Author: Annant Ppangarkar

संगमनेर, सुदृढ व निकोप समाज निर्मितीचे काम करणाऱ्या, महिलांसाठी एक हक्काचे व्यासपीठ असलेल्या जयहिंद महिला मंच व जाणीव फाउंडेशनच्या वतीने शनिवारी (दि. २ मार्च) दुपारी १२ वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात नारीशक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे उपस्थित राहणार असून सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई थोरात, एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख, प्रमिला कर्डिले, डॉ. श्रद्धा वाणी, माया पवार, सुनिता गाडे, दीप्ती सांगळे, मंगला काकड, डॉ. दिपाली पानसरे, सीमा सातपुते आदींसह आदिवासी सेवक प्रा.…

Read More

नाशिक, भारताला उत्तम तंत्रज्ञानाची व अत्याधुनिक उपचारांची आवश्यकता आहे. उपचार परवडणारे असलेच पाहिजेत पण त्यात एक्सलन्स अधिक महत्वाचा भाग आहे. अत्याधुनिक उपचारांचे एसएमबीटी मॉडेल देशात आदर्श बनेल, असे प्रतिपादन प्रख्यात शास्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युट टाटा मेमोरियल सेंटर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाने साकारल्या जाणाऱ्या विशेष सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भूमिपूजन सोहळा आणि एसएमबीटी केअर प्लस, एसएमबीटी बोन मॅरो ट्रान्सप्लांट, एसएमबीटी टेलीमेडीसीन, एसएमबीटी ई-कॅम्पस या विविध सेवा उपक्रमांच्या शुभारंभ प्रसंगी डॉ. माशेलकर बोलत होते. याप्रसंगी आमदार बाळासाहेब थोरात, माजी विधानपरिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, टाटा मेमोरियल सेंटरचे डॉ एस. डी. बनवली, डॉ पंकज चतुर्वेदी, डॉ राहुल पुरवार यांच्यासह…

Read More

अहमदनगर, दि. २९ गुन्हा दाखल होऊन तब्बल सहा महिन्यांचा कालावधी उलटून देखील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील सुमारे ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या रडारवर येत नसल्याने ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच काही दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेत वर्णी लागलेल्या पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्याकडून ठेवीदारांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र त्यांनी तपास सुरू करण्यापूर्वीच बुधवारी त्यांची नाशिकला सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली झाल्याने ठेवीदारांच्या अपेक्षा मावळल्या आहे. पोलीस उपाधीक्षक असलेल्या मिटके यांची बदली काही दिवसांपूर्वी नाशिकला सहाय्यक पोलीस आयुक्तपदी झाली होती. मात्र तेथे हजर होण्यापूर्वीच त्यांच्या बदली आदेशात पुन्हा बदल करत त्यांच्याकडे अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षकपदाचा पदभार…

Read More

संगमनेर, दि. २८ काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशात आदर्श सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यांने यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीतही ८ लॉक मॅट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार केल्याची माहिती कारखान्याच्या व्यवस्थापनाने दिली आहे. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे यावर्षीचा हंगाम साखर कारखानदारीसाठी अडचणीचा आहे. अशा स्थितीतही थोरात साखर कारखान्यावर सभासद, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे. या बळावरच कारखान्याने गाळपाचा हा टप्पा पार केला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीसह तेथे त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. याशिवाय विविध उपक्रम देखील राबविले…

Read More

संगमनेर, दि.२८ येथील कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनील कडलग यांना समाजात अर्थसाक्षरता निर्माण करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल तर साईनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील व्यवसायात नाविन्यपूर्ण कामगिरीबद्दल सुदीप वाकळे यांना प्रतिष्ठेच्या “इंडियन ग्लोरी अवॉर्ड्स” या राष्ट्रीय गुणवत्ता पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे आयोजित व्यावसायिक व शैक्षणिक शिखर परिषदेत सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश डॉ. के. जी. बालकृष्णन, माजी क्रिकेटपटू मदनलाल, भारतीय उद्योग महासंघाच्या पहिल्या महिला आणि माजी उपमहासंचालक मनिषा रॉय, संस्थापक अध्यक्ष आणि कौन्सिलचे संचालक जॉर्ज कोचुपुरकल यांच्या हस्ते कडलग व वाकळे यांना इंडियन ग्लोरी अवॉर्ड्स राष्ट्रीय गुणवत्ता पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. ग्लोबल चेंबर ऑफ कंजूमर राइट्स व काईटस् क्राफ्ट…

Read More

संगमनेर, दि. २८ नगर एलसीबी आणि तालुका पोलिसांनी केलेल्या वाळू तस्करीच्या कारवाईनंतर संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे ॲक्शन मोडवर आले आहे. संगमनेर खुर्द येथून अवैध वाळू उपसा करणाऱ्या आठ जणांना तुमच्यावर कारवाई का करू नये, अशा आशयाच्या नोटिसा बजावल्या आहे. याशिवाय महसूलची हेरगिरी करणाऱ्या आणि वाळू तस्करीला मदत करणाऱ्यांना देखील कारवाईच्या नोटिसा बजावण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.राज्याचे महसूल आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरसह राज्यातील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह वाळू तस्करांकडून सुरू असलेल्या बेकायदा वाळू तस्करीकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी त्यांनी नवे वाळू धोरण देखील आणले असून त्याची राज्यात अंमलबजावणी सुरू आहे. असे असले तरी या धोरणाची…

Read More

मुंबई, दि. २७ विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पुरवणी मागण्या संदर्भात काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत विविध प्रश्न उपस्थित सरकारची कोंडी केली. सुरुवातीलाच त्यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनाही धारेवर धरले. मला पहाटे साडेपाच वाजता कामकाजपत्रिका मिळाली, अशी तक्रार करत बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. यावर राहुल नार्वेकर यांनीही चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट केले. सभागृहात मंगळवारी प्रबळ विरोधकाची भूमिका बजावताना बाळासाहेब थोरात म्हणाले, महानंदा ही दुधाची प्रतिष्ठित अशी शिखर संस्था होती. यामागे महाराष्ट्राचा दुधाचा एक ब्रँड करायचा असा उद्देश होता. गोरेगाव मध्ये या संस्थेची ५० एकर जमीन आणि अत्याधुनिक प्लांट आहे. मात्र…

Read More

अहमदनगर, दि. २६ फेब्रुवारी ८० हजार कोटी रुपयांचा सुरत ते दक्षिणेतील राज्यांना जोडणारा नवीन रस्ता व पुणे ते छत्रपती संभाजी नगर रस्ता महाराष्ट्राचे भविष्य बदलविणारा रस्ता ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. अहमदनगर शहरातील द्वारका लॉन्स येथे ९६१ कोटी रुपये किंमतीच्या अहमदनगर शहर बाह्यवळण रस्ता, ९८० कोटी रुपये किंमतीच्या अहमदनगर-मिरजगाव-करमाळा-टेंभुर्णी पॅकेज (एक) अहमदनगर ते घोगरगाव, व पॅकेज (दोन) घोगरगाव ते चापडगाव या १०३२ कोटी रुपये किंमतीच्या रस्त्यांचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील,…

Read More

संगमनेर, दि. २६ राज्यातील वाळू तस्करीला लगाम लावण्यासाठी महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी त्यांनी नवे वाळू धोरण देखील आणले, मात्र वाळू तस्करांकडून बेकायदा वाळू उपसा सुरूच आहे. संगमनेर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका झेनॉन गाडीला भगवा ध्वज लावून वाळू तस्करी सुरू असल्याचे समोर आले. नगर एलसीबीने दोन दिवसांपूर्वीच संगमनेर मधील वाळू तस्करांवर कारवाई केली, याला काही तासांचा अवधी उलटत नाही तोच तालुका पोलिसांनी महसूलमंत्र्यांच्याच मतदारसंघातील पिंपरणे-जोर्वे रस्त्यावर केलेली कारवाई समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली असून संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, टाटा कंपनीच्या एम. एच. ४२ बी ४०२६ या…

Read More

संगमनेर, दि. २६ कोल्हार-घोटी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास जात आहे. मात्र याच मार्गाचा भाग असलेल्या आणि शहरातून जाणाऱ्या तीन बत्ती चौक ते अकोले नाका पुलापर्यंतच्या मार्गाचे मजबुतीकरण, डांबरीकरणासह अपूर्ण काम तातडीने करण्याची मागणी संगमनेर नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेंद्र वाकचौरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधितांकडे केली आहे. तीन बत्ती चौक ते अकोले नाका पुलापर्यंतचा बहुतांशी भाग वाकचौरे नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्ये मोडतो. संगमनेरमध्ये कोल्हार घोटी मार्गाच्या पूर्णत्वाचे काम बहुतांशी झाले असल्याने या कामातून तीन बत्ती चौक ते अकोले नाका पुलापर्यंतचा म्हणजेच मेनरोडचे काम झाले नसल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या या रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरणाचे…

Read More

अजय अनिता दोघे ही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघेही हुषार. त्यामुळे त्यांना लगेचच चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. हेही त्यांच्या लक्षात आले की They are in love. तेंव्हा त्यांनी लग्न करायचे ठरविले. दोघांच्या घरी एकमेकांची माहिती होतीच, त्यामुळे लगेचच दोन्ही घरचे भेटले व लग्न ठरलं. अनिताने मात्र सर्वांसमोर एक अट ठेवली. ती म्हणाली, मी एकत्र कुटुंबात राहणार नाही. हे ऐकून अजय व त्याचे आई-वडील तर चकित झालेच, बरोबर अनिताचे आई-वडील पण अनिताकडे आश्चर्याने बघू लागले. लगेचच अजयचे बाबा म्हणाले, ठीक आहे. मला अनिताचे कौतुक वाटतं की, तिने हे लग्नाआधी सर्वांसमोर सांगितले. थोडा वेळ द्या आम्हाला. आपण उद्या पुन्हा भेटू व पूढचे ठरवू,…

Read More

नवी दिल्ली, २५ फेब्रुवारी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढचे तीन महिने पंतप्रधान नरेंद्र मोदी “मन की बात” करणार नाही. असे पंतप्रधान मोदी यांनी आज ११० व्या कार्यक्रमात देशाला संबोधित करताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा ११० वा भाग रविवारी सकाळी ११ वाजता प्रसारित करण्यात आला, यावेळी त्यांनी ही घोषणा केली. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी “मन की बात” करत असतात ऑल इंडिया रेडिओच्या ५०० हून अधिक प्रसारण केंद्रांद्वारे हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. या कार्यक्रमाची सुरुवात ३ ऑक्टोबर २०१४ रोजी करण्यात आली होती. भारतीय समाजातील महिला, वृद्ध आणि तरुणांना समाविष्ट करून विविध घटकांशी जोडणे हा…

Read More

नवी दिल्ली, २५ फेब्रुवारी केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन असलेल्या तीन महत्त्वाच्या कायद्यात बदल करून नवे फौजदारी कायदे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्याची अंमलबजावणी देशात एक जुलैपासून सुरू होईल. २० नव्या गुन्ह्यामध्ये आणि त्यासाठीच्या शिक्षेतही मोठा बदल करण्यात आला आहे. त्यासाठी नव्या कायद्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवीन फौजदारी कायदे अनुक्रमे भारतीय दंड संहिता (IPC), फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) आणि भारतीय पुरावा कायदा डिसेंबर २०२३ मध्ये लोकसभेने पारित केला होता.याशिवाय सामूहिक बलात्कारात दोषी आढळल्यास २० वर्षांचा कारावास किंवा दोषी जिवंत असेपर्यंत तुरुंगवास अशी शिक्षा देण्यात येईल.…

Read More

प्रवीण पुरो – भारतीय जनता पक्षाला आता लोकसभेत ४०० चा पल्ला गाठायचा आहे. आजवर सत्ताधार्‍यांना मिळाला नसेल, अगदी इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या हत्तेनंतरच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळाला नसेल असा जनाधार त्या पक्षाला हवा आहे. यासाठी माती सुपिक करण्याची तळमळ सुरू आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे खासदारकीचं सर्वात मोठं राज्य. यामुळे या राज्याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष आहे. भाजप तर सत्तेसाठी काहीही करायला तयार असल्याने त्या पक्षाने महाराष्ट्राला सर्वाधिक महत्व दिलंय. थोडासाही हयगयपणा पल्ला गाठण्यात नाकाम ठरू शकतो. यामुळेच जेवढं शक्य आहे तितकं करण्याचा आणि अशक्य आहे ते रेटून नेण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. एका ‘इंडिया’ संज्ञेने त्यांची पळता भूई झाली आहे.…

Read More

संगमनेर, दि. २४ बेकायदेशीर वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्याचे महसूल, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवे वाळू धरण आणले असले तरी या धोरणाचा फज्ज्या उडविण्याचे काम त्यांच्याच सरकारमधील सहकारी पक्षाचे कार्यकर्ते करत असल्याचे समोर आले आहे. नगरच्या गुन्हे शाखेच्या पथकाने खांडगाव शिवारात दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत पाच आरोपीवर चोरीच्या गुन्ह्यासह पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत निष्पन्न झालेले पाचही आरोपी फरार झाले असल्याचे माहिती पोलिसांकडून देण्यात आली. संगमनेरच्या गौण खनिज उत्खननात आणि वाळू तस्करीमध्ये राजकीय पक्षाचेच पदाधिकारी अग्रेसर असल्याचे सातत्याने पुढे आले आहे. त्यामुळे महसूल विभागाकडून देखील नेहमीच त्यांच्यावर कारवाईसाठी हात आखडता घेतला जातो. शनिवारी (ता. २४)…

Read More

संगमनेर, दि. २२ फेब्रुवारी तालुक्यातील घुलेवाडी येथील आनंदवन विद्यालयाचा विद्यार्थी सोहम मनोज कडलग याने स्टुडंट टॅलेंट परीक्षेत २१२ गुण प्राप्त करत तालुक्यात पहिला येण्याचा मान पटकाविला आहे. अहमदनगर येथील हिंद सेवा मंडळ आयोजित स्टुडंट टॅलेंट परीक्षेत कडलग याच्यासह दिगंबर गणेश सराफ विद्यालयाच्या कौस्तुभ गोरक्ष सरोदेने द्वितीय तर गगन संदीप शिंदेने तालुक्यात तृतीय क्रमांकाने यश मिळविले आहे.    जिल्ह्यातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी हिंद सेवा मंडळामार्फत या परीक्षेचे आयोजन केले जाते. सोहम कडलग यास वर्ग शिक्षिका भारती केकाने-चौधर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळे कडलगचे मुख्याध्यापक विलास शिरोळे, प्रकाश भागवत, मनीषा देशमुख, अनिल कडलग, दिलीप शेटे, वडील मनोज कडलग व आई उमा…

Read More

शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन करून दिल्याच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथील धन्वंतरी हॉस्पिटलचे दोन संचालक डॉक्टर लाच लुचपतच्या जाळ्यात अडकले आहे. डॉ. महेश प्रल्हाद परदेशी व डॉ. महेश रामविलास बुब अशी धन्वंतरी हॉस्पिटलच्या दोघा संचालक डॉक्टरांची नावे असून या दोन्ही डॅाक्टरांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                                                              शुक्रवारी (ता. २३ फेब्रुवारी) करण्यात आलेल्या या कारवाईबाबत माहिती अशी…

Read More

शेअर मार्केट ट्रेडिंगमधून चांगल्या आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्यावसायिकास तब्बल ३ कोटी ७० लाखांना गंडा घालण्यात आला आहे. शेअर मार्केटचे आमिष नाशिकच्या व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले असून या प्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सायबर भामट्यांनी नाशिक येथील एका व्यावसायिकास गेल्या महिन्याभरापासून व्हॉटसॲपवर एका ग्रुपमध्ये ॲड केले होते. त्यावर शेअर मार्केट ट्रेडिंगविषयी अधिकृत वाटेल अशी माहिती दिली जात होती. शेअर ट्रेडिंगमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास मोठा परताव्याचे आमिष या व्यावसायिकाला दाखवण्यात आले होते. व्यावसायिकाला संशयितांनी साडेतीन कोटी गुंतवल्यास तुम्हाला थेट साडेसात कोटी मिळतील, अशी स्कीम सांगितली. आम्हीही असेच पैसे गुंतविले…

Read More

मुंबई, दि. २३ राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी (वय ८७ वर्ष) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. जोशी यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्यात १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली होती. तत्कालीन युती सरकारचे ते पहिले मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात राज्याच्या विकासासाठी विविध योजनांची सुरुवात झाली. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या अतिशय विश्वासातील असलेले जोशी यांचा नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते लोकसभा अध्यक्ष असा मोठा राजकीय प्रवास…

Read More

मुंबई, दि. २२ फेब्रुवारी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रीतपणे सामोरे जाणार आहे. महाविकास आघाडीची सातत्याने चर्चा होत असून जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून मविआत कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे, त्या बैठकीत जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे. राज्य निवड मंडळाच्या बैठकीआधी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले, महाराष्ट्रात मविआ आघाडी मजबूत आहे, आम्ही एकत्रपणे निवडणुका लढवत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व मित्र पक्षांशी सातत्याने चर्चा सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा…

Read More