Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : शनिवारपासून जिल्ह्यात मराठा कुणबी व कुणबी मराठा, कुणबी जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘विशेष कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला. मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम राबविण्यात आली, त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यावर नाशिक विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात “स्वतंत्र कक्ष” स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा- कुणबी नोंदी शोधण्यासाठी ४ नोव्हेबर पासूनच विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात “विशेष कक्ष”…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज वर्धा : रखडलेल्या कामाविषयी विचारणा केल्याने आमदार रणजीत कांबळे यांच्याकडून ग्रामपंचायत सदस्याला मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. ग्रामपंचायत सदस्याच्या तक्रारीवरून आमदार कांबळे यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ध्यातील देवळी तालुक्यामधील सोनेगाव ग्रामपंचायतचे सदस्य गणेश सातव यांनी गावातील एका भूमिपूजन कार्यक्रमावेळी आमदार कांबळे यांना रखडलेल्या कामाविषयी विचारणा केली होती. या कामाचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी झाले तरीही अद्याप काम सुरू झाले नाही याबद्दल सातव यांनी नाराजी व्यक्त केल्याने कांबळे यांनी त्यांना मारहाण केली. कांबळे काँग्रेसचे आमदार असल्याने मारहाणीच्या प्रकरणानंतर भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. कार्यकर्त्याला न्याय मिळायला हवा, अशी मागणी खासदार रामदास तडस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली होती. यातील एक आरोपी तब्बल महिनाभर पोलिसांच्या कस्टडीत आणि ताब्यात असताना देखील न्यायालयासमोर पोलीस या आरोपीचा सहभाग सिद्ध करू शकले नाही, जी गोष्ट पोलिसांना सहज उपलब्ध झाली असती ती पोलीस तपासामध्ये कोठेही न आल्याने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकेत असलेल्या आरोपीचा जामीन मंजूर केला. या घटनेमुळे पोलीस तपास संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. घटनेतील दोन आरोपी अद्यापही तुरुंगात असून एक-एक करत पाच आरोपी जामिनावर मुक्त झाले तर एक आरोपी अद्यापही पोलिसांना सापडू शकलेला नाही. दरम्यान यातील एक आरोपी जामिनावर मुक्त करताना न्यायालयाने तपासा संदर्भात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष @ प्रवीण पूरो नियतीची चक्र कशी फिरत असतात याचा धडा सध्या भाजप घेत आहे. याला कोणी कर्माचं फळ म्हणो वा नियतीचं चलचक्र. पापाचा घडा हा कधी तरी भरतोच. ती कोणत्या रुपात येतील हे कोणीही सांगू शकत नाही. केलेल्या पापांची फळं कधी तरी भोगाल, असे शाप महाराष्ट्रातल्या असंख्य राजकारण्यांनी भाजपच्या डोक्यावर फोडले आहेत. आज त्याची प्रचिती या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना येत असेल. यावेळी निमित्त झालंय ते गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचं. आरक्षणात खोडा घातल्याचे सारे दोष आपल्यावर येतील, असं त्या पक्षाच्या नेत्यांनी जराही मनात आणलं नसेल. आज ते घडतंय हे मात्र त्यांना मान्यच…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : आपल्या दिशादर्शक कामातून राज्यातील सहकारी साखर कारखानदारीसाठी मापदंड ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 57 व्या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या पहिल्या साखर पोत्याचे पूजन रविवारी (ता. 5 नोव्हेंबर) माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते दुपारी साडेचार वाजता करण्यात येणार आहे. अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी दिली. कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. यावेळी आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, सुधाकर जोशी, रामहरी कातोरे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ज्यांनी अवैध धंद्यांवर लगाम आणायचा त्यांनीच हप्तेखोरी करत अवैध व्यावसायिकांशी हात मिळवणी केल्याने संगमनेरमधील अवैध व्यावसायिक मुजोर बनले आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांवर कारवाईसाठी नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या विशेष पथकाला लक्ष घालावे लागले. “आमचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही”, या तोऱ्यात असलेल्या सटरफटर व्यावसायिकांवर त्यांनी केलेल्या किरकोळ कारवाईचे वृत्त प्रसिद्ध केल्याने अवैध व्यावसायिकाकडून सायं दैनिकाच्या संपादकाला दमदाटी, शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला आहे. संगमनेरमधील दैनिक प्रवरातीरचे संपादक धीरजसिंह ठाकुर यांनी यासंदर्भात संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विजय भागवत उर्फ बुट्ट्या आणि देवा दाजी पूर्ण नाव माहित नाही या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील सहआरोपी व अटकेमध्ये असलेल्या कॅशियर उत्तम लांडगे याला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी केवळ व्यवस्थापकाला अटक झाले असून उर्वरित सर्व आरोपी बाहेर आहेत. मुख्य आरोपींपैकी काहींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले तर काहींना जामीन मिळाला आहे. व्हाईट कॉलर पुढारी आणि दूधगंगा पतसंस्थेचा अध्यक्ष असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबातील सहा व्यक्तींसोबत एकूण 15 जणांवर तब्बल 81 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा तर या अपहाराला सहाय्य केल्याचा सहा जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 19 ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : शे-पन्नास रुपयांची लाचखोरी आता तब्बल कोटीच्या घरात गेली आहे. लाचखोरीचे ग्रहण एमआयडीसी अधिकाऱ्यांनाही लागल्याचे समोर आले असून अहमदनगर येथील सहाय्यक अभियंता अमित किशोर गायकवाड (वय 32, रा. प्लॉट नंबर 2, आनंदविहार, नागापूर, अहमदनगर मूळ रा. चिंचोली ता. राहुरी) याला तब्बल एक कोटी रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या एसीबीने रंगेहात पकडले आहे. गायकवाड याने लाचेची रक्कम स्वतःसाठी व तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ यांच्यासाठी स्वीकारली असल्याची माहिती देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. शुक्रवारी केलेल्या या कारवाईबाबत गोपनीयता बाळगली होती. नाशिक विभागात झालेली ही सर्वात मोठी कारवाई…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीसाठी केंद्रात असलेल्या डॉ. ओमप्रकाश शेटे यांना पुन्हा महाराष्ट्रात बोलाविण्यात आले आहे. डॉ. शेटे यांच्याकडे राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये सुसूत्रता व सुधारणा करण्यासाठी या नवीन अभियानाची धुरा देण्यात आल्याचं समजते. डॉ. शेटे हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जातात. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचे सहाय्यक खासगी सचिव राहिलेल्या डॉ. शेटे यांनी तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारच्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून फडणवीस सरकारची प्रतिमा घराघरात पोहोचविण्याचे काम केले होते. दिवस-रात्र काम करत साडेचार वर्षाच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाने (राजहंस दूध) दीपावलीच्या अगोदरच दूध दर फरक, दुधाचे पेमेंट, दूध वाहतूक ठेकेदारांचे पेमेंट, अनामत, कामगारांचा बोनस, मेहनताना, पगार, व्यापारी देणे, चढ-उतार निधी असे एकूण 35.66 कोटी रुपये संबंधितांच्या खात्यावर बँकेत वर्ग करण्यात आल्याची माहिती दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी दिली. देशमुख म्हणाले, थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या राजहंस दूध संघाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली. दूध संघाच्या माध्यमातून सातत्याने शेतकरी व नागरिकांना मदत करण्यात आली. थोरात यांच्याच…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर : संगमनेर तालुका विज्ञान गणित संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आले आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या तालुका विज्ञान संघाच्या अध्यक्षपदी मनोज ऊपरे व सचिवपदी दत्तात्रय खरात यांची तर गणित अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब राऊत व सचिवपदी अनिल वाकचौरे यांची निवड करण्यात आली. संगमनेर तालुका विज्ञान गणित अध्यापक संघाची बैठक राज्य विज्ञान महामंडळाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर मधील दिगंबर गणेश सराफ विद्यालयात पार या बैठकीसाठी पुढील तीन वर्षासाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. याच बैठकीमध्ये अध्यक्ष सचिवांसह संपूर्ण कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून निवडण्यात आलेली विज्ञान संघाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे : प्रताप जोंधळे (उपाध्यक्ष),…

Read More

सहकार महर्षी थोरात कारखान्याच्या ५७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मराठा आरक्षणासंदर्भात डॉ. तांबे म्हणाले… महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : कारखान्याचे व्यवस्थापन कसे असावे, याचा आदर्श नमुना सहकार महर्षी थोरात सहकारी साखर कारखाना असून येथे होत असलेल्या उत्तम प्रकारच्या कामामुळे हा कारखाना सहकारातील इतर कारखान्यांसाठी मापदंड ठरला आहे, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांच्या हस्ते साध्या पद्धतीने झाला. यावेळी जेष्ठ नेते बाजीराव खेमनर, इंद्रजीत थोरात, सुधाकर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संगमनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील साखळी उपोषणाला संगमनेर मधील जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी उपोषणस्थळी उपस्थित राहत पाठिंबा दर्शविला आहे. “जय जिजाऊ जय शिवराय”, “मराठा आरक्षण आमच्या हक्काचे”, या घोषणांनी उपोषण स्थळ दुमदुमले होते. जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष डॉ. दिपाली पानसरे, डॉ. श्रद्धा वाणी, ॲड. सीमा काळे-सातपुते, माधुरी शेवाळे, वृषाली कडलग, स्नेहलता कडलग, वनिता कर्पे, नम्रता दिघे, सुधा नवले, सुदेशना वाणी, वृषाली साबळे, कस्तुरी शेवाळे आदींसह महिला यावेळी उपस्थित होत्या. वाणी यांनी संभाजी ब्रिगेडचा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले. ॲड. सीमा काळे-सातपुते म्हणाल्या, मराठा आरक्षण आमच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  राहाता : राहाता विधानसभा मतदारसंघात दहशतीचे झाकण उडाले आहे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे या जोडीने शेतकरी सभासद आणि कामगारांच्या हिताची भूमिका घेतली असून आजवर राहाता तालुक्यातील जनतेला गृहीत धरणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच आधी आमच्या बहिणींचे देवदर्शन आणि आता रेशन कार्ड धारकांना पाच किलो साखर हे निर्णय झालेले आहेत. थोरात-कोल्हे जोडीचा पायगुण चांगला असून त्यांच्यामुळेच जनतेची दिवाळी गोड होणार आहे, असे मत ज्येष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर यांनी व्यक्त केले. डॉ. गोंदकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नुकतेच गणेश सहकारी साखर कारखान्याचे धुराडे पेटले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : सर्वधर्म समभावाचा विचार जोपासत देशाच्या एकात्मतेसाठी अखंडपणे कार्य करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस पक्षाची अहमदनगर जिल्हा कार्यकारणी प्रांताध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर झाली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या या कार्यकारिणीमध्ये सचिन गुजर (वरिष्ठ उपाध्यक्ष), प्रशांत दरेकर, ॲड. कैलास शेवाळे, डॉ. एकनाथ गोंदकर, प्रा. हिरालाल पगडाल, मधुकरराव नवले, अजय फटांगरे, अंकुश कानडे, राकेश पाचपुते, बाबासाहेब दिघे, ज्ञानेश्वर मुरकुटे, संपतराव मस्के, कारलोस साठे, दादा पाटील वाकचौरे, बापूसाहेब काळदाते, बाबासाहेब कांदळकर, मिनानाथ पांडे, प्रकाश भोसले, श्रीनिवास बिहानी, बाबासाहेब गुंजाळ, लताताई डांगे, सचिन गायकवाड व रोहिदास…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : या राज्याचा एक उपमुख्यमंत्री काडीखोर आहे, असं विधान मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्यानंतर एक फूल आणि दोन हाफ हेच काडीखोर आहेत. यांनीच महाराष्ट्र पेटवला आहे. यांनाच महाराष्ट्र पेटलेला हवाय. यांनीच राज्यातील सर्व प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी हा प्रश्न चिघळत ठेवलेला आहे, असं टीकास्त्र शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री, आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सोडले आहे. राऊत म्हणाले, मरठा आरक्षणाचा मुद्दा या सत्ताधाऱ्यांनीच चिघळत ठेवला आहे. कारण, त्यांना इतर मुद्यांवरून लक्ष भरकटवायचं आहे. त्यामुळे जरांगे पाटील म्हणाले की, एक उपमुख्यमंत्री काडीखोर आहे तर तसं नाही, एक फुल आणि दोन हाफ हे सगळेच काडीखोर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – अहमदनगर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने उत्कृष्ट कामगिरी करताना तीन सुवर्ण पदकांसह सहा पदके मिळवली. जिल्हा क्रीडा कार्यालयाने आयोजित केलेली ही स्पर्धा भिंगार येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूलमध्ये पार पडली. अकरा वर्षांखालील मुलांच्या गटात सर्वेश जाधव याने सुवर्ण तर चौदा वर्षांखालील गटात सोहम मेहेर याने रौप्यपदक मिळवले. सतरा वर्षांखाली मुलींच्या गटात गुंजन जोशीने सुवर्ण आणि तनिष्का वर्पेने रौप्य पदकाची कमाई केली. तर, 19 वर्षांखालील गटात सर्वदा बाणखेलेने सुवर्ण व आविश्री इंदाणीने रौप्य पदक मिळवले. या संपूर्ण स्पर्धेत ध्रुव ग्लोबलच्या स्केटिंग खेळाडूंनी तीन सुवर्ण व तीन रौप्यसह एकूण सहा पदकांची कमाई केली.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता – खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झालेले असताना देखील शासनाने काढलेल्या सन २०२३ च्या खरिप हंगामातील दुष्काळ मुल्यांकनातील शासन निर्णयात अहमदनगर जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नसल्याने हे जिल्हाच्या पालकमंत्र्याचे अपयश नाही का? असा सवाल कृषीभुषण प्रभादेवी जनार्दन घोगरे यांनी उपस्थित केला आहे. दुष्काळी परिस्थितीचा अहमदनगर जिल्ह्याला देखील मोठा फटका बसलेला असताना शासन निर्णयात अहमदनगरचा समावेश करण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांच्या खरीपाच्या सोयाबीन, बाजरी या पिकांच्या सोंगण्या करुन खळे झालेली आहे. त्यातुन मिळालेले उत्पन्न पाहता येथील शेतकरी शंभर टक्के पिकविम्याचा परताव्याला पात्र आहेत. खरीप हंगामात शेतकर्‍यांनी घेतलेले सोयाबीन, बाजरी ही हलक्या मुरमाठ जमीनीवर घेतलेली पिके पावसाआभावी पुर्णपणे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : फटाक्याच्या स्टॉलसाठी आवश्यक असलेली परवानगी देण्याकरिता 800 रुपयांची लाच घेणाऱ्या संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत विभागाने पकडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. अहमदनगरच्या लाचलुचपत विभागाने पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांच्यावर ही कारवाई केली. दीपावली सणानिमित्त निंबाळे गावी फटाका स्टॉलसाठी संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या ना हरकत दाखल्याची आवश्यकता होती. आवश्यक असलेली ना हरकत परवानगी देण्यासाठी यादव यांनी तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची मागणी केली असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. यासंदर्भात संगमनेर तालुक्यातील निंबाळे येथील एका 20 वर्षीय तरुणाने अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मंगळवारी (31 ऑक्टोंबर) तक्रार केली होती. लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवकांना आत्महत्या करू नका अशी कळकळीची विनंती करून देखील राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आत्महत्येचे लोन आता संगमनेरपर्यंत येऊन धडकले आहे. आंदोलकांना भेटण्यासाठी आलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना “विखे पाटील परत जा, परत जा” या आंदोलकांच्या निदर्शनाचा सामना करावा लागल्यानंतर आता संगमनेरमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील झोळे गावामध्ये सागर भाऊसाहेब वाळे (वय 25 वर्ष) या तरुणाने गळफास घेऊन मंगळवारी (31 सप्टेंबर) पहाटे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सागर वाळे याने घराच्या मागे असलेल्या…

Read More