Author: Annant Ppangarkar
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील पठार भागात दुचाकीला कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या दिवंगत विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील कलावंतांवर जमावाने हल्ला केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या भीषण प्रकारात महिला कलावंतांनाही मारहाण करून त्यांचा विनयभंग करण्यात आला असून, कलावंतांची रोकडही लुटण्यात आली आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील वरुडी पठार शिवारात ही घटना घडली. संबंधित तमाशा फड पोखरी बाळेश्वर (ता. संगमनेर) येथील कार्यक्रम आटोपून माळेगाव पठार येथे पुढील कार्यक्रमासाठी वाहनांतून जात होता. वाटेत वरुडी पठार येथील एका पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहने थांबली असताना, एका दुचाकीस्वाराने तमाशाच्या वाहनाला कट मारला. यावरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले.…
जालना: समृद्धी महामार्गावर बुधवारी सायंकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव वाहनाने कामगारांच्या उभ्या वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सात महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य १० ते १२ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये निधोना येथील अलकाबाई दादाराव आदमाने, मीना परमेश्वर आदमाने, कांचनबाई प्रकाश आदमाने, लक्ष्मीबाई संतोष मदन, सुमनबाई कचरू आदमाने आणि केळीगव्हाण येथील कडुबाई रामदास मदन व ताराबाई गहेनाजी चौधरी यांचा समावेश आहे. अपघातानंतर महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता आणि मृतदेहांचा खच पडला होता, हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील कडवंचीनजीक हे सर्व मजूर समृद्धी महामार्गावर…
अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील कोल्हार-घोटी मार्गावरील वडगाव पान येथे इयत्ता सहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या भीषण ॲसिड हल्ल्याच्या घटनेला आता १५ दिवस उलटून गेले आहेत. मात्र, एवढा काळ लोटूनही पोलीस प्रशासनाला या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेण्यात यश आलेले नाही. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट असून पोलिसांच्या तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता अहिल्यानगर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने आरोपीची ओळख पटवणाऱ्या किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तीस २ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. ही दुर्दैवी घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली होती. पीडित मुलगी दुपारी शाळेतून घरी परतत होती. ती एकटीच…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यात रविवार आणि सोमवार अशा सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान केले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील १५ गावांमधील सुमारे ४ हजार ५९१ शेतकऱ्यांना फटका बसला असून प्राथमिक अंदाजानुसार ३ हजार १७७.४६ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी दिली आहे. तालुक्यात रविवारी (२९ मार्च) आणि सोमवारी (३० मार्च) सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणच्या घरांचे आणि गोठ्यांचे पत्रे उडून गेले. शेतात काढणीला आलेला गहू, कांदा, मका यासह भाजीपाला आणि डाळिंबाच्या बागांचे मोठे…
मुंबई, विशेष प्रतिनिधी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडून मोठा कायदेशीर दणका बसला आहे. आपल्या निवडणुकीला आव्हान देणारी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची याचिका रद्द करावी, अशी मागणी करणारा खताळ यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे खताळ यांची आमदारकी धोक्यात आली असून, आता या प्रकरणाचा रीतसर खटला चालवला जाणार आहे. बाळासाहेब थोरात यांनी खताळ यांच्या निवडीला निवडणूक याचिकेच्या माध्यमातून आव्हान दिले आहे. अमोल खताळ यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत आणि करांच्या थकबाकीबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. या याचिकेला उत्तर देताना खताळ…
मुंबई, विशेष प्रतिनिधी राज्य शासनाने आज प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करत भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) १० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. या नव्या नियुक्त्यांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयापासून ते मुंबई महानगरपालिकेपर्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. या फेरबदलात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असलेल्या अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली असून, देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या त्या नवीन प्रमुख असतील. याचसोबत कृषी आणि पदुम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांची वित्त विभागात अतिरिक्त मुख्य…
शिर्डी, विशेष प्रतिनिधी- महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा खरात याचा आणखी एक नवा कारनामा समोर आला आहे. यामुळे खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिर्डी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करत बेकायदेशीर सावकारी प्रकरणी शिर्डी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी कॅप्टन अशोककुमार एकनाथ खरात, त्यांची पत्नी कल्पना खरात आणि इतर तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी यातील दोन आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२३ पासून शिर्डी, नाशिक आणि राहाता परिसरात हा जमीन व्यवहाराचा घोळ सुरू होता. पीडित व्यक्तीला पैशांची गरज असताना कॅप्टन अशोककुमार खरात याने दरमहा दोन टक्के व्याजाने पैसे…
नाशिक – नाशिक येथील स्वयंघोषित महाराज अशोक खरात याच्या काळ्या कर्तृत्वाचे एकामागून एक धक्कादायक पैलू समोर येत असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि जादूटोणा अशा गंभीर आरोपांखाली सध्या तो पोलीस कोठडीत असून एसआयटीमार्फत या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, खरातच्या भक्तांमध्ये केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर बडे सरकारी अधिकारी, उद्योजक आणि राजकारण्यांचाही समावेश होता. अशोक खरात हा आपल्या श्रीमंत भक्तांच्या घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी जाण्यासाठी अव्वाच्या सव्वा फी वसूल करत असे. केवळ एका ‘आऊटडोअर व्हिजिट’साठी तो चक्क ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम उकळत असल्याचे उघड झाले आहे. जो भक्त जास्त पैसे…
संगमनेर, प्रतिनिधी- लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारातून संगमनेर तालुक्यात समृद्धी निर्माण झाली असून हा तालुका आता दुधाचा तालुका म्हणून ओळखला जात आहे. आगामी काळात पंजाबप्रमाणे दुग्ध क्षेत्रात क्रांती करण्याकरता रणजीतसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘मिशन ५० लिटर’ क्षमतेच्या गाईंच्या निर्मितीमुळे राज्यात दुसरी दुग्ध क्रांती होईल, असे गौरवोद्गार पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल यांनी काढले आहेत. तर पशुपालकांनी आगामी काळात ‘कमी गाई जास्त दूध’ हे सूत्र वापरावे, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.सोमवारी वसंत लॉन्स येथे संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने आयोजित ‘मिशन ५० लिटर’ दुग्ध क्रांती कार्यशाळेत ते बोलत होते.…
संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी सोमवारी सकाळी धांदरफळ, डेरेवाडी, निमज यांसह विविध गावांतील नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसलेल्या या भागातील महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विलंब न लावता तातडीने सरसकट पंचनामे पूर्ण करावेत, जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत मिळेल, असे स्पष्ट निर्देश आमदार खताळ यांनी यावेळी प्रशासनाला दिले. तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, डेरेवाडी, गोडसेवाडी, निमज आणि राजापूर या गावांमध्ये गारपिटीने गहू, कांदा, टोमॅटो, मका आणि डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले असून उभी पिके जमिनीदोस्त झाली…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे घडलेल्या बहुचर्चित खुनाच्या घटनेतील आरोपींना न्यायालयाने अखेर शिक्षा सुनावली आहे. सोमवारी न्यायालयाने मुख्य आरोपीला जन्मठेप तर अन्य दोघांपैकी एका आरोपीला दहा वर्षाची सक्त मजुरी व तिसऱ्या आरोपीला दहा वर्षे साध्या कैदेची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. या खटल्याची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, २२ जून २०२० रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वडगावपान येथील फिर्यादी प्रतीक बाबासाहेब चत्तर यांच्या ‘कमळेश्वर चिकन शॉप’वर ही घटना घडली होती. आदल्या दिवशी झालेल्या भांडणावरून पोलिसांत दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून आरोपी राहुल देविदास काळे, देविदास हरिभाऊ काळे आणि रामनाथ सावित्रा गायकवाड हे तेथे आले होते. त्यांनी फिर्यादीचे वडील बाळासाहेब चत्तर यांना…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षाने केलेल्या फसवणुकीचे प्रकरण तालुक्यात चांगले चर्चेत आले असून सोमवारी न्यायालयाने संस्थापक अध्यक्ष मधुकर बादशहा वाळे याच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली तर त्याची संचालक पत्नी आणि पतसंस्थेचे महिला व्यवस्थापक यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. मुख्य आरोपीच्या कोठडीत वाढ झाल्याने पोलीस चौकशीतून काय समोर येते याकडे लक्ष लागले आहे. कर्ज देण्याच्या बहाण्याने एका अनुसूचित जातीच्या कुटुंबाची जमीन हडपण्याचा प्रकार समोर आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने संगमनेर तालुक्यातील झोळे येथील कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षाने आपल्या पदाचा गैरवापर करून बनावट कागदपत्र आधारे फसवणूक केल्याप्रकरणी संचालक मंडळाविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फसवणूक,…
संगमनेर, प्रतिनिधी- रविवारी संगमनेर तालुक्यातील पश्चिम भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिकांचे मोठे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. याचबरोबर अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला याचबरोबर सरकारने तातडीने पंचनामे करून सर्व नुकसानग्रस्तांना भरीव मदत करावी अशी आग्रही मागणी केली. निमज, धांदरफळ खुर्द, धांदरफळ बुद्रुक येथे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी बाळासाहेब थोरात यांनी केली. यावेळी समवेत अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामहरी कातोरे, संपतराव डोंगरे, अनिल काळे, बाळासाहेब देशमाने, अरुण गुंजाळ, सागर डोंगरे, मंगेश मतकर, रमेश गुंजाळ, विजय राहणे, दत्तू…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा राहील. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनाला उभारी मिळेल. कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे कठीण निर्णय घेणे सोपे जाईल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ: आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. व्यवसायात नवीन संधी चालून येतील, मात्र घाईने कोणताही निर्णय घेऊ नका. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. मिथुन: आज आपणास आपल्या बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल, अन्यथा विनाकारण वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढू शकतो, परंतु संयमाने परिस्थिती हाताळल्यास यश नक्की मिळेल. कर्क: कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. नवीन वस्तू किंवा वाहन खरेदीचे योग जुळून…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्याचा भौगोलिक विस्तार मोठा असून पठार भाग, प्रवरा पट्टा आणि तळेगाव पट्टा अशा तीन विभागांत हा तालुका विभागलेला आहे. पर्जन्यछायेच्या प्रदेशामुळे तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असून, उन्हाळ्याची तीव्रता वाढताच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत शासनाच्या मदतीची प्रतीक्षा न करता, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून टंचाईग्रस्त ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला आहे. एक कुटुंबप्रमुख म्हणून जनतेच्या अडीअडचणीला धावून जाण्याची आपली परंपरा थोरात यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा जपली आहे. संगमनेर तालुक्यासह उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांसाठी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, या…
संगमनेर, प्रतिनिधी – नव्या पिढीतील अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण केलेले आमदार सत्यजित तांबे यांनी मुंबई येथे संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांची प्रभावी मांडणी केली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा वारसा जपत आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या आमदार तांबे यांनी या अधिवेशनात युवकांची बेरोजगारी, महिला सुरक्षा, नाशिक-पुणे रेल्वे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. त्यांच्या या अभ्यासपूर्ण आणि आक्रमक मांडणीची सध्या राज्यभर चर्चा होत आहे. अधिवेशनातील उपस्थिती आणि कामकाजाच्या बाबतीत आमदार सत्यजित तांबे यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. १९ दिवसांच्या कामकाजापैकी १७ दिवस…
नाशिक: नाशिकमध्ये महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत नाशिक जिल्हा न्यायालयाने १ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. खरातची कोठडी संपल्याने रविवारी त्यास न्यायाधीश एम. व्ही. भराडे यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपासासाठी आणखी वेळ हवा असल्याचे सांगत तीन दिवसांच्या वाढीव कोठडीची मागणी केली, ती न्यायालयाने मान्य केली. न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, आरोपी तपासात सहकार्य करत नाहीये. खरातवर आतापर्यंत एकूण १० गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ८ गुन्हे महिलांवरील अत्याचाराशी संबंधित आहेत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने आरोपीचा मोबाईल डेटा रिकव्हर…
संगमनेर, प्रतिनिधी- येथील अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था शाखा संगमनेरच्या वतीने आयोजित ‘बोलक्या बाहुल्या’ या पपेट शो कार्यक्रमास पालक आणि बालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. सह्याद्री कॉलेजमधील के.बी. दादा देशमुख सभागृहात रंगलेल्या या कार्यक्रमात पपेट शो कलाकार संगीता पुंडगे यांनी आपल्या बाहुल्यांच्या माध्यमातून नागपंचमी, होळी, अफजलखान वधाचा ऐतिहासिक प्रसंग, लावणी, हिंदी गीते आणि देशभक्तीपर गीतांची जोड देऊन उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. मनोरंजन आणि प्रबोधनाचा हा अनोखा मिलाफ बालकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरला. या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून संगमनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे उपस्थित होत्या. तसेच संस्थेचे अध्यक्ष अनिल देशपांडे, डॉ. विवेक वाकचौरे, अरविंद गाडेकर, प्रा. अरुण लेले, दर्शन…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी अखेर पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षसह यांची पत्नी आणि व्यवस्थापक महिलेला अटक केली आहे. पोलीस चौकशीमध्ये याप्रकरणी काय माहिती समोर येते याकडे लक्ष लागले आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये संगमनेर तालुक्यातील झोळे येथील कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक मधुकर वाळे, संचालक असलेल्या त्यांच्या पत्नी कुसुम वाळे आणि व्यवस्थापक सविता हासे यांचा समावेश आहे. कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीची फसवणूक करून, तारण खताऐवजी परस्पर खरेदीखत लिहून घेतल्याच्या गंभीर आरोपाखाली पतसंस्थेच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे…
आपला मित्र कोण, यावरही एखाद्या व्यक्तीची वा संस्थेची ओळख सांगितली जाते. ज्याशी मित्रत्व करावं त्याने संकटात साथ द्यावी. स्वत:चं संकट म्हणून त्याने ते आपल्या शिरावर घ्यावं. पण मित्र तगला पाहिजे, तो जगला पाहिजे यासाठी जो प्रयत्न करतो तो खरा मित्र. याच मित्राने त्या मित्राला संकटात टाकलं तर..? तर अशी दोस्ती नसलेलीच बरी. असं राजकीय पक्षाबाबत घडलं तर ते अधिकच वाईट. उघड शत्रुत्व कधीही चांगलं. मात्र मागून वार हा कपटीपणा झाला. अशा कपटी मित्राची संगत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सातारात चांगलीच महाग पडली. ज्यांच्या मदतीने महाराष्ट्रात सत्ता राबवली त्या पक्षाच्या खांद्यावर बसून नको ते उद्योग केले की त्याची चर्चा ही होणारच. दुर्देवाने…
