Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. अरुण गायकवाड यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या “व्यावसायिक व्यवस्थापन आणि व्यावसायिक कायदे” या अभ्यास मंडळावर निवड झाली. कुलगुरूंकडून गायकवाड यांच्या नावाचे नामनिर्देशन करण्यात आले. प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड हे ३३ वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करत असून वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख म्हणुन कार्यरत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बिझनेस ला बोर्डाचे अध्यक्ष, व्होकेशनल कॉमर्स अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, विद्या परीषद सदस्य, अकौंटन्सी अभ्यास मंडळ सदस्य, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा सदस्य आदी अधिकार मंडळामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक जबाबदाऱ्या पार पाडल्या असून इतर विद्यापीठात व स्वायत्त महाविद्यालयाच्या विविध अभ्यासमंडळावर काम पहात आहेत. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील अनेक चर्चासत्रात…
हप्ते वसुली करणाऱ्या सरकारी टोळ्यांवर काय कारवाई केली? बोगस बियाणे आणि खतांचा मुद्दा विधानसभेत गाजला काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे सत्ताधाऱ्यांची भंबेरी महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किंमती कमी झालेल्या असतानाही केंद्र सरकारकडून खतांच्या बाबतीमध्ये नफेखोरी सुरू आहे, शेतकऱ्याला मदत करायची सोडून हा कसला प्रकार सुरू आहे आणि कृषिमंत्री केंद्र सरकारची ही नफेखोरी कबूल करायला का तयार नाही? आपण कोणाला घाबरता? असा सवाल करून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना चांगलेच कोंडीत पकडले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस होता. प्रश्नोत्तराच्या तासात बोगस बी बियाणे आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – ‘तुला घरी सोडतो’, असे सांगत साडेबारा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला दुचाकीवर नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपी विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मात्र पसार झाला आहे. पंकज शरद डुबे (रा. पेमगिरी, ता. संगमनेर, जिल्हा अहमदनगर) असे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात भारतीय दंडविधान कलम 376(3), 363, 366(अ) व बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातील परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने पुढील तपास…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – मंगळवारी पहाटेच्या सुमारास कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीत बेट मार्शल पेट्रोलिंग पथकातील दोघा कर्मचाऱ्यांनी तीन संशयित दुचाकी चोरांना पकडले. त्यांना घर झडतीसाठी नेले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यातील दोघांना पकडण्यात पोलीस पथक यशस्वी झाले. तर एक जण पळून गेला. आरोपींच्या घर झडतीमध्ये पोलिसांना एक जिवंत राऊंड चार मोबाईल आणि लॅपटॉप आढळून आला. पोलिसांना हे प्रकरण संशयास्पद वाटू लागल्याने त्यांनी याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला दिली आणि तपासा दरम्यान यातून मोठा उलगडा होऊ लागला. पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन या दोघांनी मोटर सायकल चोरीत पकडलेले संशयित चक्क मोस्ट वॉन्टेड आणि एनआयएच्या रडारवर असल्याचे…
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर झाला कमी; पाणीसाठा पोहचला ७० तर निळवंडे ३४ टक्क्यांवर
महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – अहमदनगर जिल्ह्याचे चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर ओसरला असला तरी ओढून आले प्रवाहित असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात ३५ मिलिमीटर पावसाचे नोंद झाल्याने धरणाचा पाणीसाठा ७७२४ दलघफु म्हणजेच ६९.९७ टक्क्यांवर तर निळवंडे धरणाचा पाणीसाठा २७६७ दलघफु म्हणजेच ३३.२६ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणांच्या लाभक्षेत्रासाठी ही समाधानाची बाब आहे. भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. उत्तर नगर जिल्ह्याला ही धरणे वरदान ठरले आहे. नव्यानेच कालव्यांच्या चाचणी झालेल्या निळवंडे धरणाच्या पाण्याचा फायदा दुष्काळी १८२ गावांना होणार असल्याने हे…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – अमली पदार्थाच्या व्यापारास आणि प्रसारास आळा घालण्यासाठी आता राज्यातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच अमली पदार्थ बाळगणाऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी ते पदार्थ जवळ बाळगण्याची मर्यादा देखील कमी करण्याबाबत केंद्र सरकारला विनंती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1681240110568980480?s=19 फडणवीस म्हणाले अमली पदार्थाच्या व्यापार आणि प्रसाराचा आळा घालण्यासाठी राज्य सरकार कठोर पावले उचलत आहे. दहशतवाद विरोधी पथकाला समन्वय एजन्सी म्हणून…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – तक्रारदाराच्या मित्राला पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. पाच लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती तीन लाखाची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह पोलीस नाईक आणि एका खासगी इसमाला अँटी करप्शन च्या पथकाने रंगेहाथ पकडले. राहुल बाबासाहेब गायकवाड (पोलीस निरीक्षक बाजारपेठ पोलीस ठाणे, भुसावळ, जि. जळगाव) पोलीस नाईक तुषार पाटील आणि खासगी इसम ऋषी दुर्गादास शुक्ला (हनुमान वाडी, भुसावळ, जिल्हा जळगाव) अशी तिघा लाचखोरांची नावे आहेत ही कारवाई नाशिक लाचलुचपच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अभिषेक…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : राज्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असून सरकारने कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्याचा निर्णय रद्द करून तातडीने राज्यात शिक्षक भरती करावी अशी आग्रही मागणी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. तातडीने भरती न केल्यास राज्यभरात मोठा उद्रेक होईल असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून दिला आहे. या पत्रात डॉ. तांबे यांनी म्हटले आहे की, राज्यभरात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. मध्यंतरी शासनाने विनाअनुदानित शाळांना टप्पा अनुदान देण्याचा चांगला निर्णय घेतला.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी माजी मंत्री काँग्रेस गटनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज मंत्र्यांचीच शाळा घेतली. विरोधी आमदारांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्र्यांनी द्यावे हे सभागृहाला शोभत नसल्याचा खोचक टोला लावताना थोरात चांगलेच संतापले असल्याचे दिसून आले. विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आज सभागृहात आक्रमक झाले. मंत्री गांभीर्यपूर्वक प्रश्नांचा अभ्यास करत नाही, बिना तयारीचेच सभागृहात येतात, असा संताप थोरात यांनी व्यक्त केला. थोरात म्हणाले, सभागृहाच्या कामकाजाच्या सुरुवातीचा तास हा प्रश्नोत्तराचा राहील हे आपण सर्वानुमते ठरविले. सभागृहातील सदस्य अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर प्रश्नांना वाचा फोडत असतात. मात्र संबंधित विभागाचे मंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांचे वस्त्रहरण करणाऱ्या भाजप नेता किरीट सोमय्या यांचे कथित अश्लील व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यात राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी दुपारी संगमनेरमध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील बस स्थानक चौकात किरीट सोमय्याच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन केले. तसेच सोमय्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. लोकशाही वृत्तवाहिनीने किरीट सोमय्यांच्या लंपटपणाचा आपल्या वाहिनीच्या माध्यमातून पर्दाफाश केला आहे. राजकीय नेत्यांवर चिखल फेक करणारच चिखलात लोळत पडल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. सोमय्यांचे चाळे समोर येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. संगमनेरमध्ये मंगळवारी दुपारी बस स्थानक चौकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुजीब शेख, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या अंकुश चत्तरचे हत्याकांड मंगळवारी विधिमंडळात पोहोचले. आरोपींमध्ये भाजपच्या नगरसेवकासह दहा जणांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगाराचा जात, धर्म आणि पक्ष न पाहता कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळात केली. अहमदनगर शहरात नुकतेच घडलेले अंकुश चत्तर हत्याकांड काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळात स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केले. गुन्हेगारीवर हल्लाबोल करताना आमदार थोरात म्हणाले, अहमदनगर शहरातील गुन्हेगारी चिंता वाढवणारी आहे. राज्य तुमचे आहे, गृहमंत्री तुमचे आहे, खासदार सत्ताधारी पक्षाचे आहे, आमदारही सत्ताधारी पक्षाकडे आलेले आहे आणि गुन्हेगारही सत्ताधारी पक्षाचाच आहे. त्यामुळे हे सर्व चिंता वाढविणारे आहे. जनतेला…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सद्यस्थितीच्या देश व राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भूमिका व पुढील धोरण जाहीर करण्यासाठी भाकपचे राष्ट्रीय नेते कॉ. डॉ. भालचंद्र कांगो यांच्या व्याख्यानाचे शनिवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता संगमनेर येथे दुर्वे नाना सभागृहात आयोजन केले असल्याची माहिती भाकपचे संगमनेर सेक्रेटरी कॉ. प्रताप सहाणे यांनी दिली आहे. ‘महाराष्ट्रातील बदलती राजकीय परिस्थिती व पक्षाची भुमिका’ या विषयासंबंधी कॉ. कांगो बोलणार असून याप्रसंगी राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य कॉ. तुकाराम भस्मे, राज्य सचिव कॉ. अॅड. सुभाष लांडे, सहसचिव प्रा. राम बाहेती आदी पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. संगमनेर-अकोले तालुक्यातील पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – देशातील पहिल्या दहा अभियांत्रिकी महाविद्यालयात समावेश असलेल्या संगमनेरच्या अग्रमानांकित अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल विभागातील 76 विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यूद्वारे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठ्या पगारावर निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी दिली. व्यंकटेश म्हणाले, माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला ए प्लस दर्जा असून सर्व विभागांचे मानांकन झालेले आहेत. महाविद्यालयातील गुणवत्तेचे शैक्षणिक कामकाज पाहून विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या सातत्याने कॅम्पस इंटरव्यूसाठी महाविद्यालयात येत असतात. यावर्षी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्यावतीने जे. एन. के. इंडिया, मुंबई कॅम्प, टावर दिल्ली, ध्रुव…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जगाचे सर्वोच्च टोक असलेले माउंट एवरेस्ट शिखर सर करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या महिला गिर्यारोहक सुविधा राजेंद्र कडलग व येथील रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष ऋषिकेश सतिष मोंढे यांना मानव विकास संस्थेचा “मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार २०२३” लातूरमध्ये वितरित करण्यात आला. राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे होते. पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, माजी मंत्री अमित देशमुख यावेळी उपस्थित होते . जवळे कडलग येथील मात्र सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या गिर्यारोहक सुविधा राजेंद्र कडलग यांनी ८८४९ मीटर उंच असलेल्या जगातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेवासा (अहमदनगर) – नेवासा तालुक्यातील गेवराई येथे सोमवारी भर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घरफोडी करण्यात आली. या घटनेत दागिने आणि रोकड रकमेसह नऊ लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. गेवराई येथील सत्तरकर वस्तीवर घर पुढचा हा प्रकार घडला याप्रकरणी शिवाजी तुकाराम सत्तरकर यांनी नेवासे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सत्तरकर हे आपल्या कुटुंबीयांसह शेतात राहतात. सोमवारी सकाळी 11 वाजता घराची कडी लावून ते घराजवळ असलेल्या कांद्याच्या शेडमध्ये पत्नी आणि गावातील चार मजुरांसह कांदा भरण्यासाठी गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पिण्यासाठी पाणी आणण्याकरिता सत्तरकर यांच्या पत्नी घरी आले असता त्यांना एक…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कडून खाजगी प्रवासी बसेसची विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेत अवघ्या पंधरा दिवसातच 140 वाहने दोषी आढळून आली असून दंडापोटी 6,18,260/-रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांनी दिली आहे. या मोहिमेत 16 जुलै अखेर 350 बसेसची तपासणी करण्यात आली. या विशेष मोहीमेत मद्य प्रशासन करुन वाहन चालविणाऱ्या चालकांची तपासणी करणे, वेग नियंत्रकामध्यें छेडछाड करणे, अग्निशमन यंत्रणा नसणे, विना परवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करणारी वाहने, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, अवैध मालवाहतूक करणाऱ्या बसेस, वाहनांमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, आपत्कालीन निर्गमन आणि दरवाजे कार्यरत स्थितीत नसणाऱ्या,…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे माजी कृषिमंत्री, काँग्रेसचे गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर टीका केल्यानंतर राज्याचे नवे कृषिमंत्री धनंजय मुंडे ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून आले. माध्यमांशी बोलताना मुंडे म्हणाले, राज्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्या विरोधात अधिक कठोर कायदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या पावसाळी अधिवेशनातच अशा विक्रेत्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा कायदा अस्तित्वात आणणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी एक विशेष समितीही स्थापन करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. थोरात…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात विविध भागातील डोंगर, टेकड्या, माळरान हरित झाली आहेत. अभियाना अंतर्गत आतापर्यंत 80 लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले असून यावर्षी ही संख्या एक कोटीवर नेण्याचा संकल्प असल्याची माहिती दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी दिली. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष तांबे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना यावेळी रोपण करण्यासाठी रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिवाजीराव खुळे, विठ्ठलबाबा खुळे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – अधिवेशनात पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झालेले काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमने-सामने बघावयास मिळाले. आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर टीका करत काही प्रश्न उपस्थित केले होते. यावर थोरात यांच्या टिकेला उत्तर देत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, शेतकऱ्यांच्या प्रश्न संदर्भात आम्हालाही गांभीर्य आहे. काही भागात पाऊस कमी असल्याने पेरण्या होऊ शकल्या नाहीत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या झाल्या आहेत. पुणे आणि नाशिक विभागात पेरण्या कमी प्रमाणात झाल्या. हवामान विभागाने पुढील आठवड्यात पाऊस सांगितला आहे, त्यामुळे पेरण्या योग्य प्रकारे होतील. यासंदर्भात सरकारने एका समितीची स्थापना केली आहे. दुबार पेरणीची वेळ आली…
बाजारात बोगस बियाणे खते मोठ्या प्रमाणात; सरकारी असल्याचे दाखवून काही टोळ्या राज्यभरात हप्ते वसुली करत आहे राज्यात 50 टक्के पेक्षा अधिक भागात पाऊस नाही तर केवळ 20 टक्केच पेरण्या पूर्ण नगरमधील मदतीच्या शब्दाचा मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना विसर महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – बाजारामध्ये बोगस बियाणे, खते मोठ्या प्रमाणावर आले आहेत. काही टोळ्या सरकारी असल्याचे दाखवून संपूर्ण राज्यभरात हप्ते वसुली करत आहे. आशा स्थितीत दुर्दैवानं सरकार म्हणून शेतकऱ्यांकडे कोणतेही लक्ष दिले जात नाही. मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, दिल्ली दौरे या सगळ्या प्रकरणात शेतकऱ्यांकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याची टीका काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केली. राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी…
