Author: Annant Ppangarkar
अहिल्यानगर, दि.१८ – रेशीम उद्योग हा ग्रामीण भागातील स्वावलंबनासाठी अत्यंत उपयुक्त पर्याय असून विशेषतः महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात हा व्यवसाय मदत करू शकतो. मागील वर्षात जिल्ह्यात ६६८ शेतकऱ्यांनी ३१६ हेक्टर क्षेत्रावर तुतीची लागवड करुन २ लाख ६५ हजार अंडीपुंज व १५१ मेट्रीक टन कोषाचे उत्पादन घेतले आहे. गतवर्षात रेशीम शेतीसाठी १०२ शेतकऱ्यांना ८५ लाख ४४ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे यांनी दिली. रेशीम शेती उद्योग हा कृषीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला व ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत करणारा उद्योग आहे. बदलते हवामान, बाजारातील शेतीमालाच्या बाजारभावाची चढउतार आणि वाढती…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथे एका आदिवासी महिलेच्या हत्येप्रकरणी, तसेच अन्य मागण्यांसाठी आदिवासी आणि मागासवर्गीय संघटनांनी मंगळवारी (दि. १७) संगमनेर शहरात निषेध मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन केले. शेतात शौचाला गेल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या या हत्येमुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. मंगळवारी दुपारी बारा वाजता शहरातील बस स्थानकासमोर हा रास्ता रोको करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विविध संघटनांचे कार्यकर्ते एकत्र जमले आणि घोषणाबाजी करत मोर्चाने बस स्थानकासमोर आले. यावेळी युवकांनी घटनेचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. या रास्ता रोकोदरम्यान झालेल्या सभेत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जुले पठार येथील घटनेवर गंभीर चिंता व्यक्त केली.…
पुणे: मुळशीचे तत्कालीन तहसीलदार रणजित भोसले यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. सात-बारा उताऱ्यावरील ‘द टाटा पॉवर कंपनी लि.’चे नाव कमी करून त्याऐवजी धोंडू गोपाल ढोरे यांचे नाव मालकी हक्कात दाखल करण्याचा आदेश दिल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या अनियमिततेप्रकरणी राज्य सरकारने सोमवारी निलंबनाचे आदेश जारी केले असून, ते जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. या प्रकरणी कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४१, १४० आणि १५५ नुसार, भोसले यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नाव कमी करण्याचा दिलेला आदेश रद्द केला होता. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर या अनियमिततेची चौकशी अतिरिक्त विभागीय…
अहिल्यानगर, १८ जून २०२५: पाथर्डी (अहिल्यानगर) येथील शिवनेरी मिसळच्या हॉटेल चालकाकडून मासिक हप्ता म्हणून १५०० रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पाथर्डी पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार लक्ष्मण सुखदेव पोटे (वय ३५) यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीस नाईक रामदास जयराम सोनवणे आणि पोलीस कोठडीतील आरोपी राहुल शिवाजी साबळे (वय २२) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे पाथर्डी येथे ‘शिवनेरी मिसळ’ नावाचे हॉटेल असून, ते रात्री १० नंतरही सुरू असते. यावरून कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदार लक्ष्मण पोटे यांनी तक्रारदाराकडे मासिक २००० रुपये हप्त्याची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने १५ जून २०२५ रोजी नाशिक…
अहिल्यानगर, १८ जून: नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अहिल्यानगरमध्ये मंगळवारी एका खासगी बँक रिकव्हरी कर्मचाऱ्याला २०,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. घर जप्तीच्या नोटीसची तारीख वाढवण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय तक्रारदाराला भिंगारच्या मंडळ अधिकारी कार्यालयाकडून घर जप्तीची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसची तारीख मंडळ अधिकाऱ्यांकडून वाढवून देण्यासाठी, जहीर अहमद इक्बाल मुलानी (वय ३०, रा. एकनाथ नगर, केडगाव, अहिल्यानगर) या खासगी बँक रिकव्हरी कर्मचाऱ्याने २०,००० रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती २०,००० रुपये लाच स्वीकारण्याचे निश्चित झाले. त्यानुसार, १७ जून २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजता जहीर मुलानी याने पंचांसमक्ष २०,००० रुपयांची लाच स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने…
मुंबई, दि. १७- विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून, आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमिनीवर पेरण्या झाल्याची माहिती आज (मंगळवारी) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यातील पीक परिस्थिती, खते आणि बियाण्यांच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. राज्यात चांगला पाऊस झाल्यामुळे खतांची मागणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. गरज भासल्यास तातडीने अधिक खतांची मागणी करावी, असेही ते म्हणाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात करण्यापूर्वी, अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र…
संगमनेर, प्रतिनिधी- महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध परंपरेचा भाग असलेल्या पायी दिंडी सोहळ्यातील संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे संगमनेर तालुक्यात सोमवारी आगमन झाले आहे. या निमित्ताने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि इतर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, यामुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि इंद्रजीत थोरात यांनी तिचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालखीचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर यांच्यासह गावकरी आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्यावतीने दोन रुग्णवाहिका, २५ डॉक्टरांचे पथक आणि परिचारिकांसह आरोग्य सेवा पुरवण्यात…
संगमनेर, प्रतिनिधी – “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या गजरात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीचे संगमनेर तालुक्यात सोमवारी संध्याकाळी उत्साहात स्वागत करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील पारेगाव बुद्रुक येथील अश्विनाथ महाराज गडावर पालखी पोहोचताच, संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि प्रशासनाच्या वतीने शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी भक्तिमय वातावरणात पालखीचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. पारेगाव ग्रामस्थांनी पालखीवर जेसीबीतून पुष्पवृष्टी केली. आमदार अमोल खताळ यांनी स्वतः पालखीतील बैलजोडीचा दोर धरून भक्तिभाव व्यक्त केला. त्यांनी गळ्यात वीणा घातला होता, तर त्यांच्या पत्नी नीलम डोईवर तुळशी वृंदावन घेऊन “विठ्ठल-नाम” च्या जयघोषात पायी चालत सहभागी झाल्या होत्या. यावेळी, निवृत्तीनाथ महाराज पालखी…
संगमनेर, १७ जून पावसाळ्याला सुरुवात होताच संगमनेर विद्युत महामंडळाचा (महावितरण) गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. शहरातील अनेक उपनगरे आणि गावठाण भागांत विजेचा लपंडाव सुरू असून, यामुळे नागरिक आणि विशेषतः छोटे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. शिवसेना शहरप्रमुख रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे यांनी महावितरणच्या या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त करत, अधिकाऱ्यांना गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. कानकाटे यांनी आरोप केला आहे की, वादळ, वाऱ्यामुळे झाडे पडून किंवा तारा तुटून वीजपुरवठा खंडित होणे नागरिकांना समजण्यासारखे आहे. मात्र, दर शनिवारी शहरातील जवळपास ७०-७५ टक्के भागात दिवसभर वीज गायब असते. रविवारी कोणतेही कारण नसतानाही विजेचा ये-जा करण्याचा खेळ सुरू होता. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे अनेक…
अहिल्यानगर, १७ जून – अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दरोडा टाकणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील विळद येथील दरोड्याबरोबरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गुन्हेही उघडकीस आले आहेत. पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ३ लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भैय्या कडू काळे (वय १८, रा. शिरोडी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), ताराचंद विरूपन भोसले (वय ३५, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), किसन उर्फ विजय गौतम काळे (वय २३, रा. पानसवाडी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), नागेश विरूपन भोसले (वय २०, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर),…
संगमनेर, प्रतिनिधी – शेकडो वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज (सोमवारी, १६ जून) अहिल्यानगर जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन झाले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूहाने वारकऱ्यांसाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा पुरविल्या. रिमझिम पाऊस आणि भक्तीमय वातावरणात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि इंद्रजीत थोरात यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी या पालखीचे अभूतपूर्व स्वागत व पूजन केले. पारेगाव बुद्रुक येथे पंढरपूरकडे निघालेल्या या पालखीमध्ये सुमारे २० हजार वारकरी सहभागी झाले होते. यावेळी डॉ. तांबे आणि थोरात यांनी पालखीचे पूजन केले. या प्रसंगी निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय पोलीस…
संगमनेर, प्रतिनिधी: आईवडील लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधत नातेवाईकाने तेरा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा व त्यातून ती गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर संगमनेर तालुका पोलिसांनी तात्काळ कारवाई करत यातील मुख्य आरोपीला अटक केली. अटक केलेल्या आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने २० जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पंडित हिरामण वैराट असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान या प्रकारातील अन्य तीन आरोपींचा अजूनही शोध सुरू असून सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे याप्रकरणी पुढील तपास करत आहे. रविवारी ही धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातून समोर आली होती. घटनेतील पीडित मुलीवर जवळच्या नातेवाईकाने आई-वडील घरी नसल्याचे संधी साधत बलात्कार केला…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवर नव्याने बांधलेल्या पुलाचे श्रेय माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचेच असल्याचा दावा काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केला आहे. तसेच, सत्तांतरानंतर सत्ताधाऱ्यांनी केवळ राजकारणासाठी पुलाचे काम रखडवल्याचा आरोप करत त्यांनी पुलाच्या कामाचे श्रेय घेऊ पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा आरसा दाखवला. या संदर्भात दिवटे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुलाच्या रखडलेल्या कामाचा घटनाक्रम विशद करत म्हटले आहे की, २०२२ मध्ये म्हाळुंगी नदीला आलेल्या पुरामुळे साईनगरकडे जाणारा जुना पूल खचला होता. पूल वाहतुकीला बंद झाल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात आणि नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी तातडीने पाहणी केली होती. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर…
संगमनेर, प्रतिनिधी – “अभिधान सार्थ हे व्हावे, हिंदुस्थान म्हणुनिया जिवाचे ज्यांनी केले रान, त्याचीच तपस्या हे सिंहासन वंद्य” या ओळींनी सुरू होणारा हिंदू साम्राज्य दिनाचा पवित्र सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने उत्साहात साजरा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा आणि हिंदू समाजाला ‘स्वत्वा’ची जाणीव करून देणारा हा प्रेरणादायी दिवस उद्या मंगळवारी (१७ जून) सायंकाळी ७ वाजता, मदन कुलकर्णी सभागृह, दिगंबर गणेश सराफ विद्यालय, घास बाजार, संगमनेर येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲड. श्रीकांत गोंगे भूषविणार असून प्रमुख वक्ते म्हणून महेश शेळके सर (महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, उत्तर नगर जिल्हा) यांचे मार्गदर्शन होणार आहे. हिंदवी स्वराज्याच्या…
संगमनेर, प्रतिनिधी: शहरातील स्वामी समर्थ नगर ते संतोषी माता मंदिर दरम्यान म्हाळुंगी नदीवर नव्याने बांधण्यात आलेला पूल जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण झाले. शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने विद्यार्थी आणि स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. चार वर्षांपूर्वी हा पूल कोसळल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला होता. स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलने केल्यानंतर या पुलाच्या कामास सुरुवात झाली होती. यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ यांनी सांगितले की, पूर्वी या पुलाचे बांधकाम स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधीतून झाले…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच व पीडित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचा हा घृणास्पद प्रकार समोर आला. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दोन महिलांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेरनजीक कोकणगाव येथे सकाळी झालेल्या भीषण अपघाताच्या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच हा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, पंडित हिरामण वैराट, संगीता पंडित वैराट, संग्राम उर्फ शेरू पंडित वैराट आणि माधुरी पंडित वैराट (सर्व रा. कळस, ता. अकोले, जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहर आणि तालुक्यात अन्नपदार्थांमधील भेसळीच्या वाढत्या तक्रारींनी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) यापूर्वी अनेक ठिकाणी छापे टाकून संशयित नमुने गोळा केले असले, तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. आता संगमनेरमध्ये गुळात भेसळ झाल्याची गंभीर तक्रार समोर आल्याने, प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संगमनेर येथील ‘सिद्धी नैसर्गिक गुळ’ या दुकानाचे विक्रेते आणि निर्माते मोहनलाल बन्सीलाल दर्डा यांच्याविरुद्ध शंकर ढमाले यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ढमाले यांनी केली आहे. रासायनिक भेसळीमुळे त्रास झाल्याचा आरोप ढमाले यांनी…
संगमनेर, प्रतिनिधी – रविवारी सकाळीच संगमनेरकरांसाठी दुःखद वार्ता समोर आली आहे. सकाळी पावणे सात वाजण्याच्या दरम्यान कोल्हार घोटी राज्यमार्गावर कोकणगावजवळ स्लिपरकोच ट्रॅव्हल्स आणि आंब्याने भरलेल्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हार घोटी मार्गावरील हॉटेल भाग्यलक्ष्मीसमोर ही दुर्दैवी घटना घडली असून या अपघातात प्रवीण सोपान कांदळकर (वय २८, रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), फिरोज लाला शेख (वय ४६, रा. कसारादुमाला, ता. संगमनेर) आणि अंजु प्रवीण वाल्मिकी (वय ३९, रा. पानिपत हरियाणा) या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात हर्षिता सोनू वाल्मिकी, बिराला पूनम,…
राज्याच्या राजकारणात नवा पैलू निर्माण करू पाहणार्या दोन ठाकरेंच्या एक होण्याच्या संभाव्य घटनेने शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांच्या आशा चांगल्याच पल्लवीत झाल्या होत्या. असं काही झालं तर त्याचे सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात पहायला मिळतील आणि अनैतिक मार्गाने सत्तेवर बसलेल्या महायुतीला त्याची किंमत मोजावी लागेल, अशी चिन्हं दिसू लागली होती. दोन भाऊ एक होण्याची शक्यता दिसू लागल्याने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनाही हायसं झालं होतं. सत्तेचा वारू उधळणार्या भाजपला याचा सर्वाधिक फटका बसू शकतो हे लक्षात आल्याने आपला फायदा न होता भाजपची उडू पाहणारी संभाव्य त्रेधा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना हवीच होती. यामुळे आतून काहीही वाटत असलं तरी दोन्ही भाऊ एक व्हावेत, अशा मानसिकतेत…
संगमनेर, प्रतिनिधी- सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक ठरू नये, अशी आग्रही मागणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन थांबवण्यासाठी सरकारने घेतलेली भूमिका फसवी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सत्ताधारी पक्षाने सत्तेवर येण्यापूर्वी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. हे आश्वासन पाळणं हे सरकारचं नैतिक आणि राजकीय कर्तव्य आहे. त्यामुळे सरकारने समिती स्थापन करण्याऐवजी सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, अशी स्पष्ट भूमिका थोरात यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती कशाला? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटलं…
