Author: Annant Ppangarkar
बुधवार दि. २७ मार्च, संगमनेर कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या काही घटना गेल्या महिनाभरापासून सातत्याने संगमनेरमध्ये घडत आहे. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडताना दिसते. यामागील कारणांचा शोध घेत प्रशासनाने आता कारवायांचा धडाका लावला आहे. पोलिसांनी नागरिकांच्या अर्जांची दखल घेत प्रचंड फौज फाट्यासह पोलिसी कारवाईचा मंगळवारी कारवाईचा बडगा उगारला. आरटीओला मदतीला घेत शहरात वाहनांची तपासणी मोहीम राबविली. दिवसभर शहरातील जोर्वे नाका, दिल्ली नाका तसेच बस स्थानक अशा तीन महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यामध्ये मोटार वाहन कायद्यानुसार ६४ वाहनधारकांवर कारवाया करण्यात आल्या. सकाळपासून विविध कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये पायी पेट्रोलिंग, नाकाबंदी दरम्यान कारवाई करण्यात आल्या. आरटीओ विभागाच्यावतीने देखील अवैध वाहनांवर कारवाया…
बुधवार दि. २७ मार्च, संगमनेर गेल्या काही दिवसात संगमनेरमध्ये घडलेल्या घटनांमुळे संगमनेर पुन्हा एकदा दंगलीच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसते. स्थानिक प्रशासनाला ही परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्यानेच की काय, थेट जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांना संगमनेरमध्ये येऊन पोलीस दलासोबत रूटमार्च काढत प्रशासन सतर्क असल्याचे त्यांना संगमनेरकरांना सांगावे लागते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा रूटमार्च काढला असला तरी देखील यापूर्वी कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचा रूट मार्च काढला नव्हता. एकूण परिस्थिती लक्षात घेता लोकसभा निवडणुका, रमजान, शिवजयंती उत्सव अशा सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी दंगलींमुळे होळपळलेल्या सुज्ञ संगमनेरकरांना शांतता हवी आहे. यासाठी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, व्यापारी, उद्योजक, संगमनेरकर नागरिक आणि विविध पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी…
बुधवार दि. २७ मार्च, मुंबई लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या सतरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत मुंबईतील उमेदवारांसह राज्यातील उमेदवार जाहीर करण्यात आल्याने या जागा शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याचे स्पष्ट झाले आहे. शिर्डीतून शिवसेनेने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून खासदार झालेल्या वाकचौरे यांनी शिवसेनेचे गद्दारी करत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी केली होती. वाकचौरे यांच्या गद्दारीचे पडसाद त्यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमटले होते परिणामी अवघ्या १७ दिवसात या मतदारसंघाचे खासदार होण्याची संधी शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार सदाशिव लोखंडे यांना मिळाली होती. मधल्या काळात वाकचौरे यांनी भाजपचे कमळदेखील…
मंगळवार दि. २६ मार्च संशयित व्यक्ती स्वतःच्या घरातून गांजाची विक्री करत असल्याची माहिती प्राप्त होताच नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव पोलिसांच्या मदतीने टाकलेल्या छाप्यात विक्रीच्या उद्देशाने कुलरमध्ये एका गोणीत दडवून ठेवलेला ३ किलो ९८० ग्रॅम वजन असलेला सुमारे ३९ हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातल्या अवैध यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई सत्र सुरू आहे. शेवगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संशयित व्यक्ती सादिक शेख राहणार नवीन बाजारतळ तालुका शेवगाव हा कब्जात…
मंगळवार दि. २६ मार्च, अहमदनगर नगर अर्बन बँकेतील कोट्यावधी रुपयांच्या बहुचर्चित आर्थिक घोटाळा प्रकरणी समाज माध्यमामध्ये यातील आरोपी दिलीप गांधी आणि संगमनेर मधील उद्योजक अमित पंडित यांच्या बद्दल वक्तव्य करणारी बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काय आहे या पोस्टमध्ये… एक अमृतवाहीनी बँकेचा चेअरमन तर दुसरा नगर अर्बन बँकेचा चेअरमन, बँकींग कायदे नियम सगळे चांगलेच माहीत असलेल्या. परंतु त्या नियमांचा गैरफायदा कसा घ्यायचा याकडे लक्ष… अमित पंडीतने कॉसमॉस बँकेचे ९ कोटीचे कर्ज काढले व थकविले. कर्ज जाणीवपुर्क थकवायचे व नंतर बँकांना ब्लँक मेल करायचे मला एकरकमी सवलत द्या तरच मी पैसे भरतो अशी भाषा…
मंगळवार दि. २६ मार्च, संगमनेर संगमनेरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार तणाव निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. या घटनांच्या आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन ॲक्टिव्ह मोडमध्ये आले असून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सात जणांना प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी हद्दपार केले असल्याची माहिती संगमनेरचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला दिली आहे. संगमनेर-अकोले तालुक्यातील सराईत गुन्हेगारांचा यात समावेश असून अनिकेत गजानन मंडलिक (माळीवाडा, संगमनेर), संपत उर्फ प्रशांत शांताराम गागरे (कोळवाडे ता. संगमनेर), संजय अदालतनाथ शुक्ला (राजुर ता. अकोले), वरद लक्ष्मण लोहकरे (जनतानगर, संगमनेर), लाल्या उर्फ अल्ताफ शेख (कुरण ता. संगमनेर), सचिन मस्कुले व अतुल कोल्हे (दोघे रा. धांदरफळ…
मंगळवार दि. २६ मार्च, संगमनेर संगमनेरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार तणाव निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन ॲक्टिव्ह मोडमध्ये आले असून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सात जणांना प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी हद्दपार केले असल्याची माहिती संगमनेरचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला दिली आहे. संगमनेर-अकोले तालुक्यातील सराईत गुन्हेगारांचा यात समावेश असून अनिकेत गजानन मंडलिक (माळीवाडा, संगमनेर), संपत उर्फ प्रशांत शांताराम गागरे (कोळवाडे ता. संगमनेर), संजय अदालतनाथ शुक्ला (राजुर ता. अकोले), वरद लक्ष्मण लोहकरे (जनतानगर, संगमनेर), लाल्या उर्फ अल्ताफ शेख (कुरण ता. संगमनेर), सचिन मस्कुले व अतुल कोल्हे (दोघे रा. धांदरफळ ता. संगमनेर) अशी…
सोमवार दि. २५ मार्च, संगमनेर गुरुवारी (२८ मार्च) संगमनेरमध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार असून दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार संगमनेर नगर परिषदेच्या प्रांगणातून शिवसेनेच्या हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळाच्या वतीने पारंपारिक भव्य दिव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीला संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केले आहे. गेल्या काही दिवसापासून संगमनेरात घडलेल्या अनुचित प्रकारांमुळे येथील शांततेला गालबोट लागले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून प्रशासनातील अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी संगमनेरकरांना शांततेचे आवाहन केले आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने योग्य ती सतर्कता बाळगत मिरवणूक काढली जाणार आहे. सायंकाळी सहा वाजता मिरवणुकीला…
सोमवार दि. २५ मार्च, संगमनेर गेल्या काही दिवसात संगमनेरात घडलेल्या दोन समाजातील वादाच्या विविध घटनांमुळे सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात येणाऱ्या संभाव्य हिंदू जन आक्रोश मोर्चाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसात संगमनेरात घडलेल्या विविध घटनांच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सतर्क असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाया केल्या जात आहेत. मोर्चाच्या आयोजकांच्या देखील काही मागण्यांवर गांभीर्याने विचार केला जात त्या दृष्टीने कार्यवाही देखील केली जात…
सोमवार दि. २५ मार्च, संगमनेर गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या, कायदा सुव्यवस्थेलाच आव्हान देणाऱ्या घटना सातत्याने दोन धर्मीयात घडत आहे. काही अपप्रवृत्ती शहरात अशांतता निर्माण करत असून अशा चितावणीखोर व गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सर्वपक्षीय व सर्वधर्मीय संगमनेरकर एकवटले होते. संगमनेरची शांतता धोक्यात आणणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाईच्या मागणीसाठी प्रांताधिकारी शैलेश हिंगे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना निवेदन देण्यात आले. यांची होती उपस्थिती… माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दिलीप पुंड व विश्वास मुर्तडक, उद्योजक मनीष मालपाणी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी, संजय फड, शिवजयंती उत्सव समितीचे सागर बागे, भाजपा युवा मोर्चाचे दीपेश…
सोमवार दि. २५ मार्च, मुंबई लोकसभा उमेदवारीनंतर प्रामुख्याने पुढे आलेल्या विखे पिता-पुत्र आणि आमदार राम शिंदे यांच्यातील वादात मध्यस्थी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर मंथन करण्यात आले. या बैठकीत विखे पिता पुत्र आणि शिंदे यांच्यातील वादावर तोडगा काढत मतभेद मिटले असले तरी मनभेद कायम असल्याचे समोर आले आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघामधून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतीय जनता पक्षाने पुन्हा उमेदवारी जाहीर केल्यानंतर याच मतदारसंघातून इच्छुक असलेले विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. पाठोपाठ त्यांनी पाथर्डीमध्ये झालेल्या बैठकीवेळी देखील अनुपस्थिती दर्शविल्याने विखेंसोबतचा वाद आणखी स्पष्ट झाला होता. दरम्यान शिंदे यांनी…
रविवार दि. २४ मार्च, संगमनेर बस स्थानकावरील कॉम्प्लेक्समध्ये औषधे खरेदी करण्यासाठी आलेल्या मुस्लिम तरुणाला रागाने का बघतो, असे विचारणा करत ‘जय श्रीराम’ म्हणण्यासाठी त्याला आठ ते नऊ जणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी बस स्थानकावर घडला. या घटनेमुळे शहरात सर्वत्र अफवांचे पेव फुटल्याने बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात दोन्ही गटाच्या नागरिकांची गर्दी जमली यामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरातील वातावरण तणावपूर्ण बनलेले आहे. या घटनेमुळे संगमनेर शहराचे वातावरण ढवळून निघाले असून शहराची शांतता धोक्यात आली आहे. शहरात तणावाचे वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून…
संगमनेरात अशांतता निर्माण करणाऱ्यांना जनतेने ओळखले आहे: थोरात भाजपमध्येही अत्यंत निष्ठेने काम केले परंतु त्या ठिकाणी स्वार्थ: शेजुळ रविवार दि. २४ मार्च, संगमनेर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण भाजपमध्ये जात असताना संगमनेरात मात्र भाजपचे दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष ॲड. रामदास शेजुळ यांनी आपल्या समर्थकांसह रविवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील शॅम्प्रोत हा प्रवेश केला आहे. शेजवळ यांच्यासह ओझर परिसरातील त्यांच्या समर्थकांचादेखील यामध्ये समावेश आहे. यावेळी कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, शंकरराव खेमनर, मीरा शेटे, ॲड. लक्ष्मण खेमनर, संतोष हासे, राजेंद्र चकोर आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.…
रविवार दि. २४ मार्च, अहमदनगर अहमदनगरमधील बहुचर्चित नगर अर्बन बँकेतील २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गेल्या आठवड्यात संगमनेरमधून अटक केलेल्या उद्योजक अमित पंडित याची जिल्हा न्यायालयाने रविवारी न्यायालयीन कोठाडीत रवानगी केली आहे. त्यामुळे आता पंडितला जामीन मिळण्याची चिन्हे निर्माण झाले आहे. नगर अर्बन बँकेतील घोटाळ्यात संचालकांसह काही कर्जदार देखील आरोपींच्या पिंजऱ्यात अडकले आहे. संगमनेरमधील उद्योजक आणि अमृतवाहिनी बँकेचा काही काळ अध्यक्ष असलेल्या अमित पंडितने ३३ कोटी रुपयाहून अधिक रकमेचा कर्जघोटाळा केल्याचे बोलले जाते. फॉरेन्सिक ऑडिट नंतर आरोपींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून आत्तापर्यंत या घोटाळ्यामध्ये १०५ आरोपी निष्पन्न झाले आहे. बडा कर्जदार असलेल्या पंडितचाही समावेश आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी (ता.…
रविवार दि. २४ मार्च, संगमनेर अनंत पांगारकर तब्बल सात महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील व्हाईट कॉलर आरोपींपर्यंत पोलिस यंत्रणेला पोहोचण्यात अपयश आले आहे. राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित समजला जाणारा मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारलेल्या आरोपीपैकी एकही आरोपी नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागलेला नाही. नगर अर्बन बँकेत एकापाठोपाठ आरोपींवर कारवाई करत ठेवीदारांना दिलासा देणारी आर्थिक गुन्हे शाखेची यंत्रणा दूधगंगा प्रकरणी मात्र राजकीय दबावाखाली देखील असल्याचे चर्चिले जात आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या मोठ्या घोटाळ्यातील मुख्य आरोपीपैकी एक असलेला पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ हाच एकमेव आरोपी सध्या अटकेत असून…
ॲड. गोरक्ष कापकर आज २३ मार्च, चार वर्षापूर्वी देशात पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊन, त्यानंतर देशात कोरोनाच्या महामारीने उद्भवलेली परिस्थिती ज्यांनी पाहिली आणि भोगली, ती त्यांच्या मरेपर्यंत स्मरणात राहील. खरं तर २०२० साल हे ‘माणूस आणि माणुसकी’ या दोन गोष्टी जगाला शिकवणारे वर्ष होते. अंतराळात जाऊन मंगळावर वस्ती करण्याच्या कल्पना करणारा माणूस, रस्त्या-रस्त्यावर अनवाणी पायाने अश्मयुगातील टोळ्यासारखा अदृश्य आजाराच्या भयाने जीव वाचवण्यासाठी पळू लागला होता. ना त्याच्या जवळ खायला होतं, ना जवळ पाणी प्यायला होतं. माणूस माणसाला परक्या माणसासारखा दूर लोटू लागला होता. एरव्ही समूहाने राहणारा माणूस उपाशीपोटी माणुसकीने अस्पृश्य समजून दूर लोटले म्हणून शहरातुन गावाच्या ओढीने आपल्या माणसाकडे…
प्रवीण पुरो – मुंबई भारतीय जनता पक्ष हा सत्तेशिवाय कोणाचाच होऊ शकत नाही, हे त्या पक्षाने आणि आजच्या त्या पक्षाच्या नेत्यांनी सोदाहरण दाखवून दिलं आहे. सत्तेसाठी ते तुमच्यासाठी आणि तुमच्या सोबत काहीही करू शकतात. कोणत्याही मार्गाचा अवलंब करू शकतात. राजकीय पक्ष म्हणून असलेले अभिनिवेष त्या पक्षाने आणि त्यांच्या नेत्यांनी कधीच गुंडाळून ठेवल्याने येनकेन प्रकारेन सत्ता हेच केंद्र त्यांनी प्रमाण मानलं. आपलं काम भागलं की ते सोबत केलेल्यांची काहीही ठेवायची नाही हा त्या पक्षाचा आणि नेत्यांचा मूलमंत्र. तुम्ही कितीही खरे असा, त्यांच्या खोटेपणापुढे तुमचं काहीच चालत नाही, हे देशाच्या नव्या राजकारणाने दाखवून दिलं आहे. आज हे सांगण्याची वेळ म्हणजे येऊ घातलेल्या…
शनिवार दि. २३ मार्च, संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या कोल्हार घोटी मार्गावर समनापुर लागत असलेल्या हॉटेल नेचर जवळील मैदानात २३ वर्षीय तरुणाचा गळा कापून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेरमध्ये गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे तणावपूर्ण परिस्थिती असताना पोलीस अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत अवघ्या तीन तासात या खून प्रकरणाचा उलगडा केला. या संदर्भात दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून कौटुंबिक कारणातून खून झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. शनिवारी सकाळी हॉटेल नेचर जवळील मैदानात खून झालेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक निरीक्षक विश्वास भान्सी यांच्यासह पोलीस पथकाने…
शनिवार दि. २३ मार्च, अहमदनगर पुन्हा उमेदवारी मिळाल्यानंतर पाच वेळा माफी मागायची वेळ यायला नको होती. अशी खासदार विखे यांचे नाव न घेता टिपणी करत भारतीय जनता पक्षाने महायुतीचे उमेदवार म्हणून डॉ. सुजय विखे यांना नगर दक्षिणेतून पुन्हा उमेदवारी दिली असती तरी गेल्या पाच वर्षात घडलेल्या घटनांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच माझी नाराजी कोणत्या मुद्द्यावर आहे हे स्पष्ट करेल, असे विधान परिषदेचे आमदार माजी मंत्री राम शिंदे यांनी सांगितले. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना अंतर्गत मोठा विरोध होताना दिसत आहे. आमदार राम शिंदे यांच्यासह…
