Author: Annant Ppangarkar

शनिवार, २२ जून  न्यायालयीन सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्याच्या कारणामुळे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोना साथ रोग सुरू असताना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वीज दरवाढी विरुद्ध आंदोलन केले होते. आंदोलना दरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण केली होती. याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा तसेच वीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी सध्या मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयापुढे सुरू असून या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असताना देखील राहुल नार्वेकर हे सातत्याने न्यायालयात गैरहजर राहत असल्याने न्यायाधीशांनी त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला. राहुल…

Read More

शनिवार, २२ जून जमीन मोजण्यासाठी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी ४ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचखोर भूमापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ४ लाखापैकी ५० हजार रुपये घेतांना एकाला पकडले आहे. दौलत मधुकर गायकवाड (वय ३५ वर्षे, भूकरमापक भूमी अभिलेख कार्यालय, हवेली, येरवडा, पुणे.) व योगेश्वर राजेंद्र मारणे (वय २५ वर्षे, रा. एरंडवणे, पुणे) या दोन लाचखोर आरोपीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अ १२ अन्वये येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या देहूगाव, पुणे येथील जमीन मोजण्यासाठी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी लाचखोर आरोपी हवेली भूमी अभिलेख कार्यालयाचा भुकरमापक दौलत गायकवाड याने…

Read More

शनिवार, २२ जून शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे थकविल्याच्या कारणावरून २१ कोटी ०३ लाख ५० हजार रुपयांच्या वसुलीसाठी नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याच्या कर्मयोगी कुंडलिकराव जगताप (कुकडी) सहकारी साखर कारखान्याची जंगम, स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना प्राधिकृत करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या साखर आयुक्तांनी ३१ मे रोजी कुकडी (कर्मयोगी कुंडलिकराव जगताप) कारखान्यासाठी हा आदेश दिला आहे. शेतकऱ्यांचे थकविलेले पैसे परत मिळावेत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने गेल्या तीन आठवड्यात कोणतीही पाऊले उचललेली नसल्याचे यासंबंधीचे वृत्त लोकसत्ताने दिले आहे. नियमानुसार उसाचे गाळप झाल्यानंतर १४ दिवसात शेतकऱ्यांना त्यांचे पेमेंट अदा करणे कारखान्यांवर बंधनकारक आहे.…

Read More

महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या, १०० टक्के कमीशनखोरी. महायुती सरकारच्या भ्रष्टाचारावर पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार शुक्रवार, दि २१ जून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या अटल सेतुचे उद्घाटन करण्यात आले त्या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच भेगा पडल्या आहेत. नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता एक फुट खाली खचला आहे. महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. कर्नाटकातील आधीचे भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले होते पण महायुती सरकार तर १०० टक्के कमीशनखोर आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर अटल सेतुची पाहणी करून रस्त्याला भेगा…

Read More

शुक्रवार, २१ जून दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला आहे. केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणी होईपर्यंत कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली असल्याचे सांगितले. म्हणजेच हायकोर्टात सुनावणी होईपर्यंत केजरीवाल तिहार तुरुंगातून सुटणार नाहीत. अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाविरोधात ईडीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्याची परवानगी दिली. या खटल्याची सुनावणी होईपर्यंत खालच्या न्यायालयाचा आदेश प्रभावी ठरणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना ईडीने युक्तिवाद केला की, आम्हाला कनिष्ठ न्यायालयात आमचे म्हणणे मांडण्याची संधी मिळाली नाही. यावर उत्तर देताना केजरीवाल यांच्या वकिलाने असे म्हणणे योग्य नसल्याचे…

Read More

शुक्रवार, २१ जून  अहमदनगर जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांनी रेशन घेण्यासाठी आपल्या रास्त भाव दुकानातून ३० जून पर्यंत ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन अहमदनगरच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्त भाव दुकानामार्फत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार नगर जिल्ह्यातील २९ लाख ३४ हजार ४८५ लाभार्थ्यांचे ई-केवायसी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकेसोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे तसेच शिधापत्रिकेमध्ये नमुद असलेल्या व्यक्ती त्याच आहेत, याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याव्दारे…

Read More

शुक्रवार, २१ जून बीड लोकसभा मतदारसंघातून झालेल्या पराभवानंतर भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या गोटात हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. असे झाले तर अनेकदा डावलल्या गेलेल्या मुंडे आणि त्यांच्या समर्थकांसाठी हा आनंदाचा धक्का असेल. दिल्लीत भाजप नेत्यांच्या झालेल्या बैठकीत मुंडे यांना राज्यसभेवर पाठविण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल हे दोन सदस्य लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने राज्यसभेतील त्यांच्या जागा व्यक्त झाल्या आहेत. यातील एका जागेवर मुंडे यांना घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मुंडे यांच्या लोकसभेतील पराभवानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी आत्महत्या करण्याचे प्रकार समोर आले आहेत. तसेच राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी…

Read More

शुक्रवार, २१ जून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी पाठोपाठ निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या राज्यातील ८३०५ सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारने सप्टेंबर अखेर पुढे ढकलल्या आहेत. या अगोदरही वेगवेगळ्या कारणाने सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. २०२४-२०२५ या वर्षात राज्यातील २४७१० सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित असून त्यापैकी राज्यातील ८३०५ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मात्र राज्य सरकारने पावसाळ्यामुळे या निवडणुका ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतचा आदेश राज्य शासनाने जारी केला आहे. गुरुवारी (२० जून) सरकारने काढलेल्या या आदेशात म्हटले आहे की, हवामान विभागाने २०२४ मध्ये सर्वसाधारण पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून…

Read More

गुरुवार, २० जून कथित मद्य घोटाळ्याप्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्लीच्या राऊज ऍव्हेन्यू न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा दिला आहे. केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला असून त्यांच्या जमीन आला स्थगिती देण्याची ईडीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्याने केजरीवाल यांची शुक्रवारी तिहारमधून सुटका होईल. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केजरीवाल्यांना सर्वोच्च न्यायालयाने २१ दिवसांसाठी जामीन दिला होता. वैद्यकीय कारणावरून केजरीवाल यांनी जामीन वाढ करून देण्याची मागणी मात्र न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यांना २ जून रोजी सरेंडर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. सरेंडर झाल्यापासून ते तिहार तुरुंगात होते. यानंतर पुन्हा त्यांनी राउज एवेन्यू न्यायालयांत जामिनासाठी याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणी दरम्यान गुरुवारी…

Read More

गुरुवार, २० जून  दोन मुलांचा शेततळ्यात टाकून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी या मुलांच्या आईसह तिच्या प्रियकराला अटक केली असून दोन्ही आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कविता सारंगधर पावसे व सचिन बाबाजी गाडे अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. तब्बल दोन महिन्यानंतर या खून प्रकरणाला वाचा फुटली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस यंत्रणेवर आंदोलनाच्या माध्यमातून दबाव वाढविल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास करत प्रत्यक्षदर्शीच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळते. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे राम नवमीच्या दिवशी १७ एप्रिल रोजी शेततळ्यात दोन शाळकरी मुलांचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…

Read More

गुरुवार, २० जून मेडिकल शिक्षणाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नीट- २०२४ या परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार झाला असून भाजपशासित राज्यातील विद्यार्थ्यांना ग्रेसमार्क देण्यात आले आहे. यामुळे प्रामाणिक व पात्र विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला असून या विरोधात युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली असून दोषींवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले. काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी विविध परीक्षांमधील गोंधळ, नीट परीक्षेतील गैरप्रकार, नुकतीच रद्द झालेली यूजीसीची-नेट परीक्षा, याचबरोबर पोलीसभरतीसह इतर स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकाराबाबत तरुणांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर प्रांताधिकारी…

Read More

गुरुवार, दि. २० जून राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्टयुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. या महाभ्रष्ट, निष्क्रीय सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष उद्या शुक्रवारी (२१ जून) राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी सकाळी ११.०० वाजता सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून ‘चिखल फेको’ आंदोलन करून भाजपाप्रणित सरकारचा निषेध करणार आहे. राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरूण, गरिब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे.…

Read More

गुरुवार, २० जून बिहारमध्ये आरक्षणाची व्याप्ती वाढवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाकडून दणका बसला आहे. आरक्षणाची व्याप्ती ५० टक्क्यांवरून ६५ टक्के करण्याचा राज्य सरकारचा निर्णय हायकोर्टाने रद्द केला आहे. शिक्षण संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये एससी, एसटी, ईबीसी आणि इतर मागासवर्गीयांसाठी राज्य सरकारच्या ६५ टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना पाटणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. राज्य सरकारने आणलेला कायदा रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याचिकाकर्ते गौरव कुमार आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी पूर्ण केल्यानंतर ११ मार्च रोजी निर्णय राखून ठेवला होता, त्यावर पाटणा उच्च न्यायालयाने आज निर्णय दिला.

Read More

गुरुवार, २० जून  लोकसभा निवडणुकीनंतर १२ जुलैला राज्यात ११ जागांसाठी विधानपरिषद निवडणूक पार पडणार आहे. मात्र तत्पूर्वीच ठाकरे गटाने ही निवडणूक स्थगित करण्याची मागणी केली आहे. यासाठी ठाकरे गट आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून ही तयारी अंतिम टप्प्यात आहे. आशा परिस्थितीत आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हाती आलेला नसताना या निवडणुका घेणं हे घटनाबाह्य असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे निवडणुका स्थगित करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. दरम्यान, यासंदर्भात कायदेतज्ज्ञांची आज बैठक घेऊन ठाकरे गटाच्या वतीने या सगळ्या संदर्भात कोर्टात जाण्याची तयारी सुरू आहे.…

Read More

गुरुवार, २० जून भरधाव वेगाने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तलाठी महिलेच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण ओढून नेल्याची घटना संगमनेर मध्ये समनापुर गावच्या शिवारात घडली. शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात चंदनापुरी (संगमनेर) येथे कार्यरत असलेल्या तलाठी भारती अशोक भुरके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी (१८ जून) सायंकाळी स्टाफच्या मैत्रिणी समवेत संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथे जात होत्या. यावेळी त्या त्यांच्या दुचाकी वर एकटाच असताना कोल्हार-घोटी मार्गावर समनापुर गावचे हद्दीत किसान ट्रॅक्टरच्या समोरून जात असताना पाठीमागून एका मोटरसायकलवर आलेल्या दोघा अनोळखी व्यक्ती पैकी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादीच्या गळ्यातील मिनी गंठण ओढून तोडून घेऊन भरधाव…

Read More

गुरुवार, २० जून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून यांचा २९ हजार ३१७ मतांनी पराभूत झालेल्या माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विखे पाटील यांच्यासह अनेक पराभूत उमेदवारांनी अशा प्रकारचा अर्ज निवडणूक आयोगाकडे केला असून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM)आणि वोटर वेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल युनिटची (VVPAT) चौकशी करण्याची मागणी केली. या संदर्भात इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची चौकशी करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला एकूण १० अर्ज मिळाले आहेत. यातील बहुतांश उमेदवारांनी…

Read More

बुधवार, १९ जून  दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र हे प्रकरण संशयास्पद असल्याने गावकऱ्यांनी वाढविलेल्या दबावानंतर या भावंडांचा शेततळ्यात बुडून नव्हे तर घातपात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहेत. आई आणि तिच्या प्रियकराने हे खून केल्याचे निष्पन्न झाले. या भावंडांचा खून आई कविता सारंगधर पावसे व सचिन बाबाची गाडे यांनी केला असून याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी सचिन बाबाजी गाडे याला अटक केली असल्याची माहिती संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे पाटील यांनी दिली. १७ एप्रिल रोजी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे शेततळ्यात बुडून रितेश सारंगधर पावसे (वय…

Read More

बुधवार, १९ जून  महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चर संस्थेच्या नाशिक येथे झालेल्या निवडणुकीत अहमदनगर जिल्हा गव्हर्निंग कौन्सिलपदी संगमनेर मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश विश्वनाथ कलंत्री व उद्योजक निलेश चव्हाण यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेठ वालचंद प्रगती पॅनलने ९० पैकी ८५ जागांवर विजय मिळवला असून ललित गांधी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. प्रकाश कलंत्री यांनी यापूर्वी संगमनेर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्षपद भूषविले आहे. कृषी व व्यापार क्षेत्राला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चरच्या माध्यमातून आम्ही विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रकाश कलंत्री व निलेश चव्हान यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शीबोलताना सांगितले.…

Read More

बुधवार, १९ जून  न्यायालयीन कामकाजा दरम्यान ओळख निर्माण करत वृद्धत्व आणि आजारपणाचा गैरफायदा घेत शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या वृद्ध समाजसेविकेची जमिनीच्या व्यवहारात दोन कोटीची फसवणूक करत दहा लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी पुण्यात एका वकिलासह सहा जणांवर भादवि ४०६, ४२०, ३८५, ३८६, ३८७, ५०६, १२० (बी) ३४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲड. रवी सुरेश जाधव (रा. लेन नं. ५, कोरेगाव पार्क), चंद्रकांत गजानन पोकळे, चिंतामणी अंकुश पोकळे (दोघे रा. ज्ञानेश्वर मंदिराजवळ, धायरी), तरूणराज संजीव कुसाळकर, करण संजीव कुसाळकर (दोघे रा. गुलमोहर पार्क, औंध) आणि अभिजीत (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या…

Read More

बुधवार, १९ जून संगमनेरकरांचे लक्ष लागून असलेल्या आणि बहुचर्चित ठरलेल्या एका न्यायालयीन खटल्यात न्यायाधीशांनी माजी उपनगराध्यक्षासह आठ सामाजिक कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल ९ वर्ष ४ महिने हा खटला न्यायालयात सुरू होता. प्रवीण गंगाधर मंडलिक, कल्पेश सोमनाथ पोगुल, सोमनाथ सुरेश गायकवाड, नरेंद्र रामेश्वर ओझा, लखन दीपक जेधे, सुदर्शन दत्तू इटप, राहुल शशिकांत नेहूलकर व शैलेश राजगोपाल कलंत्री या आठ जणांचा निर्दोष सुटलेल्यात समावेश आहे. ९ जानेवारी २०१४ रोजी संगमनेर शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावरून जाणाऱ्या दोघा दुचाकीस्वारांना जय जवान चौकात दुपारी दोन वाजेच्या सुमारास १०-१२ जणांच्या घोळक्याने अडवत दुचाकीवर पेट्रोल टाकत, दुचाकीवरील दोघांना खाली खेचत हॉकी स्टिक, लोखंडी गज व…

Read More