Author: Annant Ppangarkar
रविवार दि. २४ मार्च, संगमनेर बस स्थानकावरील कॉम्प्लेक्समध्ये औषधे खरेदी करण्यासाठी आलेल्या मुस्लिम तरुणाला रागाने का बघतो, असे विचारणा करत ‘जय श्रीराम’ म्हणण्यासाठी त्याला आठ ते नऊ जणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी बस स्थानकावर घडला. या घटनेमुळे शहरात सर्वत्र अफवांचे पेव फुटल्याने बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात दोन्ही गटाच्या नागरिकांची गर्दी जमली यामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरातील वातावरण तणावपूर्ण बनलेले आहे. या घटनेमुळे संगमनेर शहराचे वातावरण ढवळून निघाले असून शहराची शांतता धोक्यात आली आहे. शहरात तणावाचे वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून…
संगमनेरात अशांतता निर्माण करणाऱ्यांना जनतेने ओळखले आहे: थोरात भाजपमध्येही अत्यंत निष्ठेने काम केले परंतु त्या ठिकाणी स्वार्थ: शेजुळ रविवार दि. २४ मार्च, संगमनेर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण भाजपमध्ये जात असताना संगमनेरात मात्र भाजपचे दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष ॲड. रामदास शेजुळ यांनी आपल्या समर्थकांसह रविवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील शॅम्प्रोत हा प्रवेश केला आहे. शेजवळ यांच्यासह ओझर परिसरातील त्यांच्या समर्थकांचादेखील यामध्ये समावेश आहे. यावेळी कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, शंकरराव खेमनर, मीरा शेटे, ॲड. लक्ष्मण खेमनर, संतोष हासे, राजेंद्र चकोर आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.…
रविवार दि. २४ मार्च, अहमदनगर अहमदनगरमधील बहुचर्चित नगर अर्बन बँकेतील २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गेल्या आठवड्यात संगमनेरमधून अटक केलेल्या उद्योजक अमित पंडित याची जिल्हा न्यायालयाने रविवारी न्यायालयीन कोठाडीत रवानगी केली आहे. त्यामुळे आता पंडितला जामीन मिळण्याची चिन्हे निर्माण झाले आहे. नगर अर्बन बँकेतील घोटाळ्यात संचालकांसह काही कर्जदार देखील आरोपींच्या पिंजऱ्यात अडकले आहे. संगमनेरमधील उद्योजक आणि अमृतवाहिनी बँकेचा काही काळ अध्यक्ष असलेल्या अमित पंडितने ३३ कोटी रुपयाहून अधिक रकमेचा कर्जघोटाळा केल्याचे बोलले जाते. फॉरेन्सिक ऑडिट नंतर आरोपींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून आत्तापर्यंत या घोटाळ्यामध्ये १०५ आरोपी निष्पन्न झाले आहे. बडा कर्जदार असलेल्या पंडितचाही समावेश आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी (ता.…
रविवार दि. २४ मार्च, संगमनेर अनंत पांगारकर तब्बल सात महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील व्हाईट कॉलर आरोपींपर्यंत पोलिस यंत्रणेला पोहोचण्यात अपयश आले आहे. राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित समजला जाणारा मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारलेल्या आरोपीपैकी एकही आरोपी नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागलेला नाही. नगर अर्बन बँकेत एकापाठोपाठ आरोपींवर कारवाई करत ठेवीदारांना दिलासा देणारी आर्थिक गुन्हे शाखेची यंत्रणा दूधगंगा प्रकरणी मात्र राजकीय दबावाखाली देखील असल्याचे चर्चिले जात आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या मोठ्या घोटाळ्यातील मुख्य आरोपीपैकी एक असलेला पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ हाच एकमेव आरोपी सध्या अटकेत असून…
ॲड. गोरक्ष कापकर आज २३ मार्च, चार वर्षापूर्वी देशात पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊन, त्यानंतर देशात कोरोनाच्या महामारीने उद्भवलेली परिस्थिती ज्यांनी पाहिली आणि भोगली, ती त्यांच्या मरेपर्यंत स्मरणात राहील. खरं तर २०२० साल हे ‘माणूस आणि माणुसकी’ या दोन गोष्टी जगाला शिकवणारे वर्ष होते. अंतराळात जाऊन मंगळावर वस्ती करण्याच्या कल्पना करणारा माणूस, रस्त्या-रस्त्यावर अनवाणी पायाने अश्मयुगातील टोळ्यासारखा अदृश्य आजाराच्या भयाने जीव वाचवण्यासाठी पळू लागला होता. ना त्याच्या जवळ खायला होतं, ना जवळ पाणी प्यायला होतं. माणूस माणसाला परक्या माणसासारखा दूर लोटू लागला होता. एरव्ही समूहाने राहणारा माणूस उपाशीपोटी माणुसकीने अस्पृश्य समजून दूर लोटले म्हणून शहरातुन गावाच्या ओढीने आपल्या माणसाकडे…
प्रवीण पुरो – मुंबई भारतीय जनता पक्ष हा सत्तेशिवाय कोणाचाच होऊ शकत नाही, हे त्या पक्षाने आणि आजच्या त्या पक्षाच्या नेत्यांनी सोदाहरण दाखवून दिलं आहे. सत्तेसाठी ते तुमच्यासाठी आणि तुमच्या सोबत काहीही करू शकतात. कोणत्याही मार्गाचा अवलंब करू शकतात. राजकीय पक्ष म्हणून असलेले अभिनिवेष त्या पक्षाने आणि त्यांच्या नेत्यांनी कधीच गुंडाळून ठेवल्याने येनकेन प्रकारेन सत्ता हेच केंद्र त्यांनी प्रमाण मानलं. आपलं काम भागलं की ते सोबत केलेल्यांची काहीही ठेवायची नाही हा त्या पक्षाचा आणि नेत्यांचा मूलमंत्र. तुम्ही कितीही खरे असा, त्यांच्या खोटेपणापुढे तुमचं काहीच चालत नाही, हे देशाच्या नव्या राजकारणाने दाखवून दिलं आहे. आज हे सांगण्याची वेळ म्हणजे येऊ घातलेल्या…
शनिवार दि. २३ मार्च, संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या कोल्हार घोटी मार्गावर समनापुर लागत असलेल्या हॉटेल नेचर जवळील मैदानात २३ वर्षीय तरुणाचा गळा कापून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेरमध्ये गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे तणावपूर्ण परिस्थिती असताना पोलीस अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत अवघ्या तीन तासात या खून प्रकरणाचा उलगडा केला. या संदर्भात दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून कौटुंबिक कारणातून खून झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. शनिवारी सकाळी हॉटेल नेचर जवळील मैदानात खून झालेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक निरीक्षक विश्वास भान्सी यांच्यासह पोलीस पथकाने…
शनिवार दि. २३ मार्च, अहमदनगर पुन्हा उमेदवारी मिळाल्यानंतर पाच वेळा माफी मागायची वेळ यायला नको होती. अशी खासदार विखे यांचे नाव न घेता टिपणी करत भारतीय जनता पक्षाने महायुतीचे उमेदवार म्हणून डॉ. सुजय विखे यांना नगर दक्षिणेतून पुन्हा उमेदवारी दिली असती तरी गेल्या पाच वर्षात घडलेल्या घटनांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच माझी नाराजी कोणत्या मुद्द्यावर आहे हे स्पष्ट करेल, असे विधान परिषदेचे आमदार माजी मंत्री राम शिंदे यांनी सांगितले. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना अंतर्गत मोठा विरोध होताना दिसत आहे. आमदार राम शिंदे यांच्यासह…
शुक्रवार दि. २३ मार्च, संगमनेर शासकीय वसुलीच्या दृष्टीने मार्च महिना महत्त्वाचा समजला जात असल्याने शनिवार, रविवार आणि सोमवारी शासकीय सुट्ट्यांचे दिवस असतानादेखील संगमनेर नगर परिषदेचा वसुली विभाग सुरूच राहणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली आहे. २०२३ – २०२४ या आर्थिक वर्षातील मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वसुली पथकाचे नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय करांचा भरणा वेळेत व्हावा यासाठी या मोहिमेअंतर्गत २३ ते २५ मार्च दरम्यान शासकीय सुट्ट्या असताना देखील नागरिकांची गैरसोय होऊ नये या हेतूने वसुली विभाग सुरूच ठेवला जाणार आहे. मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या उपस्थितीत उपमुख्याधिकारी संजय पेखळे, कर निर्धारण…
शुक्रवार दि. २२ मार्च, अहमदनगर नगर दक्षिणमधून पुन्हा एकदा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील अंतर्गत मतभेद सुरूच असल्याचे दिसते. भाजप नेत्या पंकजा मुंडे शुक्रवारी अहमदनगरच्या दौऱ्यावर आल्या असताना या दौऱ्यावेळी आमदार राम शिंदे यांची अनुपस्थिती समोर आली आहे. अद्यापही शिंदे नाराज असल्याचे बोलले जाते. भाजपच्या बीडमधून उमेदवार असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. पाथर्डीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अहमदनगरचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे आदी उपस्थित होते. या दौऱ्यात विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांची अनुपस्थिती प्रामुख्याने जाणवली. खासदार…
शुक्रवार दि. २२ मार्च, संगमनेर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या आत्महत्या कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघा आरोपींच्या पोलीस कोठडीत संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने २६ मार्चपर्यंत वाढ केली आहे. अद्यापही या गुन्ह्यातील एक आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. संगमनेर तालुक्यातील साकुर येथील रुबाब पान शॉपमध्ये दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून सौरभ रावसाहेब खेमनर (रा. हिरेवाडी, साकुर) याने २९ फेब्रुवारीला सकाळी आठ ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान अत्याचार केला होता. सौरभ खेमनर मुलीवर अत्याचार करत असताना त्याचा जोडीदार योगेश रामा खेमनर (रा. हिरेवाडी, साकुर) याने पान स्टॉलचे शटर बाहेरून बंद करून त्याला कुलूप लावून घेतले होते. तर त्यांचे आणखी दोघे मित्र प्रशांत…
शुक्रवार दि. २२ मार्च, अकोले ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या जिद्दीच्या बळावर सामान्य कुटुंबातील एखादा तरुण अथवा तरुणीही यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकते. घरात फारशी सुबत्ता नाही, रोज कमवायचे आणि खायचे अशा परिस्थितीत सामान्य कुटुंबात एखादा दिवा पेटला की त्याचा उजेड संपूर्ण कुटुंबासोबतच गावालाही जाणवतो. आणि गावासाठी ती अभिमानाची बाब ठरते, याचा वस्तुपाठ घालून देणारे उदाहरण संगमनेर नजीकच्या अकोले तालुक्यातील आदिवासी गाव असलेल्या कोतुळमध्ये समोर आले आहे. घरात सदासर्वदा दारिद्र शेळके कुटुंबात आई विडी कामगार, पेंटर काम करताना फावल्या वेळात एखाद्या वृत्तपत्रासाठी बातमीदारी करणारे वडील अशोक शेळके आणि चार मुले यांच्या कुटुंबात परिस्थितीची जाणीव ठेवत आपल्या स्वप्नाला संतोष (शिवा) शेळके याने…
गुरुवार दि. २१ मार्च, मुंबई निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे. आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काही वेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे…
गुरुवार दि. २१ मार्च, संगमनेर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादात असलेल्या जोर्वे नाका पहाटेच्या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. क्रिकेटची मॅच खेळून आपल्या जोर्वे गावाकडे परतणाऱ्या मुलांवर हल्ला करण्यात आला आहे. या मुलांना त्यांच्याकडील बॅटनेच बेदम मारहाण केल्याचा प्रकार पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदूर शिंगोटे (ता. सिन्नर, नाशिक) येथे सुरू असलेल्या क्रिकेटच्या मॅच संपवून काही मुले घराकडे परतत असताना तीन बत्ती चौक ते जोर्वे नाका परिसरात त्यांना अडवून मारहाण करण्यात आली. या संदर्भात साई महेश जाधव यांच्या तक्रारीवरून एका दुचाकी चालकासह सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात…
गुरुवार दि. २१ मार्च, अकोले राज्यात दुधाचे भाव सातत्याने कोसळत असताना शेतकरी श्रीमंत होणार, शेतकऱ्याला दुधाचे पैसे मिळणार, मार्चअखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार अशी जाहिरातबाजी करून राज्याचे दुग्धविकास तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी व्यक्त करत दुग्ध विकास मंत्री आणि सरकारचा तीव्र निषेध केला आहे. डॉ. नवले यांनी मंत्र्यांच्या या जाहिरातबाजीवर संतप्त होत सोशल मीडियातून प्रतिक्रिया व्यक्त केली असून सरकारवर जबरदस्त टीका केली आहे. दुधाचे भाव आणखी कोसळलेले असताना दुग्धविकास मंत्री काय जाहिरात करत आहेत पहा असे म्हणत सोशल मीडियावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले…
गुरुवार दि. २१ मार्च, संगमनेर १० वर्ष वयाच्या मतिमंद असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दत्तू पंढरीनाथ डोळझाके (रा. हिवरगाव पठार, ता. संगमनेर) याला संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास आणि २७,५०० रुपये दंडाचे शिक्षा सुनावली आहे. २५ मे २०२२ रोजी पठार भागातील एका गावात घडलेल्या या प्रकारासंदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीवरून भा. द. वि. कलम ३५४(अ), ३५४(ब), ३२३, पोस्को, अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार दत्तू पंढरीनाथ डोळझाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संगमनेरचे तत्कालीन पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. फिर्यादी व त्याच्या कुटुंबीय घरात असताना फिर्यादीची भाची दुपारी साडेतीन…
बुधवार दि. २० मार्च, अहमदनगर साकुर (ता. संगमनेर) येथील अल्पवयीन मुली सोबत घडलेल्या घटनेबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने “सु-मोटो” दखल घेतली असून या संदर्भात संबंधितांवर कारवाईचे पोलीस प्रशासनाला निर्देश देत लवकरात लवकर यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले दरम्यान राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवतेंनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेत या प्रकरणीचा घटनाक्रम जाणून घेतला. यावेळी त्यांनी संबंधितांना तपासाच्या अनुषंगाने काही सूचना केल्या. रुपवते यांनी बुधवारी संगमनेरच्या साकुर येथे जात पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. गेल्या महिन्यात २९ तारखेला घडलेल्या या घटनेची दखल पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी घेतली होती. या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केला. रूपवते…
बुधवार दि. २० मार्च, संगमनेर साकुर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार व तिच्या मृत्यूप्रकरणी पोलीस यंत्रणेने तातडीने तपास पूर्ण करत आरोपींना कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करण्याची मागणी जयहिंद महिला मंच, एकविरा फाउंडेशनच्यावतीने तालुका काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली आहे. थोरात यांनी महिला कार्यकर्त्यांसह पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची भेट घेत या घटने संदर्भातील माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी पोलीस प्रशासनाने सखोल तपास करण्याची मागणी केली. साकुर येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर तिने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. उशिराने या…
अनंत पांगारकर, दि. २० मार्च, अहमदनगर नगर दक्षिणमधून भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने खासदार विखे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासमोर पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या पहिल्याच भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात खासदार विखे यांनी कार्यकर्त्यांसमोर माफीनामा सादर केला होता. त्या पाठोपाठ पालकमंत्री विखे पाटील यांनी नाराज असलेल्या आमदार राम शिंदे यांची भेट घेत त्यांच्यासोबत बंद दाराआड गुप्त खलबते केली. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री असलेल्या विखे पाटलांनी पक्षांतर्गत संवाद मोहीम साधण्यात सुरुवात केली असल्याने त्यांची ही मोहीम कितपत यशस्वी ठरते हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. नगर…
दि. २० मार्च, अहमदनगर १३ मे रोजी अहमदनगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघात लोकसभेसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दोन्ही मतदारसंघातील १७,८९९ गुन्हेगारांवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली प्रतिबंधात्मक कारवाईचा स्वतंत्र आराखडा तयार केला आहे. निवडणूक व मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी या आराखड्यानुसार शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात ७ हजारावर पोलीस व ४ हजारावर गृहरक्षक दलाचे जवान तैनात केले जाणार आहे. दोन्ही मतदारसंघात संभाव्य उमेदवारांनी, राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पोलीस यंत्रणेने देखील कायदा सुव्यवस्था बिघडवू शकणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईला…
