Author: Annant Ppangarkar

शासनाला अन्नदात्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायला भाग पाडू: अमर कतारी नाफेड मार्फत कांदा खरेदीसाठी अटी शर्ती शिथिल करा: भाऊसाहेब हासे महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संगमनेर शिवसेना (ठाकरे) आक्रमक झाली आहे. पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यात शेतीचे प्रश्न गंभीर बनले त्यामुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची व टंचाईग्रस्त गावांना तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. अशी आहे स्थिती: संगमनेर तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने बाजरी, सोयाबीन, मका, कापूस, भुईमूग ही पिके पूर्णपणे जळाली असून जनावरांचा चारासुद्धा खाण्यायोग्य राहिला नाही. तालुक्यात पाण्याची देखील टंचाई निर्माण झाली असून टंचाईग्रस्त गावांना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अकलापूर देवस्थान विकासाकरिता जिल्हा परिषदेअंतर्गत 65 लाख रुपयांची कामे मार्गी लागली असून अकरा लाखाच्या निधीतून अद्यावत व्यासपीठ निर्माण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय फटांगरे यांनी दिली. फटांगरे म्हणाले, श्री दत्त देवस्थान अकलापूर हे पठार भागासह जुन्नर व संगमनेर तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या देवस्थानच्या विकासाकरता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 65 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीमधून देवस्थानकडे येण्याकरता रस्ते, पेव्हींग ब्लॉक इत्यादी कामे करण्यात आली. स्वतंत्र व्यासपीठ: याचबरोबर सहकारातील दीपस्तंभ सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पिंपरी चिंचवड – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साळी समाजाच्यावतीने भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव चिंचवडगाव येथे मंचर येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. मोहन साळी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध उपक्रम: यावेळी आरोग्य शिबिर, तज्ञ डॉक्टरांचा सन्मान, विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील तरुण तरुणींच्या युवा मंचची स्थापना करण्यात आली. या मान्यवरांची होती उपस्थिती: रविवारी 3 सप्टेंबरला चिंचवडगाव येथील प्रभू रामचंद्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश माथेसुळ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. याशिवाय लोणावळा नगर परिषदेचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज लोणी (शिर्डी) – गोदावरीच्या पाण्याच्या आवर्तन काळात अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून नियोजन करावे. तसेच निळवंडे धरणातून पाणी सोडण्याबाबत काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. लोणीत बैठक: मंत्री विखे यांच्या उपस्थितीत लोणी येथे गोदावरी आणि निळवंडे धरण आवर्तनाच्या नियोजना संदर्भात आढावा बैठक झाली. या अधिकाऱ्यांची उपस्थिती: यावेळी नाशिकचे अप्‍पर जिल्‍हाधिकारी राजेंद्र वाघ, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जलसंपदा विभागाच्‍या कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे, अधीक्षक अभियंता आमले, नगरचे कार्यकारी अभियंता स्‍वप्‍नील काळे, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक स्‍वाती भोर, नाशिकचे उपविभागीय पोलिस आधिकारी गोकावे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज जालना – राजकारण्यांच्या विनाकारण नादी लागू नका. सरकारनं तुम्हाला वेडं केलं आणि रस्त्यावर आणलं. या लोकांना फक्त तुमची मतं पाहिजेत. तुमच्यासाठी काही करायचं नाही. आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या नेत्यांना मराठवाड्यात येऊ देऊ नका, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर हल्ला चढवत आंदोलकांना पाठिंबा दिला यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. का आले होते: जालन्यामध्ये एक सप्टेंबरला मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला यामध्ये आंदोलकांसह आणि पोलीसही जखमी झाले या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (4 सप्टेंबर) जालना येथे मराठा आंदोलकांची भेट घेतली. राजकारण पेटलं: जालन्यातील घटनेनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा…

Read More

मास्टरमाईंड भाऊसाहेब कुटेसह मुख्य आरोपी अद्यापही बाहेरच! महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शेकडो ठेवीदारांच्या कष्टार्जित 81 कोटींच्या ठेवींना चुना लावणाऱ्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहारामुळे संगमनेरच्या विश्वासार्ह सहकार विश्वाला मोठा धक्का पोहोचला आहे. 81 कोटी रुपयांचा अपहार हा दोन राजकीय कुटुंबीयांभोवती केंद्रित झाला असून ठेवीदारांच्या ठेवीतून वाहणाऱ्या दूध गंगेत हात धुवून घेणाऱ्या, राजकीय वरदहस्त असलेल्या व जिल्हा परिषदेसह संगमनेरातील अन्य संस्थांमध्ये पदाधिकारी राहिलेल्या भाऊसाहेब कुटेसह मुख्य आरोपींपर्यंत पोलीस अद्याप पोहोचू शकलेले नसल्याने पोलीस तपासाबद्दल संशयाची सुई निर्माण होताना दिसत आहे. पाच आरोपींच्या अटकेनंतर अटक सत्र थांबले: गुन्ह्याचे स्वरूप मोठे असल्याने आणि तत्कालीन तपास अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सुरुवातीलाच…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष @ प्रवीण पुरो गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या सत्तेतील धुसफूस वाढत असलेल्या बातम्या कानावर येऊ लागल्या आहेत. या सत्तेतील एक मुख्यमंत्री दुसर्‍या उपमुख्यमंत्र्याच्या म्हणण्याप्रमाणे काम करतो तर दुसरा उपमुख्यमंत्री मनाला येईल ते निर्णय घेतो. स्वार्थी सत्तेत आपले सारेच लाड पुरवले जात नसतात. स्वार्थापोटी भाजपबरोबर सत्तेत गेलेल्या एकनाथ शिंदेंची सत्ता राबवताना जी अवस्था होते आहे तशीच अजित पवारांचीही झालेली आहे. घरचं स्वातंत्र्य आणि परघरचा सासुरवास यातला फरक या दोन्ही नेत्यांना कळला असेल. आपल्याला जड होणार्‍या व्यक्तीचा काटा काढण्याचं कारस्थान अशा सत्तेत दिसून येतं.  एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या निर्णयांवर जसा भाजपचा आक्षेप असतो तसं अजित पवारांविषयीही सुरू आहे. त्यांच्यापुढे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – ठेवीदार आणि संगमनेरकरांचे लक्ष लागून असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आणि त्याच्या कुटुंबीयांना शनिवारी या प्रकरणाची सुनावणी होऊन पुढील आदेश होईपावेतो अटक न करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. त्यामुळे आरोपींना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. अंतरिम जामीन अर्ज: संगमनेरच्या आदर्श सहकाराला छेद देत शेतकऱ्यांची कामधेनू ठरलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या तब्बल 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी मुख्य आरोपी, जिल्हा परिषदेचा माजी सदस्य असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांनी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात ॲड. एस. यु. कवडे यांच्यामार्फत अंतरीम जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. अटकेचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – जालना येथील घटने संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली भूमिका एका ट्विटद्वारे स्पष्ट केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या बाबतीत त्यांनी स्पष्टपणे आपले मत व्यक्त केले. ठाकरे म्हणाले, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो. कालपासून लक्ष ठेवून: ह्या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे, आणि ह्या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कारासाठी अहमदनगर जिल्ह्यातून वृषाली कडलग, लक्ष्मीकांत ईडलवार, मंगेश कडलग व नरेंद्र राठोड यांची निवड झाली आहे. मुंबईत शिक्षक दिनी (5 सप्टेंबर) या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. 108 शिक्षकांचा समावेश: राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 2022-2023 या वर्षीच्या राज्यस्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यावर्षी राज्यातील 108 शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, जामखेड व राहुरी येथील शिक्षकांचा समावेश आहे. पुणे विभागातून कडलग: राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी निवड…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जालना जिल्ह्यात आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा संगमनेरात सकल मराठा समाज, संगमनेरकरांच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. बस स्थानकासमोर काही काळ रास्ता रोको करत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त करत निषेध नोंदविला. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ रविवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली जाण्याची शक्यता असून यात सकल मराठा समाज सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली. विश्रामगृहावर बैठक: जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी या गावांमध्ये मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच संगमनेरातदेखील सकल मराठा समाज आणि संगमनेरकर संतप्त झाल्याचे दिसून आले. शनिवारी सकाळी यासंदर्भात शासकीय विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली. या बैठकीत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकरवी झालेला लाठीचार्ज हा सरकार पुरस्कृत भ्याड हल्ला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून सरकारचा अमानुषपणा ढळढळीतपणे दिसतो आहे. ट्विट: जालन्यातील आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्ज संदर्भात थोरात यांनी समाज माध्यमावर ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आंदोलन चिरडणे योग्य नाही: मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक आंदोलने सातत्याने करीत आहे, लोकशाहीने त्यांना दिलेला तो हक्क आहे. पोलिस बळाचा वापर करून आंदोलन चिरडणे योग्य नाही. चर्चेच्या माध्यमातून अनेक आंदोलनांमध्ये मार्ग निघालेला आहे, हा आजवरचा इतिहास आहे. केंद्र, राज्यात महाशक्तीचे सरकार मात्र मार्ग निघत नाही: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरच्या सहकारी पतसंस्थांच्या विश्वासार्हतेला गालबोट लावणाऱ्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी राजकीय नेता, माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह आठ आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असून याप्रकरणी न्यायालयात कधी सुनावणी होते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान या संदर्भात सरकारी वकील सरकार पक्षाचे म्हणणे मांडणार असल्याची माहिती मिळते. यांनी केला अर्ज: 81 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात पोलिसांकडून होणारी अटक टाळण्यासाठी मुख्य आरोपी भाऊसाहेब दामोधर कुटे याच्यासह पत्नी शकुंतला कुटे, विमल कुटे, मुलगा संदीप, अमोल आणि दादासाहेब कुटे यांच्यासह सून…

Read More

श्रावण महिन्याच्या निमित्ताने कामगारांसाठी कीर्तनाचे आयोजन समाजाला दिशा दाखविणारी माध्यमे दिशाहीन महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – मालपाणी उद्योग समूहातील कामगार आपल्या कामातच विठ्ठलाचे रूप बघणारे आहे. आयुष्यातला आनंद द्विगुणित करण्यासाठी नकारात्मक गोष्टींना दूर ठेवण्याचे आवाहन करताना आजकाल नाटक, चित्रपट, समाज माध्यमांनी विकृतीची परिसीमा गाठली. टीव्ही मालिकांनी तर कहरच केल्याचे स्पष्ट करत बहुसंख्य मालिकांमध्ये एकमेकांचे पती-पत्नी पळवापळवीचे खेळ सुपारी देऊन चालविले जात असल्याची खंत प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त महाराज आफळे यांनी व्यक्त केली. येथील मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने श्रावण मासानिमित्त आफळे महाराजांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, व्यवस्थापक रमेश घोलप आदी उपस्थित होते. आफळे महाराज म्हणाले, सभ्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पकडलेल्या दोघा जणांकडून ठिबक सिंचन पाईप चोरीचे रॅकेट समोर आले आहे. या चोरट्यांनी काही पाईप चोरीची कबुली दिली असून आणखी गुन्हे समोर येण्याची शक्यता आहे. हे आहेत आरोपी: फरदिन इसाक शेख व नवशाद इशाक शेख (दोन्ही रा. अकोलेनाका, संगमनेर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. पकडलेल्या आरोपींकडून संगमनेर शहरातील दोन व संगमनेर तालुका अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकेक गुन्ह्याची दाखल करण्यात पोलिसांना यश आले आहे. याशिवाय आरोपी विरोधात चोरीचे आणखी काही गुन्हे देखील दाखल आहेत. चोऱ्यांचे सत्र होते सुरू: गेल्या काही दिवसापासून संगमनेरमध्ये जल जीवन मिशन व शेतकऱ्यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  शिर्डी – एक कर्तव्यदक्ष संरक्षण मंत्री म्हणून राजनाथ सिंह यांची देशाला ओळख आहे. पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे देशाची ताकद निश्चितच वाढली आहे. चीन व पाकिस्तानसारख्या शेजारील राष्ट्रांना आपल्या कणखर शब्दात त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे जगभरात आज भारताचे नाव आदराने घेतले जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पुरस्काराचे वितरण: प्रवरानगर (शिर्डी) येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंतीचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी अमळनेर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – भारताची अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. पुढील तीन वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असेल. भारत विकसित राष्ट्र होण्यात सहकार क्षेत्राचे योगदान आहे. देशाच्या सहकार क्षेत्राच्या विकासात महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे अमूल्य योगदान आहे, असे गौरवोद्गार देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. पुरस्कार वितरण सोहळा: प्रवरानगर येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंतीचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर येथील नियोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – रविवारी (3 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सह्याद्री महाविद्यालयातील के. बी. दादा देशमुख सभागृहात गुणवंत शिक्षकांसह पारनेरचे आमदार निलेश लंके व सिन्नरच्या जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांना गौरवले जाणार असल्याची माहिती समन्वयक अंतोन मिसाळ व अध्यक्ष बाळासाहेब हेंद्रे यांनी दिली आहे. सातत्याने सामाजिक उपक्रम: संगमनेरमधील पठार भागातील विविध कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या जाणीव जागृती फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जात असून दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या आदर्श शिक्षकांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने जाणीव फाउंडेशनच्यावतीने आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जनआरोग्यम परिवार आयोजित जाणीव फाउंडेशनचा यावर्षीचा लोकनेते बाळासाहेब थोरात शिक्षक गौरव पुरस्कार सह्याद्री प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका नम्रता पवार यांना जाहीर झाला आहे. अध्ययन, अध्यापनासाठी पुरस्कार: फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अमित पाटणकर यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शैक्षणिक अध्ययन, अध्यापनात नव संजीवनी ठरावा असा हा पुरस्कार पवार यांना देण्यात येणार आहे. रविवारी वितरण: शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिला जाणारा हा पुरस्कार पवार यांना रविवारी (3 सप्टेंबर) बीएसटी महाविद्यालयाच्या के. बी. दादा देशमुख सभागृहात वितरित केला जाणार आहे. पुरस्काराबद्दल पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना उपशाखाप्रमुख अक्षय ठुबे यांची धारदार शासनाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात समोर आला आहे. ठुबे वसंत विहार भागातील शिवसेनेचे उपशाखाप्रमुख होते. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. मंगळवारपासून होते बेपत्ता: वसंत विहारच्या धर्मवीर नगर परिसरात राहणारे उपशाखाप्रमुख अक्षय ठुबे मंगळवारपासून बेपत्ता होते. ते घरी परतले नसल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी चितळसर पोलीस ठाण्यात नोंदवली होती. पोलीस ठुबे यांचा शोध घेत होते. बुधवारी रात्री आढळला मृतदेह: बुधवारी रात्री अक्षय ठुबे यांचा मृतदेह कोकणी पाडा परिसरातील जंगलात आढळून आला. तुबे यांची हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्वरेने तपास…

Read More