Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर: अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे १९,९०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे, संदीप दरंदले, रणजीत जाधव, आकाश काळे आणि रमीजराजा आत्तार यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुरुवारी (३ जुलै) पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रातून दोन व्यक्ती ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून वाळू उपसा करून तिची…
अकोले, प्रतिनिधी: भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रसिद्ध रंधा धबधबा प्रवाहित झाला असून पर्यटकांसाठी हे एक आकर्षक ठिकाण बनले आहे. भंडारदरा धरणातील पाणीसाठा आज ७४४१ दशलक्ष घनफूट (६७.४१%) झाला आहे. जलाशय परिचालन सूचीनुसार पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, भंडारदरा धरणातून विद्युतगृहामार्फत ८४५ क्युसेक तर सांडव्याच्या (स्पील वे) गेटमधून १०५८ क्युसेक, असे एकूण १९०३ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक कमी-जास्त झाल्यास विसर्ग कमी-जास्त केला जाईल, असे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी सांगितले. येत्या १५ जुलैपर्यंत धरणाची पाणीपातळी ६५% राखण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा चांगला…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील आनंदवाडीजवळ आज सकाळी (शुक्रवार, ४ जुलै) शालेय विद्यार्थ्यांची स्कूल बस पलटी होऊन चार विद्यार्थी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी, नीलम खताळ यांनी डॉ. गुंजाळ हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. साकूर पठार भागातील अनेक विद्यार्थी चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयात शिक्षणासाठी दररोज स्कूल बसने येतात. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास, चंदनेश्वर विद्यालयाची बस (क्र. MH 14 BA 8932) ३५ विद्यार्थ्यांना घेऊन चंदनापुरी घाटातून आनंदवाडीमार्गे विद्यालयाकडे जात होती. आनंदवाडी शिवारातील एका वळणावर एका वाहनचालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसचालकाला हुलकावणी दिली. बसचालकाने प्रसंगावधान राखून बस बाजूला घेतली असता, ती साईड…
संगमनेर, प्रतिनिधी: आज (शुक्रवारी) सकाळी चंदनेश्वर विद्यालयाची स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन येत असताना चंदनापुरी घाटात एकेरी वाहतुकीमुळे साईड गटारात पलटली. या अपघातात चार ते पाच विद्यार्थी जखमी झाले. ही बातमी मिळताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने आपल्या यंत्रणा व कार्यकर्त्यांना मदतीसाठी सूचना दिल्या. यानंतर थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी तातडीने घटनास्थळी आणि नंतर रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. चंदनापुरी घाटातील डॉ. गुंजाळ हॉस्पिटलमध्ये जखमी विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले आहे. इंद्रजीत थोरात यांच्यासोबत विजय राहणे, इंद्रजीत खेमनर, सरपंच भाऊराव रहाणे, बाळासाहेब सागर, किरण राहणे, बालमशेठ सरोदे, आनंदराव कढणे, बाळू सरोदे, संदीप सरोदे, दिनकर भालेराव यांच्यासह चंदनापुरी येथील विविध…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर शहरात, पोलिसांनी सुगंधित गुटखा आणि पान मसाल्याची अवैध विक्री आणि साठवणूक करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित मालाचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत अंदाजे ४४५८४/- रुपये इतकी आहे. गुरुवारी, ३ जुलै २०२५ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संगमनेर खुर्द येथील आरोपी आहद रऊफ शेख (वय ३५, धंदा फेरी व्यापारी) याच्या राहत्या घरातून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल संतोष बाचकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या कलम २६(२)(४)(५)(e) अंतर्गत गुन्हा क्रमांक ६१३/२०२५…
संगमनेर, ४ जुलै २०२५: संगमनेर शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गोवंश कत्तलखान्यांवर पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धडक कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. वेगवेगळ्या छाप्यांमध्ये पोलिसांनी गोमांस, कत्तलीसाठी आणलेली जनावरे आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने बेकायदेशीर सुरू असलेल्या कत्तलखान्यावर महत्त्वपूर्ण छापा टाकला. या छाप्यामध्ये मदिनानगर येथून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील तिघांना अटक करण्यात आली असून तिघेजण फरार झाल्याची माहिती मिळाली. मदिनानगर…
संगमनेर, ४ जुलै- प्रतिनिधी: पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आज (शुक्रवारी) सकाळी चंदनेश्वर विद्यालयाच्या स्कूल बसला भीषण अपघात होऊन चार ते पाच विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने, या अपघातात कोणतीही गंभीर जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंदनेश्वर विद्यालयाची एम.एच. १४ बी.ए. ८९३२ क्रमांकाची बस साकुर आणि आसपासच्या भागातून सुमारे ३५ हून अधिक विद्यार्थ्यांना घेऊन चंदनापुरी घाटातून शाळेकडे येत होती. पुणे-नाशिक महामार्गावर सध्या सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. याच दरम्यान, समोरून येणाऱ्या एका वाहनाने हुल दिल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या साईट गटारात पलटी झाली. अपघाताची…
मुंबई: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेचा गैरवापर करत पात्र नसतानाही लाभ घेणाऱ्या २,२८९ सरकारी महिला कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेली रक्कम वसूल केली जाणार आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्यातील गरजू महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मात्र, काही सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्र नसतानाही या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. यामुळे सरकारला मोठा आर्थिक फटका बसला असून, आता या महिलांकडून घेतलेली रक्कम परत घेतली जाणार आहे. अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केलं की,…
संगमनेर / अहिल्यानगर, ३ जुलै २०२५: अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर बुधवारी छापा टाकून तब्बल ११ लाख २४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या आणि खेळवणाऱ्या १४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले होते. त्यानुसार, पोलीस निरीक्षक आहेर यांच्या नेतृत्वाखालील पथके जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर कारवाया करत आहे. एलसीबीच्या या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांचे पितळ…
संगमनेर, प्रतिनिधी: ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा आणि कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील ५०० युवक आणि युवतींनी पंढरपूरच्या आषाढी पायी दिंडी सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला. ‘आम्ही संगमनेरी, विठुरायाचे वारकरी’ हे ब्रीदवाक्य घेऊन या युवा कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवांसह विविध सेवा पुरवून दोन दिवस त्यांची निःस्वार्थपणे सेवा केली. वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व विविध सेवा- महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून अनेक पायी दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत. या दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखालील या युवा पथकाने संगमनेर, अहिल्यानगर मार्गे प्रवास करत संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे टेंभुर्णी…
संगमनेर, प्रतिनिधी: काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका कायम काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. याच परंपरेला पुढे नेत, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अजय नारायण फटांगरे यांची संगमनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच कोपरगाव ग्रामीणच्या तालुकाध्यक्षपदी नितीनराव मनोहर शिंदे आणि भिंगारच्या तालुकाध्यक्षपदी रिजवान शेख यांचीही निवड झाली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अजय फटांगरे यांनी यापूर्वी संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले होते. त्यावेळी त्यांनी तालुक्यात युवकांचे मोठे संघटन उभारले होते. तसेच, बोटा गटातून जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्यानंतर, त्यांनी थोरात…
महाराष्ट्र संवाद न्यूज – महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, दोन धक्कादायक घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्याच्या कोंढवा येथे कुरिअर डिलिव्हरीच्या नावाखाली घरात घुसून एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे, तर दुसरीकडे इन्फोसिसच्या हिंजवडी कॅम्पसमध्ये एका महिला कर्मचाऱ्याचा शौचालयात व्हिडिओ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कोंढवा येथील एका उच्चभ्रू गृहसंकुलात बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक भयावह घटना घडली. एका २५ वर्षीय तरुणी घरात एकटी असताना, आरोपी कुरिअर देण्याच्या बहाण्याने तिच्या घरी आला. “माझे कुरिअर नाही” असे तरुणीने सांगितल्यावरही, “सही करणे आवश्यक आहे” असे सांगत आरोपीने तिला दरवाजा उघडण्यास भाग पाडले. सेफ्टी डोअर…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनली असून, मंगळवारी, (१ जुलै) बाजार समितीत ड्रॅगनफ्रूट आणि पेरूची मोठ्या प्रमाणात आवक झाली. या बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगला भाव मिळत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी केवळ संगमनेर तालुक्यातीलच नव्हे, तर राहुरी, अकोले, राहाता आणि सिन्नर तालुक्यांमधूनही अनेक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणला होता. रोहित जाधव (संगमनेर) आणि प्रवीण पवार (राहुरी) यांच्यासह आणखी काही शेतकऱ्यांनी ड्रॅगनफ्रूट, पेरू आणि डाळिंब मोठ्या प्रमाणावर बाजार समितीत विक्रीसाठी आणले होते. ड्रॅगनफ्रूटला प्रतिकिलो किमान ५० रुपये ते कमाल ८० रुपये असा भाव मिळाला. तर डाळिंबाची २६८८ क्रेट्सची विक्रमी आवक झाली.…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर शहर आणि तालुक्यात अवैध धंदे आणि कत्तलखान्यांनंतर आता चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. नुकत्याच शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, निमोण आणि घारगाव येथे झालेल्या घरफोड्यांमध्ये लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या सर्व घटना एकाच दिवशी घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संगमनेरला पोलिस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी आणि संगमनेर शहर, संगमनेर तालुका आश्वी व घारगाव ही चार पोलिस ठाणी असूनही चोरट्यांवर पोलिसांचा कोणताही वचक राहिला नसल्याचे चित्र आहे. सोमवारी शहर हद्दीत रायते फाटा येथे झालेल्या घरफोडीत १ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. मंगळवारी, संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव पोलिस ठाण्याच्या…
मुंबई, दि. २ जुलै २०२५: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आतापर्यंत कधीही न झालेल्या थेट मुलाखतींद्वारे तालुकाध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून कार्यक्षम आणि मेहनती कार्यकर्त्यांना संघटनेत महत्त्वाची पदे देऊन तळागाळापर्यंत पक्ष मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने आतापर्यंत ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आ. विजय वडेट्टीवार, आ. सतेज पाटील, नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, आणि ॲड. गणेश पाटील यांचा समावेश आहे. पक्ष निरीक्षकांनी केलेल्या शिफारसी आणि मुलाखतींच्या आधारे ही…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यांबाबत शासनाला खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) आणि शहर पोलीस निरीक्षक (PI) यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे केली. संगमनेरमधील कत्तलखान्यासंदर्भात खताळ यांनी सभागृहात मंगळवारी प्रश्न उपस्थित केला होता त्यावर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. फडणवीस यांच्या उत्तरानंतर पोलिसांनी सभागृहाला खोटी माहिती पुरविल्याचे खताळ यांनी बुधवारी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आमदार खताळ यांनी सभागृहात सांगितले की, संगमनेर शहरात सर्रासपणे अवैध कत्तलखाने सुरू आहेत. मात्र, शहर पोलीस त्यांच्यावर केवळ थातुरमातुर कारवाई करत आहेत. गोवंश हत्याबंदी कायद्यातील…
पंढरपूर: आषाढी वारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, महाराष्ट्र राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वारीदरम्यान कोणत्याही वारकऱ्याचा अपघात, विषबाधा किंवा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाल्यास, त्यांच्या वारसांना आता 4 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. याशिवाय, वारीदरम्यान अपंगत्व आल्यास किंवा रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आल्यास देखील आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक नुकतेच जारी केले आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही आषाढी एकादशीसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली होती. आता या नव्या निर्णयामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सरकारने आणखी एक पाऊल पुढे…
अहिल्यानगर: बिगरशेती (Non-Agriculture – NA) कायद्यातील सुधारणा नियमांचे उल्लंघन करत, सातबारा उताऱ्यांमध्ये विनापरवाना फेरफार केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी संगमनेरमधील चार महसूल कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या गंभीर प्रकरणात तत्कालीन तहसीलदारांचीही चौकशी करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही माहिती मिळाली असून, यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. जवळपास वर्षभरापूर्वीचे हे प्रकरण असून, या प्रकरणी तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी भीमराज शांताराम काकड, मंडलाधिकारी वैशाली अंबादास मोरे, तलाठी पोमल दत्तात्रय तोरणे, आणि महसूल सहायक वसंत निवृत्ती वाघ या चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नेमकं काय घडलं?- संगमनेर नगरपालिका हद्दीतील तसेच गावठाणातील जागांशी संबंधित हे प्रकरण आहे. ४२ ब, ४२…
महाराष्ट्र संवाद न्यूज: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नवनियुक्त नाशिक महानगरप्रमुख सुनील बागुल यांचे खंदे समर्थक मामा राजवाडे यांच्यासह अन्य काही जणांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात घुसून तोडफोड करणे, मारहाण करणे, चोरी करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे असे आरोप त्यांच्यावर आहेत. या घटनेमुळे नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरएसएस समर्थक आणि सराफ व्यावसायिक किशोर उर्फ गजू घोडके यांनी ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल यांच्या गैरव्यवहाराचे आरोप करणारे व्हिडिओ २७ जून रोजी फेसबुकवर अपलोड केले होते. बागुल यांनी समाजसेवेच्या नावाखाली पैशांचा गैरव्यवहार करत कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवल्याचा आरोप घोडके यांनी या व्हिडिओतून केला होता…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरमधून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर खुर्द आणि बुद्रुकला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन प्रवरा नदीवरील पुलासह राज्यातील जुन्या पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत केली आहे. याशिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील कामांच्या दिरंगाईवरही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार खताळ यांनी हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. प्रवरा नदीवरील हा पूल वाहतुकीसाठी जुना झाला असून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. याचवेळी, संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणारी रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण होत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उचलून धरला. शासन निधी उपलब्ध करून देत असतानाही कामे वेळेत…
