Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे कौतुक केले आहे. ‘उदारमतवादी अर्थव्यवस्थेमुळे देशाला नवी दिशा मिळाली. त्यासाठी देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे’, अशा शब्दांत त्यांनी मनमोहन सिंग यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. दिल्लीत टॅक्स इंडिया ऑनलाईन पोर्टल आयोजित अवॉर्ड कार्यक्रमांमध्ये गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले, तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी 1991 साली सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताला एक नवी दिशा मिळाली. उदारमतवादी आर्थिक धोरण शेतकरी आणि गरिबांसाठी असते. उदारमतवादी आर्थिक धोरणामुळे एखाद्या देशाचा कसा विकास होतो, याचे उत्तम उदाहरण चीन आहे. मनमोहन सिंग यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे महाराष्ट्राचा मंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचे मंगळवारी संगमनेरमध्ये भव्य स्वागत करत समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केले. संगमनेरसह अकोले, कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, नेवासे येथील शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शिवसेना पदाधिकारी निवडीवरून उत्तर नगर जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन गटात मोठे रणकंदन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुख बबन घोलप आणि जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या समर्थकांमध्ये दोन गट पडले असून या दोन्ही गटांनी एकमेकांच्या नेत्याविरोधात आंदोलने केली होती. पक्षांतर्गत गटबाजी या निमित्ताने थेट पुणे प्रथमत:च समोर आली. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडींना स्थगिती देण्यात आल्याने संगमनेरमध्ये जिल्हाप्रमुख खेवरे यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले होते. त्यामुळे खेवरे समर्थकांनी पोलीस…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क फॉक्सकॉन, वेदांता सेमीकंडक्टर असे एका पाठोपाठ एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरणारी असून टेक्निकल शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी राज्यात रोजगार निर्मिती न होणे आणि येणारे उद्योग परराज्यात जाणे, यामुळे येथील बेरोजगारीत मोठी वाढ होणार असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले. सह्याद्री महाविद्यालयामध्ये झालेल्या युवक करिअर मार्गदर्शन मेळाव्यात आमदार डॉ. तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील होते. डॉ. बाळासाहेब वाघ, प्रा. शिवाजी नवले, प्रा. लक्ष्मण घायवट व्यासपीठावर उपस्थित होते. तांबे म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील एक प्रगतशील राज्य आहे. मात्र सध्या नव्याने सत्तारूढ झालेल्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क हिमाचलमधील काँग्रेसचे माजी सरचिटणीस धर्मपाल ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या सहवीस नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. या सर्वांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीमुळे हिमाचलमध्ये काँग्रेसला निवडणुकीपूर्वीच मोठा झटका बसला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका जाहीर झालेल्या असून येत्या चार दिवसात म्हणजेच 12 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होत आहे. तत्पूर्वीच या नेत्यांनी ऐन निवडणुकीच्या माहोलमध्ये मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी सुधन सिंह यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला आहे. यावेळी सिमला येथील भाजप उमेदवार संजय सुद हे देखील उपस्थित होते. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तब्बल 26 नेते काँग्रेस…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले टोल नाका प्रशासना विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलेले उपोषण महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर सोमवारी सायंकाळी मागे घेण्यात आले. 31 डिसेंबर पर्यंत आंदोलकांच्या मागण्या पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन प्राधिकरणाचे तांत्रिक व्यवस्थापक अनिल गोरड यांनी जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांना दिले. अनेक निष्पाप नागरिकांचे जीव जाऊन देखील, शेकडो लोक जखमी होऊन देखील, महामार्गावरील खड्ड्यामुळे अनेकांना विकलांगपणा येऊन देखील जागे न होणाऱ्या हिवरगाव पावसा येथील टोल प्रशासनाकडून केवळ वाहनचालकांकडून टोल वसुली करणाऱ्या टोल प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले होते. पुणे नाशिक महामार्गावर हिवरगाव पावसाळ्यातील दोन प्रशासनाच्या कार्यालयासमोर सुरू…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सोमवारी रात्री तेलंगणामधून महाराष्ट्रामध्ये पोहोचली आहे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात देगलूर मध्ये आली असताना या यात्रेचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. स्वागता दरम्यान यात्रेला महाराष्ट्रात देखील इतर राज्याप्रमाणे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. खासदार गांधी गुरुनानक जयंतीच्या पूर्वसंध्येला यादगार साहिबजादे बाबा जोरावर सिंहजी फतेहसिंहजी गुरुद्वारामध्ये पारंपारिक शिखांच्या वेशात पोहोचले. तेथे त्यांनी गुरुनानकांसमोर सौहार्द आणि समानतेसाठी प्रार्थना केली. त्यांच्यासोबत माजी मंत्री अशोक चव्हाण, नाना पटोले यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते. देगलूर मध्ये मोठा उत्साह आणि वातावरण काँग्रेसमय ‘नफरत छोडो भारत जोडो’चा संदेश देणारी गांधी यांच्या नेतृत्वाखालील…
राज्याच्या गृह विभागाने काढले बदल्यांचे आदेश; राज्यातील तब्बल 113 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्याच्या गृह विभागाने सोमवारी तब्बल 113 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यापैकी 104 जणांना नियुक्ती देण्यात आली आहे तर नऊ अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे त्यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे काढले जाणार आहेत. बदल्यांमध्ये नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना मुंबईमध्ये उपायुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने राज्याच्या पोलिस दलात सोमवारी मोठे फेरबदल केले. गृह विभागाने काढलेल्या आदेशामध्ये प्रसाद अक्कानारू, श्रीमती श्वेता खेडकर, विजयकांत सागर, प्रशांत वाघुडे, विशाल गायकवाड, अजित बोराडे, दत्ता नलावडे, दत्तात्रय कांबळे आणि श्रीमती ज्योती क्षीरसागर या अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे गृह विभागाने आज काढलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सातत्याने भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटावर टिकास्त्र सोडणारे पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉग्रेसमधील मातब्बर नेते व प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या कन्या मेघना काकडे-माने यांनी मातोश्रीत उध्दव ठाकले यांच्या उपस्थितीत ‘शिवबंधन’ हाती बांधले आहे. मुंबईच्या अंधेरीस्थित असलेल्या काकडे-माने यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत ‘मशाल’ हाती घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. काकडे-माने यांच्या शिवसेना प्रवेशावेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह नीलम गोर्हे, सुषमा अंधारे, अनिल परब, सचिन अहिर, आदेश बांदेकर हे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. काकडे-माने यांचे वडील अंकुश काकडे हे राष्ट्रवादीतील बडे प्रस्थ आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे ते प्रवक्ते असून आजही त्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर जिल्ह्यात 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात न्यायालयीन प्रकरणे आपसात सामंजस्याने मिटविण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे प्रकरणांची यादी सादर करण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा आणि जिल्हा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी केले आहे. भारतीय दंड संहितेच्या फौजदारी प्रसंहिता कलम ३२० प्रमाणे (न्यायालयाच्या परवानगीने) 298, 312, 323, 325, 334, 335, 337, 338, 341, 342, 343, 344, 346, 352, 355, 357, 358, 379, 381, 403, 406, 407, 411, 414, 417, 418, 419, 420, 421, 422, 423, 424, 426, 427,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांची प्रतिमा जाळल्याप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर, आता संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्दात घोषणाबाजी करणाऱ्या शिवसेनेच्या शहरप्रमुखासह चार जणांविरोधात पोलीस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद जयवंत पवार, गुलाब पांडुरंग भोसले, अमोल त्रंबक कवडे आणि रवींद्र उर्फ पप्प्या नंदू कानकाटे यांचा समावेश आहे. या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह समोर आला असून संगमनेर शिवसेनेत संपर्कप्रमुख बबन घोलप आणि जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे समर्थकांचे दोन गट निर्माण झाले आहे. शिवसेना उत्तर नगर जिल्हा उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे यांच्या तक्रारीवरून…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कारागृहातून रजेवर गेलेला कैदी अद्याप परतला नाही, तब्बल वर्षानंतर जाग्या झालेल्या कारागृह प्रशासनाने या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश कांतीलाल पंचाळ असे या कायद्याचे नाव असून तो नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. कारागृहात शिक्षा भोगत असताना पंचाळ याने कारागृह प्रशासनाकडे काही दिवसांसाठी सुट्टीची मागणी केली होती. नाशिक रोड कारागृह प्रशासनाने त्याला 30 एप्रिल 2021 ते 16 मे 2021 अशी सुट्टी मंजूर केली होती. रजेवर गेलेला हा कैदी 16 मे 2021 मध्ये पुन्हा कारागृहात येणे अपेक्षित होते. मात्र हा कैदी पुन्हा आजतागायत नाशिक रोड कारागृहात परतला नसल्याचे समोर आले आहे. तब्बल वर्षभराचा कालावधी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांनी विजय मिळविला आहे. विरोधकांनी उमेदवार दिला नसला तरी प्रतिष्ठेच्या बनविलेल्या ‘नोटा’ला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. तर उर्वरित सहा अपक्ष उमेदवारांपैकी एकही उमेदवार दोन हजाराचा पल्ला गाठू शकला नाही. शिवसेनेमध्ये झालेल्या सर्वात मोठ्या बंडा नंतर अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक देशभर चर्चिली गेली. विविध कारणांमुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेतील फुटी नंतर प्रथमतः उद्धव ठाकरे गटाने हे मोठे यश मिळविले आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. पोट निवडणुकीआधीच शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क चौथीही मुलगी झाली म्हणून पती-पत्नीने तिला विहीरीत टाकून मारले, मात्र बिबट्याने तिला पळवून नेल्याचा बनाव केला म्हणून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पती-पत्नीची संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. संगमनेर तालुक्यातील देवगांव येथे २०१४ मध्ये ही घटना घडली होती. सुदाम भिमाजी कोटकर आणि उज्ज्वला सुदाम कोटकर अशी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या पती-पत्नीची नांवे आहेत. संगमनेर तालुक्यातील देवगांव येथे २१ जानेवारी २०१४ रोजी बिबट्याने आठ दिवसांच्या मुलीस पळवून नेल्याची घटना घडली होती. या चिमुरडीचा मृतदेह रामनाथ नामदेव कोटकर यांच्या शेतातील विहीरीत आढळून आला होता. तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक देवयानी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गांजाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेरमध्ये 172 किलो गांजा सह तब्बल 24 लाखाच्या माध्यमातून हस्तगत केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून या गांजा प्रकरणी सखोल तपास करून याची पाळमुळे शोधण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. पोलीस पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जातात की संबंधितांना क्लीन चिट देतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. संगमनेर शहरानजीक कोल्हार-घोटी राज्यमार्गावर समनापुर शिवारात शहर पोलिसांनी ही कारवाई केली. एका ब्रिझा कारमधून कोल्हार घोटी मार्गावरील लोणी कडून संगमनेरच्या दिशेने गांजा आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांचे पथक संशयित वाहनाची तपासणी करण्यासाठी समनापुर…
रविवार विशेष | प्रवीण पुरो गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या भल्याच्या चर्चा करणार्यांमध्ये खरं कोण आणि खोटं कोण, याचा थांगच लागत नव्हता. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं, मीच तितका खरा असल्याचं ठासून सांगण्यासाठी प्रचंड खोटं बोलणं आणि याद्वारे जनतेला मुर्ख बनवण्याचे उद्योग लीलया सुरू आहेत. राज्यात येऊ घातलेल्या उद्योगांनी गुजरातला अधिकची पसंती देण्याच्या घटनेने दोन्हीकडून सर्वत्र टीकेचं माहोल उठलं असताना आपणच कसे बरोबर आणि विरोधक खोटारडे असल्याचे पाढे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच वाचले. त्यांच्या तोंडी गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे, तो तर आपला भाऊच आहे. फडणवीस अगदी योग्य बोलले. याच भावाने गेल्या सात आठ वर्षात महाराष्ट्राची उपटलेली पिसं पाहिली…
आजारपणातही शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातून मोठ मोठे प्रकल्प राज्याबाहेर जात आहे, याची सरकारला कोणतेही काळजी नाही. राज्यात ओला दुष्काळ निर्माण झाला आहे. शेतकरी मदतीची वाट बघतोय मात्र अशा स्थितीत सरकार कुठे आहे? असा प्रश्न निर्माण होतो. पुरोगामी विचारांची कास सोडू नका, आगामी काळात पक्ष वाढवावा लागणार असून निवडणुकांसाठी कामाला लागा, असा आदेश राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. शुक्रवारपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे “राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा” हे दोन दिवसांचे शिबिर सुरू आहे. प्रकृती अस्वस्थामुळे चार दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले शरद पवार या शिबिरासाठी उपस्थित राहणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली असतानाच…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच्या कारणावरून पतीला नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. राकेश कैलास गायकवाड (रा. हिरावाडी रोड, नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 28 एप्रिल 2015 ते 2019 या काळात आरोपी पती राकेश गायकवाडसह सासरे कैलास गायकवाड, सासू शशिकला गायकवाड या संशयितांनी किरकोळ कारणावरून किरकोळ कारणावरून उपाशीपोटी ठेवत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार आरोपीच्या पत्नीने पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक उमा गवळी यांनी करून न्यायालयात आरोपींविरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते. कोर्ट क्रमांक 8 च्या अतिरिक्त…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचा पुतळा जाणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे पोलीस उपाधीक्षकांकडे करण्यात आली आहे. पोलीस उपाधीक्षकांकडे मागणी करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आजी-माजी कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख जयवंत पवार, तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, उप जिल्हाप्रमुख दिलीप साळगट, शहरप्रमुख प्रसाद पवार, युवा सेनेचे तालुकाप्रमुख गुलाब भोसले, अमोल कवडे, शहर संघटक पप्पू कानकाटे, उपतालुका प्रमुख सोमनाथ काळे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, संतोष कुटे, समीर ओझा, रवी गिरी, बाळासाहेब घोडके आदींचा समावेश होता. शिवसेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या विरोधात संगमनेर अकोले कोपरगाव या ठिकाणी आंदोलने आणि निषेध…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना पदाधिकाऱ्यांना दूर ठेवत शनिवारी सकाळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या पुतळ्याचे दहन करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गेला काही दिवसापासून शिर्डी लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या शिवसेनेतील अंतर्गत खदखद यामुळे समोर आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नवे पदाधिकारी जाहीर करण्यात आले होते. यात काही पदाधिकाऱ्यांचे पद काढून घेण्यात आले होते. तर त्यांचा पदभार नव्या पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला त्यामुळे पक्षातील अनेक निष्ठावंत म्हणविणारे नाराज झाले. पदच्युत झालेल्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख खेवरे यांच्यावरील आपल्या निष्ठा कायम ठेवत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपला निर्णय घेण्याचे जाहीर केले…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आपली सत्ता केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच धोक्यात आणू शकतो याची जाण सत्ताधाऱ्यांना असल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत आहेत याचाच अर्थ आपला पक्ष बलशाली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यव्यापी मंथन व वेध भविष्याचा या राज्यस्तरीय शिबिराला शुक्रवारी शिर्डीत सुरुवात झाली. यावेळी पाटील बोलत होते. शिबिरात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला केला. राज्यात सत्ता नसताना आपण केंद्रस्थानी होतो. हल्लाबोल आंदोलन केले. पदयात्रा काढली. त्यानंतर विदर्भात बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत सरकारला द्यावी लागली. आज शेतकरी अडचणीत आणि अस्वस्थ आहे. सरकार मात्र याकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना मदत…
