Author: Annant Ppangarkar
संगमनेर, प्रतिनिधी – जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि गौण खनिजाचे विनापरवाना उत्खनन करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध आता जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची गय न करता त्यांच्यावर ‘मोक्का’ (MCOCA) किंवा ‘एमपीडीए’ सारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पोलीस व महसूल प्रशासनाला दिले आहेत. संगमनेर तालुका दौऱ्यादरम्यान आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज संगमनेर तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामांचा आणि प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी…
संगमनेर, प्रतिनिधी – साकूरमधील नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि ग्रामपंचायतीचे नेटके नियोजन पाहून जिल्हाधिकारी अक्षरशः भारावून गेले होते. यावेळी त्यांनी साकूर ग्रामपंचायतीच्या कामांचे तोंडभरून कौतुक केले आणि साकूरला पुन्हा एकदा भेट देण्यासाठी नक्की येईल, असा शब्दही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांना दिला. गावांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यभर राबविल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत संगमनेर तालुक्यातील साकूर ग्रामपंचायतीने केलेल्या लोकाभिमुख कामांची अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी गुरुवारी (दि. २२ जानेवारी) प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी साकूर शिवारातील खंडोबा डोंगराच्या पायथ्याशी ग्रामपंचायतीने विकसित केलेल्या नक्षत्र घनवन उद्यान व तुलसी वृंदावनाची बारकाईने पाहणी केली. विशेषतः महर्षि पराषर व…
शाळा परिसरातील तंबाखू विक्री बंद करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा; ‘Team-RGSS’चे संगमनेर पोलिसांना निवेदन
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० यार्ड परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेली तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा आणि सिगारेटची विक्री तात्काळ बंद करण्यात यावी, या मागणीसाठी राहुल गांधी समर्थक संघाच्या वतीने (Team-RGSS) संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देण्यात आले. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, तंबाखू नियंत्रण कायदा (COTPA) २००३ नुसार शैक्षणिक संस्थेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर सक्त मनाई असतानाही संगमनेरमध्ये अनेक ठिकाणी शाळांच्या अगदी जवळ पानटपऱ्या आणि दुकानांमधून सर्रास गुटखा व सिगारेट विक्री सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य व भविष्य धोक्यात येत असून, हा…
अहिल्यानगर – जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम उघडली असून, स्थानिक गुन्हे शाखेने मिरजगाव आणि खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत धडक कारवाई केली आहे. या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी दोन जेसीबी, चार ट्रॅक्टर आणि वाळू असा एकूण ८२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अनेक आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातील अवैध वाळू व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार हृदय घोडके, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे व अमोल कोतकर यांच्या पथकाने ही…
मुंबई (वडाळा) – शेतजमीन आणि घराच्या वादातून दोन नातेवाईकांनी एका महिलेला शिवीगाळ करत अंगावर धावून गेल्याची घटना वडाळा येथे घडली आहे. याप्रकरणी वडाळा पोलिसांनी संगमनेर आणि बारागाव नांदूर येथील दोन व्यक्तींविरुद्ध अदखलपात्र गुन्हा (NCR) नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सुमन रामदास वाघमारे आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यामध्ये मूळ गावी असलेली शेतजमीन आणि मुंबईतील घरावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. हा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. गुरुवारी (२२ जानेवारी २०२६) सकाळी १० वाजेच्या सुमारास, तक्रारदार महिला त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या अजय नावाच्या व्यक्तीच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या किशोर दादू वाघमारे (वय ४६) आणि कैलास बाबूराव…
संगमनेर, प्रतिनिधी – बोटा येथील स्व. शेखर शेळके यांनी क्रिकेट खेळाप्रती दाखवलेली निष्ठा आणि त्यांचे योगदान आजही पठार भागात स्मरणात आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर यांनी ‘स्व. शेखर शेळके चषक २०२६’ आयोजित करून त्यांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव केला असल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले. घारगाव येथे स्व. म्हातारबा लक्ष्मण आहेर प्रतिष्ठान संचलित धर्मवीर छत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीने या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ आमदार अमोल खताळ आणि स्व. शेखर शेळके यांच्या मातोश्री नंदा शेळके यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख…
दैनिक राशीभविष्य: मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाची प्रशंसा होईल आणि प्रलंबित कामे मार्गी लागतील. आर्थिक आघाडीवर काही सकारात्मक घडामोडी घडतील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ – आज तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे संयमाने काम घेणे हिताचे ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना शब्द जपून वापरा. शक्य असल्यास आज कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका. मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक आहे. मित्रांच्या सहकार्याने एखादे अवघड काम सहज पूर्ण होईल. व्यापारात…
संगमनेर | अनंत पांगारकर – संगमनेर तालुक्यातील सुमारे १० हजार कामगारांसाठी संजीवनी ठरणारा ‘ESIC’ (राज्य विमा प्रतिष्ठान) सेवा दवाखाना मंजूर झाला असून, या निर्णयावरून आता तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. नाशिक क्षेत्रीय कार्यालयाने ४ जून २०२५ रोजी काढलेल्या या आदेशाचे श्रेय घेण्यासाठी महायुतीचे आमदार अमोल खताळ आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्यात जबरदस्त चढाओढ पाहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांनी हा दवाखाना आपल्याच पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचा दावा केल्याने नक्की कामाचा धनी कोण? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला असून ज्या दिवशी दवाखाना कृतीत येईल तो संगमनेरकरांसाठी सुदिन असेल. आमदार अमोल खताळ यांनी या यशाचे श्रेय महायुती सरकार आणि पालकमंत्री राधाकृष्ण…
अहिल्यानगर – श्रीगोंदे तालुक्यातील हिंगणी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातील दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा छडा लावण्यास अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून १० लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर त्यांचा तिसरा साथीदार फरार आहे. हिंगणी येथील मंदिरात चोरी झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा समांतर तपास करत होते. तपासादरम्यान आरोपींचा गुन्हेगारी अभिलेख आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे ही चोरी सराईत गुन्हेगार भास्कर पथवे याच्या टोळीने केल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या राहत्या परिसरात सलग चार दिवस शोध घेतला, मात्र…
संगमनेर, प्रतिनिधी – आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, महाराष्ट्र राज्य विमा प्रतिष्ठान (ESIC) अंतर्गत बंद करण्यात आलेले सेवा दवाखाने आता संगमनेर येथे स्थलांतरित करून पुन्हा सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याचा फायदा संगमनेर तालुक्यातील सुमारे १०,००० विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबांसाठी होणार आहे. नगरपालिका निवडणुकीदरम्यान मालपाणी उद्योग समूहातील कामगारांशी संवाद साधताना आमदार अमोल खताळ यांनी कामगार रुग्णालयाबाबत शब्द दिला होता. हा शब्द पाळत त्यांनी नागपूर अधिवेशनादरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे ठोस मांडणी केली होती. या प्रयत्नांना यश आले असून, नाशिक क्षेत्रीय कार्यालयाने ४ जून २०२५ च्या आदेशानुसार संगमनेरमध्ये सेवा दवाखाने सुरू करण्याची कार्यवाही तात्काळ…
संगमनेर, प्रतिनिधी – शहरासह परिसरात सध्या चोरट्यांनी उच्छाद मांडला असून महिलांचे मंगळसूत्र ओढण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात संगमनेर भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुधवारी पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. सध्या सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडलेले असतानाच दागिने चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सध्या हिंदू समाजातील महिलांचे हळदी-कुंकवाचे कार्यक्रम सुरू असून वाण खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. याचाच फायदा घेत बस स्टँड, अशोक चौक, बाजारपेठ मेनरोड, नवीन नगर रोड, नाशिक रोड, इंदिरानगर आणि मालदाड रोड यांसारख्या वर्दळीच्या भागात दुचाकीवरून येणारे चोरटे महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून नेऊ लागले आहेत. या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.…
विशेष लेख | प्रणित सहाणे अहमदनगर जिल्ह्याच्या, विशेषतः संगमनेर तालुक्याच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात ‘कॉम्रेड’ ही पदवी केवळ नावासमोर लावण्यासाठी नसून ती कृतीतून सिद्ध करणारे नेतृत्व म्हणजे कॉम्रेड पंढरीनाथ बाबुराव सहाणे, ज्यांना अवघा जिल्हा ‘सहाणे मास्तर’ म्हणून मोठ्या आदराने ओळखतो. आज त्यांच्या निधनाला १० वर्षे पूर्ण होत असताना, त्यांनी कष्टकरी, शेतमजूर आणि शोषितांसाठी दिलेला लढा पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभा राहतो. मास्तरांचा जीवनप्रवास हा निव्वळ राजकारण नव्हता, तर तो प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आणि विषमतेविरुद्ध पुकारलेला एक अखंड एल्गार होता. संघर्षाची मुळे आणि वैचारिक जडणघडण- १२ जानेवारी १९२९ रोजी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी या ऐतिहासिक गावात मास्तरांचा जन्म झाला. अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत…
संगमनेर, प्रतिनिधी – गेल्या अनेक महिन्यांपासून स्वच्छतेच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि स्वातंत्र्यपूर्व काळात १०७ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली जिल्हा परिषदेच्या शाळेची जुनी वास्तू कारखान्याच्या ‘अग्निझुंज’ या अग्निशमन दलाच्या वाहनाद्वारे पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करण्यात आली असून, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या या विधायक उपक्रमामुळे शाळेने आता कात टाकली असून, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या जिल्हा परिषद केंद्र शाळेत राहुल गांधी समर्थक संघ (RGSS) आणि सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. राजापूर येथील ही जिल्हा परिषद शाळा अनेक दिवसांपासून स्वच्छतेच्या प्रतीक्षेत होती. रस्त्यावरील धूळ, पटांगणातील पालापाचोळा आणि जुन्या इमारतीवर साचलेली धूळ…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील कामगार आणि मध्यमवर्गीय विमाधारकांसाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य सुविधेच्या प्रश्नावर तोडगा निघाला असून, नागपूर विभागातील बंद पडलेले ‘सेवा दवाखाने’ आता संगमनेरमध्ये स्थलांतरित करण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. आमदार तांबे यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, यामुळे तालुक्यातील १० हजार कुटुंबांना हक्काची आरोग्य सेवा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य विमा प्रतिष्ठानच्या (महा-राकावि) नाशिक क्षेत्रीय कार्यालयाने ४ जून २०२५ रोजी या संदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत. या निर्णयानुसार, नागपूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ‘महाल’ आणि ‘न्यू सेक्टर’ या भागांतील…
दैनिक राशीभविष्य: मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाची दखल घेतली जाईल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभल्याने मानसिक समाधान मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, मात्र आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ- आज तुम्हाला आर्थिक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कामाचा ताण वाढण्याची शक्यता असली, तरी नियोजनाने तुम्ही त्यावर मात कराल. खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात, त्यामुळे पथ्य पाळावे. मिथुन- मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस प्रगतीकारक आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी…
संगमनेर | प्रतिनिधी तालुक्यातील वडगाव पान येथील जमीन अतिक्रमण प्रकरणात सक्षम महसूल अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असतानाही प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप गणेश रासने यांनी केला आहे. शासकीय मोजणी, पोलीस बंदोबस्त आणि पंचनामे होऊनही केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे ताबा मिळत नसल्याने, येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सहकार महर्षी क्रीडा संकुल समोर कुटुंबीयांसह उपोषणास बसण्याचा इशारा रासने यांनी दिला आहे. या संदर्भात प्रशासनाला दिलेल्या निवेदनात गणेश रासने यांनी म्हटले आहे की, वडगाव पान येथील स.नं. १३/१ (क्षेत्र ०.६१ आर) ही त्यांची मालकीची मिळकत असून, शासकीय मोजणीत या जमिनीच्या पूर्वेकडील सुमारे १७ आर क्षेत्रावर जनार्दन सहादू गायकवाड व इतरांनी अतिक्रमण केल्याचे निष्पन्न…
संगमनेर, प्रतिनिधी – “नाशिक-पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा पर्याय नसून या संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या विकासाची जीवनवाहिनी आहे. ही रेल्वे थेट मार्गानेच झाली पाहिजे ही आमची ठाम मागणी आहे. आता या संघर्षासाठी ‘अभी नही, तो कभी नही’ अशी वेळ आली आहे,” अशा शब्दांत आमदार सत्यजीत तांबे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष – नाशिक-पुणे रेल्वेच्या थेट मार्गासाठी गेल्या काही काळापासून जनआंदोलन उभे राहिले आहे. या प्रश्नी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मागितली होती. मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बैठक घेण्याचे कबूल केले असले, तरी अद्याप या बैठकीची तारीख निश्चित झालेली नाही. त्यामुळे या महत्त्वपूर्ण बैठकीची…
पुणे/अहिल्यानगर | विशेष प्रतिनिधी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शिरूर परिसरात केलेल्या एका मोठ्या कारवाईने संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ उडवून दिली आहे. २ कोटी १० लाख रुपयांचे ‘मेफेड्रोन’ (MD) ड्रग्ज जप्त केल्यानंतर, या काळ्या धंद्याचे धागेदोरे चक्क अहिल्यानगर पोलीस दलातील कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी पुणे पोलिसांनी श्याम गुजर नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले असून, खाकी वर्दीला लागलेल्या या डागामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार अमली पदार्थ विरोधी मोहीम राबवली जात होती. १७ जानेवारी रोजी शिरूर परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना ड्रग्ज विक्रीची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार १८ जानेवारीच्या…
संगमनेर, प्रतिनिधी – फिनलंडमधील प्रगत शिक्षण व्यवस्थेचा सखोल अभ्यास केल्यानंतर, आता संगमनेर शहरातील नगरपालिका शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी पुढाकार घेतला आहे. समाजातील गरजू आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मुख्य आधार असलेल्या नगरपालिका शाळांमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून शाळांच्या कामकाजाची पाहणी सुरू केली आहे. यामुळे लवकरच नगरपालिकेच्या शाळांचे रूप पालटणार असल्याचे संकेत मिळत असून शैक्षणिक क्षेत्रात या दौऱ्याची मोठी चर्चा रंगली आहे. नगरपालिका शाळांमधून उद्याचे सक्षम नागरिक घडत असतात, मात्र बदलत्या काळानुसार या शाळांमधील पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि अध्यापन पद्धतीमध्ये सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे. हीच गरज ओळखून डॉ. मैथिली तांबे यांनी शिक्षण…
संगमनेर, प्रतिनिधी – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे बंद झाल्याने संगमनेर तालुक्यातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आज सामाजिक कार्यकर्ते गुड्डू इंजिनिअर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिलांनी एकत्र येत उपविभागीय अधिकारी अरुण उंडे यांना निवेदन दिले. मुंडे यांच्या वतीने नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी उपस्थित महिलांनी आपल्या अडचणी मांडत हप्ते पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. यावर प्रशासनाने आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असून, तालुक्यातील अनेक अत्यंत गरीब महिलांनी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांचे हप्ते अचानक बंद झाले…
