Author: Annant Ppangarkar
शहर पोलिसांच्या नव्या टीमची लक्षवेधी कामगिरी परजिल्ह्यातील टोळीकडून दरोड्याच्या साहित्यासह सुमारे तीन लाखाचा मुद्देमाल ताब्यात महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस दलात केलेल्या खांदेपालटानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. तृतीयपंथीयांच्या वेषात दरोड्याच्या तयारीतील सहा जणांची टोळी पकडण्यास शहर पोलिसांना यश आले. शहर पोलिसांचे हे मोठे यश मानले जात आहे. संजय मारुती शिंदे (वय 25 वर्षे रा. चिसखेड, ता. भोताळा, जि. बुलढाणा), ओंकार शंकर शेगर (वय 23 वर्षे रा. टाकळी तलाव, पो. ढोरपगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा, सुनिल बाबुराव सावंत (वय 32 वर्षे रा. टाकळी तलाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा, राजेश शंकर शेगर…
महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या धमकी प्रकरणी आरोपीकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीर याचे जम्मू काश्मीरमधील कुख्यात दहशतवादी बशिरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा सोबत होते, असं एनआयएच्या तपासात निष्पन्न झालं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात जयेश पुजारीने उर्फ शाकीरने जानेवारी आणि मार्च महिन्यात दोन वेळा गडकरींना धमकी दिली होती. या धमकी प्रकरणी नागपूर पोलिसांनी यापूर्वीच जयेश पुजारी याच्या विरोधात यूएपीए अंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. आता त्याच गुन्ह्यांमध्ये बशुरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशाला सहआरोपी बनवण्यात आले आहे. सध्या बशिरुद्दीन नूर अहमद उर्फ…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार सत्तेत असले तरी त्यांच्यात सर्व काही आलबेल नाही. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी शपथ घेतली असली तरी त्यांना अद्याप खाते वाटप करण्यात आले नाही तसेच मंत्रिमंडळ विस्तार देखील रखडला आहे. यामुळे तिन्ही पक्षाचे आमदार नाराज असल्याने या पार्श्वभूमीवर आता महायुतीने तीन पक्षांच्या समन्वयासाठी १२ जणांच्या समन्वय समितीची स्थापन केली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड हे या समितीचे प्रमुख समन्वयक आहेत. खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये आत्तापर्यंत बैठकांचा सिलसिला सुरू आहे. चर्चेच्या फेऱ्या होत असल्या तरी देखील अंतिम निर्णय समोर येताना दिसत नाही. तसेच अर्थ खाते राष्ट्रवादीला देण्यास…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – रोटरी क्लबसह विविध संस्थांनी आयोजित केलेला रक्तदान शिबिराला संगमनेरकरांचा मोठा प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये एकाच वेळी 327 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांना एक लाखाचे अपघाती विमा संरक्षण आणि छत्री भेट देण्यात आली. रक्ताची वाढती गरज लक्षात घेत रोटरी क्लब, टीएलसी ग्रुप, इनरव्हील क्लब, संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहत, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, निमा, आयएमए, आयडीए, आयएचएमए आदी संस्थांनी शुक्रवारी (7 जुलै) आयोजित केलेल्या या शिबिराचे उद्घाटन एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या हस्ते औद्योगिक वसाहतीमध्ये तर जागतिक स्तरावर संगमनेरचे नाव उंचावणाऱ्या सायकलपट्टू प्रणिता सोमन हिच्या हस्ते रोटरी नेत्र रुग्णालयात करण्यात आले. रक्तदात्यांमध्ये महिलांचाही मोठ्या संख्येने…
महाराष्ट्र संवाद न्यूज आपल्या वक्तव्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या आणि मंत्रिपदावर गंडांतराची शक्यता निर्माण झालेल्या राज्याच्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात न्यायालयाने खटला चालविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या समोरील अडचणी आणखी वाढल्या आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी आणि अपुरी माहिती दिल्याच्या कारणावरून राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोडच्या प्रथम वर्ग न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरलाल शंकरपेल्ली आणि पुण्यातील डॉक्टर अभिषेक हरिदास यांनी 2021 मध्ये दाखल केलेल्या याचिकेत हे आदेश देण्यात आले आहे. या संदर्भात न्यायदंडाधिकारी मीनाक्षी एम. धनराज यांनी सीआरपीसी 204 अन्वये कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या कलम 125 ‘अ’…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी कोणताही गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला नसताना केवळ राजकीय द्वेषातून त्यांची खासदारकी रद्द करून त्यांना बेघर करण्यात आले. गांधी यांच्यावरील अन्यायाविरोधात आज आम्ही एक दिवसाचे मौन सत्याग्रह आंदोलन केले. आंदोलन संपले असून आता भ्रष्ट भाजपचा राज्यभर भांडाफोड करून त्यांना सळो की पळो करून सोडणार असल्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. जनतेची भावना संसदेत मांडणाऱ्या निरपराध राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आलेल्या खोट्या आरोपांमागे भाजपचा हात असल्याचा आरोप पटोले यांनी बुधवारी केला. मंत्रालयाजवळ महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसच्या वतीने मौन सत्याग्रह करण्यात आला. यावेळी माध्यमांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्याच्या मंत्रिमंडळात नव्या मंत्र्यांचा समावेश होऊन आठवडा उलटला तरी सरकारचे खातेवाटप अद्याप जाहीर झालेले नाही. शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये खाते वाटपावरून मोठा पेच निर्माण झाल्याने खाते वाटपाचा तिढा आता दिल्लीत सोडविला जाणार आहे. त्यासाठी शिंदे फडणवीस पवार दिल्लीला जाणार आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन आठवडाभराचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांसह नव्या मंत्र्यांना अद्याप कोणतेही खाते देण्यात आले नसल्याने सध्या हे सर्वजण बिन खात्याचाच कारभार हाकत आहे. वास्तविक नव्या मंत्र्यांना दोन दिवसात खातेवाटप जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील अंतर्गत कलहामुळे अद्याप खातेवाटप जाहीर होऊ शकले नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटपाचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरमधील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सौरभ पगडाल यांनी इंग्लंडच्या बर्मिंगहॅमच्या एन.एच.एस. फाउंडेशन या नामांकित संशोधन संस्थेच्या दि रॉयल ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट व ऑर्थोस्कोपिक सर्जरीमधील फेलोशिप पूर्ण केल्याची माहिती डॉ. प्रदीप कुटे यांनी दिली. इंग्लंड मधील सर्वात जुन्या व सुप्रसिद्ध असलेल्या एन.एच.एस. फाउंडेशन ट्रस्टचे दि रॉयल ऑर्थोपेडिक हॉस्पिटलची स्थापना 1909 मध्ये झालेली असून या हॉस्पिटलमध्ये सुपर स्पेशालिटी ऑर्थोपेडिक हॉस्पिटल असून तेथे असलेल्या 17 सुसज्ज ऑपरेशन थिएटरमध्ये नामांकित व निष्णात ऑर्थोपेडिक सर्जनद्वारा दररोज सुमारे 50 मोठ्या व जखमेच्या आर्थोपेडिक सर्जरी होत असतात. या हॉस्पिटलमध्ये सर्जन डॉ. सौरभ पगडाल यांनी जॉईंट रिप्लेसमेंट व ऑर्थोस्कोपिक सर्जरीचे महिनाभराचे विशेष प्रशिक्षण…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांचे सर्वमान्य नेतृत्व आणि संगमनेरचा विकास राज्यासाठी दिशादर्शक असल्याचे स्पष्ट करत यावर्षी देखील राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे. हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी मंगळवारी माजी मंत्री, आमदार थोरात यांच्या ‘यशोधन’ या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी त्यांचे स्वागत केले. श्रीराम कुऱ्हे, पी. वाय. दिघे, अनिल सोमणी, नामदेव कहांडळ, गोरक्षनाथ वर्पे, विजय हिंगे, प्रा. बाबा खरात, संजय कोल्हे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक उपस्थित होते. यावेळी डख यांनी यशोधन कार्यालयातील कामकाजाची पद्धत समजावून घेतली. भेटी दरम्यान डख…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आपल्या नावावर तब्बल दोन मोठ्या उलाढालीच्या कंपन्या असल्याचा धक्का बावीस वर्षे वयाच्या एका बेरोजगार तरुणाला जीएसटीच्या आलेल्या 24 लाख 61 हजार रुपयांच्या बिलाच्या नोटीसमुळे बसला आहे. त्यामुळे धक्का बसलेल्या या तरुणाने थेट पोलीस स्टेशन गाठून आपली व्यथा पोलिसांपुढे मांडली. पोलिसांनी देखील या बेरोजगार तरुणाच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी तपास सुरू केला आहे. इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील वृत्त दिले असून त्यात म्हटले आहे की, उत्तर प्रदेश मधील बुलंद शहरातील रहिवासी असलेल्या देवेंद्र कुमारला 24 लाख 61 हजार रुपयांच्या थकीत जीएसटी बिलाची नोटीस आली. बांधकाम मजूर असलेल्या देवेंद्र कुमारला या नोटीसमुळे चांगलाच धक्का बसला. गेल्या काही महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर – सध्या सत्तारुढ असलेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या काळात राज्याची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. लोकशाहीत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन, मोर्चे काढले जातात. मात्र सध्या कायद्याचा गैरवापर करत आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे सत्र या सरकारकडून सुरू असल्याचा आरोप करीत दलित बांधवांनी शनिवारी काढलेल्या मोर्चा प्रकरणी सुमारे दीडशे जणांवर पोलिसांच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात आला याचा शिवसेनेचे (ठाकरे) शहरप्रमुख अमरभाऊ कतारी यांनी निषेध केला आहे. कतारी यांनी म्हटले आहे की, नांदेड येथील अक्षय भालेराव आणि मुंबई येथील हिना मेश्राम यांच्या हत्येच्या निषेधार्थ दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी शहर व तालुक्यातील दलित संघटनांच्या वतीने शनिवारी (8 जुलै) निळ्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर – जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करत मोर्चा काढल्या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी एकवीस प्रमुख पदाधिकाऱ्यांसह इतर सव्वाशे आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुमारे दीडशे लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोर्चेकर्यांमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यात मागासवर्गीय समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत नांदेड येथील मागासवर्गीय तरुण अक्षय भालेराव याची निर्घून हत्या, मुंबई येथे इंजीनियरिंगचे शिक्षण घेणारी युवती हिना मेश्राम हिच्यावर अत्याचार करून तिच्या झालेल्या हत्याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या दोघांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासह अन्य मागण्यासाठी शनिवारी (8 जुलै) विविध संघटनांच्यावतीने निषेधाच्या घोषणा देत प्रांताधिकारी कार्यालयावर निळा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या संदर्भात…
नूतन पदाधिकार्यांचे पदग्रहण; मालपाणी उद्योग समूहाकडून 21 लाखांची देणगी महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर- इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमनपदी झालेली निवड वैश्विक संघटनेकडून मिळालेली समाजसेवेची खूप मोठी संधी आहे. डिस्ट्रिक्टमधील हजारो महिलांच्या साथीने सेवाकार्याचा नवा आदर्श निर्माण करण्यासाठी यापुढे सांघिक पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन इनरव्हील क्लब डिस्ट्रिक्ट 313 च्या नूतन चेअरमन रचना मालपाणी यांनी केले. इनरव्हील क्लबच्या नूतन पदाधिकार्यांच्या पदग्रहण सोहळा डिस्ट्रिक्ट मधील 76 शाखांमधील 630 महिलांच्या उपस्थितीत ढोले पाटील लॉन्सच्या सभागृहात पार पडला. यावेळी मालपाणी बोलत होत्या. इंटरनॅशनल इनरव्हील क्लबच्या व्हाईस चेअरमन ममता गुप्ता, मावळत्या चेअरमन मुक्ती पानसे यांच्यासह डिस्ट्रिक्टच्या व्हाईस चेअरमन डॉ. शोभना पालेकर, सेक्रेटरी डॉ. आशा देशपांडे, खजिनदार…
आजच्या बदलत्या काळात तत्त्व जिवंत ठेवण्याचा संघर्ष : कुलगुरू संजीव सोनवणे चिन्नण्णाच्या माध्यमातून एक चांगले पुस्तक महाराष्ट्रासमोर: आमदार बाळासाहेब थोरात महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची प्रगल्भता आणि राजकीय क्षमता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात आहे. सध्याच्या परिस्थितीत चांगले दिवस आले असल्याने बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ विचारवंत लेखक डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केली. जयहिंद लोक चळवळ आयोजित चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या हिरालाल पगडाल लिखित ‘चिन्नण्णा’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे होते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण सुरू असताना माणसा-माणसातील संवेदना हरवत चालल्या आहे. अशा स्थितीत गावोगावी ग्रंथ मंदिरे उभी राहिल्यास सुसंस्कृत समाज निर्मिती होईल, असे प्रतिपादन पुण्याच्या बार्कलेज या आयटी कंपनीचे मानव संसाधन व्हाईस प्रेसिडेंट प्रीतम देशमुख यांनी केले. स्व. पतिंगराव देशमुख यांच्या स्मृति निमित्ताने देशमुख यांनी जवळेकडलग येथील सावरकर विचार युवा मंच संचलित स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयास ग्रंथ भेट दिले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव माऊली देशमुख होते. वाचनालयाचे अध्यक्ष गोकुळ खंडागळे, उपाध्यक्ष प्रताप कडलग, कार्यवाह सुनील कडलग, दिलीप कदम, श्रीमती प्रणिता देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, व्हाट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या जाळ्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – एक रुपयात पीक विमा योजना ही राज्य शासनाने सुरु केलेली महत्त्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. शेतकऱ्यांना अशा योजनेतून लाभ देणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य असल्याचे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राज्य शासनाने खरीप व रब्बी हंगामाकरीता सुरु केलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेचा प्रसार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रथाचे उद्घाटन महसूलमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या रथांना हिरवा झेंडा दाखवून संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना या योजनेची माहिती देण्यासाठी हे रथ जिल्ह्यामध्ये रवाना करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आगामी काळ हा निवडणुकांचा राहणार असून नगरपरिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने व क्षमतेने लढवत गद्दारी करणाऱ्या गद्दारांना घरी बसविण्याचे आवाहन शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या संघटक शुभांगी पाटील यांनी केले आहे. संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये शनिवारी होऊ घातलेल्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, ग्रामपंचायतीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संगमनेर तालुका महिला आघाडीच्या सक्षमीकरणाअंतर्गत नियोजनासाठी शुभांगी पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी पाटील बोलत होत्या. महिला आघाडीच्या उत्तर नगर जिल्हा संपर्क संघटक शुभदा शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सपना मोरे, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक आशा केदारी,…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष लेख / सुरेश पाटील महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास हे ध्येय घेऊन राज्यात सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ३० जून २०२३ रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहेत. या वर्षभराच्या कालावधीत महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी निळवंडे सारखे विविध प्रकल्प, योजना व विकासकामांना गती देत उत्तर अहमदनगर जिल्ह्याचा विकासाचा ध्यास घेतलेला दिसून येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या पाठबळामुळे वर्षभरात विविध प्रकल्पांना मंजूरी मिळाली आहे. उत्तर नगर पर्यायाने शिर्डीच्या विकासाला चालना मिळाली आहे. या वर्षभराच्या कालावधीत झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा हा संक्षिप्त आढावा. निळवंडेच्या डाव्या कालव्यातून…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – लाखो विद्यार्थी घडविणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जाणारे सर डॉ. मो. स. गोसावी यांचे रविवारी पहाटे पावणेदोन वाजेच्या दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते 88 वर्षांचे होते. शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. मो. स. गोसावी यांनी वयाच्या 23 व्या वर्षी बी. वाय. के. कॉलेजचे प्राचार्य पद भूषविले. त्यानंतर पुढील 37 वर्ष त्यांनी या महाविद्यालयात शैक्षणिक योगदान दिले. अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदाची धुरा गेल्या साठ वर्षांपासून ते सांभाळत होते. डॉ. मो. स. गोसावी यांच्या योगदानातून लाखो विद्यार्थी आज मोठ्या पदांवर, उद्योजक, राजकारणी, वैद्यकीय…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष / प्रवीण पुरो महाराष्ट्रातील सत्तेच्या पिपासूंचा नंगानाच गेल्या रविवारी सार्या जगाने अनुभवला. गेल्या वर्षी याच काळात हा नंगानाच गोहाटीपासून गोव्यापर्यंत आणि गोव्यापासून मुंबईपर्यंत निर्लज्जपणे सुरू होता, जवळपास सर्वांनीच तो ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. माणून नावाचा प्राणी किती निष्ठूर असतो, तो कसाही विकला जाऊ शकतो आणि विकला जाऊनही मालकावर कसा दुगाण्या झाडतो याचं उदाहरण देशभरातल्या जनतेला मिळालं. या नंगानाचाचे खलनायक होते अर्थातच देवेंद्र फडणवीस. फडणवीसांनी राज्याच्या राजकरणाचा बाजार करण्याचा जणू विडाच उचललेला दिसतो आहे. काहीही करा सत्ता ताब्यात घ्या, या त्यांच्यातल्या हवरटपणाने राज्याच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासला आहे. सत्तेसाठी आजवर माणसं फोडली जायची. आता थेट…
