Author: Annant Ppangarkar

खासदार सदाशिव लोखंडे यांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून संगमनेरमधील बहुचर्चित ठरलेल्या म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी आणि नगरपालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यासाठी ७ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. मागील वर्षी पावसाळ्यात म्हाळुंगी नदीवरील पूल पूर्णपणे वाहून गेला होता. त्यामुळे शहरातील साईनगर पंपिंग स्टेशन, घोडेकर मळा या भागात जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी म्हाळुंगी नदीवरील पूल होण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे पूल बांधण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर खासदार लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमधील प्रतिक सुखदेव इल्हे याची बुधवारी डेन्मार्क येथील Maersk या अत्यंत नामांकित कंपनीत प्लेसमेंट झाली. प्रतिकने NRTI Badoda Gujarat (गतिषक्ती विश्व विद्यालय) या नामांकित भारत सरकारच्या शासकीय कॉलेजमधून सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये एमबीए पदवी घेतली आहे. अतिशय उच्च दर्जाच्या समजल्या जाणाऱ्या या कॉलेजमध्ये शिकणारा प्रतिक हा नगर जिल्ह्यातील पहिलाच विद्यार्थी आहे. भारतातून फक्त शंभर मुलांची दरवर्षी या अभ्यासक्रमासाठी निवड होते. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाअंतर्गत हे एकमेव विश्व विद्यालय आहे. अभ्यासक्रमदेखील तुलनेत खूप अवघड असतो. प्रतिकने उत्तम गुण मिळवत सदर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. प्रतीक उत्तम खेळाडू असून स्केटिंग प्रकारामध्ये त्याने राज्य तसेच देशपातळीवर अनेक पदके मिळविली आहेत. B.Sc.Agri…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके प्रकाशित करणार्‍या ‘चपराक’ प्रकाशनने आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. नाशिक येथील युवा कवी आणि गीतकार प्रशांत केेंदळे यांचे ‘विठु नाम’ हे भक्तीगीत वारीच्या निमित्ताने प्रदर्शित केले आहे. सध्याचा आघाडीचा गायक गौरव चाटी यांनी ते आर्त आणि सुमधुर स्वरात सादर केले आहे. कोल्हापूरच्या प्रवीण ऐवळे यांनी ते संगीतबद्ध केले आहे. पदार्पणातीलच या गीताला रसिक श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे प्रकाशक आणि निर्माते घनश्याम पाटील यांनी सांगितले. चपराक प्रकाशनने राज्यभरातील नव्या-जुन्या लेखकांची पुस्तके प्रकाशित केली. 2002 सालापासून ‘साहित्य चपराक’ हे वाङमयीन मासिक प्रकाशित होते. या मासिकातील निवडक कथा, लेखांच्या अभिवाचनाचे व्हिडिओ चपराकच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज आमच्या पोळ्या करणाऱ्या बाईला कणिक भिजवता भिजवता मध्येच फोन आला म्हणून हात धुवून त्या फोनवर दोन-तीन मिनिटं बोलल्या आणि मग पुढील बराच वेळ भिंतीकडे तोंड करून WhatsApp वर मेसेजेसची देवाणघेवाण करत होत्या. दहा-बारा मिनिटं होऊनही त्यांचं परत कामाकडे वळण्याचं चिन्ह दिसेना, तेव्हा आजींनी त्यांना विचारलं, “इंदू, काय झालं गं, सर्व ठीक आहे ना?” इंदूने चेहरा आजीकडे केला तेव्हा कळलं की डोळ्यातून पाणी वाहत होतं. पुढील काही वेळात कळलं ते असं, त्यांच्या लातूर येथे राहणाऱ्या मावस भावाच्या साडेचार वर्षाच्या मुलाला ऑपरेशनच्यावेळी भूल दिल्यानंतर झालेल्या कॉम्प्लिकेशन्समुळे त्याच्या फुफुसांवर परिणाम होऊन त्याचं श्वसन धोकादायक पातळीवर कमी झालं होतं. त्या जोडप्याचं…

Read More

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : कृषी विभागामार्फत निरीक्षकांनी केलेल्या तपासणीमध्ये दोषी आढळून आलेल्या ४ बियाणे विक्री केंद्राचे व २ किटकनाशके विक्री केंद्रांचे परवाने निलंबीत करण्यात आले आहेत. निविष्ठा उत्पादकांनी किंवा जिल्हयामधील निविष्ठा विक्री केंद्र चालकांनी कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन करु नये अन्यथा त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे यांनी म्हटले आहे. खरीप हंगाम सुरु झालेला असुन बाजारामध्ये शेतक-यांची बि-बियाणे, खते व इतर कृषि निविष्ठा खरेदीसाठी लगबग सुरु झालेली आहे. खरीप हंगाम सन २०२३-२४ साठी शेतक-यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिकच्या दोन शिक्षणाधिकाऱ्यांचे लाचेचे प्रकरण ताजे असतानाच राज्याचा शिक्षण विभाग दिवसेंदिवस लाचखोरीने ग्रासल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहे. आता तर चक्क चेकनेच 75 हजार रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार एसीबीच्या कारवाईत समोर आला आहे. तिघा लाचखोरांवर एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचखोरीचे विविध प्रकार समोर येत असतानाच आता चेकद्वारे लाच खाणारे तिघेजण एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. यात शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक आणि लिपिकाचा समावेश आहे. यासंदर्भात अँटी करप्शन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार विनोद शंकर जाधव (वय 42 वर्ष, मुख्याध्यापक, महात्मा फुले हायस्कूल, एरंडोल) नरेंद्र उत्तम वाघ (वय 44 वर्ष, कनिष्ठ लिपिक, महात्मा फुले हायस्कूल,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मित्रा….!!! ‘ते’ भडकवतील , तुला राहावणार नाही , तरीही जागचा हलू नकोस , तुला शपथ आहे पुस्तकांची , तू दगड उचलू नकोस !! धर्म कधीच संकटात नसतो, तुझा ही धर्म धोक्यात नाही,! कुण्या भुरट्यांमुळे तुझ्या आदर्शांचा अपमान होत नाही,!! कर बळकट भावनांना, वारंवार दुखू देवू नकोस,! कर दुर्लक्ष थोड इकडं तिकडं लक्ष देऊ नकोस,!! तुझ स्वतःच मत असावं, दुसऱ्याने पढवलेल बोलू नकोस,! तुला शपथ आहे पुस्तकांची, तू दगड उचलू नकोस !! दोनेक वर्षा नंतर , सुटेल सारं कोड ! निवडणुका जवळ आहेत ओळखून घे थोडं !! हे बघ ही सर्व मतांची समीकरणं आहेत ! एका आड एक…

Read More

बुधवारी सकाळी पर्यावरण प्रेमींनी पुन्हा जाळल्या वाळूच्या गोण्या! अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्यात नवे वाळू धोरण आणले असले तरी या धोरणाला तिलांजली देण्याचे काम त्यांचे विशेष लक्ष असलेल्या संगमनेर शहरात होत आहे. वाळू धोरणाची पायमल्ली होत असताना संगमनेरमधील महसूलचे अधिकारी नेमके करतात तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरातून वाहणाऱ्या प्रवरा नदीतून वाळू तस्करी सुरू असल्याचा प्रकार पर्यावरण प्रेमींनी बुधवारी सकाळी पुन्हा एकदा समोर आणला आहे. प्रवरा नदी परिसरात गंगामाई घाटावर फिरायला जाणाऱ्या पर्यावरण प्रेमींनी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नदी काठावरील पायऱ्यांवर वाळूने भरलेल्या गोण्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सेवानिवृत्त डीवायएसपी असलेल्या सासऱ्याने आपल्या मुलाच्या अपरोक्ष मुलीसमान असलेल्या सुनेवर लैंगिक अत्याचार करून सासरा-सुनेच्या नात्याला काळिमा फासल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पत्नीने पतीला सांगितल्यानंतर पतीनेही नराधम वडिलांची बाजू घेत पीडित पत्नीला मारहाण करून माहेरी हाकलून दिले. याप्रकरणी सोलापूरच्या विजापूर नाका पोलीस ठाण्यात बापलेकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. सेवानिवृत्त डीवायएसपीच्या शिक्षक असलेल्या मुलाबरोबर पीडित तरूणीचा विवाह गेल्याच वर्षी झाला होता. विवाह झाल्यानंतर तिची महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची इच्छा होती. त्यानुसार तिने महाविद्याविद्यालयात प्रवेश घेतला होता. पती शिक्षक असल्यामुळे त्यास दररोज शाळेत जावे लागायचे. त्यामुळे त्याने पत्नीला शिक्षणासाठी महाविद्यालयात नेण्या-आणण्याची जबाबदारी वडिलांवर सोपविली होती. त्यामुळे सासरा कधी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलेल्या धमकी प्रकरणी अटक केलेल्या सागर बर्वे याला मुंबईच्या महादंडाधिकारी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी बर्वे यांच्याकडून हस्तगत केलेला लॅपटॉप आणि मोबाईल यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीची चौकशी करावयाची आहे. तसेच या प्रकरणात अन्य संशयित आरोपींचा सागर बर्वे यांच्याशी काही संबंध आहे का? याचा देखील तपास करावयाचा आहे. आरोपीने आक्षपार्ह टिपणी करून दोन समूहात किंवा समाजात विविध समूहामध्ये कलह निर्माण केल्याच्या आरोपामुळे तपास होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाला सांगत पोलिसांकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. मात्र न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. आरोपी सागर बर्वे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राज्यात शिर्डी आणि चिमूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात येणार असून याबाबतचा अतिशय महत्त्वाचा ठराव आज मंत्रीमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे‌, अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी‌ दिली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. जिल्हा प्रशासनाचे बळकटीकरण करण्याच्या तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व चंद्रपूर जिल्हयातील चिमूर येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणे बाबतचा प्रस्ताव राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीमंडळ बैठकीत मांडला. शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जगात अनेक नावाजलेली व दैदिप्यमान यश मिळवलेली माणसे आहेत. त्यांचे यश आपल्याला दिसते मात्र त्यामागील त्यांचे प्रयत्न दिसत नाही. अशाच यशस्वी व्यक्तींपैकी एक म्हणजे क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर. प्रत्येकाला सचिन व्हावेसे वाटते पण सचिनसारखे कष्ट नको असतात. असे चालणार नाही. तुम्हाला जर यशाच्या शिखरावर जायचे असेल व इच्छित ध्येय गाठायचे असेल तर योग्य दिशेने प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन संगमनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले. विद्या विद्यापीठ संचलित व्हिजन कोचिंग इन्स्टीट्युटच्यावतीने आयोजित केलेल्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विदयापीठाचे अध्यक्ष डॉ. नामदेव गुंजाळ होते. प्रा. राहुल मिश्रा, प्रा. सुनिल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक : गेल्या महिनाभरापासून रखडलेल्या बदल्यांना अखेर मुर्हूत लागला आहे. राज्य सरकारने नाशिक विभागातील बदल्यांचे आदेश जारी केले असून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या संगमनेरचे तत्कालीन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांची नाशिक जिल्हा निवडणुक उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर या पदावर कार्यरत असलेल्या स्वाती थविल यांची उपजिल्हाधिकारी पाटबंधारे क्रमांक १ येथे बदली करण्यात आली आहे. संगमनेरचे तत्कालीन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांची महिनाभरापूर्वी नाशिक येथे बदली करण्यात आली होती मात्र त्यांना नियुक्तीचे ठिकाण देण्यात आले नव्हते. मंगरूळे यांनी संगमनेरमध्ये २०१९ ते २०२३ या कार्यकाळात संगमनेर उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहिले. संगमनेरला येण्यापूर्वी त्यांनी २०१६ ते २०१९ यादरम्यान नासिक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – शहरातील जोर्वे नाका येथे जोर्वे येथील आठ तरुणांवर झालेला प्राणघातक हल्ला, त्यानंतर त्याचे जोर्वे गावात उमटलेले पडसाद, शहरातील भगवा मोर्चा नंतर समनापुर गावात पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्यासमोर झालेली दगडफेक प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरलेल्या पोलीस निरीक्षक ढुमणे यांची नगर कंट्रोलला तडकाफडकी महिनाभराच्या आतच बदली करण्यात आली आहे. त्यांचा पदभार प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्याकडे तीन महिन्यांसाठी सोपविण्यात आला आहे. मंगळवारी रात्री वमने यांनी तालुका पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतली. जोर्वे येथील तरुणांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर संगमनेरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यात शहर पोलीस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निर्ढावलेल्या दागिने चोरांनी पोलीस यंत्रणेला पोलीस यंत्रणेला आव्हान देतानाच सोमवारी दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पावणेतीन लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना शहरातील अकोले नाका परिसरात घडली. संगमनेरमध्ये दागिने आणि दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. उपविभागाचा पदभार घेतलेल्या उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासमोर या गुन्हेगारीचा बीमोड करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. शहर पोलीस ठाण्यात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेले कर्मचारी देखील चोरांचा अद्याप शोध लावू शकलेले नाही. त्यामुळे या पोलीस ठाण्यात निश्चितच पाणी कुठेतरी मुरतंय असे दिसते. या दोन्ही अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्याचा विशेषतः कर्मचाऱ्यांचा बारकाईने अभ्यास करून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – गुन्हेगारीचे माहेरघर झालेल्या संगमनेरमध्ये दागिने चोरीचा सिलसिला सुरूच आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रात्री जेवणानंतर फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढत धूम स्टाईलने पोबारा केला. या प्रकारामुळे दागिने चोरीच्या घटनेत आणखी एका गुन्ह्याची वाढ झाली. बस स्थानकापासून जवळच असलेल्या पावबाकी रस्त्यावर रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या संदर्भात जानकीनगरमध्ये दूधगंगा पतसंस्थेजवळ राहणाऱ्या सविता शशिकांत मुळे वय 65 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औषध विक्रेते असलेले शशिकांत मुळे हे रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जेवणानंतर पत्नी सविता यांच्यासोबत फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. पावबाकी रस्त्याने फिरत असताना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पिकअप चालकाला चौघांनी मारहाण करत पिकअपसह सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्याची घटना नाशिक पुणे महामार्गावरील गुंजाळवाडी शिवारात घडली. दरम्यान काही वेळानंतर पोलीस पथकासह पिकअपचा शोध घेतला असता ती बेवारस स्थितीमध्ये जवळच कासारवाडी मध्ये आढळून आल्याचे समोर आले आहे. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्री चोरीची ही घटना घडली. अधिक माहिती अशी, महेश रतीलाल पंचाळ हा वाहन चालक पिकअप घेऊन गुजरातहून नासिक-पुणे मार्गाने कर्नाटकला जात असताना सोमवारी रात्री सव्वा बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान पिकअप घेऊन गुंजाळवाडी शिवारातून उड्डाणपूल पास करून जात असताना लघुशंकेसाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात अशी घटना घडली, तेव्हा सर्वांनी त्यांना सांभाळून घेतले होते, त्यामुळे विरोधकांनी आळंदीतील प्रकरणावरून राजकारण करू नये, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. मंदिरात प्रवेश देण्याच्या कारणावरून रविवारी आळंदीमध्ये पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये वाद झाला हा वाद एवढा विकोपाला गेला की शेवटी पोलिसांना वारकऱ्यांवर लाठीचार्ज करावा लागला. या घटनेचे व्हिडीओदेखील समोर आले आहेत. तर वारकऱ्यांवर कोणताही लाठीहल्ला करण्यात आलेला नाही, असे राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे. यानंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर चांगलीच टीका करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून संगमनेरमध्ये देखील शिवसेनेच्या ठाकरे गटाने सरकार विरोधात सोमवारी सकाळी निषेध आंदोलन केले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त १२ ते २६ जूनपर्यंत ‘नशामुक्ती भारत पंधरवडा’ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेत जिल्हाभर व्यापक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्याअनुषंगाने जिल्ह्यात महाविद्यालयातील समान संधी केंद्रांमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी दिली आहे. भारत सरकारने अंमली पदार्थाच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग्स मुक्त ‘भारत’ चा संकल्प केला आहे. त्याअनुषंगाने ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने १२ ते २६ जून या कालावधीत ‘नशामुक्त भारत पंधरवडा’ जाहीर करून त्याबाबत सर्व राज्यांना अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अंमली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर -रविवारी आळंदी येथे श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा दरम्यान वारकऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याविरोधात सोमवारी सकाळी संगमनेरमध्ये शिवसेनेने (ठाकरे) शिंदे-फडणवीस सरकारविरोधात निषेध आंदोलन केले. शिवसेना वारकरी भजनी मंडळाच्यावतीने शिंदे-फडणवीस सरकारच्या निषेधार्थ व राजीनामाच्या मागणीसाठी संगमनेर बस स्थानकासमोर हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी वारकऱ्यांच्या वेशात पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह केलेल्या या आंदोलनाने लक्ष वेधून घेतले होते. रविवारी आळंदी येथील श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी व पोलिसांमध्ये मंदिर प्रवेशावरून वाद उपस्थित झाला व त्याही पुढे जाऊन भगवा ध्वज खांद्यावर घेऊन हरीनामाचा गजर करणाऱ्या वारकऱ्यांवर पोलिसांनी अमानवीपणे लाठीचार्ज केला. ह्या घटनेने संपूर्ण…

Read More