 हेक्टर क्षेत्राच्या शेती पिकांचे नुकसान महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ऑक्टोंबरमध्ये अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत, मात्र यातून जर कोणाचे पंचनामे करावयाचे राहिले असतील तर त्यांनी तातडीने तहसीलदारांकडे संपर्क साधण्याचे आवाहन अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. अहमदनगर जिल्हयामध्ये ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासकीय स्तरावरून देण्यात आले होते. जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पावसामुळे बाधित झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून नगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 202236 शेतकऱ्यांचे 121628.88 हेक्टर क्षेत्राच्या शेती पिकांचे नुकसान झाले…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 जणांविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये वर्तक नगर पोलिसांनी आव्हाड यांना अटक केली आहे. हर हर महादेव या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती दाखविणे असल्याचा आरोप करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही कार्यकर्त्यांसह सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान विवियाना मॉल मधील चित्रपटाचा शोध बंद पाडला होता. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकांने शो बंद पाडल्यानंतर तिकिटाचे पैसे परत मागितले होते तसेच कोण जितेंद्र आव्हाड अशी विचारणा केली होती. यावेळी संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दर्शकाला मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ठाण्याच्या वर्तक नगर पोलीस ठाण्यामध्ये आमदार आव्हाड यांच्यासह…
