Author: Annant Ppangarkar

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील तांडा वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांनी केलेल्या मागणीनुसार, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी इतर मागास प्रवर्ग व बहुजन कल्याण मंत्री, अतुल सावे साहेब यांच्याकडे संगमनेर तालुक्यातील विविध कामांना मंजुरी देऊन निधीची तरतूद करण्याची विनंती केली होती. स्थानिक नागरिकांकडून वारंवार विकासकामांची मागणी होत असल्याने, तांबे यांनी ही महत्त्वपूर्ण मागणी शासनाकडे केली होती. तांबे यांनी एकूण ३३…

Read More

संगमनेर – एकेकाळी ‘एअरपोर्ट’ म्हणून राज्यात गौरवपूर्ण उल्लेख होणारे आणि संगमनेर शहराचे वैभव असलेले हायटेक बसस्थानक मागील वर्षभरापासून अनाधिकृत फ्लेक्सबाजीच्या विळख्यातून अखेर मुक्त झाले आहे. शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही हतबल ठरलेल्या पालिका प्रशासनाला जे जमले नाही, ते राज्य निवडणूक आयोगाने लावलेल्या आचारसंहितेमुळे साधले. आचारसंहिता लागू होताच रातोरात हे सर्व फ्लेक्स हटले आणि तब्बल एक वर्षानंतर संगमनेरच्या या देखण्या बसस्थानकाने मोकळा श्वास घेतला आहे. वर्षभर फ्लेक्सचा विळखा आणि प्रशासनाची ‘हतबलता’- लोकनेते तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे हायटेक बसस्थानक शहराची ओळख आणि अभिमान आहे. प्रशस्त जागा, शॉपिंग कॉम्प्लेक्स, आधुनिक इमारत आणि आकर्षक प्रवेशद्वार यामुळे हे ठिकाण…

Read More

संगमनेर – शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून, त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढून ट्रॅक्टर खरेदी करायचे आणि त्यानंतर शेतकऱ्यांना गंडा घालून ते ट्रॅक्टर परस्पर विक्री करणाऱ्या दोघांना श्रीरामपूर पोलिसांच्या अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने जेरबंद केले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. या कारवाईत पोलिसांनी भालचंद्र अशोक साळवी (रा. वनकुटे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) व अभिजीत सुनील भांडवलकर (रा. सिव्हिल हडको अहिल्यानगर) दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ९ ट्रॅक्टर आणि २ मोटारसायकल असा एकूण ७१ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अन्य शेतकऱ्यांची मोठी फसवणूक टळली आहे. भालचंद्र…

Read More

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शासकीय निकषांनुसार निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुकीस मंजुरी देणारे आदेश नुकतेच जारी केले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर निवडणुकीची मोठी जबाबदारी… निवडणुकांचे सर्व कामकाज शांततेत, पारदर्शकतेने आणि सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासकीय सेवेतील अनुभवी अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी यांचा समावेश आहे. हे नियुक्त अधिकारी निवडणुकीदरम्यान राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करतील. जिल्ह्यातील विविध नगरपरिषदांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक…

Read More

मेष (Aries) – आज तुम्हाला संयम आणि धीराने काम करावे लागेल, ज्यामुळे कठीण समस्यांवरही सहज उपाय मिळू शकेल. कुटुंबाशी संबंधित कामासाठी प्रवास होण्याची शक्यता आहे. कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सरकारी कामांमध्ये चांगल्या वकिलाचा सल्ला घ्यावा लागेल. वृषभ (Taurus) – आज तुम्हाला घर आणि कामाच्या जगातून बाहेर पडून निसर्गाचा आनंद घ्यावासा वाटेल. जुन्या मौल्यवान वस्तूंसाठी केलेले सौदे फायदेशीर ठरतील. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठीही आजचा दिवस चांगला आहे. काही खर्चाचा सामना करावा लागेल. मिथुन (Gemini) – व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचे काम अत्यंत काळजीपूर्वक करा आणि इतरांची मदत घ्या. तुम्ही नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता. अनावश्यक वादात अडकणे…

Read More

मुंबई – अखेर संगमनेरसह राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (४ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करताच राज्यात तात्काळ आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, दुसऱ्याच दिवशी ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. या प्रक्रियेद्वारे एकूण ६,८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार, उमेदवारांना १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या दरम्यान अर्ज दाखल करता येतील. दाखल अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होईल, तर माघारीची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त…

Read More

संगमनेर – संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र नरसिंह देशमुख यांची कार्यकाल पूर्ण होण्याआधीच बदली करण्यात आली आहे. देशमुख यांच्या बदलीमुळे संगमनेरमध्ये सुरू असलेला वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांच ग्रहण अद्यापही सुरूच आहे. देशमुख गेल्या काही दिवसापासून बदलीसाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा अखेरीस पूर्णत्वास आली आहे. देशमुख यांच्या रिक्त जागेवर पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  देशमुख यांची बदली अहिल्यानगरच्या ए. एच. टी. यु. या शाखेकडे करण्यात आली असून त्यांच्याकडे पोलीस उपाधीक्षक (मुख्यालय) अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.  जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सहा पोलीस निरीक्षक व तिघा सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत केलेल्या अधिकाऱ्यांच्या विनंती…

Read More

नान्नज दुमाला-पिंपळे परिसरासाठी मंजूर उपसा जलसिंचन योजनांवरील स्थगिती तातडीने रद्द करण्याची माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी संगमनेर – निळवंडे धरणाचे काम जनतेने विसरावे म्हणून भोजापूर चारीचा बोलबाला केला जात असल्याची टीका काँग्रेस नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तसेच, त्यांनी नान्नज दुमाला, पिंपळे परिसरासाठी मंजूर केलेल्या उपसा जलसिंचन योजनांवरील स्थगिती तातडीने रद्द करून कामे सुरू करण्याची मागणी केली आहे. पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे आणण्याचे स्वप्न जनता खूप दिवसांपासून ऐकत आहे, असेही ते म्हणाले. पिंपळे येथे विविध सहकारी सेवा सोसायटीच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते. यावेळी जिल्हा बँकेचे माधवराव कानवडे, पांडुरंग पाटील…

Read More

संगमनेर – संगमनेर शहरात उघडकीस आलेल्या ड्रग्स इंजेक्शन विक्री प्रकरणासंदर्भात राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र (RGSS) या संघटनेने कठोर भूमिका घेत पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे व संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे यांना एक निवेदन देत या देशविघातक कृत्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी सध्या सुरू असलेल्या तपासात आणखी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. संगमनेर शहरात ‘एम.आर. व्हिटॅमिन सप्लिमेंट शॉप’ नावाच्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी वापरली जाणारी औषधे (मेफेनटर्माइन सल्फेट इंजेक्शन्स) विकणाऱ्या आदित्य किशोर गुप्ता याला अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईत २.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात राजकीय…

Read More

संगमनेर – अवैध धंद्यामुळे आधीपासूनच चर्चेत असलेल्या संगमनेरमध्ये थेट नशेच्या इंजेक्शनची होणारी विक्री समोर आल्यानंतर आता सोमवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजासारखा अमली पदार्थ जवळ बाळगून त्याची चोरटी विक्री करणाऱ्या एका आरोपीला जेरबंद करण्यात यश आले आहे. या संदर्भात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.  गेल्या आठवड्यामध्ये संगमनेरमध्ये पोलिसांनी राबविलेल्या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये नशेचे इंजेक्शन्स विक्री होत असल्याचे समोर आले होते. आदित्य किशोर गुप्ता याला पोलिसांनी पकडल्यानंतर या प्रकरणाचे राजकीय कनेक्शन आणि पोलिसांवर मोठा राजकीय दबाव आल्याचे समोर आल्याने हा विषय शहरात चर्चेचा विषय ठरला. दबावानंतरही पोलिसांनी केलेली कारवाई शहरात कौतुकाचा विषय ठरली होती. गेल्या काही…

Read More

मेष (Aries) – महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींचा आध्यात्माकडे कल राहील. तुम्हाला अचानक खूप पैसे मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भविष्याची चिंता कमी होईल. व्यवसायात चांगली प्रगती होईल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. वृषभ (Taurus) – कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस असून नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. मनःशांतीसाठी ध्यान करा. मिथुन (Gemini) – महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल आणि कुटुंबात आनंदी क्षण असतील. नवीन कल्पना आणि योजनांमुळे करिअर व व्यवसायात यश मिळेल. ताण कमी करण्यासाठी चालणे किंवा योग करा. कर्क (Cancer) – तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल; मानसन्मान व…

Read More

संगमनेर – संगमनेर तालुक्यातील १८ गावांतील शेतकरी आणि नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. येथील वीजपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून स्थिर व अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नातून तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी मंजूर झाला आहे. ‘जिल्हा नियोजन’मधून मिळालेल्या या भरीव निधीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची आणि विशेषतः शेतकऱ्यांची दीर्घकाळापासूनची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. या निधीतून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणाऱ्या १८ गावांमध्ये प्रामुख्याने अंभोरे, कुंभारवाडी, कोळवडे, घुलेवाडी, जाखोरी, जोर्वे, डिग्रस, तळेगाव, नांदुरी दुमाला, मांडवे बु., मालुंजे, रणखांब वाडी, राजापूर, वरवंडी (जनतानगर), हिवरगाव पावसा, मालुंजे आणि संगमनेर खुर्द या गावांचा समावेश आहे. या भागात…

Read More

संगमनेर: संगमनेर तालुक्यात गेल्या काही महिन्यात अमली पदार्थ आणि ड्रग्सची वाढती तस्करी अत्यंत चिंतेची बाब बनली असून, यामागे ‘हप्तेखोरी’ हेच एकमेव कारण असल्याची थेट टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. थोरात यांनी ‘हिंदुत्वाचा खोटा बुरखा पांघरून’ तालुक्यात काळे धंदे सुरू करणाऱ्या लोकांवरही सडकून टीका केली. तरुणाईचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या गुन्हेगारांवर आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या शक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, रणजीतसिंह देशमुख, पांडुरंग पाटील घुले, कांचनताई थोरात, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, डॉ. जयश्रीताई थोरात,…

Read More

मोहसीन रशीद शेख शहरात नगरपालिका निवडणुकीची चाहूल लागताच वातावरण पुन्हा रंगत आलं आहे. यावेळी मात्र रस्त्यांवर आणि सोशल मीडियावर अचानक उगवलेले “समाजसेवक” नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. गेल्या काही वर्षांत जे चेहरे गल्ल्यांमधून गायब झाले होते, तेच आता पुन्हा “जनतेच्या सेवेसाठी” मैदानात उतरले आहेत. प्रश्न एवढाच — ही सेवा समाजासाठी आहे की निवडणुकीसाठी? प्रत्येक निवडणुकीच्या काळात असे हंगामी समाजसेवक सक्रिय होतात. काहीजण मदतीपेक्षा फोटो काढण्यात जास्त रस घेतात, तर काहींसाठी समाजसेवा म्हणजे फक्त पोस्टर, बॅनर आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धी. “सेवा” हा शब्दच आजकाल ब्रँडिंगचा भाग झाला आहे. खऱ्या अर्थाने समाजसेवा ही निस्वार्थ भावनेतून होते. ती निवडणुकीच्या तारखांवर अवलंबून नसते. पण…

Read More

पुणे – पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत मोठी धडक कारवाई करत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी (वय ३५) याला तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. एसीबीच्या माहितीनुसार, आरोपी उपनिरीक्षकाने तक्रारदाराच्या आशिलाला गुन्हेगारी प्रकरणात मदत करण्यासाठी आणि त्याच्या वडिलांचा जामीन मिळवून देण्यासाठी तब्बल २ कोटी रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणात तक्रारदाराचे वडील एका गुन्ह्यात अटकेत होते आणि प्रमोद चिंतामणी या प्रकरणाचा तपास अधिकारी होता. त्याने या लाचेच्या रकमेतील १ कोटी रुपये स्वतःसाठी आणि उर्वरित १ कोटी रुपये वरिष्ठ…

Read More

मेष (Aries) – आरोग्याची काळजी घ्या. ताप, सर्दीचा त्रास होऊ शकतो. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिवस. वृषभ (Taurus) – आर्थिक लाभ, पदोन्नती मिळण्याची शक्यता. वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. ज्येष्ठ मंडळींकडून धनलाभाची शक्यता. अविवाहितांसाठी विवाहयोग संभवतो. मिथुन (Gemini) – तुमच्या कामाची प्रशंसा होईल. सर्जनशीलता वाढेल. जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल. नोकरीत सुस्थता लाभेल. शिक्षणासाठी दुसऱ्यांना मदत कराल. कर्क (Cancer) – धनलाभ होऊ शकतो. भावनिक संतुलन आणि आत्मपरीक्षणाचा दिवस. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. लेखकांच्या लिखाणास प्रसिद्धी मिळेल. सिंह (Leo) – सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल. शिक्षक/प्राध्यापकांच्या प्रसिद्धीत भर पडेल. कन्या (Virgo)…

Read More

संगमनेर – संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे दहशतीचे वातावरण आहे. याच मालिकेतील आणखी एका ताज्या घटनेत, शनिवारी (१ नोव्हेंबर) हिवरगाव पावसा येथे एका ३० वर्षीय महिलेवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला असून, ती महिला गंभीर जखमी झाली आहे. अर्चना संदीप टेमगिरे (वय ३०) असे जखमी महिलेचे नाव असून ही घटना हिवरगाव पावसा शिवारात घडली. महिला आपल्या शेतातून घरी परतत असताना बिबट्याने दबा धरून तिच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये महिलेला गंभीर जखमा झाल्या आहेत, यामुळे तिची प्रकृती चिंताजनक बनली आहे. महिलेने प्रसंगावधान राखून केलेल्या आरडाओरड्यानंतर परिसरातील नागरिक तात्काळ धावून आले, यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या महिलेला स्थानिक नागरिकांच्या…

Read More

संगमनेर – गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे ‘कायदा आणि सुव्यवस्था’ संपुष्टात येऊन गुन्हेगारांचे राज्य आले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, संगमनेरला अमली पदार्थाचा विळखा घट्ट होत असतानाच आता खुद्द पोलीस ठाण्याची सूत्रेच ‘मद्यधुंद’ कर्मचाऱ्यांच्या हाती असल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्तव्यावर असताना दारूच्या नशेत असलेल्या एका हवालदाराने तक्रारदाराशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित कर्मचारी हा यावेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला असून यामुळे नागरिक आणि पोलीस दलाच्या प्रतिमेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वरिष्ठांनीही हात टेकल्याने संगमनेरकरांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. जनतेचे सेवक की मालक? – संगमनेर शहर…

Read More

संगमनेर (प्रतिनिधी) : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टेमगिरे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अर्चना संदीप टेमगिरे यांची संगमनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षा व कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी रुग्णालयात जाऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि त्यांना धीर दिला. हिवरगाव पावसा परिसरातील टेमगिरे वस्ती येथे शेतात काम करून घरी परतणाऱ्या तीस वर्षीय अर्चना संदीप टेमगिरे यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण हिवरगाव पावसा परिसरात अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही माहिती मिळताच डॉ. जयश्री थोरात यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली आणि…

Read More

संपदा मुंडे या होतकरू महिला डॉक्टरच्या अकाली मृत्यूने सारा महाराष्ट्र सुन्न झाला असताना या डॉक्टरच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्याला मारणार्‍या मारेकर्‍यांची रीघ पाहून या राज्यातल्या जनतेला झोप कशी लागते, असा प्रश्‍न पडला आहे. इतका मुर्दाड झालेला महाराष्ट्र कोणीच कधी पाहिला नाही. ज्याचं नाव या तरुणीने घेतलं, तोच निर्दोष असल्याचं सांगण्यासाठीचा आटापिटा पाहिला की सत्तेतली माणसं किती पिपासू झालीत हे लक्षात येतं. काँग्रेसच्या अनेक सत्ता या राज्याने पाहिल्या. पण असले पिपासू स्मरणात नाहीत. राजकारणाचा बोलबाला करत जो तो मारेकर्‍याचा पाठीराखा बनतो, तेव्हा महाराष्ट्र फुकट गेल्यात जमा झाला आहे, असंच वाटतं. इतकी अवनती या राज्याची झाली आहे. एकेकाळी महिलेच्या संरक्षणार्थ तिच्या मागे ठामपणे…

Read More