Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “बापू तेरे रास्ते” या महात्मा गांधींवरील भावगीत, भजनाच्या कार्यक्रमातून भाऊसाहेब थोरात यांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली. वैष्णव जनते, कानडा राजा पंढरीचा,मोगरा फुलला, मिले सुर मेरा तुम्हारा अशा विविध गीतांमधून परिसर भक्तीरसात न्हावून निघाला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त बापू तेरे रास्ते हा भजनांचा कार्यक्रम झाला. यावेळी विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, राजवर्धन थोरात, रणजीतसिंग देशमुख, प्रा. बाबा खरात,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज श्रीरामपूर : संगमनेरमधील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत राजकीय प्रतिष्ठितांनी केलेल्या सुमारे ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणाचा अद्याप तपास सुरू असतानाच आता लगतच्याच श्रीरामपूरमधील श्री संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांचे फसवणूक प्रकरण समोर आले आहे. या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात संस्थापक, संचालकांसह १४ जणांविरोधात भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४२० महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात सनी किशोर अंबिलवादे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी श्री संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सोमनाथ रघुनाथ महाले, संचालक निखिल विजय नागरे, आशिष सुरेश क्षीरसागर,…

Read More

थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त तालुक्यातील ज्येष्ठांचा सन्मान महात्मा गांधींचा विचार हाच शाश्वत विचार : आमदार थोरात महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : काही विघातक शक्तींनी महात्मा गांधींना मारले असले तरी त्यांचे विचार कधीही मारता आले नाही. आजही जगभरातील ६०० विद्यापीठांमधून गांधी विचार शिकविला जातो. गांधी-नेहरू हा देशाच्या विकासाचा विचार आहे, तो कोणीही पुसू शकणार नसल्याचे स्पष्ट करत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचे जीवनकार्य पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहणार असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार विचारवंत मधुकर भावे यांनी काढले. सहकार महर्षी थोरात कारखान्याच्या कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे जयंती शताब्दी वर्षानिमित्त सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित जयंती महोत्सवात बॉलीवूडमधील आघाडीचा गायक जावेद आली यांनी गायलेल्या कजरारे, वंदे मातरम, पुष्पामधील श्रीवल्ली गाण्यासह विविध गीतांवर संगमनेरमधील तरुणाईने प्रचंड जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. जाणता राजा मैदानावर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवात जावेद आली लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम झाला. यावेळी विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, राजवर्धन थोरात, मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, शरयूताई देशमुख, डॉ. हर्षल तांबे आदींसह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जावेद…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राजुर : झोपेत असतानाही आपल्यासाठी आपल्या पैशांनी काम केले पाहिजे. श्रीमंती प्रत्यक्षात उतरण्यासाठी व आपल्या ध्येयांना आणि स्वप्नांना अर्थ प्राप्त होण्यासाठी महागाईवर मात करणारी गुंतवणूक करून आपली स्वप्ने साकार केली पाहिजेत. त्यासाठीचे आर्थिक नियोजन म्हणजेच अर्थसाक्षरता होय, असे प्रतिपादन कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनील कडलग यांनी केले. सत्य निकेतन संस्थेच्या रा. वि.पाटणकर सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांच्या संकल्पनेतून ‘गोष्ट पैशापाण्याची’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी कडलग यांच्या मार्गदर्शनाने अर्थ साक्षरतेचे धडे गिरवले. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य आण्णासाहेब धतुरे, प्रा. शरद तुपविहिरे, प्रा. रमेश शेंडगे, प्रा. संतोष कोटकर, प्रा. बाळासाहेब घिगे आदी उपस्थित होते. कडलग यांनी अगदी डेबिट कार्ड कसे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अनंत पांगारकर @ ७५८८६००९५० संगमनेर : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील मुख्य मास्टर माईंड आरोपी राजकीय प्रतिष्ठित नेता भाऊसाहेब कुटे याच्यापर्यंत अद्याप आर्थिक गुन्हे शाखेला पोहोचण्यात अपयश आले असतानाच आता संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने या प्रकरणातील आणखी एक प्रमुख आरोपी छत्रपती संभाजी नगर येथील चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. आतापर्यंत अपवाद वगळता न्यायालयाने या प्रकरणातील बहुतांशी आरोपीचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेले आहेत. मात्र आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात घेता आरोपींची पोलीस चौकशी होणे आवश्यक असल्याने न्यायालयाने आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून देखील एकाही आरोपीला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे : पंचवीस वर्षीय तक्रारदार महिला आणि तिच्या दोन मित्रांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पोलिसांबरोबर तडजोड करतो, यासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील असे सांगत तक्रारदार आणि तिच्या दोन मित्रांकडून फोन पे द्वारे पैसे स्वीकारणारा पुण्यातील वकील एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे. सुमित नामदेवराव गायकवाड (वय २५ वर्ष, रा. सेवागिरी निवास, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या वकिलाचे नाव आहे. तक्रारदार महिलेच्या व्यक्तिगत कारणावरून तिच्या दोन मित्रांना कोथरूड पोलिसांनी शास्त्रीनगर पोलीस चौकीमध्ये नेले होते. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या मित्रांचे ओळखीचे वकील सुमित गायकवाड यांनी तक्रारदार आणि तिच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पोलिसांसोबत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : गेल्या ते दोन वर्षापासून सुरू असलेल्या शिवसेनेतील सत्ता संघर्षाचा निकाल अखेर बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचे सांगत त्यांचे सोळा आमदारही त्यांनी पात्र ठरविले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पदे कायम राहणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सत्ता संघर्षाचा निकाल विरोधात गेल्याने ठाकरे आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची चिन्हे आहेत. सर्वच राजकीय पक्षांसह राज्यातील जनतेचे शिवसेना नेमके कोणाची? एकनाथ शिंदे यांना समर्थन देणारे आमदार अपात्र की उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे आमदार अपात्र याकडे लक्ष लागून होते. निवडणूक आयोगामध्ये दाखल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राजुर : उज्ज्वल करिअर घडविण्यासाठी शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकास आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व कडलग इन्व्हेस्टमेंटचे डायरेक्टर सुनील कडलग यांनी केले. सत्यनिकेतन संस्थेच्या ॲड. मनोहरराव नानासाहेब देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्यावतीने आयोजित व्यक्तिमत्व विकास समुपदेशन कार्यशाळेत संभाषण कौशल्य या विषयावर प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. भाऊसाहेब देशमुख होते. यावेळी प्रा. संदेश कासार, प्रा. सौ. बंगाळ उपस्थित होते. कडलग म्हणाले, महाविद्यालयात येणारा प्रत्येक विद्यार्थी भविष्यातील स्वप्ने पाहत असतो. मात्र, उत्तम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : संगमनेर नगरपालिका हद्दीतील संजय गांधी नगर वडारवस्ती येथील झोपडपट्टी धारकांना घरपट्टी लागू करून त्यांना हक्काचा असेसमेंट उतारा मिळावा, याकरता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह शिवसेना नेते अमर कतारी यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून यामुळे सर्व नागरिकांना हक्काचा उतारा मिळणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे. तांबे म्हणाल्या की, संजय गांधी नगर वडार वस्ती येथील झोपडपट्टी धारकांना घरपट्टी लागू करून त्यांना उतारा द्यावा, याकरता शिवसेनेचे तत्कालीन शहराध्यक्ष अमर कतारी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याबाबत त्यांनी नगरपालीकेकडे वेळोवेळी मागणी करून वेळप्रसंगी आंदोलनही केली. या मागणीचा विचार करून काँग्रेस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : स्थानिक सत्ताधाऱ्यांना त्यांच्या मंत्रीपदाच्या व चाळीस वर्षाच्या कार्यकाळात लोकांचे प्रश्न सोडविता आले नसल्याचा आरोप करत संगमनेर शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या संजय गांधी नगर झोपडपट्टी व वडार वस्ती झोपडपट्टी पुनर्वसनासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडल्याची माहिती संगमनेरचे माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी दिली. मंगळवारी मंत्री विखे यांच्या दालनात झालेल्या या बैठकीसाठी गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांच्यासह संजय गांधी नगर वडार वस्ती येथील प्रतिनिधी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : राज्यातील तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू आहे, प्रचलित धोरणाप्रमाणे गुणवत्ता यादी जाहीर झाली असून यात बाह्य हस्तक्षेपला संधी नाही. तरीदेखील याप्रकरणी एक आमदार तीस लाख, वीस लाख दिल्याचे आरोप करत आहे. त्यांचे हे आरोप प्रसिद्धीसाठी असून अशा प्रकारे सरकारवर बेछूट आरोप करून सरकारची बदनामी केली जात असेल तर गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तलाठीपदाच्या भरती प्रक्रियेच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ नियुक्त करायची मागणी केली, याकडे लक्ष वेधले असता विखे यांनी चौकशीसाठी आम्ही तयार आहो, हवे असेल तर वडेट्टीवार यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : भव्य दिव्य स्टेज, लाईट व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या एलईडी इफेक्टसह भरतनाट्यमने सुरु झालेल्या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आसामी बिहू नृत्य, भांगडा, लावणी, धनगरी नृत्य, राजस्थानी नृत्य, बासरी वादन, फ्युजन डान्स, गवळणी या एकापेक्षा एक सरस समूह नृत्यांच्या सादरीकरणाने जयंती महोत्सवातील आनंद सोहळा ‘युवा जल्लोष’ कार्यक्रमात एकच धमाल झाली. काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जाणता राजा मैदानात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित युवा जल्लोष आनंद सोहळा संस्मरणीय झाला यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, राजवर्धन थोरात, शरयूताई देशमुख, गणेश मादास, शोभाताई कडू, कार्यकारी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील रयत शिक्षण संस्थेच्या इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी श्रेया अनिल मुंतोडे हिने संगमनेर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला असून तिची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. संगमनेर पंचायत समिती व संगमनेर तालुका विज्ञान गणित अध्यापक संघाच्यावतीने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात श्रेया मुंतोडे हिचे पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘सीड बॉल्स’ हे उपकरण स्पर्धेत प्रथम क्रमांकास पात्र ठरले. त्यामुळे यापुढील जिल्हास्तरावर होणाऱ्या प्रदर्शनात तिची निवड झाली असून ती तालुक्याचे नेतृत्व करेल. नाविन्य विषयाची योग्य निवड उत्तम सादरीकरण आणि उपयुक्तता या बळावर श्रेयाने हे यश मिळविले असल्याचे प्राचार्य जनार्दन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने संगमनेरकरांना रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड व शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांची जोरदार राजकीय फटकेबाजी ऐकावयास मिळाली. शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव म्हणाले, संस्था उभ्या करणे सामान्य गोष्ट नाही. सहकारातून संगमनेरचा विकास साधला गेला आहे. त्यामुळे बाजूच्या मतदार संघातून येथे स्पर्धा होत असली तरी आमदार बाळासाहेब थोरात अतिशय थंड डोक्याने ऑपरेशन करतात. त्यामुळे ऑपरेशन तर होतच पण रक्तही येत नाही. एकीकडे दोन माणसं एकत्र आल्याने देशाचं वाटोळ झाल आहे तर, दुसरीकडे दोन माणसांनी एकत्र येत येथे नंदनवन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : केंद्रात आजपर्यंत सहकार खाते नव्हते. राज्याच्या खत्यारीत येणाऱ्या खात्यात केंद्राचा हस्तक्षेप नको ते कायद्याविरोधात केंद्राच्या सहकारातील हस्तक्षेपाविरोधात एकत्रित येण्याची गरज आहे. हुकूमशाही प्रवृत्तीने देश चालविल्याने देशाची अधोगती होते. देशाची घटना आणि लोकशाही वाचविण्यासाठी आपण यापुढील काळात काँग्रेस सोबत असणं आवश्यक आहे. मोदींसारख्या व्यक्तीच्या हातात पुन्हा देशाची सत्ता दिल्यास देश देशोधडीला लागेल, अशी भीती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संगमनेरमध्ये व्यक्त केली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सिद्धरामय्या संगमनेरमध्ये आले होते. यावेळी ते बोलत होते. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड रविवारी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी संगमनेरात येत असताना भाजप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध करीत बस स्थानक चौकात आंदोलन केले. आंदोलकांवरील उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांचे नियंत्रण सुटल्याने आंदोलकांनी तेथून धाव घेत कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जाणता राजा मैदानाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या पोलिसांनी आंदोलकांना रोखले. त्यामुळे आंदोलकांनी तेथेच नाशिक-पुणे मार्गावर पुन्हा ठिय्या देत महामार्ग रोखला. त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे महामार्गावर बघ्यांची गर्दी जमली होती. माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांचा भाजपसह विविध संघटनासह निषेध व्यक्त…

Read More

अनंत पांगारकर @ ७५८८६००९५० लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. २००९ साली झालेल्या निवडणुकीत सध्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पराभव करत या मतदारसंघातून शिर्डीच्या साई संस्थांचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले. रामदास आठवलेसारख्या बलाढ्य उमेदवाराचा पराभव करणारे वाकचौरे या मतदार संघात जायंट किलर ठरले. त्यामुळे देशभर या मतदारसंघाची चर्चा झाली. या मतदारसंघातून म्हणजेच पूर्वीच्या कोपरगावमधून शिवसेनेच्या तिकिटावर तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या पाठोपाठ वाकचौरे दुसरे खासदार ठरले. शिवसेनेकडून मिळालेली खासदारकी गमविल्यानंतर काँग्रेस, भाजप असा प्रवास करत वाकचौरे दीर्घकाळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा स्वगृही म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत परतले आहे. सध्याच्या राजकारणात…

Read More

प्रवीण पुरो @ ९८६९९९१८६८ ३ डिसेंबर १९८४ ची काळी रात्र देशातल्या प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडवणारी ठरली होती. मध्यप्रदेशमधील भोपाळ शहरात किटकनाशकं बनवणार्‍या युनियन कार्बाइड या अमेरिकन कंपनीतून सोडण्यात आलेल्या विषारी वायूने शहरातील सुमारे १६ हजार लोकांचा बळी घेतला आणि सुमारे ४० हजार लोकांना कायमचं अपंगत्व आलं. जगभरातल्या अशा घटनांची नोंद झालेली ही देशातील पहिली सर्वात मोठी दुर्घटना ठरली. आज या भीषण घटनेची आठवण येण्याचं कारण सिडको अधिकार्‍यांच्या अर्धवटपणात आहे. या अधिकार्‍यांना उरणचं भोपाळ करायचं आहे. लोकं जीवानिशी गेली तरी चालतील पण कमाई झाली पाहिजे, असल्या मतलबी कारणाने त्यांनी उरणला भीषण संकटात लोटण्याचं पातक हाती घेतलंय. भरवस्तीत असले प्रकल्प नको, असे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर परतणाऱ्या काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले आणि माजी नगरसेवक सुरेश आरणे यांच्यावर राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावांमध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेला पाच दिवसांचा कालावधी उलटून देखील पोलिसांनी अद्याप प आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही. सदर गुन्ह्यातील आरोपी व मुख्य सूत्रधार यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी शिर्डीच्या डीवायएसपींना महाविकास आघाडीच्यावतीने निवेदन देण्यात आले. संगमनेर तालुक्यातील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात असलेल्या आश्वी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत २ जानेवारीला झालेल्या एका कार्यक्रमाहून परतत…

Read More