Author: Annant Ppangarkar

मंगळवार, १५ ऑक्टोंबर प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. नदीपात्रात या मुलांचा शोध व बचाव सुरू असताना सुगाव बुद्रुक (अकोले) येथे शोध कार्य करणाऱ्या पथकाची बोट उलटून तीन पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने नुकसान भरपाई व अन्य लाभ म्हणून गृह विभागाने ४४.६८ लाखाची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. यासंबंधीचे आदेश नुकतेच काढण्यात आले. २३ मे २०२४ रोजी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे ही दुर्घटना घडली होती. पाण्याचा प्रवाहात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. या बुडून मृत्यू झालेल्या मुलांपैकी एकाच्या शोधासाठी बचाव पथकाची मदत घेण्यात आली. बचाव कार्य सुरू…

Read More

मंगळवार, १५ ऑक्टोबर  संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या कामातून संगमनेर तालुका ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरला आहे. समृद्ध म्हणून गौरविल्या जाणाऱ्या तालुक्याला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली आहे. मात्र या तालुक्याचा सर्वांगीण विकास काही शक्तींना पहावत नाही. दडपशाही निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तींना आपल्या सर्वांना एकजुटीने रोखायच असल्याचे प्रतिपादन तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी केले. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागडावरून सुरू झालेल्या युवा संवाद यात्रेदरम्यान त्या बोलत होत्या. यात्रेचे धांदरफळ, निमगाव बुद्रुक, खांडगाव, निमज, सांगवी, चंदनापुरी, झोळे, सावरगाव तळ आदी गावांमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. हजारो तरुणांच्या सहभागाने तालुक्यात यात्रेच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण तयार झाले…

Read More

मंगळवार, १६ ऑक्टोबर  संगमनेर – सन २०२४-२५ या गळीप हंगामात श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड साखर कारखान्याने साडेपाच लाख मॅट्रिक टन ऊस गाळप आणि चांगला साखर उतारा मिळविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिरोले यांनी दिली. विजयादशमीच्या दिवशी बिरोले यांच्या हस्ते पठाण भागाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या कवठे मलकापूर येथील श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड या साखर कारखान्याच्या मिल व बॉयलिंग हाऊसमधील मशिनरीचे विधिवत पूजन करत गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब वर्पे, संचालक हरिभाऊ गीते, जनरल मॅनेजर अण्णासाहेब शेंडे, चीफ इंजिनियर रोहिदास रसाळ, प्रशासन व्यवस्थापक भाऊसाहेब मंडलिक, इंजिनीयर केशव वर्पे, संतोष नान्नर, शिवाजी…

Read More

मंगळवार, १५ ऑक्टोंबर सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुतीच्या राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांपैकी सात सदस्यांची नावे निश्चित झाली असून मंगळवारी दुपारी बारा वाजता उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे नवनियुक्त आमदारांना सदस्यत्वाची शपथ देणार आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास काही तास उरले असतानाच या सात जणांना आमदारकीची संधी मिळाली आहे. राज्यपाल नियुक्त सात सदस्यात महायुतीचा ३-२-२ असा फॉर्मुला वापरण्यात आला असून यात भारतीय जनता पक्षाच्या तीन, शिवसेना शिंदे गटाच्या दोन, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दोन आमदारांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाकडून नियुक्त करण्यात आलेल्या तीन सदस्यांमध्ये श्रीमती चित्रा किशोर वाघ, विक्रांत पाटील व धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड यांचा समावेश…

Read More

असा असेल तुमचा आजचा दिवस  मंगळवार, दि. १५ ऑक्टोंबर मेष – आपली दैनंदिन कामे सुरळीत होतील. कामामध्ये यश मिळेल. महत्त्वाच्या कामांमध्ये आपण आपल्या जोडीदाराचा सल्ला घ्या, तो आपणास लाभकारक ठरेल. नोकरीत दिवस नॉर्मल जाईल. वृषभ – नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस चांगला जाईल. काम जास्त असलं तरी कामात अडचणी येतील, मात्र आज कोणाचेही सहकार्य मिळणार नाही हे लक्षात असू द्या. त्याप्रमाणे कामाचे नियोजन करा. मिथुन – आपणास आज जिद्द व चिकाटीने काम पूर्ण करावे लागणार आहे. नवीन ओळखी होतील. ओळखीचा फायदा सामाजिक क्षेत्रात आपणास होईल सामाजिक क्षेत्र विस्तारेल. संतती सौख्य मिळेल. कर्क – आज आपले मनोबल उत्तम राहील. आत्मविश्वासाने कामे कराल.…

Read More

सोमवार, १४ ऑक्टोबर  अहिल्यानगर – जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सोमवारी बैठक पार पडली असून या बैठकीत ऊर्जा मित्र बैठक पूर्ववत सुरू करणे, अवैध गुटखा विक्री, स्वयंपाक गॅस वितरणातील गैरप्रकार, सेतू कार्यालयातील अवैध सेवाशुल्क, भेसळयुक्त मिठाईची विक्री, एसटी थांबा आदी विषयावर चर्चा झाली.‌ जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव हेमा बडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस अशासकीय सदस्य अतुल कुराडे, विलास जगदाळे, शाहूराव औटी, अमित कोहली, दिनेश थोरात, अशोक शेवाळे, रणजित श्रीगोड, उमा म्हेत्रे, बाबासाहेब भालेराव, डॉ. राजेंद्र कळमकर, विलास सोनवणे, सुनिल दळवी, डॉ. गोरख बारहाते व प्रकाश रासकर आदी उपस्थित होते.…

Read More

सोमवार, १४ ऑक्टोबर  मुंबई – शिवसेना (ऊबाठा) प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हृदयाशी संबंधित समस्यांमुळे मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६४ वर्षीय ठाकरे यांना सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास गिरगाव येथील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. वृत्तानुसार, उद्धव ठाकरेंच्या हृदयात ब्लॉकेज आढळल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून आहे. तथापि, शिवसेनेच्या (ऊबाठा) सूत्रांचे म्हणणे आहे की, माजी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मागील आरोग्य समस्यांमुळे नियमित तपासणीसाठी एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज किंवा उद्या त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो.…

Read More

सोमवार, १४ ऑक्टोंबर विधानसभा निवडणूक आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठका घेत धडाका लावला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबईत येणाऱ्या हलक्या वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे म्हणत दगाफटका करून सत्ता बळकवली तेव्हा शहाणपण का सुचले नाही? असा प्रश्न उपस्थित करत विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे पडक्या भिंतीला पुट्टी लावण्याचा प्रकार म्हणावा लागेल, अशा शब्दात या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने टीका केली आहे. पक्षाने म्हटले आहे, मुंबईतील टोल माफी बंद होणे हे सामान्यांसाठी स्वागतार्ह आहे. टोल घेतले जातात ते रस्त्याच्या डागडूजीसाठी, मात्र अत्याधुनिक यंत्रणांच्या माध्यमातून…

Read More

सोमवार, १४ ऑक्टोबर मुंबई – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी काही तास बाकी असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठी घोषणा केली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे. ऐरोली, वाशी, दहिसर, मुलुंड-एलबीएस, आनंदनगर या टोल नाक्यांवर ही माफी देण्यात आली आहे. यामुळे राज्यभरातून येणाऱ्या हलक्या मोटर वाहनांना या पाचही टोल नाक्यांवर संपूर्ण टोलमाफी मिळणार आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारकडून मोठे निर्णय घेतले जातील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यात मुख्यमंत्र्यांनी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला…

Read More

बाळासाहेब थोरातांची शिर्डी विधानसभा मतदारसंघात साखर पेरणी, महाविकास आघाडीची ताकद वाढली सोमवार, १४ ऑक्टोबर संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मालुंजे या गावातील जनसेवा मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची साथ सोडत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा हात हाती घेतला आहे. महसूल मंत्री विखे पाटील यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप व विखे गटाला मोठे खिंडार पाडण्यात थोरात यशस्वी झाले आहे. अमृतवाहिनी सहकारी बँक येथे मालुंजे येथील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, शेतकी संघाचे संचालक संतोष नागरे, मार्केट कमिटीचे संचालक संजय खरात, युवक…

Read More

असा असेल तुमचा आजचा दिवस  सोमवार, दि. १४ ऑक्टोंबर मेष – शारीरिक थकावट वाटणार आहे. स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवा. नोकरीमध्ये कोणतेही बेकायदेशीर व्यवहार टाळा. व्यावसायिक कर्ज वसुली होईल. बँकेची महत्त्वाची कामे करून घ्या. वृषभ – व्यावसायिकांना उत्साहाच वातावरण असणार आहे. आर्थिक कोंडी फुटेल. तरुणांना नैराश्य घालवणारा दिवस. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना अनुकूल दिवस असणार आहे. प्रगती होईल. मिथुन – आहार-विहाराचे पथ्य पाळा, कोणाशी हुज्जत घालू नका. मालमत्ताविषयक निर्णय होतील, मात्र व्यवहार करताना ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला निश्चित घ्यावा. कागदपत्रे नियम अटी यांचा विचार नीट करा. कर्क – प्रवासात काळजी घेणे आवश्यक आहे. साहित्यिक व पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तींना चांगला दिवस आहे. नातेवाईक…

Read More

रविवार, १३ ऑक्टोंबर जे मनाला येईल ते सांगितले जाते. शब्द दिले जात आहे. फुकट पैसे दिले जात आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष पैसे वाटतील. कारण ते तुमचेच पैसे आहे. इथूनच लुटलेले पैसे आहेत, ते पैसे नक्की घ्या, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मते द्या. महाराष्ट्राची धुरा माझ्या हातात आली की हा महाराष्ट्र दिल्लीसमोर झूकणार नाही आणि तुटणार नाही. आपला अभिमान, स्वाभिमान आपणच जगावला पाहिजे. निवडणुकीनंतर मनसे हा सत्तेतील पक्ष असेल असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वच विरोधी पक्षांवर टीका केली आहे.रविवारी ठाकरे गोरेगाव येथे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले. ठाकरे…

Read More

संगमनेर तालुका दादागिरी करत नाही आणि सहनही करणारही नाही… रविवार, १३ ऑक्टोंबर  सत्ता सामान्य माणसाच्या विकासासाठी असते मात्र याचा विसर पडलेली, सत्ता आणि पैशाच्या जीवावर राजकारण करणारी काही मंडळी सध्या आपल्या तालुक्यात फिरत आहे. मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने राज्यभर फिरून काम करण्याऐवजी सध्याच्या महसूल मंत्र्यांचे कार्यक्षेत्र कनोली-मनोली-कनकापूर पुरतेच मर्यादित राहिले आहे, अशी टीका मंत्री विखे यांच्यावर करत संगमनेर तालुक्यात वाईट प्रवृत्ती येऊ देऊ नका, असे आवाहन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुक्यातील निमोण येथे आयोजित एका संस्थेच्या कार्यक्रमात थोरात बोलत होते. युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी,…

Read More

देशातील सव्यासाची उद्योगपती, देशाभिमानी रतन टाटा यांची दोनच दिवसांपूर्वी एक्झीट झाली. देशासाठी सारंकाही करण्याची उमेद असलेला टाटांसारखा उद्योगपती झाला नाही होणार नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया सर्वसामान्यांची आहे. तरूणांचं व्यासपीठ समजल्या जाणार्‍या सोशल मिडियावर नव्वदीतला हा उद्योगपती सामान्यांच्या सुख दु:खात सहभागी होतो. प्रचंड संपत्तीचा मालक असलेल्या या महायोग्याला श्रीमंतीचा माज नाही की प्रसिध्दीचा सोस. या महान उद्योगपतीची एका विशीतल्या तरुणाशी दोस्ती होणं हे कल्पनेबाहेरील सत्य आहे. हीच दोस्ती भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपतीला सोशल मीडियावरचा स्टार बनवून गेली.  शंतनू नायडू हे त्या तरूण दोस्ताचं नाव. शंतनूनेच टाटांना सोशल मिडियाच्या जगाशी जोडलं. या तरुणाच्या आग्रहामुळेच टाटा अखेरच्या काही वर्षांत सोशल मीडियावर तरूणाईच्या गळ्यातील…

Read More

असा असेल तुमचा आजचा दिवस  रविवार, दि. १३ ऑक्टोंबर मेष – संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. नियमांचे पालन करा, वादविवादाचे प्रसंग टाळा. दुरचे नातेवाईक यांच्याशी संपर्कात राहाल. वृषभ – आपण घेत असलेल्या परिश्रमांचा मोबदला व्यवस्थित मिळेल, अपेक्षित यश मिळू शकते. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल, मात्र रागावर नियंत्रण ठेवा. कोणालाही जामीन राहू नका. मिथुन – कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास खरे समाधान प्राप्त होईल. नोकरदारांना दिलासा मिळेल, आर्थिक बाजू सावरता येईल. विवाहेच्छुक व्यक्तींना जोडीदारांची साथ मिळण्याची शक्यता राहील. कर्क – इच्छित गोष्टी साध्य करता येतील. ग्रहांची साथ मिळणार असल्याने योजना कार्यान्वित होतील. आर्थिक बाजू…

Read More

शनिवार, १२ ऑक्टोंबर  अनेक अडचणींवर मात करत आपण निळवंडे धरण आणि कालव्यांची कामे पूर्ण केली. प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन केले, त्यासाठी स्वतःची जमीन दिली. मात्र शेजारच्यांनी गुंठाभरही जमीन दिली नाही. आपल्याला नाव ठेवणाऱ्यांचे निळवंडे साठी कवडीचेही योगदान नसल्याचे स्पष्ट करत निळवंडेचे काम कोणी केले हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात तळेगाव दिघे येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. थोरात म्हणाले, निळवंडे धरणाचे पाणी खालच्याला द्यायचे तसे वरच्या नाही द्यायचे ही आपली भूमिका आहे. मध्यप्रदेश मधील हरिपुरासारखा पॅटर्न राबविण्याचा आपला प्रयत्न असून बोल घेवड्यांच्या मागे न राहता काम…

Read More

शनिवार, १२ ऑक्टोंबर १९८५ च्या निवडणुकीने संगमनेर तालुक्यात नव्या इतिहासाला सुरुवात झाली. तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलली. सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका राज्यातील प्रगतशील तालुका बनला असून आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण इकडे येतील निवडणुकीमुळे मन्या दूषित करण्याचा प्रयत्न करतील परंतु अशांना वेळच रोखत राजकारणाचे चांगली संस्कृती आणि परंपरा पुढे नेण्याचे आवाहन माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात यांच्या हस्ते शनिवारी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागडावर संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा संवाद यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. स्वराज्याची संकल्पना देणाऱ्या ऐतिहासिक शाळा गडावर विजयादशमीच्या दिवशी पारंपारिक वाद्य, सनई चौघडे, ढोल ताशांच्या गजरात, सूर आणि…

Read More

शनिवार १२ ऑक्टोंबर  मका तोडण्यासाठी शेतात गेलेल्या महिलेवर अचानकपणे बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ३५ वर्षीय महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे दुसऱ्यांदा घडलेल्या या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी ऐन दसऱ्याच्या दिवशी शनिवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी देखील तात्काळ आंदोलनस्थळी धाव घेतली. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या थोरात यांनी तात्काळ राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फोन करत नरभक्षक बिबट्याला मारण्यासंदर्भात मागणी करत वन विभागाचा हलगर्जीपणा विषद केला. मुनगंटीवार यांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत लगेचच नरभक्षक बिबट्याला तात्काळ करण्याचे आदेश देत नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देत असल्याचे थोरात…

Read More

शनिवार, १२ ऑक्टोंबर  पुणे : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वरदहस्ताने पुणे जिल्ह्यातील कासारसाई धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी असलेली मावळ तालुक्यातील २०० कोटी रुपयांची ३१ एकर जमीन वाटप आदेश होण्यापूर्वीच नोंदणीकृत साठेखत दस्तऐवजाद्वारे हस्तांतरित करण्यात आली आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी शुक्रवारी केला. दरम्यान या संदर्भात मंत्री विखे पाटील यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. धंगेकर म्हणाले, मावळ तालुक्यातील गट क्रमांक १५४ सह पाच ते सहा गटांतील शासकीय जागा लाटण्याचा हा प्रकार आहे. या जागेवर कासारसाई प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होणे अपेक्षित आहे. या जागेचा सातबाराही जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर आहे. मात्र, मंत्री विखे पाटील यांच्या जवळचे असलेले सचिन शिंदे, श्वेता…

Read More

शनिवार, १२ ऑक्टोंबर  अहिल्यानगर – उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात अनधिकृत जाहिरात फलक, फ्लेक्स, बॅनर्स आढळून आल्यास सार्वजनिक मालमत्ता विरूपणास प्रतिबंध करणाऱ्या अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करत ते तातडीने काढून टाकण्याचे निर्देश अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे उपस्थित होते. तर दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंग, बॅनर्स, फ्लेक्स काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या…

Read More