Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरूपात धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले असून शिवसेना या एका नावालाही दोन्ही गटांसाठी परवानगी नाकारली आहे. यामुळे ठाकरे-शिंदे गटाचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव काय असेल, हे आता निवडणूक आयोगाच्या हाती राहणार आहे. या प्रकारामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य करण्यास मनसैनिकांना राज ठाकरेंनी बंदी घातली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या संदर्भात ट्विट करत आपली भूमिका योग्य वेळेस मांडणार असल्याचे सांगितले आहे. शिवसेनेतून एक मोठा गट घेऊन बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ चिन्हच गोठविले नाही तर शिवसेना देखील संपविल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. या संदर्भात राजकीय गोटातून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क चार बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या तिघा कर्मचाऱ्यांविरोधात अखेर घारगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते.तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भात अरुण हौशीराम बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वीज वितरण कंपनीच्या तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वायरमन भालेराव (पूर्ण नाव माहित नाही), जालिंदर लेंडे (पूर्ण नाव माहित नाही) आणि साहेबराव शिवाजी लेंडे (दोघे रा. खंदरमाळ, ता. संगमनेर अशी आरोपींची नावे आहे. आरोपी पैकी विजय सयाजी भालेराव याला अटक करण्यात आली आहे.शनिवारी वांदरकडा खंदरमाळवाडी येथे असलेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क खंदरमाळवाडी येथे विजेचा शॉक लागून ४ लहान मुलांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोषी व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. तसेच मृत मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ११ लाख रुपयांची मदत आणि या भागातील आदिवासी कुटुबीयांच्या घरकुलांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या.संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथे वीजेचा शॉक लागून अनिकेत अरुण बर्डे, ओंकार अरूण बर्डे, दर्शन अजित बर्डे व विराज अजित बर्डे या चार भावंडांचा ८ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. या कुटूंबाची राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज खंदरमाळवाडी येथे सात्वंनपर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी येथे झालेल्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या चार भावंडांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्याची मागणी खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात रविवारी सायंकाळी सात वाजता ते मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्षात भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली.पाण्यात पडलेल्या उच्च दाबाच्या वीज तारेचा प्रवाह छोट्याशा तळ्यातील पाण्यात उतरल्याने संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी येथील अनिकेत अरुण बर्डे (वय १२ वर्ष), ओंकार अरुण बर्डे (वय १० वर्ष), दर्शन अजित बर्डे (वय ८ वर्ष) व विराज अजित बर्डे (वय ६ वर्ष) या चार भावंडांचा शनिवारी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता.वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे…

Read More

महाराष्ट्राची राज्यसत्ता काबीज करण्याचं ईडीतंत्र आत्मसात झाल्यानंतर राज्यात होणार्‍या महानगर पालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थाही आपल्या ताब्यात आल्या पाहिजेत यासाठी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने आता पुन्हा रडीचा डाव सुरू केला आहे. सत्तेचा ताबा मिळवण्यासाठी केंद्रिय गृह खात्याच्या मदतीने राज्यात ईडी, सीबीआयचा उच्छाद सुरू असताना आता गल्लीतल्या सत्तेसाठी पोलिसांना कामाला लावण्याचं पाताळयंत्री कृत्य सुरू आहे. येत्या महिन्या-दोन महिन्यात राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या सार्‍या महानगरपालिका आपल्याच ताब्यात आल्या पाहिजेत, या आसुयेपोटी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचा फुटीर गट कामाला लागलं आहे. ज्यांची ताकद आहे, राजकीय शक्ती आहे, अशा कार्यकर्त्यांना वेचून त्यांच्या विरोधात पोलीस कारवाईचा सपाटा हेच सांगतं.यंत्रणांचा वापर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना फुटीनंतर राज्यात उद्भवलेला खरी शिवसेना कोणाची हा पेच कायम असतांना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठविण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे या दोघांनाही शिवसेना नांव वापरता येणार नसल्याचा निर्वाळा आयोगाने दिला आहे. पोटनिवडणूकीपुरता हा निर्णय असल्याचे सांगितले जाते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचीच खरी शिवसेना असल्याचा व धनुष्यबाण चिन्हदेखील त्यांच्याच गटाचे असल्याचा दावा केला होता. यामुळे राज्यात शिवसेनेत दोन गट पडले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या दोन गटात शिवसेना विभागली गेल्यामुळे शिवसेनेत अभूतपूर्व पेच निर्माण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क उच्च दाबाची वीजवाहक तार तुटून पडल्यामुळे या तारेचा धक्का लागून चार बालकांचा दुर्दैवी अंत झाला. सख्खी भावंडे यात मृत्युमुखी पडल्याने तालुक्याच्या पठार भागात शोककळा पसरली.संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या नांदूर खंदरमाळवाडी गावात ही घटना शनिवारी दुपारच्या वेळी घडली. ओमकार अरुण बर्डे (वय १० वर्ष’ अनिकेत अरुण बर्डे (वय १२ वर्षे) आणि विराज अजित बर्डे (वय ६ वर्ष), दर्शन अजित बर्डे (वय ८ वर्ष) अशी या दुर्दैवी भावंडांची नावे आहेत. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती मिळाली.महसूल प्रशासनाने या घटनेची दखल घेत तातडीने संबंधितांना सूचना केल्या घडलेला प्रकार महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना कळविण्यात आला…

Read More

मृतांचा आकडा १२ वर तर जखमींची संख्या ३८ बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याचे निष्पन्न चोवीस तासाच्या आत बस पेटण्याची दुसरी घटना महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शनिवार नाशिककरांसाठी अपघातवार ठरला. बस पेटण्याच्या दोन घटना नाशिक शहर व जिल्ह्यात घडल्या. एका घटनेत मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली तर दुसऱ्या घटना मात्र सुदैवाने सर्व प्रवाशांचे प्राण वाचले आहे. नाशिकमध्ये नांदूरफाटा येथील घटनेत मृतांच्या संख्येत वाढ होवून ही संख्या १२ वर गेली तर ३८ प्रवासी जखमी असल्याचे समोर आले आहे. मृतकांच्या वारसांना पंतप्रधान निधीतून प्रत्येकी दोन लाख तर राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींवरील उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क : कमी पटसंख्येच्या मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील 17000 शाळा बंद होण्याची चिन्हे आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असून या विरोधात छात्र भारतीने राज्यस्तरीय आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून शनिवारी संगमनेरमध्ये शंभर एसटी बसेसला सरकारच्या निषेधाचे पोस्टर चिटकविण्यात आले आहे.दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने सरकारी शाळांना प्राधान्य देत या शाळांचा लौकिक जगभरात पोहोचविला आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने सरकारी शाळांना टाळे लावण्याचे धोरण अवलंबिले आहे. एकाच देशातील शिक्षणाचे हे चित्र विदारक आहे. कमी पट संख्येच्या राज्यभरातील जवळपास 17000 मराठी शाळांवर सरकारच्या या निर्णयामुळे गंडांतर येणार आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क : नासिकच्या औरंगाबाद रस्त्यावरील नांदूर नाका परिसरात मिरची चौकामध्ये शनिवारी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास खासगी लक्झरी बसला अपघातानंतर भीषण आग लागली. या आगीमध्ये दहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. घटनास्थळी प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. अपघातग्रस्त बस यवतमाळहुन मुंबईकडे चालली होती. मात्र शनिवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास ही बस नांदूर नाक्याजवळ मिरची चौकात आल्यानंतर चौफुलीवर एका टँकरला धडकली आणि अपघातानंतर लगेचच चिंतामणी ट्रॅव्हल्स या बसने पेट घेतला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाचे तीन-चार वाहने तसेच चार-पाच रुग्णवाहिका झाल्या होत्या. पेटलेली अपघातग्रस्त बस विजविण्याचा अर्धा तासाहून अधिक वेळ प्रयत्न सुरू होता. आग एवढी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर तालुक्यातील दोघा व अकोले तालुक्यातील एका सराईत गुन्हेगारांस प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी एक वर्षाकरिता हद्दपार केले असल्याची माहिती संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दिली आहे. रमेश संतू पावसे (रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर), सागर उर्फ शक्तिमान तुकाराम कोकण (रा. धांदरफळ खुर्द, संगमनेर) आणि ऋतिक किसन बांडे (रा. खडकी ता. अकोले) अशी या हद्दपार केलेल्या तिघा गुन्हेगारांची नावे आहेत. अकोले आणि संगमनेर तालुका पोलिसांकडून पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तसेच पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रांत अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्याकडे या आरोपी विरोधातील हद्दपारीचे प्रस्ताव पाठविले होते. मंगरूळ यांनी तीनही गुन्हेगारांना एक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क निळवंडे धरण आणि कालव्यासाठी अविश्रांत श्रम केल्यानेच ही कामे आज मार्गी लागली आहेत. ती आता कोणीही थांबवू शकत नाही. यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचा आम्ही सातत्याने उल्लेख करतो, मात्र या कामात तुमचे योगदान काय, समन्यायी पाणी वाटपावर होतात आम्ही संघर्ष करत असताना तुम्ही गप्प का होतात, असा थेट सवाल राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूलमंत्र्यांना नाव न घेता केला आहे. तालुक्यातील तळेगाव दिघे येथे विविध विकास कामांची उद्घाटने माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. संगमनेरच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग घडवून आणणाऱ्या आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार टीकेचे धनी ठरले. शिवसेनेतून 40 आमदारांना घेऊन बाहेर पडलेले आणि नव्याने शिंदे-फडणवीस सरकार बनविलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबतचे युती आपल्याला कधीच मान्य नव्हती, शिवसेनेने त्यांचे हिंदुत्व सोडले अशी टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी ही युती कधीच मान्य केली नसती. असे देखील शिवसेनेतून बाहेर पडलेले अनेक नेते म्हणत आहेत. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. ज्या शरद पवारांवर आज टीका केली जाते त्या पवारांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पक्षविरहीत राजकीय संबंध कसे होते हे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अन्न औषध प्रशासनाने नाशिकरोड भागात केलेल्या तब्बल १८ लाख रुपयांचा मिक्स गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला व सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे. प्रशासनाने ज्या गोडावूनवर छापा टाकला तेथून अनेक पानटपऱ्यासह दुकानांमध्ये गुटखा पोहचविला जात असल्याचा अंदाज आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात यासंदर्भात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा दोन पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली. अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी नाशिक रोडवरील सचदेव आर्केड या ठिकाणी असलेल्या गोडावूनवर छापा टाकला असता त्यांना तेथे ३ लाख ६१ हजार ५७० रुपयांचा वैधानिक इशारा नसलेला सिगारेटचा साठा आढळून आला. हा माल ताब्यात घेत गोडावून सील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क खरी शिवसेना कोणाची यावरुन न्यायालयात वाद विवाद सुरु असतांना दसरा मेळाव्यासाठीही शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला न्यायालयात जावे लागले. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवाजी पार्कवर ठाकरेंच्याच शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतांना बीकेसीत शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा होत आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी दसरा मेळाव्याला गर्दी जमविण्यासाठी चालविलेल्या कोट्यावधी रुपयांच्या उधळपट्टीची ईडी आणि आयकर विभागाने चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. लोंढे म्हणाले, शिंदे गट राज्याच्या विविध भागातून एसटी व खासगी बसेसमधून कार्यकर्ते आणत आहे. यासाठी एसटी महामंडळाकडे दहा कोटी रुपये भरले असून ते मोजण्यासाठी महामंडळाला दोन दिवस लागले, असे वृत्त माध्यमातुन समजले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यातील २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्याचा फतवा राज्य शासनाने काढला आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात छात्रभारती संघटना आक्रमक झाली आहे. मराठी शाळा ह्या गोरगरीब जनतेच्या आहेत, त्या कोणाच्या बापाच्या नाहीत असे ठणकावत छात्रभारतीने या निर्णयाचे पत्रक फाडून टाकत आणि संगमनेरच्या प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदविला आहे. कमी पटसंस्थेच्या राज्यातील सतरा हजारापेक्षा अधिक शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याची शासनाची ही कृती अत्यंत निषेधार्ह आहे, शासनाच्या या निर्णयाचा आणि गरिबांचे शिक्षण बंद करणाऱ्या मानसिकतेचा छात्रभारती तीव्र निषेध व्यक्त करत असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सेवा पंधरवड्यानिमित्ताने राबविलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून १७३४ जातवैधता पडताळणी प्रमाणपत्रांचे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन वाटप करण्यात आले असून जिल्ह्यातील १११ महाविद्यालयांमधील प्राचार्य व कर्मचाऱ्यांना जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या ऑनलाईन प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. जातप्रमाणपत्र वाटप करतांना त्रुटी राहू नयेत म्हणून जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची ऑनलाईन वेबनारद्वारे कार्यशाळा घेण्यात आली. अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) विकास पानसरे यांनी दिली. सामान्य नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित अर्जांचा कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत राबविण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिक्षणातून खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होते. बोलीभाषा ही प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्याला बोलीभाषा चांगली येते तोच इतर भाषांवर प्रभुत्व गाजवू शकतो. सर्व शिक्षण हे बोलीभाषेतून मिळाल्याने ते ज्ञान वाढीस अधिक पूरक ठरते. असे प्रतिपादन दिल्लीच्या जेएनयु विद्यापीठाचे प्रा. शरद बाविस्कर यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात ‘भुरा एक शैक्षणिक आत्मचिंतन’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे होत्या. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे, सहसचिव दत्तात्रय चासकर, रजिस्टर बाबुराव गवांदे, प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, उपप्राचार्य शिवाजीराव नवले, डॉ. बाळासाहेब वाघ, समन्वयक प्रा. लक्ष्मण घायवट, प्रा. तुळशीराम जाधव, प्रा. हेमलता राठोड आदी उपस्थित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील शिधापत्रिकाधारक जनतेची दिवाळी गोड करणार आहे. शिधापत्रिकाधारकांना अल्पदरात म्हणजेच प्रत्येकी 100 रुपयात दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणार आहे. दसरा मेळाव्या आधीच घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे शिधापत्रिका धारकांना रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल देण्याची योजना असून, त्यापोटी सरकारी तिजोरीवर सुमारे 500 कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. दिवाळी तोंडावर आल्याने कमी कालावधीत वस्तूंचा पुरवठा करावा, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रचलित निविदा प्रक्रियेला छेद देत, यावेळी थेट वायदे बाजारातून या वस्तूंची खरेदी करण्याचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत घेतला आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत न्यायालयाने 10 ऑक्टोबर पर्यंत वाढ केल्याने राऊत यांना दसराही तुरुंगातच घालवावा लागणार आहे. त्यामुळे उद्याचा शिवसेनेचा दसरा मेळावा त्यांच्या गैरहजेरीत होणार आहे. खासदार राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय होऊन त्यांची सुटका होईल असा अंदाज होता मात्र न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 10 ऑक्टोंबर पर्यंत पुन्हा वाढ केली आहे. तोपर्यंत राऊत यांना तुरुंगातच राहावे लागेल. 10 ऑक्टोंबरलाच त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात व्यासपीठावर राऊत यांच्या नावाची खुर्ची रिकामी ठेवण्यात…

Read More