Author: Annant Ppangarkar

संगमनेर, दि. ३ मार्च – प्रतिनिधी संगमनेर तालुक्याची तोडफोड करण्याच्या उद्देशाने आश्वी बुद्रुक येथे प्रस्तावित केलेल्या अप्पर तहसील कार्यालयाला संपूर्ण संगमनेर तालुक्यातून मोठा विरोध होत आहे. जोर्वे येथील ग्रामसभेत या तहसील कार्यालयातला कडकडून विरोध करण्याचा ठराव एकमताने संबंध झाला. यावेळी विखे समर्थकांनी आश्वी येथेच कार्यालय करण्याची मागणी केली. यावर संपूर्ण गावातील नागरिक महिला व युवक आक्रमक झाल्याने विखे समर्थकांनी पळ काढला. जोर्वे येथील ग्रामपंचायतच्यावतीने जुने गावातील पारावर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या ग्रामसभेत एकमताने आश्वी बुद्रुक येथे होणाऱ्या अपर तहसील कार्यालयाला विरोधाचा ठराव मांडण्यात आला. याला सर्व गावाने झालेल्या मतदानातून संमती दर्शवली. मात्र तालुक्याच्या आणि जोर्वे गावच्या कायम…

Read More

संगमनेर, दि. ३ मार्च संगमनेर तालुक्याचे महसुली विभाजन करून आश्वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालय निर्मितीचा घाट घातला गेला आहे. यावरून तालुक्यात वाद निर्माण झालेला असतानाच आता पालकमंत्री समर्थकांनी प्रस्तावित असलेले आश्वी बुद्रुक अपर तहसील कार्यालय तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांच्या प्रतिनिधींना दिले आहे. हे कार्यालय तातडीने सुरू करून या भागातील ग्रामस्थ, शेतकरी, महीला, विद्यार्थ्यांची अडचण दूर करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पंचक्रोशीतील नागरीकांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यामुळे तालुक्यातील अपर तहसील कार्यालयाचा वाद आता आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पद्मश्रीं डॉ. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, प्रवरा बँकेचे…

Read More

संगमनेर, दि. ३ मार्च आपली समिती आपली ताकद हे ब्रीद असलेल्या शिवजयंती उत्सव युवक समितीच्या अध्यक्षपदी रोहित वाळके यांची सर्वांनूमध्ये निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष रोहित बागे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नव्याने पदाधिकारी निवडी करण्यात आल्या आहे. समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली जाते याची दरवर्षी कार्यकर्त्यांना उत्सुकता असते. ग्रामदैवत असलेल्या चंद्रशेखर चौकातील मारुती मंदिरामध्ये झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. एक वर्षासाठी या निवडी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कामाची प्रेरणा घेऊन संगमनेरमध्ये सर्वपक्षीय तरुणांनी एकत्रित येत अकरा वर्षांपूर्वी शिवजयंती उत्सव युवक समितीची स्थापना केली होती. समितीच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबविले जात असून तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते.…

Read More

सोमवार, दि. ३ मार्च सोमवारी विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हातात बेड्या घालून विधानभवनात दाखल झाले. थेट बेड्या घालून आलेल्या आव्हाड यांच्यामुळे काही वेळ नेमकं काय घडलं याची चर्चा सुरू होती. आव्हाड यांनी याचं स्पष्टीकरण देत सांगितले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सरकारकडून घाला घातला जात आहे. गुन्हे दाखल केले जात आहेत. मूलभूत अधिकार शाबूत राहिले पाहिजे. यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. अमेरिकेत भारतीय नागरिकांवर अन्याय करण्यात आला आहे. त्यांना विमानात कोंबून भारतात पाठवल्या जाणं म्हणजे अपमानित करण्याचा प्रकार आहे. लोक भोगत असलेल्या यातना या बेड्यांपेक्षा कमी नाही, असं देखील ते म्हणाले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे, दि. ३ मार्च – पुणे स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपीने गुन्ह्याची कबुली देण्याऐवजी उलट पीडित तरुणीवर खळबळजनक आरोप केले होते. पीडित तरुणीला शरीर संबंधासाठी साडेसात हजार रुपये दिल्याचा आरोप करणाऱ्या आरोपीच्या बँक खात्याची पोलिसांनी तपासणी केली आहे. २६ वर्षीय तरुणीवर स्वारगेट बस स्थानकामध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली होती तसेच यंत्रणेविरोधात राज्यभर संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी नराधम दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्याला पकडून देण्यासाठी लाखभर रुपयांचे बक्षीस देखील पोलिसांनी जाहीर केले होते. आरोपी गाडे याच्या वकिलांनी पीडित तरुणीवर तरुणीवर कुठलीही…

Read More

पूर्ण ताकदीचं सरकार राज्यात वा केंद्रात असलं की सार्‍या गोष्टी सुरळीत सुरू असतात. तक्रारीविना राज्याचा गाडा हाकता येतो असं मानलं जातं. पण अनेकदा यावर पाणीही पडतं. सरकारकडे बहुमताची ताकद असून काही फायदा नसतो. कायदा करणारा आणि त्याची अंमलबजावणी करणार्‍यांमध्ये अभद्र युती झाली की कायदा सहज गुंडाळला जातो. हवे ते उद्योग करायला जो तो मोकळा असतो. हेतूमध्ये खोट असली की अशा गोष्टी होत राहणं स्वाभाविक. मात्र हेतूत बाधा नसेल तर कोणीही कितीही आगाऊपणा केला की त्याची खोड मोडणं अवघड नसते. कारवाई न करणार्‍या अधिकार्‍याला कुठलं निमित्त पुढे करता येत नाही. सध्या मजबुत असलेल्या महायुतीच्या राज्य सरकारची अवस्था अशीच काहीशी झाली आहे.…

Read More

शनिवार, दि. १ मार्च  नाशिक – आमदार देवयानी फरांदे यांनी शनिवारी नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या एका कॅफेमध्ये छापा टाकला असता समोरच्या दृश्य बघून त्यांना देखील धक्का बसला. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी यावेळी काही तरुण-तरुणींना ताब्यात घेतले असून या प्रकारामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. नाशिक शहरामध्ये अनेक गैरप्रकार सुरू असून कॅफे संस्कृतीच्या नावाखाली तरुण-तरुणींना गैरप्रकार करण्यासाठी अल्प दरात जागा उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांना कार्यकर्त्यांनी दिली होती. त्यामुळे या माहितीची पडताळणी करण्यासाठी फरांदे यांनी शनिवारी घटनेचे गांभीर्य ओळखून स्वतः कारवाई करण्याचे ठरविले. त्यांनी गंगापूर रोड परिसरातील उच्च  वस्तीत असलेल्या विद्या विकास सर्कल परिसरामध्ये असलेल्या…

Read More

शनिवार, दि. १ मार्च काँग्रेसने विधान परिषदेच्या गटनेतेपदी सतेज पाटील यांची तर विधानसभा मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख यांची निवड केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी (१ मार्च) काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या सोशल मीडिया ‘X’ अकाउंटवरून याची माहिती दिली आहे. सपकाळ यांनी म्हटले आहे की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर केल्या आहे. यामध्ये विधानसभा उपनेते म्हणून अमीन पटेल, विधानसभा मुख्य प्रतोद अमित देशमुख, विधानसभा सचिव विश्वजीत कदम, विधानसभा प्रतोद शिरीषकुमार नाईक व संजय मेश्राम, विधानपरिषद गटनेता सतेज उर्फ बंटी पाटील, विधान…

Read More

संगमनेर, दि. १ मार्च मागील तीन महिन्यापासून प्रवरा नदीकाठी तसेच पठार भागामध्ये विजेचा पूर्ण खेळखंडोबा झाला आहे. पूर्ण दाबाने पूर्ण वेळ वीज मिळाली पाहिजे, मात्र असे न होता अगदी चार तास लाईट मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नदीचे पाणी उचलता येत नाही. संगमनेर तालुक्यातील वीज पुरवठा बंद ठेवून हे पाणी पूर्वेला देण्यासाठी सत्ताधारी काम करत आहे आणि येथील नवीन लोकप्रतिनिधी त्यांच्या तालावर नाचत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यापुढे वीज व पाण्याबाबतच्या समस्या मांडल्या. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, सोमेश्वर…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुतीने लोकप्रिय योजनांच्या घोषणांचा पाऊस पाडून विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळविले. त्यातही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ गेमचेंजर ठरली. पण सत्तेत पुन्हा आल्यानंतर आर्थिक भाराची जाणीव झाल्याने महायुतीने थेट ३० टक्के खर्चकपात करण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) आमदार रोहित पवार यांनी, सरकारी आकडेवारी शेअर करत महायुतीवर टीका केली आहे. राज्य दिवाळखोरीकडे वाटचाल करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सुधारित अंदाजपत्रक निश्चित करताना, वित्त विभागाने प्रत्येक विभागाची खर्चमर्यादा ठरवून दिली आहे. त्यानुसार निवृत्ती वेतन, शिष्यवृत्ती, विद्यावेतन, सहाय्यक अनुदानित वेतन, कर्ज…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. घरात घुसून खात्मा करण्यात येईल, अशी धमकी सावंत यांना दिली आहे. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिली आहे. नागपूर येथील प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने फोन करून चार दिवसांपूर्वी इंद्रजित सावंत यांना धमकी दिली होती. या प्रकरणावरून बराच गदारोळ झाला आहे. कोरटकर सध्या फरार आहे. यातच इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी दिल्यानं त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने यूट्यूब कमेंटच्या माध्यमातून सावंत यांना धमकावले आहे. ‘सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू,’ अशी धमकी वैद्यने…

Read More

राहुल जाधव पाटील रमजान हा केवळ उपवास करण्याचा महिना नाही तर तो आत्मशुद्धी संयम आणि परोपकाराचा महिना आहे. या महिन्यात उपवास म्हणजे फक्त अन्न आणि पाणी टाळणे नसून आपल्या मनातील वाईट विचार ईर्ष्या लोभ आणि अहंकार यांना दूर करण्याचा सोहळा असतो. सकाळी लवकर जेव्हा संपूर्ण जग शांत असते तेव्हा रमजानचे पहिले किरण मनावर उमटतात. कुटुंब एकत्र येऊन सेहरी घेतात. त्या क्षणी एकत्र असण्याचा आनंद डोळ्यांच्या कडा ओलावणारा असतो. असे कितीतरी लोक आहेत ज्यांना एकवेळचे अन्न मिळविण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. उपवासात केवळ भुकेची जाणीव होत नाही तर भुकेच्या वेदना सहन करणाऱ्या गरिबांचे दुःखही मनाला जाणवते. दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी जेव्हा अजानचा…

Read More

संगमनेर, दि. २८ फेब्रुवारी  एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या सीटवर गळ्यातील मंगळसूत्रामधील मनी पडले असता महिलेला आपल्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र गायब झाल्याचे लक्षात आले. गुरुवारी (२७ फेब्रुवारी) संगमनेर बस स्थानकावर हा प्रकार घडला. संगमनेर बस स्थानकामधून महिलांच्या गळ्यातील दागिने वारंवार चोरी जात आहे. दागिने चोरट्यांचा शोध लागत नसल्याने चोरट्यांचे मनोधैर्य वाढले असून दिवसाढवळ्या ते महिलांच्या गळ्यातील दागिन्यांच्या चोऱ्या करत आहे. दागिने चोरट्यांसाठी संगमनेर बस स्थानक आणि बसस्थानकावरील गर्दी फायद्याची ठरत आहे. बस स्थानकावर असलेल्या एखाद-दोन पोलिसांचा डोळा चुकवून बस स्थानकावरील सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीतही चोऱ्या होऊ लागल्याने संगमनेरचे बस स्थानक महिलांसाठी असुरक्षित बनू लागले आहे. संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील…

Read More

नागपूर : जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने याचिकाकर्ता मुलाच्या वडिलांना जातवैधता प्रमाणपत्र दिले, त्याच्या भावाला आणि बहिणीला देखील दिले. मात्र याचिकाकर्ता मुलाने समितीकडे अर्ज केल्यावर कागदपत्रे पुरेशी नसल्याचे कारण सांगून अर्ज नाकारण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समितीच्या या कृतीला बेकादेशीर ठरवत वडील, भाऊ-बहिणीकडे जातवैधता असताना समितीने इतर कागदपत्रे तपासण्याची गरजच नव्हती, असे निरीक्षण नोंदवले आणि समितीचा आदेश रद्द केला. तसेच एका महिन्यात याचिकाकर्त्याला जातवैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देशही मुख्य न्या. आलोक आराध्ये आणि न्या. अविनाश घरोटे यांच्या खंडपीठाने समितीला दिले. ऋषी बळवंत दडमल या विद्यार्थ्याने नागपूरच्या जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ‘माना’ जनजाती समूहाचे जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अर्ज केला होता.…

Read More

नीरज बाबासाहेब गाढे –  साडेतीन शक्तिपीठं एकाच ठिकाणी असल्याची मान्यता अहिल्यानगरमध्ये आहे. कोल्हारचे भगवती माता मंदिर हे साडेतीन पीठांचं शक्तिस्थान म्हणून ओळखलं जातं. तसेच प्रभू श्री राम यांनी वनवासात असताना येथे स्थापित केलेले वाळूचे शिवलिंग पुढे जाऊन कोल्हाळेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. याच सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या कोल्हार भगवतीपूर येथे ७ मे १९५९ रोजी राजेंद्र शिवाजीराव गाढे यांचा गाढे पाटील कुटुंबात जन्म झाला. पुढे “गाढे काका” या नावाने संगमनेर, घुलेवाडी परिसरात ओळखले जाणारे हे सुंदर नेतृत्व २४ फेब्रुवारी २०२५ रोजी अल्पशा आजाराने काळाआड गेले व सर्वांचे आवडते, सर्वाना प्रेरणा देणारे, सामाजिक कार्यक्रमांमध्ये आवर्जून भाग घेणारे, कुठेही भेटल्यावर पोटभरून गप्पा…

Read More

पुणे, दि. २८ फेब्रुवारी  २६ वर्षीय तरुणीवर स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये अत्याचार करणाऱ्या आरोपीला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. पुणे पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला त्याच्या गावातून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली. स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर बसमध्येच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणी आरोपी दत्ता गाडे हा दोन दिवसांपासून फरार होता. फरार असलेल्या आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी आरोपीवर १ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. बड्या राजकीय नेत्याच पोरग तीन तासात सापडतं आणि अत्याचार करणारा नराधम आरोपी…

Read More

संगमनेर, दि. २७ फेब्रुवारी विधान परिषदेच्या उपसभापती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या बद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत गुरुवारी संगमनेरमध्ये राऊत यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत प्रतिमा दहन करण्यात आली. बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा बाहेर महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केले. यावेळी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेध करण्यात आला, अशी माहिती संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या प्रसिद्धी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. यावेळी आमदार खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख कावेरी नवले, भाजपाच्या ओबीसी महिला मोर्चाच्या सरचिटणीस पायल…

Read More

संगमनेर, दि. २७ फेब्रुवारी –  मोठा गाजावाजा करत संगमनेर नगरपरिषदेने पोलिसांच्या मदतीने संगमनेरमधील पाच कत्तलखाने नेस्तनाबूत केले असले तरी देखील संगमनेरात अद्यापही गोवंश हत्या सुरूच आहे. संगमनेरमधील कत्तलखान्यावर थेट अहिल्यानगर एलसीबीने कारवाई केली आहे. मंगळवारी करण्यात आलेल्या या कारवाईत १२०० किलो गोमांसासह तब्बल नऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संगमनेरमधील जमजम कॉलनीमध्ये अब्दुल समद कुरेशी याच्या पत्राच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची व कत्तलीसाठी जनावरे डांबून ठेवल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, अशोक लिपणे, मनोज लातूरकर, विशाल तनपुरे यांनी माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी एका पत्राच्या शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने गोवंश जनावरे…

Read More

संगमनेर, दि. २७ फेब्रुवारी – महिलांवरील अन्याय अत्याचाराविरोधात काम करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील महिलांकडून जागृत महिला मंचची स्थापना करण्यात आली आहे. मंचच्या अध्यक्षपदी तळेगाव येथील साक्षी दिघे, उपाध्यक्षपदी नांदुरी दुमाला येथील अर्चना शेळके, सचिव पदी पेमगिरी येथील अर्चना वनपत्रे यांची निवड करण्यात आली आहे. सुनिता रोहिदास खताळ (धांदरफळ खुर्द), मंदा निळे (मिर्झापूर), ज्योत्स्ना कदम (संगमनेर), लक्ष्मी तूपसुंदर (गुंजाळवाडी), शितल पांडे (पिंपळगाव माथा), मुक्ता सांगळे, लता सावंत (पिंपळगाव माथा), निर्मला दिघे (तळेगाव) यांचे तालुका कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली आहे. लोकपंचायत संस्थेच्या बहिणा प्रकल्पांतर्गत महिला अत्याचाराविरोधात काम करणाऱ्या महिलांनी एकत्रित येत मंगळवारी संगमनेर खुर्द येथे झालेल्या बैठकीत या संगमनेर शाखेची स्थापना केली. बैठकीसाठी…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर बसमध्येच अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट डेपोमधील सुरक्षा रक्षकांच्या केबीनची तोडफोड केली. यानंतर शिवसैनिकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. यावेळी स्वारगेट बस डेपोत शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. “आम्हाला पंधराशे रुपये नको पण, सुरक्षा द्या” असं म्हणत या महिलांनी जोरदार आंदोलन करत राज्याचे मुख्यमंत्रीही असणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. स्वारगेट डेपोमध्ये जिथं सुरक्षा रक्षकांची केबीन आहे. त्याच्या समोरच ही बस उभी होती. त्यामध्ये महिलेवर अत्याचाराची…

Read More