Author: Annant Ppangarkar
अहिल्यानगर, दि. १६ – शेती अधिक शास्त्रशुद्ध, फायदेशीर व पर्यावरणपूरक बनावी यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. शेतीसाठी उपयुक्त माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा व नियोजन बैठकीत पालकमंत्री विखे बोलत होते. बैठकीस आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अहिल्यानगरचे अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून संगमनेर तालुक्यातील एका व्यापाऱ्याला जामखेडमध्ये बोलावून लुटणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या दरोड्यात व्यापाऱ्याकडून दहा लाख रुपये आणि सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. पोलिसांनी तत्पर कारवाई करत या टोळीतील तीन सदस्यांना बेड्या ठोकल्या असून, उर्वरित सात आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र दिलीप मैड (वय ३५, रा. आश्वी, ता. संगमनेर) यांना अश्विनी नावाच्या महिलेने १५० ग्रॅम सोने १० लाख रुपयांना देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार मैड हे जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे गेले असता, अश्विनी आणि तिच्या ८ ते १० साथीदारांनी त्यांना मारहाण…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : संगमनेर शहर गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीच्या बेड्यांमध्ये जखडले आहे. विकासकामांची चाके जाम झाली आहेत आणि नागरी समस्यांचा डोंगर वाढतच चालला आहे. या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या संगमनेरकरांनी आता आरपारची लढाई पुकारली आहे. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी नागरिकांच्या शिष्टमंडळाने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक मारली. शहरातील प्रलंबित प्रश्नांची जंत्री त्यांच्यासमोर मांडत, येत्या १५ दिवसांत या समस्यांवर ठोस तोडगा काढण्याचा अल्टिमेटम दिला. अन्यथा, नगरपरिषदेला हादरवून सोडणारे जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. शहरातील नागरिक अनेक दिवसांपासून मूलभूत नागरी सुविधांसाठी तरसत आहेत. पावसाळा तोंडावर असताना गटारे तुंबलेली आहेत, रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत,…
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील शेंडेवाडी, साकूर, पिंपळगाव, कौठे मलकापूर आणि कर्जुले पठार भागातील दगडखाणींवर अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत काम करत असलेल्या ३८ वेठबिगार आणि ३१ बालकामगारांची प्रशासनाने आज (गुरुवारी) यशस्वीरित्या सुटका केली. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना सकाळी मिळालेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने तातडीने आणि प्रभावीपणे ही कारवाई केली. मुक्त करण्यात आलेल्या ३८ वेठबिगार कामगारांमध्ये २२ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे. या गंभीर प्रकरणी संबंधित ठेकेदारावर घारगाव पोलीस ठाण्यात वेठबिगार प्रतिबंधक कायद्यासह कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार, संगमनेरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर,…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी: श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, राज्याच्या सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी एका प्रशासकीय समितीची नियुक्ती केली आहे. यासंबंधी गुरुवारी (१५ फेब्रुवारी २०२४) विशेष आदेश जारी करण्यात आला. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे विद्यमान पालकमंत्री आणि स्थानिक आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रशासकीय समितीमध्ये प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश असून जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख असलेले जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची सहअध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधी यांचाही समितीत समावेश आहे. संगमनेरचे आमदार अमोल खताळ, कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे हे…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीरामपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत १३ कोटी ७५ लाख ४१ हजार रुपये किमतीचा तब्बल ४०८ किलो वजनाचा अल्प्राझोलम या अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका टेम्पो चालकाला अटक केली असून पुणे जिल्ह्यातील एका रसायन अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मिनीनाथ विष्णू राशिनकर (वय ३८, रा. धनगरवाडी, राहाता, अहिल्यानगर) या टेम्पो चालकाला अटक केली आहे. तर, विश्वनाथ कारभारी शिपणकर (रा. दौंड, पुणे) याच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात…
शिर्डी: मुंबईतील सोने व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी यांना शिर्डीत मोठा गंडा घालण्यात आला आहे. त्यांच्या हॉटेलच्या खोलीतून तब्बल ३ कोटी २६ लाख रुपये किंमतीचे सुमारे साडेतीन किलो सोन्याचे दागिने आणि ४ लाख रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. या प्रकरणी खिशी यांनी त्यांचा चालक सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित याच्यावर संशय व्यक्त केला असून शिर्डी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजयसिंह खिशी हे मुंबईतील त्यांच्या फर्ममधून सोन्याचे दागिने घेऊन ७ मे रोजी शिर्डीत आले होते. त्यांच्यासोबत कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि चालक सुरेश कुमार होते. त्यांनी हॉटेल साई सुनीतामध्ये खोली क्रमांक २०१ मध्ये मुक्काम केला होता. खिशी हे परिसरातील सराफा दुकानांमध्ये सोने…
भाग – २ संगमनेर | अनंत पांगारकर अधिकृत गर्भपात केंद्र नसताना देखील रुग्णालयातील डॉक्टरने गर्भपातासंदर्भातील कायदा आणि नियम बाजूला ठेवत महिलेचा गर्भपात करण्याचे धाडस कसे दाखविले. महिलेची प्रकृती हाताबाहेर गेल्यानंतर तिला थेट दुसऱ्या तालुक्यातील रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर तेथे या महिलेच्या मृत्यू झाला. याची माहिती शहरात कानोकानी बहुतांश ठिकाणी पसरली. त्यामुळे आता या दुर्दैवी घटनेनंतर संगमनेर शहरातील महिला सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांनी ‘ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या माध्यमातून घडलेल्या प्रकरणावर आवाज उठवला आहे. त्यांनी सलग चार ते पाच दिवस या घटनेची सखोल माहिती मिळवली आणि २ मे २०२५ रोजी अहमदनगर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे एक विस्तृत तक्रार अर्ज दाखल केला. या…
महाराष्ट्र संवाद न्यूज – राहाता: शेतात खत टाकण्याचे काम आटोपून जवळच्या ओढ्यावर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या चुलत भावांचा पाय घसरून पाण्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांनाही प्राण गमवावे लागले. ही हृदयद्रावक घटना राहाता तालुक्यातील गोगलगाव येथे घडली. मृत पावलेल्या मुलांची नावे साहिल दत्तात्रय चौधरी (वय १८) आणि किरण नारायण चौधरी (वय १५) असून दोघेही गोगलगावचे रहिवासी होते. किरणने नुकतीच ९ वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती, तर साहिल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, किसन तुकाराम तनपुरे (वय ६०) हे बुधवारी सायंकाळी त्यांच्या शेतात पिकांना पाणी देत होते. त्याचवेळी त्यांच्या शेजारी राहणारे साहिल आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विट व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तयार करण्यासाठी ठेवलेल्या कच्च्या विटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने विट उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी विट उत्पादकांनी शासनाकडे अनेक वर्षांपासून मागणी केली आहे, परंतु शासनाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. शेतमालाला अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास जशी विमा योजना लागू आहे, त्याच धर्तीवर विट व्यवसायासाठी देखील विमा योजना लागू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विट उत्पादकांनी विमा कंपन्यांकडे विमा पॉलिसीनुसार कच्च्या विटांचा विमा उतरवण्याची विचारणा केली असता, विमा कंपन्यांनी मात्र विट व्यवसायासाठी त्यांच्याकडे कोणतेही विशिष्ट धोरण…
महाराष्ट्र संवाद न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात राजशिष्टाचार आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. या प्रकरणी दोन तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सहाय्यक महसूल अधिकारी एस. पी. हांगे आणि ग्राम महसूल अधिकारी व्ही. व्ही. कंठाळे या दोन तलाठ्यांनी मुख्यालयात थांबण्याचे आदेश असूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पूजन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला, ज्यामुळे राजशिष्टाचाराचे उल्लंघन झाले. ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केल्याचा आरोप…
संगमनेर – प्रतिनिधी महाराष्ट्र विधानमंडळाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या लोकलेखा समितीवर (Public Accounts Committee) आमदार सत्यजीत तांबे यांची निवड झाली आहे. त्यांच्या अभ्यासू वृत्ती, प्रभावी मांडणी आणि युवा नेतृत्वामुळे ही निवड विशेष लक्षवेधी ठरली आहे. विधानमंडळ सचिवालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, आमदार तांबे यांची लोकलेखा समितीवर अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती राज्य सरकारच्या खर्चावर, आर्थिक निर्णयांवर आणि नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) यांच्या अहवालावर आधारित चौकशी करून शिफारसी करते. विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार हे या समितीचे अध्यक्ष आहेत. युवा नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तांबे यांच्यावर राज्याच्या आर्थिक पारदर्शकतेची मोठी जबाबदारी आली आहे. त्यांनी यापूर्वी विधान परिषदेत कायदा, आरोग्य, शिक्षण, शेती,…
नवी दिल्ली: पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकावलेला भारतीय भूभाग त्वरित रिकामा करावा, अशी कठोर भूमिका भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने घेतली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पाकिस्तानला यासंदर्भात स्पष्ट शब्दांत ताकीद दिली. याव्यतिरिक्त, सिंधू पाणी वाटप करार देखील आता स्थगित ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रणधीर जयस्वाल म्हणाले की, जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित कोणतेही प्रश्न भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय स्तरावरच सोडवले पाहिजेत, ही भारताची नेहमीची आणि राष्ट्रीय भूमिका आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही. 10 मे 2025 रोजी दुपारी 3:35 वाजता दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेबाबत माहिती देताना जयस्वाल म्हणाले, “पाकिस्तानी उच्चायुक्तालयाकडून दुपारी 12:37 वाजता या…
मुंबई – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यभरात संघटनात्मक फेरबदल केले आहेत. पक्षाने राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी ५८ नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. या निवडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. विधानसभा निवडणुकांनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याऐवजी पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली. कार्यकारी अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ‘संघटन पर्व’ अभियान यशस्वीरित्या राबवून दीड कोटी नवीन सदस्यांची नोंदणी पूर्ण केली. ही सदस्य नोंदणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महत्त्वाची रणनीती मानली जात आहे. https://x.com/BJP4Maharashtra/status/1922220666297713066?t=2k_iZ7sCUaO21JLggAJQpA&s=19 या पार्श्वभूमीवर, भाजपने राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी ५८ जिल्हाध्यक्षांची नवी यादी जाहीर…
अहिल्यानगर – एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या दोन अवैध जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 17 जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 2 लाख 27 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पकडलेल्यांमध्ये एका पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन आणि वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीच्या आजी व माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने या कारवाईची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी ही कारवाई केली. पथकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सह्याद्री चौक ते चाकण ऑईल मिल रस्त्यालगतच्या हॉटेल जनता दरबारच्या मागील पटांगणात…
संगमनेर – प्रतिनिधी राज्यातील महत्त्वपूर्ण सहकारी संस्थांपैकी एक असलेल्या आणि सहकाराच्या माध्यमातून संपूर्ण राज्यासाठी नव्हे तर देशासाठी दिशादर्शक टिपलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची एकमताने निवड झाली आहे. यासोबतच, व्हाईस चेअरमनपदी पांडुरंग घुले यांची देखील सर्वानुमते निवड झाली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडल्यानंतर आज (मंगळवारी) प्रादेशिक सहसंचालक संतोष बिडवाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक, काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वीही कारखान्याने अनेक महत्त्वपूर्ण…
अकोले – प्रतिनिधी नवलेवाडी (ता. अकोले) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका श्रीमती सुमन गणपत खतोडे यांच्या शिकवण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे आणि विद्यार्थ्यांप्रति असलेल्या समर्पण भावनेमुळे पालक अक्षरशः भारावून गेले आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून नवलेवाडीतील विद्यार्थी आणि पालकांनी एकत्र येत त्यांना चक्क एक नवीन स्कुटीची खास भेट दिली आहे. अकोले येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात हा कौतुक सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह राजूर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य विलास नवले यांनी अध्यक्षस्थान भूषविले. माजी नगराध्यक्ष के. डी. धुमाळ, गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, शिक्षण विस्तार अधिकारी (अकोले) माधवराव हासे, शिक्षण विस्तार अधिकारी (मवेशी बीट) बाळासाहेब दोरगे आणि केंद्रप्रमुख…
संगमनेर – प्रतिनिधी संगमनेर बस स्थानकामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा देखभालीअभावी बंद पडली होती. संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ पाटील यांनी याची तातडीने दखल घेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. या प्रयत्नांना यश आले असून, लवकरच संगमनेर एसटी स्थानकातील बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा पुन्हा सुरू होणार असल्याचे माहिती आमदार खताळ यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आमदार खताळ यांच्या मागणीची दखल घेत एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना योग्य ते निर्देश दिले. त्यानुसार, एमएसआरटीसीच्या आयटी विभागाने संगमनेर बस डेपोत नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच,…
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानला कठोर इशारा दिला आहे. दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. अण्वस्त्रांच्या धमक्यांना न जुमानता निर्णायक प्रहार करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणारे सरकार यांच्यात फरक नसल्याचेही त्यांनी ठणकावले. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पहिल्यांदाच जाहीर भाषणात बोलताना मोदींनी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तान सरकार आणि लष्करावर घणाघात केला. दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला लष्करी अधिकारी उपस्थित राहणे, हे ‘सरकारपुरस्कृत दहशतवादा’चे मोठे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. सर्जिकल स्ट्राईक, एअरस्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूर यांद्वारे भारताने दहशतवादाविरोधात नवी रणनीती आखली आहे. पाकिस्तानने अण्वस्त्र वापरण्याची धमकी दिल्याने अमेरिकेने मध्यस्थी केल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मोदींनी…
संगमनेर – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात घडलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाने डॉ. अमोल कर्पे याने वैद्यकीय क्षेत्राची लाज चव्हाट्यावर आणली असतानाच आता आणखी एका हृदयद्रावक घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. एका गर्भवती महिलेला गर्भपात करायचा होता आणि या प्रयत्नात तिला आपला जीव गमवावा लागला. या घटनेने आरोग्य यंत्रणेतील त्रुटी आणि संगमनेरमधील काही डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला देण्यात आलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांमुळे झालेल्या त्रासातून गर्भपात करताना तालुक्यातील एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. महिलेला दिलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांमुळे महिलेची तब्येत बिघडली. त्यानंतर संगमनेर शहरातील एका प्रतिष्ठित ‘प्रवीण’ डॉक्टरने महिलेची शारीरिक स्थिती…
