Author: Annant Ppangarkar
अहिल्यानगर – श्रीगोंदे तालुक्यातील हिंगणी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातील दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा छडा लावण्यास अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून १० लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर त्यांचा तिसरा साथीदार फरार आहे. हिंगणी येथील मंदिरात चोरी झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा समांतर तपास करत होते. तपासादरम्यान आरोपींचा गुन्हेगारी अभिलेख आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे ही चोरी सराईत गुन्हेगार भास्कर पथवे याच्या टोळीने केल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या राहत्या परिसरात सलग चार दिवस शोध घेतला, मात्र…
संगमनेर, प्रतिनिधी – आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, महाराष्ट्र राज्य विमा प्रतिष्ठान (ESIC) अंतर्गत बंद करण्यात आलेले सेवा दवाखाने आता संगमनेर येथे स्थलांतरित करून पुन्हा सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याचा फायदा संगमनेर तालुक्यातील सुमारे १०,००० विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबांसाठी होणार आहे. नगरपालिका निवडणुकीदरम्यान मालपाणी उद्योग समूहातील कामगारांशी संवाद साधताना आमदार अमोल खताळ यांनी कामगार रुग्णालयाबाबत शब्द दिला होता. हा शब्द पाळत त्यांनी नागपूर अधिवेशनादरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे ठोस मांडणी केली होती. या प्रयत्नांना यश आले असून, नाशिक क्षेत्रीय कार्यालयाने ४ जून २०२५ च्या आदेशानुसार संगमनेरमध्ये सेवा दवाखाने सुरू करण्याची कार्यवाही तात्काळ…
संगमनेर, प्रतिनिधी – शहरासह परिसरात सध्या चोरट्यांनी उच्छाद मांडला असून महिलांचे मंगळसूत्र ओढण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात संगमनेर भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुधवारी पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. सध्या सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडलेले असतानाच दागिने चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सध्या हिंदू समाजातील महिलांचे हळदी-कुंकवाचे कार्यक्रम सुरू असून वाण खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. याचाच फायदा घेत बस स्टँड, अशोक चौक, बाजारपेठ मेनरोड, नवीन नगर रोड, नाशिक रोड, इंदिरानगर आणि मालदाड रोड यांसारख्या वर्दळीच्या भागात दुचाकीवरून येणारे चोरटे महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून नेऊ लागले आहेत. या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.…
विशेष लेख | प्रणित सहाणे अहमदनगर जिल्ह्याच्या, विशेषतः संगमनेर तालुक्याच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात ‘कॉम्रेड’ ही पदवी केवळ नावासमोर लावण्यासाठी नसून ती कृतीतून सिद्ध करणारे नेतृत्व म्हणजे कॉम्रेड पंढरीनाथ बाबुराव सहाणे, ज्यांना अवघा जिल्हा ‘सहाणे मास्तर’ म्हणून मोठ्या आदराने ओळखतो. आज त्यांच्या निधनाला १० वर्षे पूर्ण होत असताना, त्यांनी कष्टकरी, शेतमजूर आणि शोषितांसाठी दिलेला लढा पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभा राहतो. मास्तरांचा जीवनप्रवास हा निव्वळ राजकारण नव्हता, तर तो प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आणि विषमतेविरुद्ध पुकारलेला एक अखंड एल्गार होता. संघर्षाची मुळे आणि वैचारिक जडणघडण- १२ जानेवारी १९२९ रोजी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी या ऐतिहासिक गावात मास्तरांचा जन्म झाला. अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत…
संगमनेर, प्रतिनिधी – गेल्या अनेक महिन्यांपासून स्वच्छतेच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि स्वातंत्र्यपूर्व काळात १०७ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली जिल्हा परिषदेच्या शाळेची जुनी वास्तू कारखान्याच्या ‘अग्निझुंज’ या अग्निशमन दलाच्या वाहनाद्वारे पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करण्यात आली असून, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या या विधायक उपक्रमामुळे शाळेने आता कात टाकली असून, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या जिल्हा परिषद केंद्र शाळेत राहुल गांधी समर्थक संघ (RGSS) आणि सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. राजापूर येथील ही जिल्हा परिषद शाळा अनेक दिवसांपासून स्वच्छतेच्या प्रतीक्षेत होती. रस्त्यावरील धूळ, पटांगणातील पालापाचोळा आणि जुन्या इमारतीवर साचलेली धूळ…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील कामगार आणि मध्यमवर्गीय विमाधारकांसाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य सुविधेच्या प्रश्नावर तोडगा निघाला असून, नागपूर विभागातील बंद पडलेले ‘सेवा दवाखाने’ आता संगमनेरमध्ये स्थलांतरित करण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. आमदार तांबे यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, यामुळे तालुक्यातील १० हजार कुटुंबांना हक्काची आरोग्य सेवा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य विमा प्रतिष्ठानच्या (महा-राकावि) नाशिक क्षेत्रीय कार्यालयाने ४ जून २०२५ रोजी या संदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत. या निर्णयानुसार, नागपूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ‘महाल’ आणि ‘न्यू सेक्टर’ या भागांतील…
दैनिक राशीभविष्य: मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाची दखल घेतली जाईल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभल्याने मानसिक समाधान मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ- आज तुम्हाला आर्थिक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कामाचा ताण वाढण्याची शक्यता असली, तरी नियोजनाने तुम्ही त्यावर मात कराल. खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात, त्यामुळे पथ्य पाळावे. मिथुन- मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस प्रगतीकारक आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी…
संगमनेर | प्रतिनिधी तालुक्यातील वडगाव पान येथील जमीन अतिक्रमण प्रकरणात सक्षम महसूल अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असतानाही प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप गणेश रासने यांनी केला आहे. शासकीय मोजणी, पोलीस बंदोबस्त आणि पंचनामे होऊनही केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे ताबा मिळत नसल्याने, येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सहकार महर्षी क्रीडा संकुल समोर कुटुंबीयांसह उपोषणास बसण्याचा इशारा रासने यांनी दिला आहे. या संदर्भात प्रशासनाला दिलेल्या निवेदनात गणेश रासने यांनी म्हटले आहे की, वडगाव पान येथील स.नं. १३/१ (क्षेत्र ०.६१ आर) ही त्यांची मालकीची मिळकत असून, शासकीय मोजणीत या जमिनीच्या पूर्वेकडील सुमारे १७ आर क्षेत्रावर जनार्दन सहादू गायकवाड व इतरांनी अतिक्रमण केल्याचे निष्पन्न…
संगमनेर, प्रतिनिधी – “नाशिक-पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा पर्याय नसून या संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या विकासाची जीवनवाहिनी आहे. ही रेल्वे थेट मार्गानेच झाली पाहिजे ही आमची ठाम मागणी आहे. आता या संघर्षासाठी ‘अभी नही, तो कभी नही’ अशी वेळ आली आहे,” अशा शब्दांत आमदार सत्यजीत तांबे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष – नाशिक-पुणे रेल्वेच्या थेट मार्गासाठी गेल्या काही काळापासून जनआंदोलन उभे राहिले आहे. या प्रश्नी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मागितली होती. मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बैठक घेण्याचे कबूल केले असले, तरी अद्याप या बैठकीची तारीख निश्चित झालेली नाही. त्यामुळे या महत्त्वपूर्ण बैठकीची…
पुणे/अहिल्यानगर | विशेष प्रतिनिधी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शिरूर परिसरात केलेल्या एका मोठ्या कारवाईने संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ उडवून दिली आहे. २ कोटी १० लाख रुपयांचे ‘मेफेड्रोन’ (MD) ड्रग्ज जप्त केल्यानंतर, या काळ्या धंद्याचे धागेदोरे चक्क अहिल्यानगर पोलीस दलातील कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी पुणे पोलिसांनी श्याम गुजर नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले असून, खाकी वर्दीला लागलेल्या या डागामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार अमली पदार्थ विरोधी मोहीम राबवली जात होती. १७ जानेवारी रोजी शिरूर परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना ड्रग्ज विक्रीची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार १८ जानेवारीच्या…
संगमनेर, प्रतिनिधी – फिनलंडमधील प्रगत शिक्षण व्यवस्थेचा सखोल अभ्यास केल्यानंतर, आता संगमनेर शहरातील नगरपालिका शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी पुढाकार घेतला आहे. समाजातील गरजू आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मुख्य आधार असलेल्या नगरपालिका शाळांमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून शाळांच्या कामकाजाची पाहणी सुरू केली आहे. यामुळे लवकरच नगरपालिकेच्या शाळांचे रूप पालटणार असल्याचे संकेत मिळत असून शैक्षणिक क्षेत्रात या दौऱ्याची मोठी चर्चा रंगली आहे. नगरपालिका शाळांमधून उद्याचे सक्षम नागरिक घडत असतात, मात्र बदलत्या काळानुसार या शाळांमधील पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि अध्यापन पद्धतीमध्ये सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे. हीच गरज ओळखून डॉ. मैथिली तांबे यांनी शिक्षण…
संगमनेर, प्रतिनिधी – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे बंद झाल्याने संगमनेर तालुक्यातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आज सामाजिक कार्यकर्ते गुड्डू इंजिनिअर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिलांनी एकत्र येत उपविभागीय अधिकारी अरुण उंडे यांना निवेदन दिले. मुंडे यांच्या वतीने नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी उपस्थित महिलांनी आपल्या अडचणी मांडत हप्ते पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. यावर प्रशासनाने आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असून, तालुक्यातील अनेक अत्यंत गरीब महिलांनी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांचे हप्ते अचानक बंद झाले…
संगमनेर, प्रतिनिधी – शिबलापूर ग्रामपंचायत कार्यालयातील घंटागाडीची दुरावस्था आणि महापुरुषांच्या प्रतिमा गोदामात फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर, याविरोधात कायदेशीर लढा देणारे तक्रारदार संजय तबाजी मंतोडे यांना अखेर मोठे यश मिळाले आहे. सुरुवातीला तक्रारदारालाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाने अखेर लेखी माफीनामा सादर करत आपली चूक मान्य केली आहे. या निर्णयामुळे सत्य समोर आले असून परिसरातून समाधान व्यक्त होत आहे. संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायतीमध्ये महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान होत असल्याची आणि शासकीय मालमत्तेची हेळसांड होत असल्याची तक्रार संजय मंतोडे यांनी प्रशासनाकडे केली होती. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वस्तुस्थिती मांडणारी बातमी प्रसिद्ध केली होती. मात्र, ही बातमी समोर…
दैनिक राशीभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि फलदायी ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकता आणि धाडसाचे कौतुक होईल. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची साथ उत्तम असल्याने तुम्ही अधिक कार्यक्षमतेने काम कराल. वृषभ – आज तुम्हाला आर्थिक नियोजनावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. गुंतवणुकीच्या दृष्टीने दिवस चांगला असला तरी घाईने निर्णय घेणे टाळावे. नोकरीमध्ये सहकाऱ्यांच्या मदतीमुळे एखादा कठीण प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. प्रवासाचे योग येतील, मात्र प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे गरजेचे आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन – तुमच्या संवादकौशल्यामुळे आज अनेक…
संगमनेर/जळगाव – महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सध्या प्रचंड गोंधळाची स्थिती असून भाजपच्या खेळीमुळे राज्याच्या सुसंस्कृत राजकारणाचे मोठे नुकसान होत आहे. गटातटाचे राजकारण राज्यासाठी दुर्दैवी असून सरकारने आता तरी राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे आणि त्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. थोरात सध्या विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांनी अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. शेतकऱ्यांची कर्जमाफी आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या दौऱ्यादरम्यान जळगाव जामोद येथे माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘सातपुडा कृषी प्रदर्शना’चे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी बोलताना त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर…
सिन्नर – नाशिक-पुणे जलदगती रेल्वेचा मूळ आराखडा बदलून तो शिर्डीमार्गे वळवण्याच्या निर्णयामुळे सिन्नर तालुक्यातील शेतकरी आणि रेल्वे कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आणि नाशिक-पुणे महामार्गावर एकाच वेळी ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक-पुणे रेल्वेचा मूळ मार्ग नाशिक–सिन्नर–अकोले–संगमनेर–नारायणगाव–चाकण असा निश्चित करण्यात आला होता. मात्र, नारायणगाव येथील ‘जीएमआरटी’ (GMRT) या आंतरराष्ट्रीय खगोल निरीक्षण प्रकल्पाच्या कामात रेल्वेमुळे अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन, प्रशासनाने नवीन पर्यायी मार्ग पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक असा प्रस्तावित केला आहे. या बदलाची माहिती समोर आल्यापासून मूळ मार्गावरील भागात तीव्र अस्वस्थता असून, हा बदल…
संगमनेर | अनंत पांगारकर – संगमनेर नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडी काल (सोमवारी) पार पडल्या असून, यामध्ये एका महिला नगरसेविकेची कामगिरी सध्या संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. सत्तेत असलेल्या नगरसेवकांना देखील ज्या समित्यांवर स्थान मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, तिथे विरोधी पक्षाच्या एकमेव महिला नगरसेविकेने सर्वच समित्यांवर आपले स्थान निश्चित करून एक नवा राजकीय विक्रम प्रस्थापित केला आहे. सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे तसेच उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विशेष सभेत या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. संगमनेर पालिकेत आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील सेवा समितीचे…
संगमनेर, प्रतिनिधी – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सध्या सुरू असलेल्या काँक्रिटिकरणाच्या कामाबाबत ‘RGSS’ टीमने आक्रमक पवित्रा घेतला असून, थेट मैदानावर उतरून कामाची गुणवत्ता तपासली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शिंदे यांनी तात्काळ आपल्या तज्ज्ञ टीमला पाचारण केले आणि प्रत्यक्ष घटनास्थळी तपासणीचे आदेश दिले. मालपाणी ट्रक टर्मिनसपाशी असलेल्या उड्डाणपुलावर करण्यात येत असलेल्या सिमेंट काँक्रिट अस्तरीकरणाच्या जाडीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, RGSS टीमने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कामाची सखोल चौकशी करत पाहणी केली. नाशिक पुणे महामार्गावर मालपाणी इंडस्ट्रीज लगत असलेल्या उड्डाणपुलावर सुरू असलेल्या काँक्रिटिकरणाची जाडी काही ठिकाणी ठरवून दिलेल्या निकषांपेक्षा कमी असल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. यासंदर्भात RGSS कडे…
संगमनेर, प्रतिनिधी – राजकारणापलीकडे जाऊन जेव्हा समाजकारण केले जाते, तेव्हा सामान्यांचे प्रश्न कसे मार्गी लागतात, याचा प्रत्यय संगमनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये आला आहे. नगरसेवक योगेश (चिकू) जाजू यांच्या तत्परतेमुळे परदेशपुरा आणि जुम्मा मशीद परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ड्रेनेजचा प्रश्न निकाली निघाला असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. संगमनेरमधील परदेशपुरा आणि जुम्मा मशीद हा दाट लोकवस्तीचा भाग आहे. या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेजची मोठी समस्या निर्माण झाली होती. सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत होती, याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत होता. अनेकदा मागणी करूनही तांत्रिक कारणांमुळे हे काम रखडलेले होते. ३-४ दिवसांपूर्वी नगरसेवक…
संगमनेर, प्रतिनिधी – विषय समित्या हा खऱ्या अर्थाने नगरपालिकेचा आत्मा असून, गेल्या काही काळातील त्यांची मरगळ झटकून या समित्यांना अधिक शक्तिशाली आणि लोकाभिमुख करण्यावर आपला भर असेल, अशी ग्वाही आमदार सत्यजीत तांबे यांनी देत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संगमनेर शहराच्या आगामी विकासाची आणि प्रशासकीय शिस्तीची एक व्यापक दिशा स्पष्ट केली. संगमनेर नगरपालिकेच्या विशेष विषय समित्यांच्या सदस्य, सभापती निवडीचा कार्यक्रम सोमवारी तहसीलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे उपस्थित होत्या. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या स्वागत समारंभावेळी आमदार तांबे बोलत होते. तांबे यांनी विषय समित्यांच्या घसरलेल्या प्रभावावर भाष्य केले. बजेट आणि अधिकारांच्या मर्यादांमुळे या समित्यांकडे दुर्लक्ष झाले होते,…
