Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : राज्यात बहुचर्चित ठरलेला संगमनेरच्या बस स्थानकाचे व व्यापारी संकुलाचे बांधकाम अवैध गौण खनिजाचा वापर करून करण्यात आल्याचे समोर आले आहे. वाळू मुरूम डबर याचा शासनाचा मोबदला बुडून वापर केल्याप्रकरणी विकसक आर एम कातोरे यांना संगमनेरच्या तहसीलदारांनी ३ कोटी ६६ लाख २२ हजार ८६९ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे हा प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आला. यासंदर्भात अमोल खताळ पाटील यांनी दिलेली माहिती अशी, संगमनेर बस स्थानक आणि व्यापारी संकुलाचे बांधकाम बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर करण्यात आले आहे. हे बांधकाम करताना विकसक आर.एम.कातोरे यांनी गौण खनिज (वाळू, मुरूम, डबर) विशेषत: वाळूचा कुठलाही…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अमरावती : शिंदे फडणवीस सरकार सोबत असलेले प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री अपक्ष आमदार बच्चू कडू रस्ता ओलांडत असताना त्यांना एका दुचाकी स्वाराने जोराची धडक दिली आहे. या अपघातात बच्चू कडू गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अमरावतीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कडू यांच्यावर अमरावतीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी स्वतः ट्विट झाले या अपघाताची माहिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील आमदारांच्या अपघाताची मालिकाच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार जयकुमार गोरे, आमदार धनंजय मुंडे, आमदार योगेश कदम यांच्या कारचा अपघात झाल्याचे प्रकार गेल्या काही दिवसात समोर आले आहे. त्यातच आता प्रहार संघटनेचे नेते,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील शुक्लेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. पाचव्या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या साहिल सातपुते याच्यासह इयत्ता आठवीमध्ये शिकणारे चार विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत, अशी माहिती शाळेच्यावतीने देण्यात आली. गुणवत्ता यादीत चमकलेल्या आकांक्षा सोमनाथ कुटे हिने अहमदनगर जिल्ह्यात १४३ वा, श्रेयस रमेश सातपुते यांने अहमदनगर जिल्ह्यात २३० वा, श्रावणी संजय गुंजाळ हिने भूमिहीन पालकांचे पाल्य या गटात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला तर ज्ञानेश्वरी जालिंदर सातपुते हिने भूमिहीन पालकांचे पाल्य या गटात तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांना एकनाथ भांड यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेर तालुक्यातील चिखली येथील नूतन माध्यमिक विद्यालयात पार पडलेल्या तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनामध्ये देवगड विद्यालयातील नववी मध्ये शिकणाऱ्या अनुराधा शांताराम वर्पे या विद्यार्थ्यांनीच्या गणितीय शैक्षणिक खेळणी उपकरणाने प्रथम क्रमांक मिळविला. ५ व ६ जानेवारीला पार पडलेल्या या प्रदर्शनात अनुराधा वर्पे हिने गणितीय शैक्षणिक खेळणी यामध्ये संच म्हणजे काय, कोनांच्या जोड्या, घनफळ काढणे याची प्रतिकृती तयार केली होती .सदर उपकरणासाठी तिला तीस रुपये खर्च आला होता. तालुकास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनापूर्वी देवगड विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याला अनुसरून निर्माण होणाऱ्या कलाकृतींना सादरीकरणाची संधी मिळावी आणि यातून संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी, आंतरशालेय विज्ञान-गणित प्रदर्शन भरवण्यात आले…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : शहरालगत खांडगाव फाटा येथे भरधाव पीकअप आणि रिक्षाच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले. मृतात एका महिलेचा समावेश आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील खांडगाव फाटा येथे हा अपघात झाला. आशाबाई बबनराव चोथे (वय ४५, रा. आंबाईमाता मंदिर, पुणे), राजेंद्र उत्तम शेळके (वय ४५ रा. आंबेगाव, पुणे) अशी मृतांची नावे असून दत्ता पांडुरंग वराडे, कैलास चोथे, आशा चोथे, राजू शेळके यांचा जखमींमध्ये समावेश आहे. एम.एच. १७ सीव्ही ००२६ या क्रमांकाची पिकअप नासिक-पुणे मार्गावरून पुण्याच्या दिशेने जात होती. यावेळी खांडगाव फाट्यावर समोरून संगमनेरच्या दिशेने येत असलेली रिक्षा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : दिवसेंदिवस गंभीर बनलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकी विरोधात संगमनेरच्या महसूल विभागाने कारवाया सुरू केल्या आहेत. एकाच वेळी अवैध वाळूची वाहतूक करणारी तब्बल पाच वाहने महसूल विभागाच्या पथकाने पकडली आहेत. या सर्वांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूजला’ दिली. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. महसूलच्या पथकाने शहर व परिसरातून ही वाहने पकडली आहेत. गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारने गौण खनिजाबाबत कडक धोरण अवलंबिले आहे. याचा फटका वाळू तस्करांना बसला असून महसूल खात्याने अवैध वाळू तस्करी विरोधात कठोर पावले उचलण्यास…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : थोर स्वातंत्र्यसेनानी व अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १२ जानेवारी हा प्रेरणा दिन म्हणून साजरा होत असून यावर्षीही गावोगावी मोठ्या उत्साहात प्रेरणा दिन होणार आहे. या निमित्ताने अमृत उद्योग समूहाच्यावतीने गुरुवारी (१२ जानेवारी) सकाळी ९ वाजता अमृतेश्वर मंदिरातील प्रांगणाजवळ प्रेरणास्थळ येथे अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून संगमनेर तालुक्यामध्ये समृद्धी निर्माण केली. आर्थिक शिस्त, काटकसर, पारदर्शकता ही त्रिसूत्री सहकारात राबवून संपूर्ण देशासाठी दिशादर्शक ठरणारे संगमनेर हे आदर्श सहकाराचे मॉडेल निर्माण केले आहे. दरवर्षी १२ जानेवारी हा दिवस संगमनेर तालुका व अहमदनगर…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर ; कोरोना काळात जिल्हा बंदी असताना नासिकहून पुणे जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनाची तपासणी करताना नाकाबंदी दरम्यान दंड आणि कारवाई चुकविण्याचे उद्देशाने पळून जाण्याच्या प्रयत्नात पोलीस निरीक्षकांच्या पायावर कार घालून त्यांच्या पायाला दुखापत करणाऱ्या आरोपीची संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायाधीश डी. आर. देशपांडे यांनी अवघ्या ११ महिन्यात हा खटला निकाली काढला. १५ मे २०२१ रोजी संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथील आंबी फाट्यावर हा प्रकार घडला होता. कोरोना प्रादुर्भाव असल्याने नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींकडे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना पास आहेत की नाही याची पोलीस निरीक्षक सुनील पाटील तपासणी करत होते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेर शहर आणि तालुक्यात मोटरसायकल चोरी दररोज सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तालुका पोलिसांनी पकडलेल्या एका संशयित आरोपीकडून सहा मोटारसायकलीसह तीन मोबाईल हस्तगत केले आहे. या संशयिताच्या साथीदारांचा शोध लागल्यास आणखी मोटर सायकल मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस कर्मचारी अनिल जाधव यांना संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील संशयित इसम लक्ष्मण जयराम गोरडे (वय ४२) हा चोरीच्या मोटरसायकल विकत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. जाधव यांनी संशयित इसम गोरडे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता त्याने मोटार सायकली चोरल्या असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे दोन…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी परिवाराच्या पुढाकाराने व महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा आणि संगमनेरमधील माहेश्वरी समाज यांच्या सहकार्याने आयोजित केले जाणारे विवाहयोग्य युवक-युवती परिचय संमेलन मागील दहा वर्षांपासून माहेश्वरी समाजाला वरदान ठरले आहे. हे संमेलन म्हणजे व्यवस्थापन कौशल्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण असल्याचे गौरवोद्गार प्रसिध्द व्यवस्थापन गुरु डॉ. वसंत बंग यांनी काढले. अखिल भारतीय माहेश्वरी विवाहयोग्य युवक-युवती परिचय संमेलनाचा उद्घाटनावेळी ते बोलत होते. राजस्थान मंडळाचे अध्यक्ष मनिष मालपाणी, स्वागताध्यक्ष राजेश मालपाणी, उद्योजक विजय आसावा, अजय लाहोटी, मंडळाचे कार्याध्यक्ष रोहित मणियार, प्रकल्प प्रमुख ओम इंदाणी, उपाध्यक्ष सम्राट भंडारी, संगमनेर तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष अतुल झंवर, कोषाध्यक्ष उमेश…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : मानवी जीवनात विज्ञानाचे मोठे महत्त्व आहे. मानवाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचे काम विज्ञान करत असते. त्यामुळे ज्ञानप्राप्तीसाठी विज्ञानाची कास धरणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते हिरालाल पगडाल यांनी केले. ४७ वे संगमनेर तालुका विज्ञान गणित प्रदर्शन ५ ते ७ जानेवारी दरम्यान तालुक्यातील चिखली येथील नूतन माध्यमिक विद्यालयात पार पडले. प्रदर्शनाचे उद्घाटन पगडाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनिल नागणे होते. गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष सोपान सहाने, उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख नंदकुमार हासे आदी उपस्थित होते. गटविकास अधिकारी नागणे म्हणाले,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षण झाल्यानंतर आपल्याकडे मराठी माणूस नोकरीला प्राधान्य देतो. व्यवसाय करण्याचे धाडस तो दाखवत नाही. असं मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित १८ व्या जागतिक मराठी संमेलनामध्ये ते बोलत होते. यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार, पी. डी. पाटील, संमेलनाध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे आधी व्यासपीठावर उपस्थित होते. मराठी टक्का आणि मराठी माणसाविषयी चिंता व्यक्त करत पाटील म्हणाले, राजकारणात मराठी माणूस येण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. निवडणुकांमध्ये उमेदवारी देऊ नका, असं मराठी माणूस म्हणू लागला आहे. विश्लेषकांमध्ये देखील मराठी नाव फारसे सापडत नाही. यात अमराठी व्यक्ती अधिक संख्येने आहेत. मराठी माणसाची ही…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : शुक्रवारी मध्यरात्री तीन बिबट्यांनी एकत्रित पोल्ट्री फार्ममध्ये धुमाकूळ घालत सुमारे चारशेहून अधिक कोंबड्या फस्त केल्या तर अनेक कोंबड्या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. अकोले तालुक्यातील मेहेंदुरी येथील शेतकरी सुधीर दगडू बंगाळ यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये ही घटना घडली आहे. अनेक कोंबड्या भयभीत झाल्याने आणखी काही कोंबड्या दगावण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातील मेहेंदुरी परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांचा या परिसरात नेहमीच वावर असतो. बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून हा भाग परिचित आहे. त्यामुळे या परिसरात अनेक बिबटे दिवस-रात्र संचार करीत आहेत. यातून मानवांवर हल्ल्याचे प्रकार देखील घडले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री १…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : धांदरफळच्या देशमुख मळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका वृषाली सुनील कडलग यांच्या प्रदूषण विरहित सिग्नल झोन या उपकरणास प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. संगमनेर तालुक्यातील चिखली येथे ५ ते ७ जानेवारी दरम्यान झालेल्या ४७ व्या तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शन पार पडले. इयत्ता सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी असे दोन गट त्याचबरोबर प्राथमिक शिक्षक गट, माध्यमिक शिक्षक गट, परिचर गट अशा विविध गटांमधून शालेय साहित्यांची स्पर्धा झाली. संगमनेर तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थी शिक्षक परिचारक यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला. प्राथमिक शिक्षक गटात “कार्बन डाय-ऑक्साइड वायूचे सिग्नल परिसरातील नियंत्रण” या विषयावरील मॉडेलला प्रथम…
विकास प्रक्रियेत माध्यमांचा सहभाग आवश्यक महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क लोणी : जिल्ह्याकडे आजपर्यंत फक्त राजकीय दृष्टीकोनातून पाहिले गेले. पालकमंत्री बाहेरचेच देण्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न झाल्यामुळेच जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा कधी मांडला गेला नाही. ही परिस्थिती सर्वांच्या सहकार्याने बदलविण्याचा आपला प्रयत्न आहे. पर्यटनाबरोबरच औद्योगिक विकासासाठी हा जिल्हा आता सर्वांना साद घालत आहे. माध्यमांनी सुध्दा या विकास प्रक्रीयेत सहभागी होवून मार्गदर्शकाची भूमिका बजवावी, असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. पत्रकार दिनाचे औचित्य साधून प्रवरा परिवाराच्यावतीने माध्यम प्रतिनिधींशी स्नेह संवादाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मंत्री विखे पाटील यांनी सविस्तर भाष्य करुन, जिल्ह्याच्या तयार करण्यात…
रविवार विशेष 🔸 प्रवीण पुरो राज्य विधिमंडळाच्या नागपूरमध्ये पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजांना स्वराज्यरक्षक म्हणून संबोधल्याच्या कारणास्तव भारतीय जनता पक्षाने राज्यभर त्यांचा निदर्शनं करून निषेध केला. झोपी गेलेला जागा झाला, असाच हा आंदोलनाचा प्रकार होता. स्वराज्यरक्षक अशी उपाधी दिल्याने अजित पवार यांनी संभाजी राजांचा जणू अवमानच केला असा प्रचार भाजपच्या धर्माभिमान्यांनी सुरू केला. वास्तविक पवार यांनी ते राज्याचे अर्थमंत्री असताना संभाजी राजांचा स्वराज्यरक्षक असा उल्लेख मागल्यावर्षी अर्थसंकल्प मांडताना जवळपास १० वेळा केला. राज्याच्या अर्थसंकल्पाची पूर्वतयारी ही वित्तमंत्रालयाच्या संबंधित अधिकार्यांकडून होत असते. अर्थसंकल्प जाहीर झाला त्यातील संभाजी राजांविषयीची टिपण्णं ही अधिकार्यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : गोवंश जनावरांच्या कत्तलीस बंदी असली तरी संगमनेरात मात्र या कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन सुरूच आहे. शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून येथील सुरू असलेल्या एका कत्तलखान्यावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी दोन लाख रुपये किमतीचे गोवंश जनावराचे मांस ताब्यात घेत नष्ट केले. संगमनेर शहरातील मोगलपुरा भागातील खाटीक गल्लीमध्ये गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा टाकला असता तेथे पोलिसांना मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची कत्तल केल्याचे तेथे आढळलेल्या मांसावरून निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे साडेआठशे किलो मांस ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलिसांची छाप्याची कारवाई सुरू असताना सालेम साटम कुरेशी…
खोके सरकार, बोके सरकार आणि द्वेषाने वागणाऱ्या महसूलमंत्र्यांमुळे आमची उपासमार महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : आपण अनेक वर्ष महसूल मंत्रीपद उपभोगले आहे. मात्र आपण कधीही अशा प्रकारचे राजकारण केले नाही. प्रत्येकाला मदत करण्याची भूमिका होती. मात्र काही लोक आता आपल्या तालुक्याचे नुकसान करायला निघाले आहे. त्यांना येथील विकास बघवत नाही. तालुक्याचा विकास थांबविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. दहशतीचे राजकारण त्यांना आपल्या तालुक्यात व जिल्ह्यात करावयाचे आहे. मात्र संगमनेर तालुका आणि नगर जिल्हा हे कदापिही होऊ देणार नाही. असा थेट इशारा माजी महसूल मंत्री व काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ४ व ५ जानेवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत विविध उद्योजकांची भेट घेतली. या उद्योजकांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी डावोसला जात असल्याने यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. रोहित पवार यांनी एका ट्विट द्वारे सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आले आणि ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक घेऊन गेले. पण महाराष्ट्रात सगळ्या पायाभूत सुविधा असतानाही गुंतवणूकदारांना भेटून त्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करायला लावावी,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : विधान परिषद पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक नियमांचा व कायद्याचा बारकाईने अभ्यास करून ही निवडणूक मुक्त, निर्भय, निष्पक्ष व अत्यंत शिस्तबद्धरीतीने पार पाडावी. तसेच या निवडणुकीच्या कामात कुठल्याही प्रकारचा कसूर खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी भोसले यांच्या उपस्थितीत पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोसले बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, राज्य…
