Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावरील डोळासणे शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत टोळीला घारगाव पोलिसांनी पकडले. पोलिसांनी या कारवाईत चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून कारसह दरोड्याचे साहित्य आणि मोबाईल असा एकूण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, पोलीस कोठडीत असताना केलेल्या चौकशीत या आरोपींनी घारगाव हद्दीत ट्रकमधून डिझेल चोरी केल्याचे दोन गुन्हे कबूल केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १४ एप्रिल रोजी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्याचे पोलीस पथक पुणे-नाशिक हायवेवर रात्रगस्त घालत होते. यावेळी डोळासणे गावच्या बोगद्याजवळ अंधारात एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार संशयास्पदरित्या उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पथकाने…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांपासून सुरू झालेल्या वारकरी संप्रदायाचा उदात्त विचार घेऊन काँग्रेसने देश उभारणीचे महान कार्य केले आहे. सद्यस्थितीत देशामध्ये काही जातीय शक्ती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असून, अशा धर्मांध शक्तींच्या विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा सुरू असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक व माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी केले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्यावतीने आयोजित ‘युवा संगम’ कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसच्या नेत्या डॉ. जयश्री थोरात, ठाणे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह पवार,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी तालुक्याच्या विकासाचा पाया रचला, तर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शेती, शिक्षण, सहकार आणि आर्थिक समृद्धीच्या माध्यमातून या तालुक्याला प्रगतीपथावर नेले आहे. युवक काँग्रेसने आयोजित केलेला हा ‘युवा संगम’ कार्यक्रम इतिहासाचे मार्गदर्शन घेऊन भविष्याची दिशा ठरवणारा ठरेल, असे गौरवउद्गार विधिमंडळ पक्षाचे गटनेते व माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी काढले. संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या वतीने आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण आणि संवाद कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, माजी आमदार उल्हासदादा पवार,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा पारा आणि भारतीय हवामान खात्याने दिलेला उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी १८ एप्रिल २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. या नव्या निर्णयानुसार, आता जिल्ह्यातील शाळा उन्हाळी सुट्टी लागेपर्यंत सकाळी ७ ते ११ या वेळेतच भरवल्या जाणार आहेत. जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली असून, उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना या उष्णतेचा त्रास होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय…
आश्वी, प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक परिसरात बिबट्याने पुन्हा एकदा आपल्या दहशतीचा प्रत्यय दिला असून, आज सकाळी शेतात काम करणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून, एकाच वस्तीवर बिबट्याने हल्ला करण्याची ही चौथी वेळ असल्याने वनविभागाच्या भूमिकेबद्दल ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आश्वी बुद्रुक येथील खेमनर वस्तीवरील गट नंबर २३१ मध्ये सुमनबाई बाळासाहेब खेमनर या आज शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जनावरांसाठी घास कापण्याचे काम करत होत्या. याच दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याने सुमनबाई यांच्या मानेवर आणि हातावर खोलवर जखमा केल्या. संकटाच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक: लग्नाचे खोटे आमिष दाखवून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी नाशिकच्या सिडको आणि सातपूर पोलीस ठाण्यात एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत सिडको परिसरातील एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून संशयित आरोपी अर्शील साबीर मन्सूरी याने लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर हॉटेल डेमॉक्रसी येथे नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. इतकेच नव्हे तर आरोपीने पीडितेचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून तिला धमकावले आणि तिच्याकडील सोन्याची चैन व कानातील दागिने जबरदस्तीने काढून घेतले. या गुन्ह्यात अर्शील मन्सूरीला मदत करणाऱ्या दीपक, हिमांशू, नितेश आणि प्रथमेश या त्याच्या साथीदारांविरुद्धही एमआयडीसी…
मुंबई, विशेष प्रतिनिधी राज्यात बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असून या रॅकेटमध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी दत्ता कराळे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि सोमनाथ घार्गे यांचा थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. मुंबईतील गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचले असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी पुराव्यांसह मांडलेल्या माहितीनुसार, आयपीएस अधिकारी दत्ता कराळे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि सोमनाथ घार्गे यांचा या ऑनलाइन फसवणूक रॅकेटमध्ये सहभाग आहे. मंत्रालयातील उच्चपदस्थांच्या आशीर्वादाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशांची हेराफेरी होणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य आरोपी पतीसह चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या सर्व आरोपींना न्यायालयाने उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर तिघे अद्याप फरार आहेत. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी केवळ १३ वर्षे ४ महिन्यांची असताना आरोपींनी संगनमत करून तिचा विवाह लावून दिला होता. पीडितेचे वय कमी असल्याचे माहित असतानाही तिच्या संमतीविना हा विवाह पार पडला आणि त्यानंतर तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करण्यात आले. या…
मुंबई, विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ९ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, राज्याच्या राजकीय वर्तुळात आता खऱ्या अर्थाने हालचालींना वेग आला आहे. पुढील महिन्यात म्हणजेच मे २०२६ मध्ये या जागा रिक्त होत असून, त्यासाठी आयोगाने १२ मे २०२६ ही मतदानाची तारीख निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी सकाळी मतदान पार पडल्यानंतर सायंकाळी ५ वाजता निकालही जाहीर केला जाणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या एकाच दिवसाकडे लागले आहे. येत्या १३ मे रोजी विधान परिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अमोल मिटकरी, शशिकांत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्यानंतर सासरी तिचा शारीरिक व मानसिक छळ करून अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी हा गुन्हा संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मूळची मुकींदपूर (नेवासा फाटा) येथील आहे. ती अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिच्या आई-वडिलांनी आणि एका मध्यस्थाने संगनमत करून तिचा विवाह शिंदोडी (ता. संगमनेर) येथील एका तरुणाशी लावून दिला होता. हा विवाह सन २०२४ मध्ये झाला…
महाराष्ट्र संवाद न्यूज, संगमनेर: अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या संगमनेर शाखेच्यावतीने रविवारी (१० मे) शहरात एका विशेष विनामूल्य कथाकथन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल देशपांडे यांनी दिली आहे. सह्याद्री महाविद्यालयातील के.बी. दादा देशमुख सभागृहात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ही कार्यशाळा होणार असून या उपक्रमाच्या माध्यमातून संगमनेरकर नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कथाकथन क्षेत्रातील बारकावे शिकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या कार्यशाळेत पुणे येथील अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला संचलित सानेगुरुजी कथाकथन प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष शामराव कराळे, अपर्णा निरगुडे आणि रमेशराव काळे हे अनुभवी मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत. या प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कथा निवेदक कसा तयार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर शहरातील चावडीवरील तलाठी कार्यालयात सुरू असलेला गंभीर गैरप्रकार आमदार अमोल खताळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उघडकीस आणला आहे. या कार्यालयात दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांची अडवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळले जात असल्याची तक्रार एका महिलेने व्हाट्सअप मेसेजद्वारे आमदारांकडे केली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत आमदार खताळ यांनी तातडीने कार्यालयाला भेट दिली असता, त्याठिकाणी धक्कादायक परिस्थिती पाहायला मिळाली. शासकीय कर्मचारी उपस्थित नसताना मन्सूर शेख आणि त्यांचा जावई या खाजगी व्यक्ती तेथे बसून अधिकृत कागदपत्रांची हाताळणी करत असल्याचे दिसून आले. यावेळी आमदारांनी संबंधित व्यक्तींना चांगलेच धारेवर धरत त्यांच्या अधिकारांबाबत जाब विचारला. शासकीय कामकाजात खाजगी व्यक्तींचा अशा प्रकारे…
मुंबई, विशेष प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रशासकीय स्तरावर पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे नवीन आदेश जारी केले आहेत. या नव्या फेरबदलांनुसार डॉ. बी.एन. पाटील यांची नियुक्ती ‘रुसा’च्या प्रकल्प संचालकपदी, तर मंगेश जोशी यांची नियुक्ती पर्यटन संचालक म्हणून करण्यात आली आहे. याशिवाय कुलदीप जंगम यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी, कुशल जैन यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आणि रेवैया डोंगरे यांची केळापूर उपविभागात यवतमाळ येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून वर्णी लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांत राज्य सरकारने ४० हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असल्या, तरी यामध्ये तुकाराम मुंढे यांची बदली सर्वाधिक चर्चेची ठरली आहे. दिव्यांग कल्याण विभागात पारदर्शक कारभार करत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या साडेतीन वर्षांच्या पुतणीचा विनयभंग करून तिच्या आईवर (भावजयीवर) जीवघेणा हल्ला करणाऱ्या एका नराधम चुलत्याला पोलिसांनी अटक केली आहे. संतोष शंकर राऊत (वय ३४, रा. घुलेवाडी, संगमनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक केलेल्या आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, सहाय्यक सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायाधीश मंदार नेरलेकर यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी संतोष राऊत याला १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल २०२६…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील वीज वितरण विभागाच्या कार्यालयावर पंचक्रोशीतील संतप्त शेतकऱ्यांनी आक्रमक होत मोर्चा काढला. सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढलेली असताना वीज मंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि अपुरा दाब यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. वीज पुरवठा सुरळीत करावा आणि रोटेशन कालावधीत ११ तास वीज मिळावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी भर उन्हात सुमारे चार तास रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी वीज वितरण विभागाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनात कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, जिल्हा बँकेचे माधवराव कानवडे, संपतराव…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: शहरातील सोनांबेकर रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत, संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख अमित चव्हाण यांनी केली आहे. वैद्यकीय क्षेत्राला कलंकित करणाऱ्या अशा घटनांमुळे सामान्य जनतेचा डॉक्टरांवरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील दत्तात्रय दळवी या रुग्णास उपचारासाठी सोनांबेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि नाशिक येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संगमनेरच्या सोनांबेकर रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच दळवी यांचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. सुरुवातीला पोलीस प्रशासनाकडून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: समाजातील अनेक महनीय व्यक्तींपासून नेहमीच प्रेरणा मिळत असते. पूर्वीची आणि आजची परिस्थिती वेगळी असली तरी, आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी जिद्द महत्त्वाची ठरते. समाजाला भेडसावणाऱ्या सर्व अडचणींवर मात करत घेतलेला विचार आणि कृती समाजाला अभिप्रेत जीवन जगण्यास प्रवृत्त करत असते. खऱ्या अर्थाने पुरस्कारासाठी सुयोग्य व्यक्ती शोधणे कठीण असते, मात्र संगमनेर रोटरी क्लबने या पुरस्कारांसाठी केलेली निवड सार्थ आणि समाजासाठी पथदर्शक आहे. ‘स्वार्थ विरहित सेवा’ या संकल्पनेप्रमाणेच संगमनेर रोटरी क्लबचे सामाजिक कार्य अत्यंत गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल रो. सुधीर लातुरे यांनी केले. येथील मालपाणी हेल्थ क्लबच्या सभागृहात रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या वतीने…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, शिर्डी: निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. कडक उन्हाचा तडाखा आणि वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, निळवंडे धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, उच्चस्तरीय आणि उजव्या कालव्यातून येत्या १५ एप्रिलपासून पाणी सोडले जाणार आहे, तर डाव्या कालव्याचे आवर्तन २५ एप्रिलपासून सुरू होईल. सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढल्याने लाभक्षेत्रातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला असल्याने शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे धाव घेत आवर्तन सोडण्याची विनंती केली होती. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकतीच…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर शहरात अवैध कत्तलखान्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) आपली मोहीम सुरूच ठेवली असून, सोमवारी झालेल्या कारवाईत तब्बल ९५० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, एकाच आठवड्यात एलसीबीने केलेली ही चौथी मोठी कारवाई असल्याने खळबळ उडाली आहे. नगरहून येऊन एलसीबीचे पथक वारंवार कारवाया करत असताना, स्थानिक संगमनेर पोलीस मात्र या प्रकारांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आता सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, गणेश लोंढे, विजय पवार, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, योगेश कर्डीले आणि उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने ही कारवाई…
महाराष्ट्र संवाद न्यूज, संगमनेर: संगमनेर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात महायुतीच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात डीजे लावून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या ४० वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ माघाडे परिवाराच्या माध्यमातून वैचारिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांची परंपरा जोपासली जात आहे. मात्र, यंदा प्राध्यापक अहिरे यांचे व्याख्यान सुरू असतानाच समोरून डीजेचा कर्कश आवाज करून हा कार्यक्रम उधळून लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे संगमनेरची सांस्कृतिक आणि सामाजिक एकता धोक्यात आल्याचा आरोप करत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यात गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या राजकीय ध्रुवीकरणाचे पडसाद आता…
